* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANZADHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788171617326
  • Edition : 3
  • Publishing Year : 1959
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE VERSES IN THE SHORT ESSAY SHOULD BE LIKE THE SOFT GOLDEN SHADES OF THE SETTING SUN, THE HUMOR SHOULD BE AS CHARMING AS A HALF-BLOOMED LOTUS, BUT DELICATE...NOT A BELLY LAUGH, JUST A CHEEK-STIRRING...AND THE PHILOSOPHY IT IMPLIES SHOULD BE AS SPARSE, BUT BEAUTIFUL, AS THE MOONS JUST BEGINNING TO SHINE ON THE HORIZON. KHANDEKAR`S PERCEPTION OF SUCH IDEAL SHORT ESSAYS SHOULD BE.
वि.स.खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या मूळ बृहदसंग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंधांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधांत दिसतो. लघुनिबंधातली काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यांतला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधांविषयीच्या खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात खांडेकरांच्या लघुनिबंधात तत्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MANJADHAR #V S KHANDEKAR #SHRI #TILGUL #SUKLELYA PHULANCHA SUGANDH #NAU GUNTHE #JAMIN #PRAVAS #CHIMNICHE PILLU #PHOTOGRAPHERCHYA DUKANAT #DIVYA BHAS #TACHANYA #UPEKSHIT NAYIKA #DON SHABDHA #PUNHA EKDA #DAINANDINI #JUNI CHITRE #CRICKET ANI NATAK #EK ABHIPRAY #AKASHWANI #DULAKI #GOD SHEVAT #मंझधार #वि. स. खांडेकर # श्री #तिळगूळ #सुकलेल्या फुलांचा सुगंध #नऊ गुंठे #जमीन # प्रवास #चिमणीचे पिल्लू #फोटोग्राफरच्या दुकानात #दिव्य भास #टाचण्या #उपेक्षित नायिका # दोन शब्द #पुन्हा एकदा #दैनंदिनी #जुनी चित्रे #क्रिकेट आणि नाटक #एक अभिप्राय #आकाशवाणी #डुलकी #गोड शेवट#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, NASHIK 12-10-1997

    मंझधार : सर्वस्पर्शी लघुनिबंध संग्रह… वि. स. खांडेकर यांच्या प्रिती विलासाच्या मध्यान्हकाळी म्हणजे १९५९ मध्ये त्यांचा ‘मंझधार’ हा ६१ लघुनिबंधाचा संग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यात खांडेकरी लघुनिबंधाची वैशिष्ट्ये, गुणदोष यांचे एकत्रित दर्शन एकाच ग्रंथा होत असे. अशा समग्र ग्रंथाचे विभाजन करून ‘पहिले पान’, ‘मंझधार’ आणि ‘धुके’ असे तीन लघुनिबंध संग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने अलीकडेच प्रसिद्ध केले. त्यामुळे कदाचित ग्रंथ विक्री-वितरणाची व्यावहारिक सोय झाली असली तरी अभ्यासकांना मात्र असे विभाजन क्लेशकारक वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जी विशिष्ट दृष्टी ठेवून खांडेकरांनी आपल्या लघुनिबंधांची क्रमवारी मांडणी केलेली असे तिलाच तिलांजली मिळण्याचा संभव अशा परिस्थितीत निर्माण होतो. थोर साहित्यिकांचे अभिप्रेत दृष्टिकोनही इतिहासजमा होऊ नयेत. असेच कोणाही साहित्यप्रेमीला वाटत राहणार. ‘मंझधार’या लघुनिबंधसंग्रहात वीस लघुनिबंधांचा समावेश करण्यात आला आहे. १९४८ ते १९५६ या काळात त्यांचा लेखनाविष्कार झालेला आहे. १९४८ मधील ‘उपेक्षित नायिका’ आणि १९४९चा ‘एक अभिप्राय’ हे दोन लघुनिबंध वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तुकारामाची पत्नी जिजाईच्या जीवनदृष्टीचा अत्यंत सुरेख व सखोल परामर्श खांडेकरांनी घेतला आहे. तिची तुलना चांदबिबी, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, शकुंतला, सीता, वसंतसेना आदींशी कौशल्याने केली आहे. सारखा तोंडाचा पट्टा चालविणाऱ्या जिजाईसमोर तुकाराम हा वीर पुरुषही होता. हे नमूद करून त्याच्या जागी आपण असतो तर एके दिवशी इंद्रायणीच्या पात्रात आपले प्रेत लोकांना दिसले असते, असा चमत्कृतीपूर्ण शेवट केला आहे. ‘एक अभिप्राय’ या लघुनिबंधात भाजीमास्तर, पोस्टमास्तर, शाळामास्तर आणि स्टेशनमास्तर यांची खुसखुशीत तुलना आढळते. ‘स्टेशन मास्तरांच्या कामासारखे रुक्ष काम’ हा अभिप्राय न रुचल्यामुळे खांडेकरांनी येथे स्वैर कल्पनाविलास केला आहे. १९५० मध्ये लिहिलेले ‘फोटोग्राफरच्या दुकानात’ आणि ‘दैनंदिनी’ हे दोन लघुनिबंध आहेत. पहिल्यात ‘फोटोमधल्या कृत्रिमतेची शिस्त’ अतिशयोक्त करून सांगितली आहे. लोक आपल्या भावना आणि आवडीनिवडीपेक्षा इतरांना काय बरे दिसेल हे लक्षात घेऊन फोटो काढून घेतात, हे निरीक्षण मांडले आहे. ‘दैनंदिनी’मध्ये दैनंदिनी लिहिणे म्हणजे जाणुनबुजून ढोंगी होणे– असे जगावेगळे मत व्यक्त होते. १९५१ मधील ‘सुकलेल्या पुâलांचा सुगंध’ ‘क्रिकेट आणि नाटक’ व ‘दिव्य भास’ हे तीन लघुनिबंध आहेत. पहिल्या लघुनिबंधात जुन्या पुराण्या पुस्तकांसंबंधी वाटणारी ओढ काव्यमय शैलीत विशद केली आहे. दुसऱ्या क्रिकेट आणि नाटकाची तुलना करताना ‘मनुष्य हा यंत्र नाही, पोपट नाही, राक्षस नाही, देव नाही; तो मनुष्यच आहे!’ हे सूत्र कल्पकतेने गुंफलेले आहे. १९५२ मधील तीन लघुनिबंध म्हणजे ‘जुनी चित्रे’, ‘डुलकी’ आणि ‘गोड शेवट’ हे होत. पहिल्यात ‘पांडव प्रताप’ पोथीतल्या चित्रांचे रासग्रहण आढळते. दुसऱ्या लघुनिबंधात नेपोलियनच्या डुलकी घेण्याच्या सवयीचे वर्णन ‘त्याने निसर्गावर विजय मिळवला. हवी तेवहा हुकमी डुलकी घ्यायची आणि हवे तेव्हा पुन्हा जागे होऊन कामाला लागायचे हे येरागबाळ्याचे काम नाही’ अशा मार्मिक शब्दांत केले आहे. ‘गोड शेवट’ हा लघुकथेच्या अंगाने लिहिलेला लघुनिबंध वाटतो. ‘मानवी जीवनाची खरीखुरी जाणीव शोकान्त कथा करून देतात. सुखान्त कथात ते सामर्थ्य आढळणार नाही.’ हा विचार मननीय वाटतो. ‘श्री’ आणि ‘तिळगूळ’ हे दोन लघुनिबंध १९५३मधील आहेत. ‘श्री’ मध्ये इंग्रज समुद्रातल्या बेटावर राहणारे असल्याने त्यांची मुळाक्षरे लाटांसारखी झाली आणि मराठे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणारे असल्याने आपली मुळाक्षरे अवघड जागी बांधलेल्या किल्ल्यासारखी झाली, असे मार्मिक निरीक्षण मांडलेले आहे. ‘तिळगूळ’ मध्ये काव्यरचना तंत्राचा मिश्किल परिहास केलेला आहे. कोणत्याही विषयावर काव्य न लिहिले हेच उत्कृष्ट काव्य कसे ठरते, हे सुचविले आहे. १९५४ मध्ये लिहिलेला ‘दोन शब्द’ हा एकुलता एक लघुनिबंध असून, त्यात ‘अच्छा’ आणि ‘इश्श्य’ या दोन शब्दांची सुरेख फिरकी घेतली आहे. विशेषत: बायकांच्या तोंडी ‘अच्छा’ शब्द ऐकल्यावर खांडेकरांना काय वाटते, हे मुळातून वाचण्यासारखे आहे. मानवी जीवनाचा सर्वस्पर्शी वेध घेण्याचे सामर्थ्य वि. स. खांडेकर त्यांच्या लघुनिबंधामध्ये आढळते. चिंतन-मनन-वाचन-व्यासंग या चार स्तंभांवर त्यांच्या लघुनिबंधाची भरभक्कम वास्तू उभी राहिलेली आहे. तिला मतमतांतराच्या परीक्षणा-निरीक्षणयुक्त बळकट खिडक्या-दारे आढळतात. प्रतिमा-अलंकारयुक्त भाषाशैलीचा मुलामा या वास्तूला आगळीच शोभा आणतो. त्यांचे लघुनिबंध वाचणे हा जत्रेतल्या रहाट पाळण्यात बसल्याचा अनुभव असतो. वक्रोक्ती, चमत्कृती, अतिशयोक्ती अशा उक्तिविशेषांचे मनोज्ञ दर्शन त्यांचा कोणताही लघुनिबंध घडवतो. ‘मंझधार’ ही त्याला अपवाद नाही. अराऊंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स’ असा अनुभव घ्यायचा असेल त्याने खांडेकरांचा कोणताही लघुनिबंध संग्रह वाचायला हरकत नाही. -विजय काचरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more