* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANZADHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788171617326
  • Edition : 3
  • Publishing Year : 1959
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE VERSES IN THE SHORT ESSAY SHOULD BE LIKE THE SOFT GOLDEN SHADES OF THE SETTING SUN, THE HUMOR SHOULD BE AS CHARMING AS A HALF-BLOOMED LOTUS, BUT DELICATE...NOT A BELLY LAUGH, JUST A CHEEK-STIRRING...AND THE PHILOSOPHY IT IMPLIES SHOULD BE AS SPARSE, BUT BEAUTIFUL, AS THE MOONS JUST BEGINNING TO SHINE ON THE HORIZON. KHANDEKAR`S PERCEPTION OF SUCH IDEAL SHORT ESSAYS SHOULD BE.
वि.स.खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या मूळ बृहदसंग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंधांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधांत दिसतो. लघुनिबंधातली काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यांतला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधांविषयीच्या खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात खांडेकरांच्या लघुनिबंधात तत्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MANJADHAR #V S KHANDEKAR #SHRI #TILGUL #SUKLELYA PHULANCHA SUGANDH #NAU GUNTHE #JAMIN #PRAVAS #CHIMNICHE PILLU #PHOTOGRAPHERCHYA DUKANAT #DIVYA BHAS #TACHANYA #UPEKSHIT NAYIKA #DON SHABDHA #PUNHA EKDA #DAINANDINI #JUNI CHITRE #CRICKET ANI NATAK #EK ABHIPRAY #AKASHWANI #DULAKI #GOD SHEVAT #मंझधार #वि. स. खांडेकर # श्री #तिळगूळ #सुकलेल्या फुलांचा सुगंध #नऊ गुंठे #जमीन # प्रवास #चिमणीचे पिल्लू #फोटोग्राफरच्या दुकानात #दिव्य भास #टाचण्या #उपेक्षित नायिका # दोन शब्द #पुन्हा एकदा #दैनंदिनी #जुनी चित्रे #क्रिकेट आणि नाटक #एक अभिप्राय #आकाशवाणी #डुलकी #गोड शेवट#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, NASHIK 12-10-1997

    मंझधार : सर्वस्पर्शी लघुनिबंध संग्रह… वि. स. खांडेकर यांच्या प्रिती विलासाच्या मध्यान्हकाळी म्हणजे १९५९ मध्ये त्यांचा ‘मंझधार’ हा ६१ लघुनिबंधाचा संग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यात खांडेकरी लघुनिबंधाची वैशिष्ट्ये, गुणदोष यांचे एकत्रित दर्शन एकाच ग्रंथा होत असे. अशा समग्र ग्रंथाचे विभाजन करून ‘पहिले पान’, ‘मंझधार’ आणि ‘धुके’ असे तीन लघुनिबंध संग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने अलीकडेच प्रसिद्ध केले. त्यामुळे कदाचित ग्रंथ विक्री-वितरणाची व्यावहारिक सोय झाली असली तरी अभ्यासकांना मात्र असे विभाजन क्लेशकारक वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जी विशिष्ट दृष्टी ठेवून खांडेकरांनी आपल्या लघुनिबंधांची क्रमवारी मांडणी केलेली असे तिलाच तिलांजली मिळण्याचा संभव अशा परिस्थितीत निर्माण होतो. थोर साहित्यिकांचे अभिप्रेत दृष्टिकोनही इतिहासजमा होऊ नयेत. असेच कोणाही साहित्यप्रेमीला वाटत राहणार. ‘मंझधार’या लघुनिबंधसंग्रहात वीस लघुनिबंधांचा समावेश करण्यात आला आहे. १९४८ ते १९५६ या काळात त्यांचा लेखनाविष्कार झालेला आहे. १९४८ मधील ‘उपेक्षित नायिका’ आणि १९४९चा ‘एक अभिप्राय’ हे दोन लघुनिबंध वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तुकारामाची पत्नी जिजाईच्या जीवनदृष्टीचा अत्यंत सुरेख व सखोल परामर्श खांडेकरांनी घेतला आहे. तिची तुलना चांदबिबी, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, शकुंतला, सीता, वसंतसेना आदींशी कौशल्याने केली आहे. सारखा तोंडाचा पट्टा चालविणाऱ्या जिजाईसमोर तुकाराम हा वीर पुरुषही होता. हे नमूद करून त्याच्या जागी आपण असतो तर एके दिवशी इंद्रायणीच्या पात्रात आपले प्रेत लोकांना दिसले असते, असा चमत्कृतीपूर्ण शेवट केला आहे. ‘एक अभिप्राय’ या लघुनिबंधात भाजीमास्तर, पोस्टमास्तर, शाळामास्तर आणि स्टेशनमास्तर यांची खुसखुशीत तुलना आढळते. ‘स्टेशन मास्तरांच्या कामासारखे रुक्ष काम’ हा अभिप्राय न रुचल्यामुळे खांडेकरांनी येथे स्वैर कल्पनाविलास केला आहे. १९५० मध्ये लिहिलेले ‘फोटोग्राफरच्या दुकानात’ आणि ‘दैनंदिनी’ हे दोन लघुनिबंध आहेत. पहिल्यात ‘फोटोमधल्या कृत्रिमतेची शिस्त’ अतिशयोक्त करून सांगितली आहे. लोक आपल्या भावना आणि आवडीनिवडीपेक्षा इतरांना काय बरे दिसेल हे लक्षात घेऊन फोटो काढून घेतात, हे निरीक्षण मांडले आहे. ‘दैनंदिनी’मध्ये दैनंदिनी लिहिणे म्हणजे जाणुनबुजून ढोंगी होणे– असे जगावेगळे मत व्यक्त होते. १९५१ मधील ‘सुकलेल्या पुâलांचा सुगंध’ ‘क्रिकेट आणि नाटक’ व ‘दिव्य भास’ हे तीन लघुनिबंध आहेत. पहिल्या लघुनिबंधात जुन्या पुराण्या पुस्तकांसंबंधी वाटणारी ओढ काव्यमय शैलीत विशद केली आहे. दुसऱ्या क्रिकेट आणि नाटकाची तुलना करताना ‘मनुष्य हा यंत्र नाही, पोपट नाही, राक्षस नाही, देव नाही; तो मनुष्यच आहे!’ हे सूत्र कल्पकतेने गुंफलेले आहे. १९५२ मधील तीन लघुनिबंध म्हणजे ‘जुनी चित्रे’, ‘डुलकी’ आणि ‘गोड शेवट’ हे होत. पहिल्यात ‘पांडव प्रताप’ पोथीतल्या चित्रांचे रासग्रहण आढळते. दुसऱ्या लघुनिबंधात नेपोलियनच्या डुलकी घेण्याच्या सवयीचे वर्णन ‘त्याने निसर्गावर विजय मिळवला. हवी तेवहा हुकमी डुलकी घ्यायची आणि हवे तेव्हा पुन्हा जागे होऊन कामाला लागायचे हे येरागबाळ्याचे काम नाही’ अशा मार्मिक शब्दांत केले आहे. ‘गोड शेवट’ हा लघुकथेच्या अंगाने लिहिलेला लघुनिबंध वाटतो. ‘मानवी जीवनाची खरीखुरी जाणीव शोकान्त कथा करून देतात. सुखान्त कथात ते सामर्थ्य आढळणार नाही.’ हा विचार मननीय वाटतो. ‘श्री’ आणि ‘तिळगूळ’ हे दोन लघुनिबंध १९५३मधील आहेत. ‘श्री’ मध्ये इंग्रज समुद्रातल्या बेटावर राहणारे असल्याने त्यांची मुळाक्षरे लाटांसारखी झाली आणि मराठे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणारे असल्याने आपली मुळाक्षरे अवघड जागी बांधलेल्या किल्ल्यासारखी झाली, असे मार्मिक निरीक्षण मांडलेले आहे. ‘तिळगूळ’ मध्ये काव्यरचना तंत्राचा मिश्किल परिहास केलेला आहे. कोणत्याही विषयावर काव्य न लिहिले हेच उत्कृष्ट काव्य कसे ठरते, हे सुचविले आहे. १९५४ मध्ये लिहिलेला ‘दोन शब्द’ हा एकुलता एक लघुनिबंध असून, त्यात ‘अच्छा’ आणि ‘इश्श्य’ या दोन शब्दांची सुरेख फिरकी घेतली आहे. विशेषत: बायकांच्या तोंडी ‘अच्छा’ शब्द ऐकल्यावर खांडेकरांना काय वाटते, हे मुळातून वाचण्यासारखे आहे. मानवी जीवनाचा सर्वस्पर्शी वेध घेण्याचे सामर्थ्य वि. स. खांडेकर त्यांच्या लघुनिबंधामध्ये आढळते. चिंतन-मनन-वाचन-व्यासंग या चार स्तंभांवर त्यांच्या लघुनिबंधाची भरभक्कम वास्तू उभी राहिलेली आहे. तिला मतमतांतराच्या परीक्षणा-निरीक्षणयुक्त बळकट खिडक्या-दारे आढळतात. प्रतिमा-अलंकारयुक्त भाषाशैलीचा मुलामा या वास्तूला आगळीच शोभा आणतो. त्यांचे लघुनिबंध वाचणे हा जत्रेतल्या रहाट पाळण्यात बसल्याचा अनुभव असतो. वक्रोक्ती, चमत्कृती, अतिशयोक्ती अशा उक्तिविशेषांचे मनोज्ञ दर्शन त्यांचा कोणताही लघुनिबंध घडवतो. ‘मंझधार’ ही त्याला अपवाद नाही. अराऊंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स’ असा अनुभव घ्यायचा असेल त्याने खांडेकरांचा कोणताही लघुनिबंध संग्रह वाचायला हरकत नाही. -विजय काचरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more