* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SANGE VADILANCHI KIRTI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660517
  • Edition : 12
  • Publishing Year : NOVEMBER 1973
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OT;GAUTAM BUDDHA, LAOTSE AND CONFUCIUS WERE SITTING TOGETHER IN THE HEAVEN. THE TIMEFAIRY CAME OVER THERE WITH THREE GLASSE. ALL THE THREE GLASSES WERE FULL UP TO BRIM. SHE OFFERED THEM TO THE TRIO. GAUTAM BUDDHA REFUSED THE GLASS SAYING THAT LIFE IS FULL OF SADNESS. LAOTSE ACCEPTED THE GLASS SAYING THAT “NOW THE GLASS IS ALREADY BEEN OFFERED, LET ME TASTE IT”. CONFUCIUS JUST ACCEPTED THE GLASS.”IF “ASHTAVAKR” REACHES THE HEAVEN THEN WHAT WOULD BE HIS REACTION?”, ONE DISCIPLE ASKED OSHO. OSHO ANSWERED, HE WILL ACCEPT THE DRINK AND THEN FINISH OFF THE TIMEFAIRY TOO AS SHE HERSELF IS TIME, “SAMAY”. THE JUICE IN THE GLASS IS LIFE ITSELF. THE FULLNESS OF THE GLASS INDICATES THAT LIFE IS FULL OF JUICES OR THE JUICE IS FILLED IN THE GLASS OF LIFE. TO ENJOY THE JUICE MEANS TO ENJOY LIFE, TO CONQUER OVER TIME. EVERY MOMENT OF OUR LIVING IS FULL OF VIGOUR AND VITALITY, TO ENJOY IT MEANS TO WIN OVER LIFE. IF YOU MISS EVEN A SINGLE SECOND THEN YOU MISS THE HAPPINESS IN IT TOTALLY, FOREVER. J. KRISHNMURTI CALLS THIS AS AWARENESS. IF WE ARE AWARE THEN WE CAN KEEP OUR EYES OPEN TO EACH AND EVERY MOMENT OF PRESENT. THAT SINGLE MOMENT WILL TEACH US TO INVEST AND SPEND PROPERLY. THOSE PEOPLE WHO COME ACROSS SUCH AWARENESS NEVER REPENT IN LIFE FOR ANYTHING. I CONSIDER MYSELF TO BE VERY LUCKY AS I GOT AN OPPORTUNITY TO MEET SUCH A PERSON IN MY LIFE; FIRST IT WAS MY FATHER AND LATER ON IT WAS DR. SURESHCHANDRA NADKARNI WHO ACTUALLY FINISHED THE TIMEFAIRY. I NEVER CAME ACROSS THE TIMEFAIRY, BUT MY FATHER HAD DRANK TO THE LAST DROP OF LIFEJUICE FROM THE GLASS OF LIFE, HAD ENJOYED IT, HAD STRIVED FOR IT; AND ME? I HAD WITNESSED IT. IT WAS DR. NADKARNI WHO WAS DITTO LIKE MY FATHER; THIS BOOK WHICH IS WRITTEN IN THE MEMORIES OF MY FATHER IS DEDICATED TO HIM." VA PU. "VASANTA; ANNA KALE”S LUCKY SON. ANNA HIMSELF WAS A VERY LUCKY PERSON. HE HAD A BEAUTIFUL COMMAND OVER BRUSH AND THE PEN. VASANTA WAS ALWAYS MORE CLOSE TO THE PEN. BUT BOTH FATHER AND SON HAD SAME ADDICTION; DRAMA AND THE PEOPLE RELATED TO IT. I AM NOT SURPRISED TO SEE THAT THE THIRD GENERATION HAS CONTINUED WITH THE TREND. ANNA”S GRANDSON SUHAS IS ACQUIRING NAME AND FAME AS AN ACTOR AT THE VERY YOUNG AGE AND ALSO HAS A SMOOTH HAND OVER THE BRUSH. SUHAS MIGHT BECOME A SINGER IF PURSUED PROPERLY. ANNA WILL BE 87 YEARS OLD NOW AND WE WISH THAT VERY SOON WE GET A CHANCE TO CELEBRATE THE CENTURY. THOUGH HE IS VASANTA”S FATHER, FOR ALL OF US DRAMATIST HE IS NO LESS THAN OUR FATHER.HE MAINLY WORKED AS A DRAPER AND MANY OF US HAD HAD IT AS THE BACKGROUND. OVER THE YEAR, ANNA AND HIS DRAPERY BOTH HAVE STOOD FIRMLY BEHIND US. HE ALWAYS PASSESSED EVER FRESH ATTITUDE. VASANTA IS LUCKY TO HAVE A FATHER WHO GAVE HIM NOT ONLY GUIDANCE, SUPPORT, BUT A WHOLE LOT OF FRIENDSHIP. HE WAS THE BEST FRIEND OF HIS SON. HE WAS HIS SON”S ROOM PARTNER IN ALL SENSE. HE TRAVELLED BETWEEN PUNE AND MUMBAI THROUGHOUT HIS LIFE. WITH DUE RESPECT, HIS DAUGHTER AND DAUGHTERINLAW ALSO ENJOY TEASING HIM, CAN BE FRIENDS WITH HIM. HE IS SO SWEET BY NATURE THAT HIS KIDS HAVE FORGOTTEN THAT HE CAN SCOLD TOO. EVEN TODAY, MANY A FAMILIES WONDER WHAT IT IS LIKE FOR THE “PA” TO BE FRIENDLY WITH THEM. HIS APPEARANCE IS VERY SIMPLE; THE ART STUDENTS DRESS UP MORE COLOURFULLY THAN HIS PAINTINGS. HE DRESSES ACCORDING TO THE OLD TRENDS BUT COLOURS BEYOND THE SET NORMS. DRAPERY COLOURING IS TIRING MENTALLY AS WELL AS PHYSICALLY; BUT AT THE AGE OF 80, ANNA COLOURED THE DRAPERY FOR THE JUNGLE, PALACE ETC. FOR BALGANDHARVA NATYA MANDIR AT PUNE, IN HIS OWN STYLE. ART ITSELF HAS A FLOW, CREATIVITY, AN INNOVATIVE TREND. ANNA FOLLOWS THE STYLE OF ANANDRAOJI PAINTER. THE STAGE RECOGNIZES THE IMPORTANCE OF TRENDS IN DRAMA AND IN DRAPERY TOO. ANNA IS A MASTER OF IT. I AM VERY MUCH FOND OF ANNA”S DRAPERY AND WRITING. HIS HAND MOVES SWIFTLY AND DELICATELY OVER THE CANVAS AND THE PAPER BUT EQUALLY OVER HIS FRIENDS” BACKS”“. "PU. LA. DESHPANDE".  
व.पु. काळे हे महाराष्ट्राला एक कथालेखक आणि कथाकथनकार म्हणून सुपरिचित आहेत. व.पु.ंचे वडील पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचं रूढ अर्थाने चरित्र म्हणता येईल अशा पद्धतीने वपुंनी चरित्र लिहिलं नसलं तरी वडिलांना केंद्रस्थानी ठेवून अंत:करणपूर्वक लिहिलेलं पुस्तक आहे, ’वपु सांगे वडिलांची कीर्ती.’ वपुंचे वडील उत्कृष्ट नेपथ्यकार होते. नाटक आणि चित्रपटांसाठी पडदे रंगवणं हे त्यांचं काम. वपुंची आई (वपु आणि त्यांची बहीण आईला ताई म्हणत), त्यांची मोठी बहीण सिंधूताई आणि वपु स्वत: असं हे चौकोनी कुटुंब. वपु आणि सिंधूताई वडिलांना ’अण्णा’ असं संबोधत. अण्णा मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरमध्ये नोकरी करत. मुंबईला मित्राच्या घरी ते राहत. कुटुंब मात्र पुण्याला होतं. महिन्या दोन महिन्यांनी दोन दिवस रजा घेऊन किंवा एखाद्या शनिवार-रविवारी ते पुण्याला येत. त्यावेळेला वपु आणि त्यांची बहीण शाळकरी वयात होते. नंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईच्या एका चाळीत घर घेतलं आणि वपु, सिंधूताई व ताई मुंबईला रवाना झाले. आता सगळं कुटुंब एका ठिकाणी राहू लागलं. वपु अणणांबद्दल सांगताना कधी वर्तमानात असतात, तर कधी भूतकाळात जातात; मात्र अण्णांच्या जीवनातील घटना-प्रसंगांचं वर्णन करण्यापेक्षा अण्णांची स्वभाववैशिष्ट्यं सांगण्याकडे त्यांचा कल दिसतो. नेपथ्याचं काम अण्णा किती तन्मयतेने आणि कुशलतेने करत याबद्दल ते सांगतात. तसेच एक वडील म्हणून त्यांचं आपल्याशी कसं नातं होतं, हेही सांगतात. मिश्किलपणा, काहीसा हळवेपणा, ओढठास्तीच्या आर्थिक परिस्थितीतही त्यांचं आनंदी राहणं, काटकसरीपणा, कष्टाळूपणा, वक्तशीरपणा, कधीही कोणाबद्दलही तक्रार करायची नाही किंवा केलीच तर ती वेगळ्या पद्धतीने करायची . त्यांची स्वभाववैशिष्ट्ये वपु नोंदवतात. अण्णा केवळ नेपथ्यकारच नव्हते तर ते लेखनही करायचे, मंगलाष्टकं रचायचे. वेगवेगळे अल्बम्स करायचा छंद त्यांना होता. वपुंच्या काही कथांची शीर्षकंही अण्णांनी सुचवली आहेत. ते रोजनिशी लिहित. त्यांच्या नेपथ्यातील बारकावे, जिवंतपणा आणि कुशलता दर्शवणारे काही प्रसंग वपुंनी सांगितले आहेत. ललितकलादर्शसाठी अण्णांनी केलेल्या कामाचा उल्लेख आणि त्यांचा त्या संस्थेशी असलेला ऋणानुबंध याबद्दलही वपुंनी लिहिले होते. राजकमल आणि ललितकलादर्श या दोन्ही संस्थांच्या यशस्वितेमध्ये अण्णांचंही योगदान महत्त्वाचं होतं; पण त्या संस्थांनी अण्णांची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही; उलट व्ही. शांताराम आणि भालचंद्र पेंढारकर यांनी अण्णांच्या बाबतीत जी अनास्था दाखवली त्याबाबतची नाराजी वपुंनी व्यक्त केली आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    व. पु. काळे या नावाच्या माझ्या तरुण मित्राला कसले म्हणून ग्लॅमर नव्हते. अशा काळापासून मी ओळखतो आहे आणि एकपरीने त्याच्या अनोख्या मार्गक्रमणातील चढउतारांचा मी साक्षी आहे. त्याच्या कथाकथनाचे आरंभापासून तो अगदी कालपरवापर्यंतचे अगणित कार्यक्रम मी वेळोवेळीमोठ्या कुतूहलाने पाहिले, ऐकलेले आहेत आणि तो केवळ अव्वल श्रेणीचा लोकप्रिय कथाकथन आहे म्हणून त्याची व त्याच्या कथांची आजवर कधी मी अवहेलना केलेली नाही आणि तूर्त त्याच्या एकपरीने अभूतपूर्व अशा पुस्तकाच्या परिचयासाठी म्हणून मी हे लिहित असलो, तरी गेल्या कित्येक दशकांपासून जपलेले आमचे जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध लपवण्याचे वा तटस्थ अलिप्तपणाचे सोंग आणण्याचे काही कारण आहे, असे मला वाटत नाही. पहिल्यापासूनच वेळोवेळी वपु आपली कित्येक महत्त्वाची पुस्तके भेट म्हणून मला देत आलेले आहेत आणि त्यांच्या दोन-तीन पुस्तकांची अशीच परिचायक परीक्षणे अधूनमधून केव्हा तरी लिहिल्याचे स्मरते. पण ही घटनाही कित्येक वर्षांपूर्वीची आहे आणि कथाकथक म्हणून अलौकिक असा लौकिक ज्याला तूर्त लाभला आहे. त्याच्या कथापुस्तकांवर काही लिहिण्यापेक्षा त्याच्या तदितर अन्य स्वत्वविशेष अशा पुस्तकांविषयी लिहिण्यात मला अधिक रस व स्वारस्य आहे. वपु सांगे वडिलांची कीर्ती वपु काही दिवसांपूर्वी माझ्या घरी आले ते अशीच वेगळ्या प्रकारची दोन पुस्तके एकदम भेट म्हणून मला देण्यासाठी. ही दोन्ही पुस्तके वेगवेगळ्या कारणांसाठी तशी एक प्रकारे अभूतपूर्व उल्लेखनीय आहेत. पैकी पहिले जे आहे ते ‘वपु सांगे वडिलांची कीर्ती’ पण या नावातील ‘वपु’ हा पहिलाच शब्द वगळला, तर सांगे वडिलांची कीर्ती’ या वपुंच्या पूर्वप्रसिद्ध पुस्तकाची (पुन्हा एकपरीने) ही दुसरी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती पुलांच्या प्रस्तावनेमुळे आणि त्या प्रस्तावनेतील दुर्मिळ असा सहजाभिप्राय एकदम पटण्यासारखा असल्यामुळे जिज्ञासू वाचकांच्या स्मरणात आजही ताजी असेल. पण त्याच पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती असली, तरी त्या पूर्वावृत्तीचे ही दुसरी आवृत्ती म्हणजे काही शब्दत: पुनर्मुद्रण नव्हे. कारण या दुसऱ्या आवृत्तीच्या अखेरीस आता तब्बल बारा वर्षांनंतर वपुंनी तब्बल पत्तीस पृष्ठांचे एक नवेच प्रकरण ‘का?’ नावाचे जे जोडलेले आहे. ते पहिल्या आवृत्तीच्या वाचकांनासुद्धा सकारण विलक्षण मनोरंजक वाटेल, असे आहे आणि खरे तर त्याविषयी जरा हात झाडून मोकळेपणाने लिहायला मला फार आवडले असते. कारण मूळ पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीतील एकूण एक सर्व प्रकरणे वपुंनी आपल्या सदादक्ष वडिलांच्या सदैव जागत्या पहाऱ्यात बसून लिहिली होती. आणि म्हणून लिहिलेली होती ती फार फार हात राखून हे वाचकांनासुद्धा सहज जाणवण्यासारखे होते. अर्थात त्यातही सूचक तपशील तसे पुष्कळच होते. पण ज्यांची कीर्ती वपु सांगत होते, ते त्यांचे तीर्थरूप वडील चित्रकार पु. श्री. काळे, तसे ते इतके मितभाषी की सहसा कधीच काही न बोलणारे, अकारण कृतज्ञतेची जपमाळ सतत ओढणारे आणि सहनशील सोशिकतेने स्वत:पेक्षाही सत्वाला अधिक मानणारे असे सद्गृहस्थ असल्यामुळे स्वत:विषयी आपल्या मुलाने लिहिलेल्या प्रत्येक शब्दाशब्दावर सक्त नजर ठेवून असत आणि त्यांच्या सच्छील वृत्तीला रुचणार नाही, असा एक शब्दसुद्धा त्यांच्या त्या स्मरणलेखनातून ते कटाक्षाने कटाप करीत असत आणि तोही मुकाट्याने आपल्या ‘वडिलांची कीर्ती सांगत’ असला, तरी त्यांची प्रत्येक आज्ञा तो प्रमाण मानीत असे. पण वडील गेल्यावर त्यांनी पूर्वी प्रतिबंध केलेले खरे ते सारे निर्भयपणे सांगून टाकायला आपण आता मोकळे झालो, अशा भावनेने वपुंनी हे जे अखेरचे प्रदीर्ष असे नवे प्रकरण लिहिले आहे. ते मुळातूनच समग्र वाचण्यासारखे आहे. यासाठी की समाजात मोठी मानमान्यता पावलेली सिनेमा नाटकातील लब्धप्रतिष्ठित माणसे खाली मान घालून सचोटीने व कर्तव्यबुद्धीने काम करणाऱ्या या थोरल्या काळ्यारख्या सालस व्यक्तीशी किती कल्पनातीत अशा कृतघ्न क्षुद्रपणाने वागू शकतात, त्याची यथातथ्य कल्पना यावी. पण वपुंच्याच आग्रहाखातर त्यांच्याच एका जुन्या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती म्हणून विचारात न घेता त्यांचे जे नवे कोरे पुस्तक आहे. ‘कथाकथनांची कथा’ त्याच्या परिचयाकडे आता काहीशा अनिच्छेने पण तरीही उत्साहाने वळले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more