* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAYANKAL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661750
  • Edition : 8
  • Publishing Year : 1939
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 108
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHY DID I NAME THIS COLLECTION AS SAYANKAAL? SOME OF MY READERS QUESTIONED ME POINTING AT THE FACT THAT MY EARLIER COLLECTION WAS ‘CHANDANYAT`, SO THE NEXT SHOULD NATURALLY BE NAMED AS ‘MADHYARATRA-MIDNIGHT`. HOW IT IS THAT YOU ARE GOING IN A REVERSE MANNER? WHEN I GAVE IT A THOUGHT THEN I REALISED THAT THE MOST APPRECIATED PICTURE THAT I HAD IN MY MIND CONTAINED THREE MAIN FEATURES. FIRSTLY, THE PICTURE WAS SHOWING A SETTING SUN WITH ITS MILD GOLDEN RAYS REFLECTING IN A BEAUTIFUL LAKE, SECONDLY THERE WERE HUNDREDS OF LOTUSES IN THE LAKE, THEY WERE SLOWLY AND TENDERLY CLOSING THEIR PETALS AND THIRDLY THE SKY WAS AWAKENING TO THE TWINKLING STARS. THE LOTUSES WERE TELLING THAT THROUGHOUT THE DAY WE ARE IN FULL BLOOM AND THROUGHOUT THE NIGHT YOU ARE IN FULL SWING. TWILIGHT IS THE ONLY TIME WHEN WE ALL ARE HALFWAY EITHER FOR TWINKLING OR FOR SHUTTING. THE PICTURE RESEMBLED MY ATTEMPT OF BLENDING POETRY, HUMOUR AND PHILOSOPHY TOGETHER IN A SORT OF COLLECTION. THE POETIC ASPECT OF A SHORT ESSAY SHOULD BE AS MILD AS THE SETTING SUN. THE HUMOUR SHOULD BE AS TENDER AS THE LOTUS PETALS, ONLY HALF CLOSED, CREATING ONLY HUMOUR, NOT HURTING ANY ONE, BRINGING A SMILE ON THE READER`S LIPS AND THE PHILOSOPHY SHOULD BE AS SCANTY AS THE STARS JUST EMERGED IN THE SKY, BUT BEAUTIFUL FROM THE BEGINNING.
‘‘लघुनिबंधांतली काव्यस्थळे मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यातला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक – पोट धरून हसविणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा – असावा आणि त्यातून सूचित होणारे तत्त्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे – विरळ, पण सुंदर – असावेत, अशा ज्या काही कल्पना माझ्या मनात घोळत होत्या, त्या व्यक्त करण्याकरिताच "सायंकाल" या नावाचा मी आश्रय घेतला...’’ वि.स.खांडेकरांनी कथाकादंबNयांबरोबरच, लघुनिबंधांचेही विपुल लेखन केले आहे. मराठी साहित्यात लघुनिबंध हा साहित्यप्रकार रुजवण्यात आणि तो विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे, या संग्रहातील निबंधांवरून सुस्पष्टपणे लक्षात येते. या संग्रहातील लघुनिबंधांमध्ये काव्य, विनोद व तत्त्वज्ञान यांचा सुरेख संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे लघुनिबंध वाङ्मयगुणांनी अलंकृत आणि विचारप्रवर्तक आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #सायंकाल
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 15-01-1995

    जीवनातील विसंगती गंभीरपणे मांडणारे लघुनिबंधसंग्रह… मेहता प्रकाशनाने अलीकडे कै. वि. स. खांडेकर यांच्या दुर्मिळ झालेल्या साहित्याचे देखणे पुर्नमुद्रण करून अभ्यासकांची चांगली सोय केली आहे. ‘सायंकाल’ (१९३९) आणि ‘अविनाश’ (१९४१) या दोन लघुनिबंधसंग्रहाच्याया नव्या आवृत्त्या म्हणूनच स्वागतार्ह वाटतात. दोन्हीलाही लेखकाच्या उपयुक्त प्रस्तावना आहेत. ‘सायंकाल’मध्ये त्यांच्या १८, तर ‘अविनाश’मध्ये १४ लघुनिबंधांचा समावेश आहे. दोन्हींवर चंद्रमोहन कुलकर्णीची सुंदर मुखपृष्ठे आहेत. ‘लघुनिबंध’ हा वाङ्मयप्रकार आज नाट्यछटेप्रमाणेच अस्तंगत झाला असला, तरी ललित निबंध या नव्या स्वरूपात तो बहरताना दिसतो. १९३० ते ४० या दशकात त्याला बहर आला होता. कै. फडके यांनी इंग्रजीतील रॉबर्ट लिंड, ए. जी. गार्डनर, ल्यूकस चेस्टरटन, लॅम्ब वगैरे लघुनिबंधकारांचे ‘पर्सनल एसेज’ वाचून मराठीतही असे सुटसुटीत व खेळकर लघुनिबंधक का लिहिले जाऊ नयेत, असे वाटले आणि त्यांनी १९२५ मध्ये ‘रत्नाकर’ मासिकात आपली ‘सुहास्य’ ही पहिली गुजगोष्ट लिहिली. त्यानंतर कै. वि. स. खांडेकर आणि अनंत काणेकर यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण लघुनिबंध लिहिले. खांडेकरांनी ‘वैनतेय’ या सावंडवाडीतून निघणाऱ्या मासिकातून आपले लघुनिबंध लिहिले, त्यामुळे तेच मराठी लघुनिबंधाचे जनक आहेत, असा एक वाद आनंद यादव यांनी फडके यांच्या हयातीतच निर्माण केला होता. फडके यांनी ‘मीच लघुनिबंधाचा जनक’ असे त्याला उत्तरही दिले होते. वाद निरर्थक होता. कारण फडके आणि खांडेकरांच्या लघुनिबंधात काहीही साम्य नव्हते, हे आज खांडेकरांच्या प्रस्तुतचे दोन निबंधसंग्रह वाचून जाणवते. फडके यांना अभिप्रेत असलेल्या प्रकारचा आत्माविष्कार खांडेकरांना अभिप्रेत नाही. काणेकरांप्रमाणेच वैचारिकता हाच त्यांचा विशेष आहे. वाचकांना विश्वासात घेऊन आपली सुख-दु:खे त्यांच्या कानात सांगणे, (‘गुजगोष्टी’ हे अर्थपूर्ण नाव फडके यांनी दिले होते व ते योग्य होते.) क्षुल्लक विषयाची एक वेगळी बाजू त्याच्या दृष्टोत्पत्तीस आणून देणे, त्याला तशाच प्रसन्न, मुलायम भाषेची व शैलीची जोड देणे, हे काणेकर व खांडेकर यांना जमले नाही. कारण ती त्यांची प्रकृतीच नव्हती. त्यापेक्षा विषयाच्या निमित्ताने एखादा चमकदार विचार मांडणे, वाचकांना धक्का देणे, हे काणेकरांचे वैशिष्ट्य होते. खांडेकरांनी ‘अविनाश’च्या प्रस्तावनेत त्याची तुलना वाऱ्यावर डोलणाऱ्या रंगिबेरंगी फुग्यांशी केली आहे, त्यातील वेगळी भाषा हेही विशेष त्यांनी सांगितले आहेत. पण त्यांचे लघुनिबंध वैचारिकतेच्या अंगानेच अधिक जातात. त्याबरोबरच लघुनिबंधाच्या प्रकृतीशी मिळती-जुळती भाषा त्यांच्याजवळ नसल्याने उपमा, रूपक, उप्रेक्षा इत्यादींनी सजलेली नेहमीची त्यांची भाषाच कृत्रिमपणे ते इथेही वापरतात आणि या वाङ्मयाला ती काहीशी ओबड-धोबड व विसंगतही वाटते. काणेकर एखाद्या चमकदार विचार चटकन सांगून मोकळे होतात, असेही खांडेकर करीत नाहीत. फडके परंपरेतील शेवटचे लघुनिबंधकार म्हणजे कै. ना. मा. संत हेच होत, त्यामुळे खांडेकरांचे समाजिक चिंतन, त्याचे विचार हे लेखकाच्या आत्मविष्कारापेक्षा या लघुनिबंधात अधिक महत्त्वाची जागा घेतात. आज नव्याने लिहिला जाणारा ललित निबंधही वैचारिकतेकडे अधिक झुकताना दिसतो व त्यात संशोधन, चिंतन, मनन, निरीक्षण इत्यादींना प्राधान्य आलेले दिसते. आजचा ललित निबंध हा आठवण, प्रवास, आत्मचरित्र, भाववृत्ती, कथा इत्यादी अनेक वाङ्मय प्रकारांशी सलगी करताना दिसतो. (उदाहरणार्थ : दुर्गाबाई व इरावतीबार्इंचे ललितनिबंध) त्यामुळेच ललितलेख असेही त्याचे एक नवे नामकरण काही जण करतात, त्यामुळे जुन्या लघुनिबंधातून नवा ललितानिबंध उत्क्रांत झाला, असे खांडेकर म्हणतात ते बरोबर वाटत नाही. गुजगोष्ट किंवा लघुनिबंध किंवा ललितनिबंध आणि ललितलेख हे प्रकार वेगवेगळेच आहेत. एकातून दुसरा उत्क्रांत झाला, हे खरे नाही. खांडेकरांच्या या दोन संग्रहातील लघुनिबंधात तत्त्वदर्शन, भावविहार व कल्पनाविलास यांना प्राधान्य आहे. त्यात पहिल्याला अधिक प्राधान्य आहे. ‘सायंकाल’मध्ये बाळपणीचा काळ सुखाचा, विरह, सुभाषिते, माझे आवडते लेखक, सायंकाल, आणि ‘आविनाश’मधील परीक्षक, सारेच गुलाम इत्यादी लघुनिबंध काहीसे चाकोरीतले आहेत म्हणजे त्यांच्या अंतरंगाची त्यांच्या शीर्षकावरून कल्पना येते व ती सहसा खोटी ठरत नाही. वाचकांना विषयाची अपरिचित बाजू दाखविणे, त्यांना सहसा जमत नाही. ‘सायंकाल’मधील चष्म्यावाचून काढलेला ‘एक तास’ त्यांना आंधळ्याच्या अनुभवाचे दु:ख पटवून देतो. ‘अशोकाची फुले’ त्यांना स्वप्न आणि सत्य यांतील फरक जाणवून देतात. खिस्त, गांधी, गिब्रान यांच्या तत्त्वज्ञानापर्यंत नेतात. ‘पुस्तकातील खुणा’ वरून त्यांना वाटते की पुस्तकातल्या खुणा पुस्तकातच राहतात. ज्यातल्या खुणा आपण विसरत नाही असा एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे अनुभवलेले जीवन, हाच नाही का ? असे ते विचारतात. ‘हरवलेले कागद’, ‘हरवली म्हणून सापडली’ या गुजगोष्टीची आठवण करून देतो. आपण सुंदर आहोत, विख्यात आहोत, उदार आहोत, सभ्य आहोत असे भासवण्याचा प्रयत्न ही मनुष्याची प्रदर्शनाची हौस वाटते तितकी हास्यास्पद नाही, असे ते ‘प्रदर्शन’मध्ये म्हणतात. प्रौढत्वी शैशव जपण्याचा विचार ते ‘एक अपघाता’त मांडतात. काणेकरांच्या ‘दोन मेणबत्त्या’ हा गाजलेला लघुनिबंध वाचून उंदरानी कुरतडलेल्या व आयुष्य फुकट गेलेल्या दुसऱ्या मेणबत्तीची कैफियत त्यांना मांडावीशी वाटते. ‘अविनाश’मध्येही साध्या प्रसंगातून तत्त्वविचाराकडे जाण्याची खांडेकरांची लकब दिसते. भूत, भविष्यकाळापेक्षा वर्तमानकालच जीवनाचा आनंद देत असतो. (पुढे-पुढे), आपल्याला ओळखणाऱ्या व्यक्तींत आपल्याविषयी एकमत कुठे असते ? (दोन पत्रे), हे निबंध विषयाची दुसरी बाजू मांडतात. ‘आंब्याचा मोहर’सारखा एखादा लघुनिबंध अखेर अकारणच फार गंभीर होतो. विचार कितीही प्रभावी असला तरी त्याला पंख नसतात. त्याला नेहमी जमिनीलाच चिटकून राहावे लागते, म्हणून माणसाने अविचारी झाले पाहिजे, हा ‘अकल्पित संदेश’ मधील विचार चमकदार असला तरी गंभीरपणेच व्यक्त होतो. ‘अहं ब्रहास्मि’पेक्षा ‘मी आहे की’ हेच शब्द आज सामान्य मनुष्याच्या आयुष्याचे समाधान करू शकतात (मी आहे की), हा विचार किंवा ‘चहा, गप्पा आणि मुले’ ही मर्यादित असतात तोपर्यंत सुखकारक असतात... पत्रात या तिन्हीचेही फायदे/तोटे एकवटलेले असतात ! हे भाष्य त्यांच्या लघुनिबंधांची प्रकृती स्पष्ट करते. अशी विरोधाभासात्मक रचना हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. खांडेकरांचा लघुनिबंध हा फडके यांच्याप्रमाणे निव्वळ आत्माविष्काराच्या हेतूने लिहिलेली गुजगोष्ट नाही. त्यांची प्रकृती वैचारिक आहे. साध्यासुध्या प्रसंगातून जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान त्यांना सुचलं. काणेकरांप्रमाणे समाजाला धक्का देऊन विचार मांडणे, ही त्यांची वृत्ती नाही. काणेकरांचे गणूकाका सनातन प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्यामते लेखकांच्या मतांच्या संघर्षातून काणेकरांच्या लघुनिबंधात नवविचारांच्या ठिणग्या उडतात. खांडेकर त्यांच्या मानाने सौम्य प्रकृतीचे आहेत. आपल्याला जे अनुभव कथेत वापरता येणे शक्य वाटले नाही, जे आपण लघुनिबंधात वा थोड्या जागेत ‘वैनतेया’तून मांडण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे. केवळ कलाविलास म्हणूनही त्यांनी ते लिहिले नाहीत, त्यामुळे त्यात फडक्यांच्या गुजगोष्टीतले --- शोधू पाहणाऱ्यांची निराशाच होणे शक्यच, पण खांडेकरांसारख्या एका चिंतनशील सतप्रवृत्त आणि पापभीरू आणि समाजाच्या उपेक्षित वर्गाबद्दल अपार कणव वाटणाऱ्या लेखकाला जीवनातील जी विसंगती जाणवली, ती त्याने या दोन (व अन्य) लघुनिबंध संग्रहातून काहीशी गंभीरपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या लघुनिबंधांपेक्षा या दोन संग्रहाला जोडलेल्या त्यांच्या प्रस्तावनाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व या वाङ्मयप्रकारावर अधिक प्रकाश पाडतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more