* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664621
  • Edition : 6
  • Publishing Year : JULY 2004
  • Weight : 375.00 gms
  • Pages : 256
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
HUMAN LIFE IS FULL OF VARIOUS FEELINGS LIKE LOVE, HATRED, HAPPINESS, SORROW, JEALOUSY, CRITICISM, PRAISE, DEFORMITIES, INTELLIGENCE, BEAUTY AND SO MANY OTHER THINGS. THE ARTICLES IN THIS BOOK MAINLY REVEAL THE FACTS AND FACTORS BEHIND THESE WHILE THEY ALSO DISCUSS THE BASIC PRINCIPLES OF LIFE, THE ORIGINAL ATTITUDES, THE MENTALITY, AND ALSO THE DIRECTIONS OF LIFE. HE USES SIMPLE INCIDENTS AND EVENTS OF LIFE TO REVEAL THIS. THESE ARTICLES REVEAL THE MATURED, BALANCED, SENSITIVE, YOUNG MIND SEARCHING THE ACHILLES HILL OF LIFE; AND REFLECT UPON HIS ATTRACTIVE PERSONALITY. EACH ARTICLE IS A SHORT ONE, YET IT HAS THE CAPACITY TO CAPTIVATE THE MINDS READING IT, COMPELLING THEM TO THINK. HIS SUCCESS AT THE VERY FIRST ATTEMPT IS ASTONISHING. ANAND YADAV.
मानवी जीवनातील राग, लोभ, सुख-दु:ख, द्वेष-मत्सर, निंदा-स्तुती, विकृती-सुकृती, बुद्धीचे स्थान, सौंदर्याचे मर्म, यशस्वी जीवनाची दिशा इत्यादी मूलभूत वृत्ती-प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारे शैलीदार असे हे ललित लेख आहेत. ते अतिशय शहाण्या शैलीत, दृष्टांत-उपमादी अलंकाराच्या, घटना-प्रसंगांच्या माध्यमातून आविष्कृत केलेले आहेत. लेखकाचे एक प्रौढ, संतुलित, संवेदनशील, सर्वागांनी जीवनाचे मर्म शोधणारे चिरतरुण मन आणि आकर्षक, मोहक व्यक्तिमत्व या लेखांतून व्यक्त होते. अतिशय छोटेखानी स्वरूपाचे हे लेख मनाचा ठाव घेणारे, त्याला गुंगवून टाकणारे, पदोपदी वाचकाला विचारप्रवृत्त करणारे आहेत. पहिल्याच पुस्तकाचे त्यांचे हे यश विलक्षण वेधक ठरावे, अशा योग्यतेचे आहे. - आनंद यादव
स्वामीकार रणजित देसाई पुरस्कार २००५ .
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #YASUKHANO #YASUKHANO #यासुखांनो #ESSAYSMARATHI #SURESHVASANTNAIK "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVA KAL 10-12-2007

    ‘सुखी कसे व्हाल? आपला मार्ग! या सुखांनो... मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित व सुरेश वसंत नाईक लिखित ‘या सुखांनो...’ हे पुस्तक मानवाला जगण्याची नवसंजीवनी देणारे आहे. सध्याचा जमानामानव संसाधनाचा विकास (Human Resource Development) तसेच मानवी संबंधाचा (Huan Relationship) आहे. याबाबत पाश्चिमात्त्य व जपानीच संस्कृतीवर आधारित निरनिराळी पुस्तके, प्रशिक्षिण व शिबिरे भारतात घेतली जातात. निरनिराळ्या उद्योगांत कामगारांपासून उच्चवर्गीय अधिकाऱ्यांपर्यंत परदेशी संस्कृतीतील विचार पोहोचण्याचा आटापिटा चालतो. निरनिराळ्या पंचतारांकित हॉटेल तसेच हिलस्टेशनला याबाबत कार्यक्रम घेतले जातात. याचीच फलश्रुती म्हणजे दिवसरात्री उद्योगाठिकाणी काम करून उत्पादनवाढ भरमसाठी पगारवाढ पण प्रत्यक्षात कामगार व अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत जीवनात दूरदर्शनवरील निरनिराळ्या मालिकात दाखवले जाणारे नात्यातील ताणतणाव्, जीवनातील एकाकीपणा, वाढत जाणारी वैफल्यभावना व एकमेकांतील जीवघेणी जीवनस्पर्धा बहुतेक प्रमाणात येतात. आईवडील मग विभक्त कुटुंबपद्धती अनुसरून आपल्या मुलांना पण जीवघेण्या स्पर्धांमध्ये उतरवतात. अशा वेळी मानवी जीवनातील आश्वासक जीवनमूल्ये देणारे कोणी हवे असते. मानवी जीवनातील आनंद, सुरक्षितपणाची घट्ट भावना, श्रद्धा, भक्ती, विवेक इत्यादी बाबत सुसंस्कार माणसाला हवे वाटतात. खरे तर मानवी जीवनाला फक्त पैसा नको असतो. हवे असते ते जीवनाचे सौंदर्य, निखळ आनंद, सुहास्य, रोजच्या दैनंदिन कामकाजात निर्लेप विनोदाच्या साहाय्याने विचारांचे प्रदूषण टाळून सुख आपल्या दारात आणायचे आहे ते आपल्याला सांगितले आहे. वेदपुराणात संत साहित्यातील उदाहरणे आणि विचार जे ज्ञान या पुस्तकातून त्यांनी इतरांसाठी परावर्तित केले आहे ते त्यांनी वेद, पुराण, भारतीय संस्कृती व भारतीय संत साहित्य यातून प्रामुख्याने घेतले आहे. काही ठिकाणी परदेशी उदाहरणे आली आहेत. पण तीही सर्वसामान्य लोकांना सहज समजतील अशीच. इंग्रजी भाषेतील अवतरणे आली तेथे त्यांनी त्यांचे सुलभ मराठी भाषांतर दिलेले आहे. हे सर्व इतके अचूक व आपुलकीने केले आहे की वाटते, आपला कोणी हितचिंतक मित्र, सहृदय, नातेवाईक किंवा वाडवडील आपल्याशी हितगुज करत आहे. ‘या सुखांनो’ पुस्तकात सुखाचे जे मंत्र दिले आहेत ते आचरणास पण सोपे आहेत काही ठिकाणी लेखकाने आपल्या मनातील जुनी जळमट काढावयास लावलेली आहेत हे इतक्या सहजतेने करावयास लावले आहे की कधी आपण सुधाराणापथावर आलो हेच आपणाला कळत नाही. सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव यांनी ‘या सुखांनो’ हे पुस्तकपुरस्कृत करताना लिहिले आहे की, ‘मानवी जीवनातील राग, लोभ, सुख-दु:ख, द्वेष-मत्सर, निंदा-स्तुती, विकृती-सुकृती, बुद्धिचे स्थान, सौंदर्याचे मम्र, यशस्वी जीवनाची दिशा इत्यादी मूलभूत वृत्ती-प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारे शैलीदार असे हे ललित लेख आहेत. ते अतिशय शहाण्या शैलीत, दृष्टांत उपमादी अलंकाराच्या घटना-प्रसंगाच्या माध्यमातून अविष्कृत केलेले आहेत.’ अनुभवातून जन्मलेले सकस विचार ‘या सुखांनो’ पुस्तकाचे लेखक प्रस्तावनेत म्हणतात की, ‘‘तैतरीय उपनिषद वाचताना प्राचीन ऋषींनी या जीवनाचे अत्यंत मौलिक रहस्य लोकांपुढे उकलून सांगितलेले दिसते ही शिकवणूक म्हणजे मंत्रच आहेत. ‘मननात त्रायते इति मंत्र:।’ त्या विचाराला मंत्र असे म्हातात. हे मंत्र किंवा विचार त्यांना निव्वळ कवि कल्पनेतून किंवा प्रतिभेतून सुचलेले नाहीत. तर अनेक वर्षे जीवनाचे विचारमंथन केल्यावर (तप केल्यानंतर) त्यांनी अनुभूतीचा कस लावूनच हे विचार स्वीकारले आहेत. त्या सू़क्ष्म चिंतनातूनच त्यांना गवसलेले हे जीवनरहस्य समाजापुढे ठेवले. त्या ऋषींच्या मते आनंद हा जीवनाचा रस आहे. या आनंदरसाशिवाय जगो हे अत्यंत निरस होय. त्यांना आढळले की, हा आनंद सर्व चांगल्या कृतीतून (सुकृतातून) निर्माण होतो. या उपनिषदाच्या त्यांच्या अनुभवान्ती हा आनंद त्यांना मनुष्याच्या हृदयात आढळला (त्यालाच त्यांनी ईश्वर असे म्हटले आहे.)’’ भीती, राग, चिंता, निराशा दूर सास! अतिशय उद्बोधक अशा या पुस्तकात मानवी मन त्याचे विकार उदाहरणार्थ अढी, निंदा, भीती, राग, चिंता, निराशा व मत्सर यावर प्रत्येकी स्वतंत्र लेख आहे. प्रत्येक लेख आपल्याला विचार करावयास लावणारा आहे. हे विकार विषय मनात कसे येतात. कसे असतात, कसे मनात घर करून बसतात, व कसे अपायकारक असतात याची सांगोपांग सोपी माहिती उदाहरणे देऊन दिली आहे. हे विकारविषय मनातून कसे काढून टाकायचे याबाबत आपल्याशी विचारविनिमय केला आहे. हे सर्व वाचल्यावर आपण आपल्या मनाचा स्वत:ला मानसोपचारतज्ञ बनून सर्व सकारात्मकम तसेच नकारात्मक बाजू तपासून समस्याच्या गाभ्यापर्यंत जातो. हळूहळू आपणात आपले विचार सकारात्मक बदलण्याची शक्ती येत जाते. चांगले विचार, चांगली कृत्ये हळूहळू आपल्या मनाला व आपल्याला सुरक्षित व शांत शांत बनवत जातात. खरंच हे सर्व विलक्षण आहे. याची अनुभूती घेण्यासाठी ‘या सुखांनो’ वाचावेच. अवतरणांचा खजिना अनेक ठिकाणी मराठी कवितेच्या ओळी, हिंदी दोहे उद्बोधित केलेले आहे. गीतरामायण, भगवद् गीता, शेक्सपियरची नाटके यांचे यांचे संदर्भ दिलेले आहेत. संत ज्ञानेश्वर तुकोबारायापासून समर्थ रामदास स्वामीपर्यंतच्या संत साहित्यातील वचने जागोजागी दिलेली आहेत. पतंजली योगसूत्रापासून भाऊसाहेब पाटणकरांपर्यंतच्या साहित्यातील समर्पक विचारांची अवतरणे लेखात जागोजागी दिलेली आहेत. आनंदयात्रा, सुख आले माझ्या दारी, सखे सोबती, कृतज्ञ मी, कृतार्थ मी, जे होते ते भल्यासाठीच, सुखा सखा विनोद यासारख्या अनेक लेखातून जीवनाची सकारात्मक बाजू दाखवून लेखकाने जीवनाची ती आपल्या वाचकांच्यात परावर्तीत केलेली आहे. खरंच पुस्तक एकदा वाचून समाधान होत नाही. ज्या ज्या वेळी आयुष्यात निराशा, पराभव, ताणतणाव यासारख्या समस्या ‘या सुखांनो’ पुस्तकाचे वाचन केल्यास आपल्या जीवनात आलेले मळभ, निराशेचे ढग जीवन आनंदरूपी वाऱ्याबरोबर नाहिसे होतील यात शंकाच नाही. हे पुस्तक हे नुसते लेखकांची हितगुज नसून प्राचीन भारतीय संस्कृती, जीवनमूल्ये व जीवनरस याबरोबर हितगुज आहे. आपण जीवन जगावे म्हणून अनेक गोष्टी करतो मग हे ‘सर्वात्मक सर्वेश्वर’ करुणाकरांकडे नेणारे पुस्तकही प्रत्येकाने वाचावे. -पंकज पंडीत कुलकर्णी ...Read more

  • Rating Starज. अ. पाटील

    सर्वप्रथम आपण मला ‘या सुखांनो’ हे आपले पुस्तक सप्रेम भेट दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. या पुस्तकातील सर्व लघुनिबंध मी वाचलं. अतिशय आवडले. मी आपले अभिनंदन करतो. आपले लेख मला लघुनिबंधाच्या धाटणीचे वाटले. ते वाचल्यावर मला ‘जुनी पुस्तके’, ‘वाट चुकल्याा आनंद’ या सारखे लघुनिबंध लिहिणारे प्रा. ना. सी. फडके आणि‘अज्ञानाचा आनंद’, ‘दोन मेणबत्त्या’ यासारखे लघुनिबंध लिहिणारे प्रा. काणेकर यांची आठवण झाली. आपली लेखन शैली आणि निवेदन पद्धती या मातब्बर लेखकांच्या तोडीची आहे. त्यात भाषा सौंदर्य तर आहेच आणि सहजता व ओघही आहे. पुस्तकातील लेख रोजच्या जीवनाशी परिचित आहेत. म्हणून ते सामान्य वाचकाला वाचावेसे वाटतात. अल्पावधीतच या पुस्तकाचे दोनदा पुनर्मुद्रण झाले. ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे. सर्व लेखातून आपला बहुश्रुतपणा जाणवत आपल्या विचारांना तात्विक आणि आध्यात्मिक बैठक आहे. पुस्तकात आख्यायिका आणि दंतकथांची सुंदर पखरण आहे. त्यामुळे ते बोधपद असुनही रंजक झाले आहे. ‘या सुखांनो’ हे केवळ पुस्तकच नाही, तर ती सुखाची किल्ली पण आहे. ही गुरुकिल्ली सर्वांनी बाळगावी असे मना मनोमन वाटते. असेच लेखनकार्य चालू ठेवावे. पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. ...Read more

  • Rating Starशांता मरगूर, सोलापूर

    माझी मुलगी सौ. अनुप्रिता महेश अंदेली हिच्याकडून `या सुखांनो` हे पुस्तक वाचायला मिळाले. बघताच मी मुखपृष्ठाच्या मोहात पडले. हिरव्या गर्द झाडाला उलटा लटकलेला खोपा आणि पिलांच्या सुखासाठी आटापिटा करणारी सुगरण पाहून त्या जगन्नियंत्याचे स्मरण झाले. पुस्तकातल प्रत्येक लेख लेखकाच्या विचारवैभवाची साक्ष देतो. सुखी जीवन कोणाला नको आहे? सगळेच सुखाची अपेक्षा करतात़ परंतु कोणत्या मार्गाने गेल्यास शाश्वत सुख मिळेल याची निश्चित पाऊलवाट मिळते. सुखाच्या कल्पनेमागे चाचपडत असणाऱ्या वाचकाला हमरस्ता सापडतो. तो सुखाच्या लक्षदिव्यांनी उजळलेला असतो. प्रत्येक लेखात जीवनाचे मर्म शोधून ते लालित्यपूर्ण शैलीत मांडले आहेत. वाचकांचे जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी लेखकाची आंतरिक तगमग दिसून येते. सर्वच लेख मनाला भावतात. त्यातल्या त्यात सबुरी, राग मनाची आग, सुखाचा सखा विवेक, कामाची किमया, विसर्जन - सगळेच लेख अंतर्मुख करणारे आहेत. ...Read more

  • Rating StarSAHITYA SUCHI - SEPT 2004

    आत्ताची पिढी ही आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विषयी अधिकच ‘सजग’ झालेली आढळते. आणि ते योग्यही आहेच. या पिढीची ही मानसिकता लक्षात घेऊन अनेक लेखकांनी त्यांना मार्गदर्शक ठरणारी पुस्तके लिहिलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ‘यश तुमच्या हातात’ ‘व्यक्तिमत्त्वाचा विकस’ किंवा ‘यशस्वी जीवनाची वाटचाल’ वगैरे अशी पुस्तके खरोखरीच फार चांगले मार्गदर्शन करतात. तसेच हे ‘या सुखांनो’ हे अत्यंत सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य सांगता येईल की, सहजसुलभ शैलीतल्या या पुस्तकात जे दुष्टान्त किंवा दाखले दिलेले आहेत. ते पुराणकाळातील तर आहेतच पण अगदी वर्तमानकालीनही आणि त्यामुळे पुस्तक वाचताना हे ‘आपलं’ आपल्यासाठी आहे हे वाटत राहतं. लेखकाने अत्यंत संयमित, संतुलितपणे लेखन केलेले आहेच. पण ते वाचताना, लेखकाचे माहितीपूर्ण वाचनही वाचकाच्या लक्षात येते. आपल्या संग्रही हवेच असे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य सांगता येईल की, सहजसुलभ शैलीतल्या या पुस्तकात जे दृष्टान्त किंवा दाखले दिलेले आहेत ते पुराणकाळातील तर आहेतच पण अगदी वर्तमानकालीनही आहेत आणि त्यामुळे पुस्तक वाचताना ते ‘आपलं’ आपल्यासाठी आहे हे वाटत राहतं. लेखकाने अत्यंत संयमित, संतुलितपणे लेखन केलेले आहेच. पण ते वाचताना, लेखकाचे माहितीपूर्ण वाचकाच्या लक्षात येते. आपल्या संग्रही हवेच असे हे पुस्तक आहे. नवीन पिढीने कसं वागावं याचा आदर्श वस्तुपाठ या पुस्तकातून मिळत जातो. त्याप्रमाणे जुन्या पिढीनेही कसं वागावं याबद्दलचं चिंतनही यात केलेलं आहे. ‘पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेची जडलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगेल’ हे पुलचं भाष्य अधिक बोलकं करून सांगणारं हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more