RAVINDRA THAKUR

About Author

Birth Date : 14/04/1955


PROFESSOR AND FORMER HEAD, DEPARTMENT OF MARATHI, SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR. WRITING IN VARIOUS FORMS LIKE STORIES, POEMS, NOVELS, PLAYS, REVIEWS, EDITING, TRANSLATION ETC. ABOUT 25 BOOKS PUBLISHED TILL DATE. SOME BOOKS ON THE WAY TO PUBLICATION... ENGLISH TRANSLATION OF MAHATMAS POPULAR NOVEL PUBLISHED. HINDI TRANSLATION UNDER PUBLICATION. M. A HINDI TRANSLATION OF PHULES BIOGRAPHICAL PLAY KRANTI SANGAR IS UNDER PUBLICATION. THE NOVEL MAHATMA WAS WRITTEN BY RANJIT DESAI, RES. YOU PATIL PARAKHAD AWARD.

प्राध्यापक आणि माजी प्रमुख, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. कथा, कविता, कादंबरी, नाटक, समीक्षा, संपादन, अनुवाद इत्यादी विविध स्वरूपाचे लेखन. आजपर्यंत सुमारे २५ ग्रंथ प्रकाशित. काही ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर... महात्मा या बहुचर्चित कादंबरीचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित. हिंदी अनुवाद प्रकाशनाधीन. म. फुले यांच्या जीवनचरित्रावरील क्रांति संगर या नाटकाचा हिंदी अनुवाद प्रकाशनाधीन. महात्मा या कादंबरीस रणजित देसाई, रा. तु. पाटील परखड हे पुरस्कार. दोन समीक्षा ग्रंथांना शिवाजी विद्यापीठाचे उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ पुरस्कार. शैक्षणिक आणि वाङ्‌मयीन कार्याबद्दल २००७ मध्ये शिवाजी विद्यापीठातर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार. अनेक विद्यार्थ्यांना एम.फिल. आणि पीएच.डी.साठी मार्गदर्शन. त्यांच्या साहित्यकृती आणि एकूणच साहित्यावर अनेक विद्यापीठांतून संशोधनकार्य सादर. म. फुले यांचे जीवनकार्य आणि इतर अनेक वाङ्‌मयीन विषयांवरील अभ्यासू व्याख्याते म्हणून प्रसिद्ध.
Sort by
Show per page
Items 1 to 7 of 7 total
DAHI DISHA Rating Star
Add To Cart INR 495
DHARMAYUDDHA Rating Star
Add To Cart INR 450
41 %
OFF
DR. RAVINDRA THAKUR BIRTHDAY OFFER Rating Star
Add To Cart INR 1690 INR 1002
41 %
OFF
DR. RAVINDRA THAKUR BIRTHDAY OFFER SET 2 Rating Star
Add To Cart INR 795 INR 469
MAHATMA ( JOTIRAO PHULE ) Rating Star
Add To Cart INR 550
10 %
OFF
MAHATMA JYOTIRAO PHULE - ENGLISH Rating Star
Add To Cart INR 795 INR 716
VIRUS Rating Star
Add To Cart INR 195

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more