* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184989182
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 200
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.SANJAY DHOLE COMBO SET - 13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THERE SHOULD NOT BE ONLY FANTASY IN THE SCIENTIFIC STORIES, OR SCIENCE JUST FOR TASTE. THERE SHOULD BE NEW, MODERN IDEAS OF SCIENCE, FACTUAL SCIENCE, THEORIES, ALSO A TOUCH OF BASIC SCIENCE. ALONG WITH THIS, SOME MODERN EXPERIMENTS, RULES, SCIENCE AND TECHNOLOGY IN PRESENT AND NEAR FUTURE, SHOULD ALSO BE INCLUDED IN IT. IMPORTANCE SHOULD BE GIVEN TO BOTH – SCIENCE AND FICTION AS WELL, THUS, READERS SHOULD EXPERIENCE THE DOUBLE BONANZA. DR. SANJAY DHOLE’S SCIENTIFIC STORIES FIT EXACTLY IN THE ABOVE STATED CRITERIA. HIS STORIES CROSS THE BOUNDRIES OF HARDCORE SCIENTIFIC STORIES, AS THEY SPREAD AWARENESS AND INFORMATION ABOUT SCIENCE AND MAKE READERS TO THINK ON IT, WISELY ! HIS STORIES ARE BASED ON VARIOUS SCIENTIFIC IDEAS. HIS “PARIVARTAN” STORY IS BASED ON THE ORIGIN OF CELLS AND “MOHIM FATTE” IS BASED ON ITS RESEARCH. “KOLISHTAK” IS BASED ON SPIDER FARMING. “AKALPIT” IS BASED ON THE HARMFUL EMISSIONS FROM THE RAYS. “SANKARIT” IS BASED ON EFFECTS OF PURPOSIVELY CHANGES IN THE GENES. “ASTITVA” DESCRIBES AN UNIMAGINABLE EXPERIMENT ON A HUMAN BEING. “UDHVASTA” IS BASED ON THE INFLAMMABLE CHARACTERISTIC OF FIRE, AND “AKHER TO PARATALA” IS BASED ON A CANVAS OF MEMORIES.“SOCKER” IS BASED ON FOOTBALL. “VICHARVAHAN” IS BASED ON THE PRODUCTION AND INFLUENCE OF VARIOUS THOUGHTS IN A HUMAN’S BRAIN. “DURGAMYA” IS BASED ON ‘TUNNELING EFFECT’ IN PHYSICS. HE HANDLES VARIOUS SCIENTIFIC SUBJECTS IN AN EFFORTLESS MANNER AND NARRATES BOTH THE SIDES OF THE COIN , EXPLANING THE BOON AND THE CURSE PART OF SCIENCE. HIS STORIES MAKES US THINK ON A HIGHER LEVEL. HIS STORIES ARE SAID TO BE RATIONAL AND UNIQUE !!
विज्ञानकथेत विविधांगी विषय हाताळलेले असून, एखादं विज्ञान, प्रयोग किंवा त्यांचे निष्कर्ष मानवाच्या जेवढ्या भल्यासाठी वापरता येऊ शकतात; तेवढाच त्या विनाशालाही कारणीभूत ठरू शकतात. ‘परिवर्तन’ ही कथा मूळपेशींवर आधारलेली असून ‘मोहीम फत्ते’मध्ये त्यांच्या शोधावर आधारीत आहे. ‘कोळिष्टक’ ही कथा ‘स्पायडर फार्मिंग’ व त्यांच्या जनुकावर आधारलेली आहे. तर ‘अकल्पित ’ ही कथा किरणोत्सारीतून निर्माण होणाऱ्या समस्येवर आधारलेली आहे. ‘संकरित’ ही कथा जनुकांमध्ये हेतुपुरस्सर बदल घडवून आणल्यानंतरचे परिणाम दर्शविते तर ‘अस्तित्व’मध्ये वैद्यकशास्त्रात मानवावरील विधायक प्रयोग दाखविलेला आहे. ‘उद्ध्वस्त’ ही कथा पदार्थाच्या ‘दीपन’ या गुणधर्मावर असून, ‘अखेर तो परतला’ ही कथा स्मृतिपटलांवर आधारित आहे. ‘सॉकर’ ही कथा फुटबॉलच्या रोमांचक खेळावर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून भाष्य केलेली आहे. ‘विचारवहन’ हे मानवी मेंदूतील प्रक्षेपित होणाऱ्या क्षीण लहरींवर आधारलेले आहे. शिवाय ‘दुर्गम्य’ ही कथा भौतिकशास्त्रातील ‘टॅनेलिंग इफेक्ट’वर आधारित आहे.
* सार्वजनिक वाचनालय, नासिक - पु.ना.पंडित पुरस्कार २०१५ . * विज्ञान मित्र पुरस्कार - स्नेहवर्धन प्रकाशन - २०१५.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SANKARIT #SANKARIT #संकरित #SCIENCEFICTIONMARATHI #DR.SANJAYDHOLE #डॉ.संजयढोले "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 17-01-2016

    कल्पनावैविध्याला नैतिकतेची जोड... विज्ञानकथेत विविधांगी विषय हाताळलेले असून, एखादं विज्ञान, प्रयोग किंवा त्यांचे निष्कर्ष मानवाच्या जेवढ्या भल्यासाठी वापरता येऊ शकतात; तेवढाच त्या विनाशालाही कारणीभूत ठरू शकतात. ‘परिर्वन ही कथा मूळपेशींवर आधारलेली आह. ‘कोळिष्टक’ ही कथा ‘स्पायडर फार्मिंग आणि त्यांच्या जनुकावर आधारलेली आहे. ‘संकरित’ ही कथा जनुकांमध्ये हेतुपुरस्सर बदल घडवून आणल्यानंतरचे परिणाम दर्शविते तर ‘अस्तित्व’मध्ये वैद्यशास्त्रात मानवावरील विधायक प्रयोग दाखविलेला असून, ‘अखेर तो परतला’ ही कथा स्मृतिपटलांवर आधारित आहे. ‘सॉकर’ ही कथा फुटबॉलच्या रोमांचक खेळावर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून भाष्य करणारी आहे. ‘विचारवहन’ हे मानवी मेंदूतील प्रक्षेपित होणाऱ्या क्षीण लहरींवर आधारलेले आहे. शिवाय, दुर्गम्य ही कथा भौतिकशास्त्रातील टॅनेलिंग इफेक्टवर आधारित आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more