* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAYANKAL
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661750
  • Edition : 8
  • Publishing Year : 1939
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 108
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHY DID I NAME THIS COLLECTION AS SAYANKAAL? SOME OF MY READERS QUESTIONED ME POINTING AT THE FACT THAT MY EARLIER COLLECTION WAS ‘CHANDANYAT`, SO THE NEXT SHOULD NATURALLY BE NAMED AS ‘MADHYARATRA-MIDNIGHT`. HOW IT IS THAT YOU ARE GOING IN A REVERSE MANNER? WHEN I GAVE IT A THOUGHT THEN I REALISED THAT THE MOST APPRECIATED PICTURE THAT I HAD IN MY MIND CONTAINED THREE MAIN FEATURES. FIRSTLY, THE PICTURE WAS SHOWING A SETTING SUN WITH ITS MILD GOLDEN RAYS REFLECTING IN A BEAUTIFUL LAKE, SECONDLY THERE WERE HUNDREDS OF LOTUSES IN THE LAKE, THEY WERE SLOWLY AND TENDERLY CLOSING THEIR PETALS AND THIRDLY THE SKY WAS AWAKENING TO THE TWINKLING STARS. THE LOTUSES WERE TELLING THAT THROUGHOUT THE DAY WE ARE IN FULL BLOOM AND THROUGHOUT THE NIGHT YOU ARE IN FULL SWING. TWILIGHT IS THE ONLY TIME WHEN WE ALL ARE HALFWAY EITHER FOR TWINKLING OR FOR SHUTTING. THE PICTURE RESEMBLED MY ATTEMPT OF BLENDING POETRY, HUMOUR AND PHILOSOPHY TOGETHER IN A SORT OF COLLECTION. THE POETIC ASPECT OF A SHORT ESSAY SHOULD BE AS MILD AS THE SETTING SUN. THE HUMOUR SHOULD BE AS TENDER AS THE LOTUS PETALS, ONLY HALF CLOSED, CREATING ONLY HUMOUR, NOT HURTING ANY ONE, BRINGING A SMILE ON THE READER`S LIPS AND THE PHILOSOPHY SHOULD BE AS SCANTY AS THE STARS JUST EMERGED IN THE SKY, BUT BEAUTIFUL FROM THE BEGINNING.
‘‘लघुनिबंधांतली काव्यस्थळे मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यातला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक – पोट धरून हसविणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा – असावा आणि त्यातून सूचित होणारे तत्त्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे – विरळ, पण सुंदर – असावेत, अशा ज्या काही कल्पना माझ्या मनात घोळत होत्या, त्या व्यक्त करण्याकरिताच "सायंकाल" या नावाचा मी आश्रय घेतला...’’ वि.स.खांडेकरांनी कथाकादंबऱ्यां बरोबरच, लघुनिबंधांचेही विपुल लेखन केले आहे. मराठी साहित्यात लघुनिबंध हा साहित्यप्रकार रुजवण्यात आणि तो विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे, या संग्रहातील निबंधांवरून सुस्पष्टपणे लक्षात येते. या संग्रहातील लघुनिबंधांमध्ये काव्य, विनोद व तत्त्वज्ञान यांचा सुरेख संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे लघुनिबंध वाङ्मयगुणांनी अलंकृत आणि विचारप्रवर्तक आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #सायंकाल
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 15-01-1995

    जीवनातील विसंगती गंभीरपणे मांडणारे लघुनिबंधसंग्रह… मेहता प्रकाशनाने अलीकडे कै. वि. स. खांडेकर यांच्या दुर्मिळ झालेल्या साहित्याचे देखणे पुर्नमुद्रण करून अभ्यासकांची चांगली सोय केली आहे. ‘सायंकाल’ (१९३९) आणि ‘अविनाश’ (१९४१) या दोन लघुनिबंधसंग्रहाच्याया नव्या आवृत्त्या म्हणूनच स्वागतार्ह वाटतात. दोन्हीलाही लेखकाच्या उपयुक्त प्रस्तावना आहेत. ‘सायंकाल’मध्ये त्यांच्या १८, तर ‘अविनाश’मध्ये १४ लघुनिबंधांचा समावेश आहे. दोन्हींवर चंद्रमोहन कुलकर्णीची सुंदर मुखपृष्ठे आहेत. ‘लघुनिबंध’ हा वाङ्मयप्रकार आज नाट्यछटेप्रमाणेच अस्तंगत झाला असला, तरी ललित निबंध या नव्या स्वरूपात तो बहरताना दिसतो. १९३० ते ४० या दशकात त्याला बहर आला होता. कै. फडके यांनी इंग्रजीतील रॉबर्ट लिंड, ए. जी. गार्डनर, ल्यूकस चेस्टरटन, लॅम्ब वगैरे लघुनिबंधकारांचे ‘पर्सनल एसेज’ वाचून मराठीतही असे सुटसुटीत व खेळकर लघुनिबंधक का लिहिले जाऊ नयेत, असे वाटले आणि त्यांनी १९२५ मध्ये ‘रत्नाकर’ मासिकात आपली ‘सुहास्य’ ही पहिली गुजगोष्ट लिहिली. त्यानंतर कै. वि. स. खांडेकर आणि अनंत काणेकर यांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण लघुनिबंध लिहिले. खांडेकरांनी ‘वैनतेय’ या सावंडवाडीतून निघणाऱ्या मासिकातून आपले लघुनिबंध लिहिले, त्यामुळे तेच मराठी लघुनिबंधाचे जनक आहेत, असा एक वाद आनंद यादव यांनी फडके यांच्या हयातीतच निर्माण केला होता. फडके यांनी ‘मीच लघुनिबंधाचा जनक’ असे त्याला उत्तरही दिले होते. वाद निरर्थक होता. कारण फडके आणि खांडेकरांच्या लघुनिबंधात काहीही साम्य नव्हते, हे आज खांडेकरांच्या प्रस्तुतचे दोन निबंधसंग्रह वाचून जाणवते. फडके यांना अभिप्रेत असलेल्या प्रकारचा आत्माविष्कार खांडेकरांना अभिप्रेत नाही. काणेकरांप्रमाणेच वैचारिकता हाच त्यांचा विशेष आहे. वाचकांना विश्वासात घेऊन आपली सुख-दु:खे त्यांच्या कानात सांगणे, (‘गुजगोष्टी’ हे अर्थपूर्ण नाव फडके यांनी दिले होते व ते योग्य होते.) क्षुल्लक विषयाची एक वेगळी बाजू त्याच्या दृष्टोत्पत्तीस आणून देणे, त्याला तशाच प्रसन्न, मुलायम भाषेची व शैलीची जोड देणे, हे काणेकर व खांडेकर यांना जमले नाही. कारण ती त्यांची प्रकृतीच नव्हती. त्यापेक्षा विषयाच्या निमित्ताने एखादा चमकदार विचार मांडणे, वाचकांना धक्का देणे, हे काणेकरांचे वैशिष्ट्य होते. खांडेकरांनी ‘अविनाश’च्या प्रस्तावनेत त्याची तुलना वाऱ्यावर डोलणाऱ्या रंगिबेरंगी फुग्यांशी केली आहे, त्यातील वेगळी भाषा हेही विशेष त्यांनी सांगितले आहेत. पण त्यांचे लघुनिबंध वैचारिकतेच्या अंगानेच अधिक जातात. त्याबरोबरच लघुनिबंधाच्या प्रकृतीशी मिळती-जुळती भाषा त्यांच्याजवळ नसल्याने उपमा, रूपक, उप्रेक्षा इत्यादींनी सजलेली नेहमीची त्यांची भाषाच कृत्रिमपणे ते इथेही वापरतात आणि या वाङ्मयाला ती काहीशी ओबड-धोबड व विसंगतही वाटते. काणेकर एखाद्या चमकदार विचार चटकन सांगून मोकळे होतात, असेही खांडेकर करीत नाहीत. फडके परंपरेतील शेवटचे लघुनिबंधकार म्हणजे कै. ना. मा. संत हेच होत, त्यामुळे खांडेकरांचे समाजिक चिंतन, त्याचे विचार हे लेखकाच्या आत्मविष्कारापेक्षा या लघुनिबंधात अधिक महत्त्वाची जागा घेतात. आज नव्याने लिहिला जाणारा ललित निबंधही वैचारिकतेकडे अधिक झुकताना दिसतो व त्यात संशोधन, चिंतन, मनन, निरीक्षण इत्यादींना प्राधान्य आलेले दिसते. आजचा ललित निबंध हा आठवण, प्रवास, आत्मचरित्र, भाववृत्ती, कथा इत्यादी अनेक वाङ्मय प्रकारांशी सलगी करताना दिसतो. (उदाहरणार्थ : दुर्गाबाई व इरावतीबार्इंचे ललितनिबंध) त्यामुळेच ललितलेख असेही त्याचे एक नवे नामकरण काही जण करतात, त्यामुळे जुन्या लघुनिबंधातून नवा ललितानिबंध उत्क्रांत झाला, असे खांडेकर म्हणतात ते बरोबर वाटत नाही. गुजगोष्ट किंवा लघुनिबंध किंवा ललितनिबंध आणि ललितलेख हे प्रकार वेगवेगळेच आहेत. एकातून दुसरा उत्क्रांत झाला, हे खरे नाही. खांडेकरांच्या या दोन संग्रहातील लघुनिबंधात तत्त्वदर्शन, भावविहार व कल्पनाविलास यांना प्राधान्य आहे. त्यात पहिल्याला अधिक प्राधान्य आहे. ‘सायंकाल’मध्ये बाळपणीचा काळ सुखाचा, विरह, सुभाषिते, माझे आवडते लेखक, सायंकाल, आणि ‘आविनाश’मधील परीक्षक, सारेच गुलाम इत्यादी लघुनिबंध काहीसे चाकोरीतले आहेत म्हणजे त्यांच्या अंतरंगाची त्यांच्या शीर्षकावरून कल्पना येते व ती सहसा खोटी ठरत नाही. वाचकांना विषयाची अपरिचित बाजू दाखविणे, त्यांना सहसा जमत नाही. ‘सायंकाल’मधील चष्म्यावाचून काढलेला ‘एक तास’ त्यांना आंधळ्याच्या अनुभवाचे दु:ख पटवून देतो. ‘अशोकाची फुले’ त्यांना स्वप्न आणि सत्य यांतील फरक जाणवून देतात. खिस्त, गांधी, गिब्रान यांच्या तत्त्वज्ञानापर्यंत नेतात. ‘पुस्तकातील खुणा’ वरून त्यांना वाटते की पुस्तकातल्या खुणा पुस्तकातच राहतात. ज्यातल्या खुणा आपण विसरत नाही असा एकच ग्रंथ आहे, तो म्हणजे अनुभवलेले जीवन, हाच नाही का ? असे ते विचारतात. ‘हरवलेले कागद’, ‘हरवली म्हणून सापडली’ या गुजगोष्टीची आठवण करून देतो. आपण सुंदर आहोत, विख्यात आहोत, उदार आहोत, सभ्य आहोत असे भासवण्याचा प्रयत्न ही मनुष्याची प्रदर्शनाची हौस वाटते तितकी हास्यास्पद नाही, असे ते ‘प्रदर्शन’मध्ये म्हणतात. प्रौढत्वी शैशव जपण्याचा विचार ते ‘एक अपघाता’त मांडतात. काणेकरांच्या ‘दोन मेणबत्त्या’ हा गाजलेला लघुनिबंध वाचून उंदरानी कुरतडलेल्या व आयुष्य फुकट गेलेल्या दुसऱ्या मेणबत्तीची कैफियत त्यांना मांडावीशी वाटते. ‘अविनाश’मध्येही साध्या प्रसंगातून तत्त्वविचाराकडे जाण्याची खांडेकरांची लकब दिसते. भूत, भविष्यकाळापेक्षा वर्तमानकालच जीवनाचा आनंद देत असतो. (पुढे-पुढे), आपल्याला ओळखणाऱ्या व्यक्तींत आपल्याविषयी एकमत कुठे असते ? (दोन पत्रे), हे निबंध विषयाची दुसरी बाजू मांडतात. ‘आंब्याचा मोहर’सारखा एखादा लघुनिबंध अखेर अकारणच फार गंभीर होतो. विचार कितीही प्रभावी असला तरी त्याला पंख नसतात. त्याला नेहमी जमिनीलाच चिटकून राहावे लागते, म्हणून माणसाने अविचारी झाले पाहिजे, हा ‘अकल्पित संदेश’ मधील विचार चमकदार असला तरी गंभीरपणेच व्यक्त होतो. ‘अहं ब्रहास्मि’पेक्षा ‘मी आहे की’ हेच शब्द आज सामान्य मनुष्याच्या आयुष्याचे समाधान करू शकतात (मी आहे की), हा विचार किंवा ‘चहा, गप्पा आणि मुले’ ही मर्यादित असतात तोपर्यंत सुखकारक असतात... पत्रात या तिन्हीचेही फायदे/तोटे एकवटलेले असतात ! हे भाष्य त्यांच्या लघुनिबंधांची प्रकृती स्पष्ट करते. अशी विरोधाभासात्मक रचना हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. खांडेकरांचा लघुनिबंध हा फडके यांच्याप्रमाणे निव्वळ आत्माविष्काराच्या हेतूने लिहिलेली गुजगोष्ट नाही. त्यांची प्रकृती वैचारिक आहे. साध्यासुध्या प्रसंगातून जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान त्यांना सुचलं. काणेकरांप्रमाणे समाजाला धक्का देऊन विचार मांडणे, ही त्यांची वृत्ती नाही. काणेकरांचे गणूकाका सनातन प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्यामते लेखकांच्या मतांच्या संघर्षातून काणेकरांच्या लघुनिबंधात नवविचारांच्या ठिणग्या उडतात. खांडेकर त्यांच्या मानाने सौम्य प्रकृतीचे आहेत. आपल्याला जे अनुभव कथेत वापरता येणे शक्य वाटले नाही, जे आपण लघुनिबंधात वा थोड्या जागेत ‘वैनतेया’तून मांडण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे. केवळ कलाविलास म्हणूनही त्यांनी ते लिहिले नाहीत, त्यामुळे त्यात फडक्यांच्या गुजगोष्टीतले --- शोधू पाहणाऱ्यांची निराशाच होणे शक्यच, पण खांडेकरांसारख्या एका चिंतनशील सतप्रवृत्त आणि पापभीरू आणि समाजाच्या उपेक्षित वर्गाबद्दल अपार कणव वाटणाऱ्या लेखकाला जीवनातील जी विसंगती जाणवली, ती त्याने या दोन (व अन्य) लघुनिबंध संग्रहातून काहीशी गंभीरपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या लघुनिबंधांपेक्षा या दोन संग्रहाला जोडलेल्या त्यांच्या प्रस्तावनाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व या वाङ्मयप्रकारावर अधिक प्रकाश पाडतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more