KAREN ROSE

About Author

Birth Date : 29/07/1964


A WORLDWIDE READER FAVORITE AND WINNER OF THE PRESTIGIOUS RITA AWARD, KAREN ROSE WAS BORN, RAISED AND EDUCATED IN WASHINGTON, DC. IT TOOK PLACE IN A NEARBY TOWN IN MARYLAND. HER FIRST MYSTERY NOVEL, DONT TELL ME, WAS RELEASED IN JULY 2003. SINCE THEN, HER ONE LONG STORY AND TEN NOVELS HAVE BEEN PUBLISHED. SHE WON THE 2005 RITA PRIZE FOR BEST MYSTERY WRITER FOR HER THIRD NOVEL, IM WATCHING YOU. .

जगभरातील वाचकांच्या पसंतीस उतरलेली व रिटा या सन्माननीय पारितोषिकाची विजेती करेन रोझ हिचा जन्म, बालपण व शिक्षण वॉशिंग्टन डी.सी. नजीकच्या मेरीलँड या शहरात झाले. जुलै, २००३ मध्ये डोंट टेल मी ही तिची पहिली रहस्यमय कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यानंतर आतापर्यंत तिची एक दीर्घकथा व दहा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आय अ‍ॅम वॉचिंग यू या तिच्या तिसऱ्या कादंबरीसाठी तिला २००५ सालाचे सर्वोत्कृष्ट रहस्यमय लेखीकेचे रिटा पारितोषिक मिळाले. कोणत्याही कथेचा शेवट हा नेहमी सुखद असावा असे माझे मत आहे. करेन म्हणते, आणि मला वाटते की वाचकांनाही असाच शेवट आवडतो. खऱ्या आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात की जगणे मुश्किल होऊन जाते. अशा वेळेस वाटते की हळुच अशा एका प्रदेशात निघून जावे की जिथे अखेरच्या वळणावर गुलाबांचे ताटवे पसरलेले असतील. मला आशा आहे की माझ्या कथा, माझ्या वाचकांनाही अशीच एक हवीहवीशी वाटणारी सुरेख वाट मिळवून देतील.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
DIE FOR ME Rating Star
Add To Cart INR 500
TBC Classic Book
I CAN SEE YOU Rating Star
Add To Cart INR 995
TBC Classic Book
SCREAM FOR ME Rating Star
Add To Cart INR 480
TBC Classic Book

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more