* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE SIMEON CHAMBER
  • Availability : Available
  • Translators : JAYWANT CHUNEKAR
  • ISBN : 9788184980035
  • Edition : 2
  • Publishing Year : 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 328
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
FOR UP AND COMING LAWYER SAM BOGARDUS ANOTHER DAY MEANS MOTHER CASE. BUT WHEN HE AGREES TO SEE JENNIFER DAVIES LITTLE DOES HE REALISE THAT HIS ATTRACTIVE NEW CLIENTS IS TO PUT HIS LIFE AT RISK. JENNIFER IS TRACING HER FATHER - HER ONLY CLUE BEING FOUR SHEETS OF PARCHMENT BELONGING TO THE JOURNAL OF SIR FRANCIS DRAKE. THESE PAPERSHOLD THE KEY TO HER FATHER`S INDENTITY AND A MULTITUDE OF UNSOLVED MYSTERIES... FULL OF SCEPTICISM, SAM AGREES TO SHOW THE PAPERS TO HIS TRUSTED FRIEND, UNIVERSITY PROFEFESSOR NICK JORGENSES. ASTOUNDINGLY, NICK VERIFIES THE PAPER`S AUTHENTICITY. BUT ALREADY TOO MANY PEOPLE KNOW OF THE JOURNAL`S EXISTENCE... AND WHEN HIS LAW - PARTNER, SUSAN PATERSON, IS FOUND STABBED TO DEATH, SAM EMBARKS ON A RELENTLESS PURSUIT OF THE TRUTH, ENCOUNTERING DANGER AND DECEIT IN THE FORM OF A RUTHLESS KILLER WHO SEEMS DETERMINED TO PREVENT SAM FROM ACHIEVING HIS GOAL, EVENTUALLY SAM IS LURED INTO THE SIMEON CHAMBER, TO DISCOVER ONE OF THE BEST-KEPT SECRETS TIME HAS EVER KNOWN.
फ्रान्सिस ड्रेक. १६व्या शतकातला दर्यावर्दी आणि सागरी लुटारू; पण इंग्लंडच्या राणीने आश्रय दिलेला. सागरीमार्गाने पृथ्वी प्रदक्षिणेला तो निघाला होता. त्याने आपल्या प्रवासाचा तपशीलवार वृत्तांत लिहून ठेवला होता, अशी समजूत आहे. १७ एप्रिल, १९०६. कॉलिफोर्निआतल्या मरिन काउंटितल्या `सान क्विल्टॉन प्रिझन` मधला एक कैदी – अर्ल ह्युबर, याला योगायोगानं तुरुंगाखालच्या भुयाराचा शोध लागला. ह्युबरनं त्या भुयाराचा माग काढला आणि त्याच्या टोकाला पोहोचल्यावर, मातीतून पडणा-या सोन्याच्या नाण्यांनी तो न्हाऊन निघाला. – आणि त्याचवेळी तिथून पाच मैलांवर उद्ध्वस्ततेनं थैमान घातलं. सान फ्रान्सिस्को. १९७५. सॅम बोगार्डस. एक वकील. जेनिफर डॅवीज हीही एक वकीलच. तिनं काही चर्मपत्रांची पानं बोगार्डस समोर ठेवली आणि त्यांच्या आधारे आपल्या जन्मदात्या बापाचा शोध घ्यायची विनंती सॅमला केली. तीन वेगवेगळ्या कालखंडांतल्या ह्या घटनांचा परस्परसंबंध दर्शनी तरी काहीच दिसत नाही. पण तो आहे! त्या संबंधाचीच ही शोधकथा. शोध घेता घेता वाचकाला एका अद्भुत ठिकाणी घेऊन जाणारी; जिथं दडलं आहे काळाला आजवर अज्ञात असलेलं एक लोकविलक्षण गूढ. अनेक खुनांना आमंत्रण देणारं एक रहस्य! एक विलक्षण रोमांचक, उत्कंठापूर्ण रहस्यकथा. त्यासाठी उघडायला हवं – `द सिमीऑन चेम्बर!`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #स्टीव्हमार्टिनी #STEVEMARTINI #JAYWANTCHUNEKAR #THESIMEONCHAMBER #दसिमीऑनचेंबर #THEATTORNEY
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more