* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE NEGOTIATOR
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788171612079
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 420
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :FREDERICK FORSYTH COMBO OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE KIDNAPPING OF A YOUNG MAN ON A COUNTRY ROAD IN OXFORDSHIRE IS BUT THE FIRST BRUTAL STEP IN A RUTHLESS PLAN TO FORCE THE PRESIDENT OF THE UNITED STATES OUT OF OFFICE. IF IT SUCCEEDS, HE WILL BE PSYCHOLOGICALLY AND EMOTIONALLY DESTROYED. ONLY ONE MAN CAN STOP IT - QUINN, THE WORLD`S FOREMOST NEGOTIATOR, WHO MUST BARGAIN FOR THE LIFE OF AN INNOCENT MAN, UNAWARE THAT RANSOM WAS NEVER THE KIDNAPPER`S REAL OBJECTIVE . . . THE NEGOTIATOR UNFOLDS WITH THE SPELLBINDING EXCITEMENT, UNCEASING SURPRISE AND RIVETING DETAIL THAT ARE THE HALLMARKS OF FREDERICK FORSYTH, THE MASTER STORYTELLER.
ऑक्सफोर्डशायरमधल्या एका गावरस्त्यावरून एका युवकाचे अपहरण हा अमेरिकेच्या अध्यक्षाला त्याच्या पदावरून हुसकावून लावण्याच्या, आत्यंतिक व्रूर अशा कारस्थान-नाट्यातील पहिला प्राणांतिक अंक होता. तो यशस्वीरित्या पार पाडला गेला, तर हा अध्यक्ष या अनपेक्षित धक्क्याने मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचून अकार्यक्षम होईल, हा एकमेव हेतू या अपहरणामागे होता. हा दुर्दैवी प्रकार जगातील फक्त एकच व्यक्तीR थोपवून धरू शकत होती– क्वन! अपहरणाच्या अशा प्रकारांमध्ये सातत्याने यशस्वी ठरलेला जगद्विख्यात मध्यस्थ. अपहरणकत्र्यांच्या मूळ हेतूविषयी अल्पांशानेही कल्पना नसताना या निष्पाप युवकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या आयुष्याची बाजी लावणारा मध्यस्थ.या अपहरणनाट्याचा उलगडा होत असताना श्वास रोखून ठेवणाNया औत्सुक्याने वाचक कधी कमालीचा उत्तेजित होतो, कधी आश्चर्याने चकित होतो, तर कधी अंगावर कोसळणाNया तपशिलांमुळे गोठल्यासारखा होतो. प्रेÂडरिक फॉर्सिथ या जागतिक कीर्तीच्या लेखकाने विलक्षण कौशल्याने विणलेली ही चित्तचक्षुचमत्कारिक कहाणी वाचताना थरारक अनुभवांमुळे तुम्ही पानापानांवर स्तंभित होणार आहात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MADHYASTHA #THENEGOTIATOR #मध्यस्थ #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEENASOHONI #लीनासोहोनी #FREDERICKFORSYTH #फ्रेडरिकफॉर्सस्थ "
Customer Reviews
  • Rating StarRajendra Thite

    गुप्तहेर कथा , रहस्य कथा , साहस कथा . भले मग त्या सत्यकथा असोत अथवा काल्पनिक . साहित्यात त्यांचेही स्थान महत्वाचे असतेच .आजूबाजूचे सर्व वातावरण विसरायला लावून वाचकाची मती क्षणभर गुंग करण्याची शक्ती या प्रकारात असते . चला अशाच एका साहसी मोहमेवर निघूया . पुस्तक प्रेमी च्या सदस्यांना या मूळ पुस्तकाचे कर्ते फ्रेडरिक फोर्सिथ नवीन नाहीत . त्यांच्या the fox या मूळ कादंबरीचा मा . सुधांशु नाईक यांनी आपल्या गृपला परिचय करून दिलाच आहे . त्यांचेच हे आणखी एक पुस्तक . इंग्रजी साहित्यिक फ्रेडरिक फोर्सिथ यांनी बी बी सी मध्ये पोलिटिकल कॉरस्पॉन्डन्ट म्हणूनही काम केले आहे . प्रस्तुत काल्पनिक कादंबरीत त्यांनी आपल्या तिथल्या कामकाज व अनुभवाचा चपखलपणे वापर केला असावा . काही राजकीय नेतृत्वाची नावे त्यांनी कादंबरीत पदासकट वापरली आहेत . 1971 मध्ये दी डे ऑफ दि जॅकल्स हि त्यांची आणखी एक कादंबरी गाजली होती . या कादंबरीवर याच नावाचा पुढे चित्रपट निघाला . आज आपण परिचय करून घेत असलेल्या कादंबरीवर सुद्धा दी निगोशिएटर हा चित्रपट येऊन गेलाय . विलक्षण गतिमान कथानक हे त्यांचे वैशिष्ट्य . अनुवाद कर्त्या लीना गुळवणी यांच्या नावावर देखील बरीच पुस्तके जमा आहेत . त्यांनी मराठी अनुवाद केलेल्या आयुष्याचे धडे गिरविताना ( सुधा मूर्ति ) व टू सर विथ लव्ह. ( ई आर ब्रेथवेट ) या पुस्तकांचा अनुक्रमे चित्रा सोहोनी व प्रदीप तळेकरजी यांनी आपल्या गृपवर करून दिलेला परिचय रसिकांना आठवतच असेल . आता पुस्तकाकडे वळूया . अमेरिका व रशिया या दोन जागतिक स्तरावरील बलाढ्य शक्ती . या एकमेकांच्या जरी कट्टर प्रतिस्पर्धी असल्या , तरीही प्रस्तुत कादंबरीत महा विघातक , महा विध्वंसक अशी संरक्षण विषयक मिसाईल्स निर्मिती करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना बंधने घालवीत या हेतूने या दोन देशात `नानटेक्त` करार होऊ घातला आहे . या पार्शवभूमीवर कथानक सुरु होते . हा करार होऊ नये असे दोन्ही देशातील उद्योगपतीना आर्थिक हितसंबंधा साठी , तर दोन्हीकडील राजकीय शक्तींना पक्षीय राजकारण ,वैयक्तिक महत्वाकांक्षा यामुळे गैरसोयीचा ठरणार असल्याने नकोसा असतो . साहजिकच तो करार हाणून पाडण्यासाठी जो तो निकराने प्रयत्नास लागतो .त्यातच एक खतरनाक संधीसाधू आंतर राष्ट्रीय गुन्हेगार टोळी यात एन्ट्री घेते . या टोळीचे संबंध व लागेबांधे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या दोन्ही देशातील मंत्रालयात मोठ्या पदांवर सभ्यते चे पांढरपेशी बुरखे घालून काम करणाऱ्या , उच्च पदस्थ , महत्वाचे अतिमहत्त्वाचे अधिकारी यांच्या पर्यंत पोचलेले असतात . जरी हे चित्र बहुदा सर्वच देशात असले तरी सामान्य नागरिकांच्या आकलन शक्तीच्या पार पल्याड असे हे एक निराळे जग असते . हा नानटेक्ट करार होऊ नये यासाठी मग सर्व पातळीवर सर्व शक्ती कार्यरत होतात . याची काहीशी कुणकुण लागून सीआयए व केजीबी देखील जागरूक होते . पण घडायचे ते घडतेच . अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एकुलत्या एक मुलाचे रशियन भूमीतून अपहरण होते . अपहरणकर्ते खंडणी मागतात . आणि त्याची सुटका करायसाठी नेमला जातो *`क्वीन* हा व्यावसायिक *मध्यस्थ* सुरवातीला फक्त अपहरण कर्त्यांशी वाटाघाटी करून मुलाची सुखरूप सुटका करून देणे एवढच काम असणारा क्वीन चक्क अपयशी ठरतो . रक्कम ही जाते आणि मुलाची हत्या पण होते . पण दरम्यान क्वीन च्या हाती बरेचसे मोडके तोडके धागेदोरे लागलेले असतात . त्यामुळे तो हे प्रकरण एकट्याने लढायचा निर्णय घेतो . केजीबी व सीआयए यांचा विरोध पत्करून , त्यांना आपल्या पाठीवर घेऊन , या कृत्या मागची पसरलेली पाळेमुळे रशिया अमेरिका इंग्लंड व आणखी काही युरोपीय देशातून खणून काढतो .एकांडा शिलेदार बनलेला निराधार क्वीन हत्या करणाऱ्या संपूर्ण टोळीचा मागोवा तर घेतोच पण त्यांना कळसूत्री प्रमाणे त्यांना नाचवणाऱ्या आंतर राष्ट्रीय सभ्य गुंडांचाही , उच्च राजकीय नेत्यांचाही पर्दाफाश करतो . कथानकाचा हा सारा प्रवासच सापशिडी सारखा अंदाज न येणारा . विस्मय कारक कलाटण्या देणारा.गुंता गुंतीचे कूट प्रश्न निर्माण करणारा . राजकारण्यांच्या ,स्वार्थाच्या ,क्रूरतेच्या , बुद्धीचातुर्याच्या अशा एका अनोख्या विश्वात आपण क्वीन बरोबरच गुंतून जातो .त्यातील जीवघेण्या पाठलागाचे थरार आपल्या काळजाचे ठोके चुकवतात.उत्कंठा शिगेला पोचते .आणि अखेरीस फ्रेडरिक या कोड्याची एखाद्या कुशल सर्जन प्रमाणे हळुवार चिरफाड करत असताना आपल्यालाही एक उत्तम दर्जेदार कादंबरी वाचल्याचे समाधान मिळते . मूळ लेखकाला जरी हे श्रेय देणे योग्य , तरी त्याच बरोबर मी तरी अनुवादक लीना सोहोनी याना हे श्रेय काहिसे अधिकच देईन . याचे मुख्य कारण इंग्रजी पुस्तके वाचताना आपल्याला स्वतः च्या शब्द संग्रहाची मर्यादा पडते .व्याकरणाचा पुरेसा अभ्यास नसेल तर सौन्दर्य समजत नाही . म्हणूनच अनुवादक इथे फार महत्वाचा दुवा ठरतो . लीना सोहोनी यांनी वरील जबाबदारी - पुस्तकातील क्वीन या मध्यस्था - इतकीच चोख पार पाडली आहे . क्वीन या कथानायकाची व्यक्तिरेखा हा या कादंबरीचा आत्मा आहे . अशा या जेम्स बॉण्ड ची आठवण करून देणाऱ्या व्यक्तिरेखेला मूळ इंग्रजी एवढ्याच ताकदीने त्यांनी मराठी भाषेत रंगवले आहे . आणि हीच ` मध्यस्थ` ची दमदार अशी जमेची बाजू आहे .कोणत्याही प्रसंगवर्णनात अचूक मराठी शब्दयोजना ,मूळ इंग्रजी वातावरण , व्यक्ती , समाज अगदी कशाचा ही मूळ बाज न बदलता त्यांनी हा अनुवाद आपल्या पुढे मांडलाय . केवळ या समर्थ अनुवादा मुळेच मराठी साहित्यात एका दर्जेदार रहस्यकथेची भर पडली आहे असेच मला वाटते राजेंद्र थिटे ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    रशियातील केजीबी चिंतेत आहे कारण आता त्यांच्याकडे जो तेलसाठा आहे तो फक्त सात ते आठ वर्षे पुरणार आहे .त्यानंतर रशियाचे दिवाळे वाजणार आहे . भरपूर तेलसाठा असणाऱ्या राष्ट्रावर आक्रमण करायची त्यांची योजना आहे . पण सध्याचा अमेरिकेचा अध्यक्ष जॉन कॉरमॅक असतान ते शक्य नाही . अमेरिकेतील तेल व्यवसायिक सायरस मिलर चिंतेत आहे कारण जगभरातील तेलसाठे या वीस वर्षांत संपुष्टात येणार आहे आणि अरबी राष्ट्रांवर त्यांना अवलंबून राहावे लागेल .त्याला आता असे राष्ट्र पाहिजे की ते त्याच्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचेल पण त्यासाठी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बदलायला हवा. पीटर कॅब अमेरिकेतील मोठा शस्त्रास्त्र निर्माता.त्याने नवीन शस्त्राचा शोध लावलाय त्यासाठी लाखो डॉलर्स मोजलेत. पन्नास हजार माणसे कामाला लावली आहेत.पण अमेरिका आणि रशियाचा शस्त्रास्त्र कपातीचा करार झाला तर तो रस्त्यावर येणार आहे .कसेही करून हा करार होऊ नये यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी राष्ट्राध्यक्ष बदलायचीही त्याची तयारी आहे . अमेरिका आणि रशियाचा शस्त्रास्त्र कपातीचा करार शेवटच्या टप्प्यात आहे . दोन्ही देशाचे अध्यक्ष सोडल्यास कोणालाही हा करार व्हावा असे वाटत नाही . देशातील संरक्षण खर्चात कपात करणे दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटनाना आणि लष्करप्रमुखांना मान्य नाही. त्याचवेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या मुलाचे ऑक्सफर्डमधून अपहरण होते . त्याच्या सुटकेसाठी जगातील सर्वोत्तम मध्यस्थ निवडला जातो . क्वीन ही एकमेव व्यक्ती आहे जी सुटकेसाठी योग्य वाटाघाटी करू शकेल . क्वीन त्याच्या सुटकेत यशस्वी होतो पण सर्वांच्या समोर त्याची हत्याही होते . वाटाघाटी यशस्वी झाल्या तरीही हत्या का ???? कोण आहेत या हत्येच्या मागे . क्वीन हे रहस्य शोधून काढायचे ठरवितो . एक श्वास रोखून ठेवणारा पाठलाग,भयानक कटाचा हळू हळू होणारा उलगडा पाहून वाचक कमालीचे उत्तेजित होतो तर कधी आश्चर्यचकित .लेखकाने विलक्षण बुद्धिमत्तेनी लिहिलेली ही कहाणी वाचून तुम्ही स्तंभित होणार आहात . ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan

    ऑक्सफोर्डशायरमधल्या एका गावरस्त्यावरून एका युवकाचे अपहरण हा अमेरिकेच्या अध्यक्षाला त्याच्या पदावरून हुसकावून लावण्याच्या, आत्यंतिक व्रूर अशा कारस्थान-नाट्यातील पहिला प्राणांतिक अंक होता. तो यशस्वीरित्या पार पाडला गेला, तर हा अध्यक्ष या अनपेक्षित धक्कयाने मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचून अकार्यक्षम होईल, हा एकमेव हेतू या अपहरणामागे होता. हा दुर्दैवी प्रकार जगातील फक्त एकच व्यक्ती थोपवून धरू शकत होती– क्वन! अपहरणाच्या अशा प्रकारांमध्ये सातत्याने यशस्वी ठरलेला जगद्विख्यात मध्यस्थ. अपहरणकत्र्यांच्या मूळ हेतूविषयी अल्पांशानेही कल्पना नसताना या निष्पाप युवकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या आयुष्याची बाजी लावणारा मध्यस्थ. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more