* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE NEGOTIATOR
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788171612079
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 420
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :FREDERICK FORSYTH COMBO OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE KIDNAPPING OF A YOUNG MAN ON A COUNTRY ROAD IN OXFORDSHIRE IS BUT THE FIRST BRUTAL STEP IN A RUTHLESS PLAN TO FORCE THE PRESIDENT OF THE UNITED STATES OUT OF OFFICE. IF IT SUCCEEDS, HE WILL BE PSYCHOLOGICALLY AND EMOTIONALLY DESTROYED. ONLY ONE MAN CAN STOP IT - QUINN, THE WORLD`S FOREMOST NEGOTIATOR, WHO MUST BARGAIN FOR THE LIFE OF AN INNOCENT MAN, UNAWARE THAT RANSOM WAS NEVER THE KIDNAPPER`S REAL OBJECTIVE . . . THE NEGOTIATOR UNFOLDS WITH THE SPELLBINDING EXCITEMENT, UNCEASING SURPRISE AND RIVETING DETAIL THAT ARE THE HALLMARKS OF FREDERICK FORSYTH, THE MASTER STORYTELLER.
ऑक्सफोर्डशायरमधल्या एका गावरस्त्यावरून एका युवकाचे अपहरण हा अमेरिकेच्या अध्यक्षाला त्याच्या पदावरून हुसकावून लावण्याच्या, आत्यंतिक क्रूर अशा कारस्थान-नाट्यातील पहिला प्राणांतिक अंक होता. तो यशस्वीरित्या पार पाडला गेला, तर हा अध्यक्ष या अनपेक्षित धक्क्याने मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचून अकार्यक्षम होईल, हा एकमेव हेतू या अपहरणामागे होता. हा दुर्दैवी प्रकार जगातील फक्त एकच व्यक्ती थोपवून धरू शकत होती! अपहरणाच्या अशा प्रकारांमध्ये सातत्याने यशस्वी ठरलेला जगद्विख्यात मध्यस्थ. अपहरणकर्त्याच्या मूळ हेतूविषयी अल्पांशानेही कल्पना नसताना या निष्पाप युवकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या आयुष्याची बाजी लावणारा मध्यस्थ.या अपहरणनाट्याचा उलगडा होत असताना श्वास रोखून ठेवणाऱ्या औत्सुक्याने वाचक कधी कमालीचा उत्तेजित होतो, कधी आश्चर्याने चकित होतो, तर कधी अंगावर कोसळणाऱ्या तपशिलांमुळे गोठल्यासारखा होतो. फ्रेडरिक फॉर्सिथ या जागतिक कीर्तीच्या लेखकाने विलक्षण कौशल्याने विणलेली ही चित्तचक्षुचमत्कारिक कहाणी वाचताना थरारक अनुभवांमुळे तुम्ही पानापानांवर स्तंभित होणार आहात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MADHYASTHA #THENEGOTIATOR #मध्यस्थ #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #FREDERICKFORSYTH #फ्रेडरिकफॉर्सस्थ "
Customer Reviews
  • Rating StarRajendra Thite

    गुप्तहेर कथा , रहस्य कथा , साहस कथा . भले मग त्या सत्यकथा असोत अथवा काल्पनिक . साहित्यात त्यांचेही स्थान महत्वाचे असतेच .आजूबाजूचे सर्व वातावरण विसरायला लावून वाचकाची मती क्षणभर गुंग करण्याची शक्ती या प्रकारात असते . चला अशाच एका साहसी मोहमेवर निघूया . पुस्तक प्रेमी च्या सदस्यांना या मूळ पुस्तकाचे कर्ते फ्रेडरिक फोर्सिथ नवीन नाहीत . त्यांच्या the fox या मूळ कादंबरीचा मा . सुधांशु नाईक यांनी आपल्या गृपला परिचय करून दिलाच आहे . त्यांचेच हे आणखी एक पुस्तक . इंग्रजी साहित्यिक फ्रेडरिक फोर्सिथ यांनी बी बी सी मध्ये पोलिटिकल कॉरस्पॉन्डन्ट म्हणूनही काम केले आहे . प्रस्तुत काल्पनिक कादंबरीत त्यांनी आपल्या तिथल्या कामकाज व अनुभवाचा चपखलपणे वापर केला असावा . काही राजकीय नेतृत्वाची नावे त्यांनी कादंबरीत पदासकट वापरली आहेत . 1971 मध्ये दी डे ऑफ दि जॅकल्स हि त्यांची आणखी एक कादंबरी गाजली होती . या कादंबरीवर याच नावाचा पुढे चित्रपट निघाला . आज आपण परिचय करून घेत असलेल्या कादंबरीवर सुद्धा दी निगोशिएटर हा चित्रपट येऊन गेलाय . विलक्षण गतिमान कथानक हे त्यांचे वैशिष्ट्य . अनुवाद कर्त्या लीना गुळवणी यांच्या नावावर देखील बरीच पुस्तके जमा आहेत . त्यांनी मराठी अनुवाद केलेल्या आयुष्याचे धडे गिरविताना ( सुधा मूर्ति ) व टू सर विथ लव्ह. ( ई आर ब्रेथवेट ) या पुस्तकांचा अनुक्रमे चित्रा सोहोनी व प्रदीप तळेकरजी यांनी आपल्या गृपवर करून दिलेला परिचय रसिकांना आठवतच असेल . आता पुस्तकाकडे वळूया . अमेरिका व रशिया या दोन जागतिक स्तरावरील बलाढ्य शक्ती . या एकमेकांच्या जरी कट्टर प्रतिस्पर्धी असल्या , तरीही प्रस्तुत कादंबरीत महा विघातक , महा विध्वंसक अशी संरक्षण विषयक मिसाईल्स निर्मिती करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना बंधने घालवीत या हेतूने या दोन देशात `नानटेक्त` करार होऊ घातला आहे . या पार्शवभूमीवर कथानक सुरु होते . हा करार होऊ नये असे दोन्ही देशातील उद्योगपतीना आर्थिक हितसंबंधा साठी , तर दोन्हीकडील राजकीय शक्तींना पक्षीय राजकारण ,वैयक्तिक महत्वाकांक्षा यामुळे गैरसोयीचा ठरणार असल्याने नकोसा असतो . साहजिकच तो करार हाणून पाडण्यासाठी जो तो निकराने प्रयत्नास लागतो .त्यातच एक खतरनाक संधीसाधू आंतर राष्ट्रीय गुन्हेगार टोळी यात एन्ट्री घेते . या टोळीचे संबंध व लागेबांधे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या दोन्ही देशातील मंत्रालयात मोठ्या पदांवर सभ्यते चे पांढरपेशी बुरखे घालून काम करणाऱ्या , उच्च पदस्थ , महत्वाचे अतिमहत्त्वाचे अधिकारी यांच्या पर्यंत पोचलेले असतात . जरी हे चित्र बहुदा सर्वच देशात असले तरी सामान्य नागरिकांच्या आकलन शक्तीच्या पार पल्याड असे हे एक निराळे जग असते . हा नानटेक्ट करार होऊ नये यासाठी मग सर्व पातळीवर सर्व शक्ती कार्यरत होतात . याची काहीशी कुणकुण लागून सीआयए व केजीबी देखील जागरूक होते . पण घडायचे ते घडतेच . अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एकुलत्या एक मुलाचे रशियन भूमीतून अपहरण होते . अपहरणकर्ते खंडणी मागतात . आणि त्याची सुटका करायसाठी नेमला जातो *`क्वीन* हा व्यावसायिक *मध्यस्थ* सुरवातीला फक्त अपहरण कर्त्यांशी वाटाघाटी करून मुलाची सुखरूप सुटका करून देणे एवढच काम असणारा क्वीन चक्क अपयशी ठरतो . रक्कम ही जाते आणि मुलाची हत्या पण होते . पण दरम्यान क्वीन च्या हाती बरेचसे मोडके तोडके धागेदोरे लागलेले असतात . त्यामुळे तो हे प्रकरण एकट्याने लढायचा निर्णय घेतो . केजीबी व सीआयए यांचा विरोध पत्करून , त्यांना आपल्या पाठीवर घेऊन , या कृत्या मागची पसरलेली पाळेमुळे रशिया अमेरिका इंग्लंड व आणखी काही युरोपीय देशातून खणून काढतो .एकांडा शिलेदार बनलेला निराधार क्वीन हत्या करणाऱ्या संपूर्ण टोळीचा मागोवा तर घेतोच पण त्यांना कळसूत्री प्रमाणे त्यांना नाचवणाऱ्या आंतर राष्ट्रीय सभ्य गुंडांचाही , उच्च राजकीय नेत्यांचाही पर्दाफाश करतो . कथानकाचा हा सारा प्रवासच सापशिडी सारखा अंदाज न येणारा . विस्मय कारक कलाटण्या देणारा.गुंता गुंतीचे कूट प्रश्न निर्माण करणारा . राजकारण्यांच्या ,स्वार्थाच्या ,क्रूरतेच्या , बुद्धीचातुर्याच्या अशा एका अनोख्या विश्वात आपण क्वीन बरोबरच गुंतून जातो .त्यातील जीवघेण्या पाठलागाचे थरार आपल्या काळजाचे ठोके चुकवतात.उत्कंठा शिगेला पोचते .आणि अखेरीस फ्रेडरिक या कोड्याची एखाद्या कुशल सर्जन प्रमाणे हळुवार चिरफाड करत असताना आपल्यालाही एक उत्तम दर्जेदार कादंबरी वाचल्याचे समाधान मिळते . मूळ लेखकाला जरी हे श्रेय देणे योग्य , तरी त्याच बरोबर मी तरी अनुवादक लीना सोहोनी याना हे श्रेय काहिसे अधिकच देईन . याचे मुख्य कारण इंग्रजी पुस्तके वाचताना आपल्याला स्वतः च्या शब्द संग्रहाची मर्यादा पडते .व्याकरणाचा पुरेसा अभ्यास नसेल तर सौन्दर्य समजत नाही . म्हणूनच अनुवादक इथे फार महत्वाचा दुवा ठरतो . लीना सोहोनी यांनी वरील जबाबदारी - पुस्तकातील क्वीन या मध्यस्था - इतकीच चोख पार पाडली आहे . क्वीन या कथानायकाची व्यक्तिरेखा हा या कादंबरीचा आत्मा आहे . अशा या जेम्स बॉण्ड ची आठवण करून देणाऱ्या व्यक्तिरेखेला मूळ इंग्रजी एवढ्याच ताकदीने त्यांनी मराठी भाषेत रंगवले आहे . आणि हीच ` मध्यस्थ` ची दमदार अशी जमेची बाजू आहे .कोणत्याही प्रसंगवर्णनात अचूक मराठी शब्दयोजना ,मूळ इंग्रजी वातावरण , व्यक्ती , समाज अगदी कशाचा ही मूळ बाज न बदलता त्यांनी हा अनुवाद आपल्या पुढे मांडलाय . केवळ या समर्थ अनुवादा मुळेच मराठी साहित्यात एका दर्जेदार रहस्यकथेची भर पडली आहे असेच मला वाटते राजेंद्र थिटे ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    रशियातील केजीबी चिंतेत आहे कारण आता त्यांच्याकडे जो तेलसाठा आहे तो फक्त सात ते आठ वर्षे पुरणार आहे .त्यानंतर रशियाचे दिवाळे वाजणार आहे . भरपूर तेलसाठा असणाऱ्या राष्ट्रावर आक्रमण करायची त्यांची योजना आहे . पण सध्याचा अमेरिकेचा अध्यक्ष जॉन कॉरमॅक असतान ते शक्य नाही . अमेरिकेतील तेल व्यवसायिक सायरस मिलर चिंतेत आहे कारण जगभरातील तेलसाठे या वीस वर्षांत संपुष्टात येणार आहे आणि अरबी राष्ट्रांवर त्यांना अवलंबून राहावे लागेल .त्याला आता असे राष्ट्र पाहिजे की ते त्याच्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचेल पण त्यासाठी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बदलायला हवा. पीटर कॅब अमेरिकेतील मोठा शस्त्रास्त्र निर्माता.त्याने नवीन शस्त्राचा शोध लावलाय त्यासाठी लाखो डॉलर्स मोजलेत. पन्नास हजार माणसे कामाला लावली आहेत.पण अमेरिका आणि रशियाचा शस्त्रास्त्र कपातीचा करार झाला तर तो रस्त्यावर येणार आहे .कसेही करून हा करार होऊ नये यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी राष्ट्राध्यक्ष बदलायचीही त्याची तयारी आहे . अमेरिका आणि रशियाचा शस्त्रास्त्र कपातीचा करार शेवटच्या टप्प्यात आहे . दोन्ही देशाचे अध्यक्ष सोडल्यास कोणालाही हा करार व्हावा असे वाटत नाही . देशातील संरक्षण खर्चात कपात करणे दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटनाना आणि लष्करप्रमुखांना मान्य नाही. त्याचवेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या मुलाचे ऑक्सफर्डमधून अपहरण होते . त्याच्या सुटकेसाठी जगातील सर्वोत्तम मध्यस्थ निवडला जातो . क्वीन ही एकमेव व्यक्ती आहे जी सुटकेसाठी योग्य वाटाघाटी करू शकेल . क्वीन त्याच्या सुटकेत यशस्वी होतो पण सर्वांच्या समोर त्याची हत्याही होते . वाटाघाटी यशस्वी झाल्या तरीही हत्या का ???? कोण आहेत या हत्येच्या मागे . क्वीन हे रहस्य शोधून काढायचे ठरवितो . एक श्वास रोखून ठेवणारा पाठलाग,भयानक कटाचा हळू हळू होणारा उलगडा पाहून वाचक कमालीचे उत्तेजित होतो तर कधी आश्चर्यचकित .लेखकाने विलक्षण बुद्धिमत्तेनी लिहिलेली ही कहाणी वाचून तुम्ही स्तंभित होणार आहात . ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan

    ऑक्सफोर्डशायरमधल्या एका गावरस्त्यावरून एका युवकाचे अपहरण हा अमेरिकेच्या अध्यक्षाला त्याच्या पदावरून हुसकावून लावण्याच्या, आत्यंतिक व्रूर अशा कारस्थान-नाट्यातील पहिला प्राणांतिक अंक होता. तो यशस्वीरित्या पार पाडला गेला, तर हा अध्यक्ष या अनपेक्षित धक्कयाने मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचून अकार्यक्षम होईल, हा एकमेव हेतू या अपहरणामागे होता. हा दुर्दैवी प्रकार जगातील फक्त एकच व्यक्ती थोपवून धरू शकत होती– क्वन! अपहरणाच्या अशा प्रकारांमध्ये सातत्याने यशस्वी ठरलेला जगद्विख्यात मध्यस्थ. अपहरणकत्र्यांच्या मूळ हेतूविषयी अल्पांशानेही कल्पना नसताना या निष्पाप युवकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या आयुष्याची बाजी लावणारा मध्यस्थ. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more