* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789392482274
  • Edition : 2
  • Publishing Year : MAY 2022
  • Weight : 1000.00 gms
  • Pages : 1296
  • Language : MARATHI
  • Category : NOVEL
  • Discount : WORLD BOOK DAY OFFER 23 APRIL(Login to get best discount offers.)
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
GOTHAM BUDDHA`S BIOGRAPHY IS ABOUT THE JOURNEY FROM PRINCE SIDDHARTHA TO TATHAGATA, BECOMING A BUDDHA... HIS FIRST ROYAL LIFE IN THIS JOURNEY ... HIS WANDERINGS AFTER LEAVING HOME AND HIS STRUGGLE TO FIND OUT THE ULTIMATE TRUTH IN THE MEANTIME ... THEN THE REAL TRUTH THAT CAME TO HIM ... FROM THAT THE ESTABLISHMENT OF BUDDHIST DHAMMA, BHIKKHU SANGH ... ITS SPREAD IN THE COUNTRY AND ABROAD ... IN TREND AND RETIREMENT STRUGGLE ... AN EPIC NOVEL DEPICTING MANY DRAMATIC EVENTS IN THE LIFE OF THE BUDDHA, THE LIGHT OF THE BUDDHIST DHAMMA, THE STORY-LIKE, DETAILED VISION OF PHILOSOPHY.
गोतम बुद्धाचं जीवनचरित्र म्हणजे राजपुत्र सिद्धार्थ ते तथागत, बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास आणि बुद्ध झाल्यानंतरचा प्रवास...या प्रवासातील त्याचं सुरुवातीचं राजस जीवन...त्याच्या पित्याने म्हणजे शुद्धोदन महाराजांनी त्याला वैराग्यापासून परावृत्त करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना न जुमानता पुत्रजन्मानंतर काही तासांतच त्याने केलेला गृहत्याग...गृहत्यागानंतरची त्याची भ्रमंती आणि त्यादरम्यान अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी त्याची चाललेली धडपड...त्यानंतर अंतिम सत्याचा त्याला झालेला साक्षात्कार...त्यातूनच बौद्ध धम्माची, भिक्खू संघाची झालेली स्थापना...देश-परदेशात त्याचा झालेला प्रसार...प्रवृत्ती आणि निवृत्तीतील संघर्षाचं...बुद्धांच्या जीवनातील अनेक नाट्यमय प्रसंगांचं, बौद्ध धम्माच्या प्रकाशाचं, तत्त्वज्ञानाचं कथारूपी, तपशीलवार दर्शन घडविणारी महाकादंबरी
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य #तथागतगोतमबुद्ध #वसंतरावगायकवाड #चरित्रात्मककादंबरी #कपिलवस्तू #महाराजशुद्धोदन #महाराणीमायावती #महाराणीप्रजापति #सिद्धार्थ #तथागतगोतम #सावत्थी #अनाथपिाQण्डकाराम #स्तूप #आनंद #देवदत्त, राहुल, यशोधरा, अरहत, भिक्खू, वैसाली, पसेनदी, अजातशत्रू, आज्ञात कोण्डण्ण, महामोगल्लान, सारिपुत्त, पब्बज्जा, उपालि, धम्म, परिनिर्वाण, काल, बोधिवृक्ष, कोसल #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #TATHAGATGOTAMABUDHA #VASANTGAIKWAD #CHARITRATMAKKADAMBARI #KAPILVASTU #MAHARAJSHUDDHODAN #MAHARANIMAYAVATI #MARAHANIPRAJAPATI #SIDDHARTH #TATHAGATGOTAMA #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MEHTAPUBLISHINGHOUSE
Customer Reviews
  • Rating Starप्रा.डॉ.प्रशांत गायकवाड,पेठ वडगाव,जिल्हा कोल्हापूर

    वैजनाथ महाजन यांनी आपल्या तथागत गोतम बुद्ध या कादंबरीचे समीक्षण नुकतेच वातचले.ते मनाला खूप खूप भावले.अत्यंत मोजक्या शब्दात एका महा कादंबरी बद्दल लिहिले निश्चित च सोपे नाही हे आव्हानात्मक काम समर्थपणे पेलल्या बद्दल मा.महाजन यांचे अभिनंदन.त्यांनी काही ादंबऱ्यांचे केलेले निर्देश लक्षणीय आहेत.कादंबरी चे साहित्यातील स्थान अचूक सांगितले आहे.कादंबरी कोणकोणत्या अंगांनी आकार घेत पुढे जाते या विषयी अधिक तपशील आले असते तर बरे झाले असते.वैजनाथ महाजन यांनी ज्या अधिकारवाणीने या विषयी भाष्य केले आहे ते अगदी वस्तुनिष्ठ आणि गांभीर्याने विचार करायला प्रवृत्त करणारे आहे.खूप छान.लेखक आणि समीक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन.प्रकाशकांनी कादंबरी प्रकाशित करण्याचे केलेले धाडस कौतुकास्पद आहे त्यांना ही हार्दिक शुभेच्छा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more