* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177669879
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2008
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 180
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EVERY FIELD OF LIFE IS AFFECTED BY POLITICS. EVEN FIELD LIKE EDUCATION IS NOT EXCEPTION FOR THAT. THIS VIRUS OF CORRUPTION & POLITICS NOT ONLY EXPLOITS THE TRUE PEOPLE IN THE FIELD, BUT CORRUPTS THE WHOLE SYSTEM. RAVINDRA THAKUR’S NOVEL ‘VIRUS’ PUTS LIGHT ON SUCH MALPRACTICES IN THE FIELD OF EDUCATION. ‘VIRUS’ EFFECTIVELY PORTRAY CHANGING SCENARIO OF THE EDUCATION SYSTEM.
त्याचं काय आहे प्रोफ्रेसर कॉम्प्युटरमध्ये एखाद दुसरा प्रोग्रॅमच काय,पण संपूर्ण सिस्टीमच करप्ट करणारा व्हायरस असतो. तसा हा एक व्हायरस! कॉम्प्युटरमध्ये तो बाहेरून घुसू शकतो किंवा काही वेळा कॉम्प्युटरच्या सिस्टिममध्येच दडलेला असतो आणि संधी मिळताच अक्टिव्हेट होतो. त्याला समूळ नष्ट करू शकेल असा एकही उपाय आजवर उपलब्ध झालेला नाही. अगदी तसंच आहे हे. फरक एवढाच, की हा व्हायरस बाहेरून आलेला नाही. या व्यवस्थेच्या पोटातच तो आहे. किंबहुना त्यावरच ही सगळी सिस्टीम उभी आहे. मग ती चांगली कशी निपजणार?...तुम्ही कितीही नवे प्रोग्रॅम तयार करा... तुमच्या नकळत तो त्यात शिरतोच आणि सगळी सिस्टीम क्रॅश करून टाकतो.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #VIRUS #VIRUS #व्हायरस #FICTION #MARATHI #RAVINDRATHAKUR #रवींद्रठाकूर "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    ‘व्हायरस’ : विद्यापीठीय राजकारणाचे व्यामिश्र बंध उलगडणारी कादंबरी… समाजीकरणाच्या प्रक्रियेसाठी निर्माण करण्यात आलेली शिक्षण ही एक महत्त्वाची सामाजिक व्यवस्था आहे. समाजाची निर्मिती, अस्तित्व आणि विकास समाजाअंतर्गत कार्यशील असलेल्या विविध घटकांमधील पस्पर समन्वयावर अवलंबून असतो. सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी समाजातील सदस्यांचे परस्परसहकार्य आणि आरोग्यदायी वर्तन महत्त्वाचे ठरते. यासाठी चांगल्या मूल्यांची रुजवात होणे महत्त्वाचे असते. प्रत्येक व्यक्तिच्या जन्मापासून अंतापर्यंत चालणारी समाजकीरणाची प्रक्रिया यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. शिक्षणव्यवस्था ही या प्रक्रियेचाच एक अविभाज्य भाग आहे. अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार सर्वदूर झालेला आहे. समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचले आहे. त्यामुळेच शिक्षणक्षेत्र हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. या क्षेत्राशी प्रत्येकाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध येणे अपरिहार्य ठरले आहे. शिक्षणक्षेत्राकडून समाजातील सर्वच घटकांची मोठी अपेक्षा असते. त्यामुळेच राष्ट्र उभारणीच्या कार्यातील शिक्षण ही सर्वांत महत्त्वाची पायरी मानली जाते. परंतु या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाला याची जाणीव असते का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या क्षेत्रामध्ये घुसलेल्या अनेक अप्रगल्भ, उथळ, अकार्यक्षम, दृष्टिकोन व्यापक नसलेल्या, क्षुद्र आणि कोत्या मनोवृत्तीच्चया अक्कडबाज लोकांमुळे हे क्षेत्र प्रदूषित झाले आहे. या लोकांच्या संकुचित मनोवृत्तीमुळे हे क्षेत्र हीन राजकारणाचे माहेरघर बनले आहे. एकूणच या व्यवस्थेतील फोलपणा आणि दांभिक वृत्तीवर कधी थेट तर कधी उपरोधिक भाष्य करणारी रवींद्र ठाकूर यांची ‘व्हायरस’ ही कादंबरी अलीकडेच प्रसिद्ध झालेली आहे. स्वत:ला कामामध्ये मनस्वीपणे गुंतवून ठेवणारे कार्यमग्न आणि महत्परिश्रमी डॉ. शेळके त्यांच्या विषयाचे विभाग प्रमुख तसेच कुलगुरू डॉ. जुनागडे यांच्या हितसंबंधी राजकारणाचे बळी ठरतात. डॉ. खराडे यांच्यापेक्षा सेवा, संशोधन आणि इतर अनुषंगिक बाबींमध्ये पात्र असूनही विभागातील प्राध्यापक पदासाठी डॉ. शेळक्यांना अर्ज करता येऊन नये अशी परिस्थिती निर्माण केली जाते. अडवणुकीचा एक भाग म्हणून तयांचा अर्ज थ्रू प्रॉपर चॅनल जाऊ नये याची डॉ. खराडेंकडून दक्षता घेतली जाते. अशी परिस्थिती निर्माण केली जाते. या प्रकाराने अस्वस्थ झालेले डॉ. शेळके विद्यापीठातील अडवणूक, वशिलेबाजी, हितसंबंधी, आणि जातीय राजकारणाचे स्वत:ला येणारे अनुभव विनेदनातून कथन करीत कादंबरीभर अस्वस्थच राहतात. कोणत्याही संवेदनशील व्यक्तीमध्ये दिसणारी अस्वस्थता डॉ. शेळकेंच्या रूपातून कादंबरीमध्ये व्यक्त होते. स्वत:ला हवी मी माणसं हवीत तेथे बसवून मनमानी कारभार करणारे कुलगुरू आणि त्यांच्यासारख्या इतर प्राध्यापकांची स्वाभिमानी वृत्तीच त्यांच्या प्रगतीआड येताना दिसते आणि त्यांच्या उपेक्षेला कारणीभूत ठरते. जात-पात, गटबाजी यामध्ये स्वत:च सहभागी होणारे कुलगुरू डॉ. खराडे, डॉ. वांगीकर, डॉ. प्रिया सोमण, डॉ. पावसकर यांच्यासारख्या प्राध्यापकांचा कौशल्यपूर्वक वापर स्वत:चे हेतू साध्य करण्यासाइी करतात. हे प्राध्यापकदेखील स्वत:च्या छोट्या-मोठ्या स्वार्थापोटी जुनागडेंचे होयबा होतात. केवळ विद्यापीठातच नव्हे, तर विद्यापीठाशी सलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये या राजकारणाचे पडसाद उमटतात. एकीकडे शिक्षकांच्या संघटनेला हाताशी धरणे आणि दुसरीकडे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या संघअनेविरोधात काम करणे, त्यांची आंदोलने मोडून काढणे असे दुटप्पी काम जुनागडेंपासून सुरू असते. विद्यापीठातील हितसंबंधांच्या राजकारणामुळे शिक्षक निवड समित्यांमधून गैरव्यवहार होतात. प्रशांत काळोखे सारख्या हुशार उमेदवारावर होणारा अनन्वित अन्याय हे या राजकारणाचे प्रतिनिधिक उदाहरण आहे. जातीने एन. टी. प्रवर्गातील असूनही काळोखेची खुल्या जागेवर निवड होते. या निवडीवेळी येणारे अडथळे, होणारे राजकारण हे या व्यवस्थेतील लोकांची कोती मनोवृत्ती आणि जातीय राजकारण ध्वनीत करते. पीएच. डी. सारख्या महत्त्वाच्या पदवीसाठी चालणाऱ्या संशोधनामध्ये होणारे गैरप्रकार मीनाक्षी महाजनच्या उदाहरणातून समोर येतात. ती वाङ्मयचौर्यासारखा गंभीर गुन्हा करून पीएच. डी. पदवी मिळवू पाहते आहे. अशी विद्यार्थीनी स्वत:च्या नावावर दाखवून डॉ. खराडे स्वत:चे प्रमोशन मिळवू पाहात आहेत. कारण हितसंबंधांतून येथे प्रमोशनचे फायदे दिले जात आहेत. विद्यापीठ गीताच्या निमित्ताने झालेले राजकारण, ते निमित्त साधून प्रा. ढवळ्यांसारख्या गरीब माणसाचा होणार छळ, कुलगुरू पदासाठी ज्यांचे नाव नेहमी चर्चेत असायचे त्या प्रा. चव्हाणांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक, उलट त्यांच्या कृपेने विभागात चिकटलेल्या माणसालसा विभागप्रमुख पद दिले जाणे, पात्र लोकांना डावलणे, चमचेगिरी करणाऱ्यांचे हितसंबंध जोपासले जाणे अशा अनेक घटना-प्रसंगातून कादंबरीचे कथानक पुढे सरकत राहते. अनेक प्रश्न उपस्थित करीत आणि शेवटी तेही अनुत्तरीत ठेवून कादंबरी संपते. शिक्षणक्षेत्र अंतर्गत राजकारणाने दिवसेंदिवस बरबटले जात आहे. या व्यवस्थेमध्ये एखाद्या प्रमुख पदावर नियुक्त केलेली व्यक्तीच राजकीय प्रभावामुळे त्या पदावर आली असेल तर राजकारण विरहीत काम चालणार कसे अलीकडे अशा भ्रष्ट मार्गानेच रिक्त पदांवर उमेदवारांची निवड होण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळेच चेहरे पाहून काम करण्याची प्रवृत्ती बळावते आहे. हुशार, ध्येयवेडी, जबाबदारीचे गांभीर्य ओळखणारी कार्यक्षम व्यक्ती किंवा असा वर्ग आजही या क्षेत्रामध्ये आहे. परंतु हा वर्ग अपरिमित कष्ट करूनही तत्त्वशून्य, दूषित राजकारणाला बळी पडताना दिसतो आहे. या वर्गाकडे असणारी ज्ञानपिपासूवृत्ती, त्यांचे मनोरथ आणि एकूणच त्यांच्या कार्यक्षमतेला नेस्तनाबूत करण्याचा दुराचार वाढला आहे. मोठ्या पदांची अभिलाषा ठेवून स्वत:चे स्वार्थ साधण्यामध्ये मशगूल असणारे लोक त्यासाठी गटबाजी करून प्रामाणिक व्यक्तींवर अन्याय करीत सुटले आहेत. हे माजोरी लोक आणि त्यांच्या माजोरीवृत्तीचे बळी अशा सवाचे वास्तवदर्शी पडसाद प्रस्तुत कादंबरीमध्ये पडलेले दिसतात. शैक्षणिक कार्यासाठी स्थापन केलेल्या एका महत्त्वाच्या संस्थेतील अनागोंदी, तेथील भ्रष्ट राजकारण, सूडबुद्धी, दांभिकता यावर भेदक प्रकाश टाकत एकूणच अशा संस्थांतील भ्रष्टाचाराचा बुरखा फाडणे हे या कादंबरीचे मध्यवर्ती आशयसूत्र आहे. खरे तर जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याची क्षमता शिक्षणामध्ये आहे. परंतु शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच निर्माण होणारे अनेक प्रश्न सोडवण्याएवेजी व्यवस्थेकडून भिजत ठेवले जातात. विशिष्ट हेतूने प्रेरित आणि हितसंबंधी राजकारण करीत असलेल्या प्रमुख पदांवरील जुनागडेंसारख्यांना यातच सुख मिळते. अशा लोकांना सामाजिक स्वास्थ आणि समाजाचे परितर्वन नको असते. या कादंबरीतील डॉ. जुनागडे आपल्या सनातनी विचारांना सतत चिकटून आहेत. वेळप्रसंगी ते आपल्या विचारांना मुरड घालताना दिसतात. परंतु त्यांचा मूळ हेतू उघड झाल्याशिवाय राहत नाही. वरून बोलणे पुरोगामी, नवविचाराधिष्ठित असले तरी त्यांच्या मनामध्ये सनातनी विचार खोलवर रुजलेला आहे. आपल्या विचाराशी सहमती दर्शविणाऱ्यांना ते जाणीवपूर्वक जवळ करतात. अशांवर ते आपली कृपादृष्टी ठेवून आहेत. विद्यापीठात चाललेल्या राजकारणाचा सूत्रधारच कुलगुरू पदावर असणारी व्यक्ती आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवस्थाच या राजकारणांमध्ये कशी ओढली जाते. याचे वास्तववादी चित्र या कादंबरीमध्ये येते. कुलगुरू डॉ. जुनागडे विशिष्ट विचारांशी बांधील आहेत. आपल्या विचारांना, ध्येयांना जुळवून घेणाऱ्यांना हळूहळू ते स्वत:भोवती जमवू लागतात. त्यातून विद्यापीठात एक कंपू तयार होतो. या कंपूतील सर्वच त्यांच्या विचारांचे आहेत असे नाही. परंतु स्वत:चे स्वार्थ साधण्यासाठी ते अधीर आहेत. यासाठी ते कुलगुरुंच्या स्तुतीत डुंबलेले आहेत. संधी मिळेल तेथे स्तुती करण्याची स्पर्धा लागावी असे त्यांचे वर्तन आहे. स्वास्थ्यामुळे त्यांच्यात तत्त्वशून्यता आलेली आहे. स्वत:च्या भल्यापोटी ते काहीही करायला धजताहेत. वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे ते आड येणाऱ्यांना पद्धतशीरपणे बाजूला करताहेत. त्यांना नामोहरम करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. यासाठी उपलब्ध सर्व मागाचा अवलंब ते करताहेत. शिक्षणव्यवस्थेमध्ये आज सर्वत्र दिसणारी ही आपमतलबी प्रवृत्ती प्रस्तुत कादंबरीच्या आशयसूत्रातून व्यक्त होते. लेखक हे आशयसूत्र समोर ठेवताना कोठेही घटना-प्रसंगाची ओढूनताणून मांडणी करीत नाही. इतिहासाचे प्राध्यापक डॉ. शेळके यांच्या भाविश्वासाने येणारे सर्व अनुभव येथे एका क्रमाने लेखक वाचकांसमोर ठेवतो. वाचकांना या कादंबरीला एकसंघ सलग असे कथासूत्र नाही असे वाटते. परंतु विद्यापीठासारखी संस्था ही व्यापक आणि विविध विद्याशाखांमध्ये विभागलेली असते. अशा व्यापक आणि विविध विद्याशाखांमध्ये विभागलेल्या व्यवस्थेवर लिहिताना घटना प्रसंगांची बांधणी लेखकाने डॉ. शेळकेंच्या भावविश्वाचा आधार घेऊन केलेली आहे. डॉ. चव्हाण, डॉ. सावंत यांच्यासारख्या प्राध्यापकांशी डॉ. शेळक्यांच्या चललेल्या चर्चा यातून कथासूत्र प्रतीत होत राहते. या चर्चांमधून एकीकडे या व्यवस्थेवर वास्तवदर्शी प्रकाश टाकला जातो तर दुसरीकडे कादंबरीचे कथासूत्र एकत्र बांधून ठेवण्याचे कौशल्य साधले जाते. या कादंबरीमध्ये घडून येणाऱ्या या चर्चांमधून व्यक्त होणारे चिंतन संवेदनशील वाचकाला विचारप्रवृत्त करणारे आहे हे अंतर्मुख चिंतन कादंबरीमध्ये सर्वत्र येते. असाच एक संवाद येथे मुळातून पाहण्यासारखा आहे. सावंत सरांशी बोलताना शेळके म्हणतात, दोन प्राध्यापक भेटले तर एकमेकांशी धड बोलतसुद्धा नाहीत. सरळ एकमेकांना टाळतात किंवा बघूनही न बघितल्यासारखं करतात. सगळं वातावरण इतकं गढूळ होऊन गेलं आहे की काही विचारू नका. त्यावर सावंत सर म्हणतात, त्याचं काय आहे कोण माणूस कसा असेल, कोणाचा असेल, तो कुठे जाऊन काय सांगेल याचा काहीच अंदाज नसतो नं. असल्या गचाळ वातावरणात कसलं डोंबलाचं शिक्षण देणार आणि कसलं झाटाचं संशोधन करणार अहो, या उच्चविद्याभिूषितांपेक्षा आमची खेड्यापाड्यातली माणसं फार चांगली. ओळख असो नसो, समोरून येणाऱ्या माणसाला ते सहज नमस्कार करतात, माणसाकडे आधी माणूस म्हणून पाहतात. अरे, तुमच्या शिक्षणात आणि संशोधनात माणसालाच जागा नसेल तर ते काय चाटायचं आहे. शिक्षणव्यवस्थेच्या पोटात शिरलेल्या प्रदूषणाचे आणि अंतर्गत राजकारणाचे सर्व संदर्भ ही कादंबरी पुरविते. शिक्षणाचा उद्देश मानवता या मूल्याची प्रतिष्ठापना हा असावा. तसा तो असतोही, परंतु मूल्यप्रदूषित वातावरणामध्ये मानवताच पायदळी तुडविली जाते. शिक्षणातून नम्रता यायला हवी परंतु नम्रतेपेक्षा अहंकार वाढतो आहे. द्वेष, मत्सर, तिरस्कार, विचारांची क्षुद्रताच अधिक दिसून येते. यासंदर्भातील अंतर्मुख करणारे चिंतन या कादंबरीमध्ये अनेक वेळा येते. मुळातच विद्यापीठाविषयी पूर्वग्रहदूषित असलेले आणि विशिष्ट विचारांनी कार्य करणारे कुलगुरू वरकरणी पुरोगामित्वाची भाषा वापरतात. परंतु ही त्यांची तोंडदेखली भाषा त्यांच्या कृतींमधून उघडी पडते. त्यामुळेच विद्यापीठात त्यांच्या विचारांचे प्रतिकूल पडसाद एमटत राहतात. दररोज नवनवे वाद जन्माला येतात. आंदोलनं उभी राहतात. या आंदोलनांना कुलगुरू जुमानत नाहीत. आंदोलकांची हेटाळणी केली जाते. लोकांचे न्याय्य हक्कच डावलले जातात. त्यातूनच नवे-नवे संघर्ष सुरू होतात. या आंदोलनात काहींचे प्राण जातात. विद्यापीठाचेही अपरिमित असे नुकसान होते. संकेतांना तिलांजली दिली जाते. जेष्ठतेला मूठमाती मिळते. हे संघर्ष शेवटही कोर्ट-कचेऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचतात. कुलगुरू आपल्या विचारांना आणि कार्यपद्धतीला विरोध करणाऱ्यांना हुकूमशाहीच्या बळावर लगाम लावण्याचा प्रयत्न करतात. विरोधात जाणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळेल तेथे ठेचून काढतात. अडवणे, डावलणे असल्या दबावतंत्राचा अवलंब सुरूच ठेवतात. आपले काम प्रामाणिकपणे करणाऱ्या व्यक्तींचे मानसिक स्वास्थ घालवायचे, त्यांना समाधानाने जगणेही अशक्य करायचे ही त्यांची प्रवृत्ती आहे. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक सोडाच त्यांनी केलेल्या कामाची साधी दखलही घेतली जात नाही. या सर्वांमागे असणाऱ्या हीन मानसिकतेचे प्रत्ययकारी चित्रण लेखकाने केले आहे. हे चित्रण करताना कोठेही अतिशयोक्ती झालेली आहे असे जाणवत नाही. भाषा वापरताना ते स्वत:चा संयम ढळू देत नाही. अन्याय मांडताना देखील लेखकाच्या भाषेमध्ये शिवराळपणा शिरत नाही. अनवधनानेही येथे कोणाविषयी टोकाचे आरोप येत नाहीत. कादंबरीदेखील व्यक्तिरेखा, उद्वेग, चीड, संताप व्यक्त करतात, परंतु तो करताना आपला तोल ते ढळू देत नाहीत. कादंबरीतील आशयसूत्र लेखकाच्या समाजविषयीच्या सखोल जाणिवेतून संयतपणे अभिव्यक्त होत राहते. लेखकाची तीव्र संवेदना समकालीन बोलीतून व्यक्त होते. विद्यापीठीय क्षेत्रामध्ये व्यवहारासाठी वापरली जाणारी समकालीन भाषा लेखक येथे कौशल्याने उपयोजितो. या कादंबरीतील भाषेचे स्वरूप लक्षात येण्यासाठी पुढील उतारा उपयुक्त ठरेल. त्याचं काय आहे प्रोफेसर ही मानसिकताच मोठी अवघड आहे. कॉम्प्युटरमध्ये एखाददुसरा प्रोग्रॅमच काय, पण संपूर्ण सिस्टीमच करप्ट करणारा व्हायरस असतो. तसा हा एक व्हायरस आहे. कॉम्प्युटरमध्ये तो बाहेरून घुसू शकतो किंवा काही वेळा कॉम्प्युटच्या सिस्टीममध्ये तो दडलेला असतो आणि संधी मिळताच अ‍ॅक्टिव्हेट होतो. त्याला समूळ नष्ट करू शकेल असा एकही उपाय आजवर उपलब्ध झालेला नाही. अगदी तसंच आहे हे. फरक एवढाच, की हा व्हायरस बाहेरून आलेला नाही. या व्यवस्थेच्या पोटातच तो आहे. किंबहुंना त्यावरच ही सगळी सिस्टीम उभी आहे. मग ती चांगली व्यवस्थेमुळे उद्विग्न झालेल्या संवेदनशील मनाचा उद्गार आहे. एखादी शिक्षण संस्था वरून जेवढी भव्य दिव्य दिसते तशी ती आतून असतेच असे नाही. पीएच. डी. सारख्या महत्त्वाच्या संशोधनपदवी मधील भोंगळपणा, अशी मोठी पदवी विनासायास पदरी पाडून घेण्यासाठी अवलंबिले जाणारे गैरमार्ग, विविध समित्यांवर चेहरे पाहून होणारी लोकांची नियुक्ती, निवड समित्या, त्यातून चालणारा गैरव्यवहार, भरती-पदोन्नती प्रक्रियेतील मनमानी, पदांचा गैरवापर करून चाललेले आक्षेपार्ह वर्तन, दबावतंत्र, अडवणूक, जातीयता, प्रांतीयता, विद्यार्थीनींवर होणारे लैंगिक अत्याचार, वसतिगृहातील गैरप्रकार, भ्रष्टाचार अशा असंख्य घटना-प्रसंगांच्या आधाराने विद्यापीठासारख्या महत्त्वाच्या संस्थेतील अनागोंदी आणि मनमानी कारभाराची चिरफाड प्रस्तुत कादंबरीमध्ये वास्तवपूर्ण रीतीने येते. शिक्षकांच्या संघटना आणि कर्मचारी-विद्यार्थी आंदोलने कशी कौशल्यपूर्ण रीतीने मोडून काढली जातात, आंदोलनातील हवा काढून घेण्यासाठी कसे डावपेच आखले जातात, या संदर्भातील वर्णने वाचून शिक्षणप्रेमी वाचकांची मने उद्विग्न होतात. वाचकांच्या मनामध्ये उद्वेग जागृत व्हावा अशी घटना– प्रसंगांची मांडणी हे ठाकूरांचे कौशल्य आहे. या कादंबरीला कथासूत्र आहे. परंतु ते बंदिस्त स्वरुपाचे नाही. त्या प्रमाणेच कादंबरीच्या रूढ तंत्रात बसेल असा शेवटही या कादंबरीला नाही. शिक्षणयात्रेचे स्वरूप विलक्षण व्यापक आणि दिवसेंदिवस विस्तारणारे आहे. त्यामुळे या व्यवस्थेचे समग्र अंतरंग एकाच कथासूत्रात उलगडून दाखविणे अशक्य आहे. तथापि आतून बरबटलेल्या, सडलेल्या या व्यवस्थेचे आयाम देखील विविधांगी आहेत. त्यामुंळेच प्रस्तुत कादंबरीचा रूपबंध बंदिस्त झालेला नाही. कादंबरीच्या शेवटी कथासूत्र जेथे संपते तिथून पुढे वाचकांच्या मनामध्ये ते सुरू राहते. पुढे महाजनवर कारवाई झाली काय, काळोखेचे अस्वस्थ होतो. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम लेखक वाचकांवर सोडून देतो. समस्येच्या मुळापर्यंत जाण्याची लेखकाची वृत्ती, घटना-प्रसंगांची सर्जनशील मांडणी आणि सामाजिक जाणिवेतून सर्व घडामोडींकडे पाहण्याची व्यापक दृष्टी प्रस्तुत कादंबरी वाचताना प्रत्ययाला येते. एकूणच शिक्षणासारख अनेक शाखा-उपशाखांतून विभागलेल्या आणि दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या गुंतागुंतीची आणि व्यामिश्रतेची उकल प्रस्तुत कादंबरीतून होताना दिसते. त्याचबरोबर या व्यवस्थेमध्ये शिरलेल्या भ्रष्ट आणि हीन प्रवृत्तीमुळे शिक्षण व्यवस्थेलाच भोगाव्या लागणाऱ्या परिणामांचे सर्व सुक्ष्म संदर्भ पुरविण्यात लेखक कमालीचा यशस्वी झालेला आहे. -डॉ. नंदकुमार मोरे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 23-12-2012

    विद्यापीठीय भ्रष्टाचाराचा पंचनामा… आजकाल शिक्षण क्षेत्रातदेखील राजकीय हस्तक्षेप, जातीय प्रवृत्त्ती आणि भ्रष्टाचार यांनी हौदोस मांडला आहे. ज्ञानदानासारख्या पवित्र आणि उदात्त क्षेत्रातील विद्यापीठांना अनाचाराचा जंतुसंसर्ग झाला असून या तिरस्करणीय परिस्ितीमुळे विद्वान, प्रामाणिक आणि स्वार्थत्यागी व्यक्तींचा बळी जात आहे. या विचित्र सत्यचित्राचे प्रातिनिधिक रूप म्हणजे प्रस्तुत व्हायरस ही कादंबरी होय. ग्रंथ हे ज्ञानाचे प्रतीक. या ग्रंथांना धर्म, जात, राजकारण, भ्रष्टाचार, कलह यांची कीड लागणे म्हणजे सुसंस्कृत, सज्जनांना छळणे होय, पण विद्यमान समाजयंत्रणा तशीच असून तिचा भेद करणे किती दुरापस्त असू शकते हे कादंबरीकाराने मांडले आहे. ‘कॉम्प्युटरमध्ये एखाद दुसरा प्रोग्रॅमच काय, पण संपूर्ण सिस्टिमच करप्ट व्हायरस असतो तसा हा एक व्हायरस. हा व्हायरस बाहेरून आलेला नाही. या व्यवस्थेच्या पोटातच तो आहे. किंबहुना त्यावरच ही सगळी सिस्टिम उभी आहे. मग ती कशी चांगली निपजणार तुम्ही कितीही नवे प्रोग्रॅम तयार करा... तुमच्या नकळत तो आत शिरतोच आणि सगळी सिस्टिम कॅश करून टाकतो.’ हे कादंबरीतील एका प्रधानपात्राचे निवेदन असून त्याद्वारे कादंबरीचा आशयपट कोणत्या स्वरूपाचा आहे हे ध्वनित होते. प्रस्तावनेत कादंबरीकाराने ‘सारभूत’ विधान केले आहे. ते असे असत्यच सत्याचं रूप घेऊन वावरतंय. सत्यावरच कुरघोडी करतंय. सत्य अशा बिकट परिस्थितीत सापडलंय की त्याला समोर येणं अशक्य होऊन बसलंय. सत्यवादी वेडा ठरतोय... ठरवला जातोय... यासंदर्भात स्वतंत्रपणे भाष्य करण्याची मुळीच गरज नाही. कारण तो एक बोलका ढलपा ठरावा. कादंबरीतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा इत्यादी सर्व काही काल्पनिक... असे स्पष्टीकरण ठळक अक्षरात मुद्दामहून केले असले तरी वाचकांना मात्र हे सर्वकाही चांगलेच परिचयाचे वाटते यातच कादंबरीचे यश सामावले आहे. जातीय पातळीवरून राजकारण करून, दलित विद्यार्थी संघटनांना भडकावून आंदोलने करणे अशा घटनांची नोंदसुद्धा सविस्तरपणे केली गेली आहे. विद्यापीठ स्तवनाचे गीत, बहुजन संघटना नेत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे भांडवल करून घरबांधणीत केलेला भ्रष्टाचार अशा प्रसंगांचा आलेख शैक्षणिक क्षेत्राची झाडाझडती घेताना दिसून येतो. ज्ञानदानापेक्षा गटबाजी, हेवेदावे, भ्रष्टाचार यामध्येच गुरफटलेले विद्वान प्राध्यापक, विद्यार्थी नेते, मंत्री यांच्यामुळे शिक्षण क्षेत्र कसे व किती पोखरले आहे याची कल्पनाच करवत नाही. हा ‘व्हायरस’ खूप हैदोस घालून सारी यंत्रणच बिघडवून टाकतो. किंबहुना तो यंत्रणेचाच एक अटळ भाग बनून सर्वांना हतबल करू शकतो हे दारूण सत्य कथन करणारी ही कादंबरी शैक्षणिक वर्तमानावर कोरडे ओढून अंतर्मुख करते. ही कादंबरी अजिबात काल्पनिक न वाटता ती वास्तवात घडणारी वाटते हे कादंबरीकाराचे सुयश म्हणता येईल. - डॉ. श्रेया मुळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more