* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANZADHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788171617326
  • Edition : 3
  • Publishing Year : 1959
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE VERSES IN THE SHORT ESSAY SHOULD BE LIKE THE SOFT GOLDEN SHADES OF THE SETTING SUN, THE HUMOR SHOULD BE AS CHARMING AS A HALF-BLOOMED LOTUS, BUT DELICATE...NOT A BELLY LAUGH, JUST A CHEEK-STIRRING...AND THE PHILOSOPHY IT IMPLIES SHOULD BE AS SPARSE, BUT BEAUTIFUL, AS THE MOONS JUST BEGINNING TO SHINE ON THE HORIZON. KHANDEKAR`S PERCEPTION OF SUCH IDEAL SHORT ESSAYS SHOULD BE.
वि.स.खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या मूळ बृहदसंग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंधांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधांत दिसतो. लघुनिबंधातली काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यांतला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधांविषयीच्या खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात खांडेकरांच्या लघुनिबंधात तत्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MANJADHAR #V S KHANDEKAR #SHRI #TILGUL #SUKLELYA PHULANCHA SUGANDH #NAU GUNTHE #JAMIN #PRAVAS #CHIMNICHE PILLU #PHOTOGRAPHERCHYA DUKANAT #DIVYA BHAS #TACHANYA #UPEKSHIT NAYIKA #DON SHABDHA #PUNHA EKDA #DAINANDINI #JUNI CHITRE #CRICKET ANI NATAK #EK ABHIPRAY #AKASHWANI #DULAKI #GOD SHEVAT #मंझधार #वि. स. खांडेकर # श्री #तिळगूळ #सुकलेल्या फुलांचा सुगंध #नऊ गुंठे #जमीन # प्रवास #चिमणीचे पिल्लू #फोटोग्राफरच्या दुकानात #दिव्य भास #टाचण्या #उपेक्षित नायिका # दोन शब्द #पुन्हा एकदा #दैनंदिनी #जुनी चित्रे #क्रिकेट आणि नाटक #एक अभिप्राय #आकाशवाणी #डुलकी #गोड शेवट#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, NASHIK 12-10-1997

    मंझधार : सर्वस्पर्शी लघुनिबंध संग्रह… वि. स. खांडेकर यांच्या प्रिती विलासाच्या मध्यान्हकाळी म्हणजे १९५९ मध्ये त्यांचा ‘मंझधार’ हा ६१ लघुनिबंधाचा संग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यात खांडेकरी लघुनिबंधाची वैशिष्ट्ये, गुणदोष यांचे एकत्रित दर्शन एकाच ग्रंथा होत असे. अशा समग्र ग्रंथाचे विभाजन करून ‘पहिले पान’, ‘मंझधार’ आणि ‘धुके’ असे तीन लघुनिबंध संग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने अलीकडेच प्रसिद्ध केले. त्यामुळे कदाचित ग्रंथ विक्री-वितरणाची व्यावहारिक सोय झाली असली तरी अभ्यासकांना मात्र असे विभाजन क्लेशकारक वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जी विशिष्ट दृष्टी ठेवून खांडेकरांनी आपल्या लघुनिबंधांची क्रमवारी मांडणी केलेली असे तिलाच तिलांजली मिळण्याचा संभव अशा परिस्थितीत निर्माण होतो. थोर साहित्यिकांचे अभिप्रेत दृष्टिकोनही इतिहासजमा होऊ नयेत. असेच कोणाही साहित्यप्रेमीला वाटत राहणार. ‘मंझधार’या लघुनिबंधसंग्रहात वीस लघुनिबंधांचा समावेश करण्यात आला आहे. १९४८ ते १९५६ या काळात त्यांचा लेखनाविष्कार झालेला आहे. १९४८ मधील ‘उपेक्षित नायिका’ आणि १९४९चा ‘एक अभिप्राय’ हे दोन लघुनिबंध वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तुकारामाची पत्नी जिजाईच्या जीवनदृष्टीचा अत्यंत सुरेख व सखोल परामर्श खांडेकरांनी घेतला आहे. तिची तुलना चांदबिबी, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, शकुंतला, सीता, वसंतसेना आदींशी कौशल्याने केली आहे. सारखा तोंडाचा पट्टा चालविणाऱ्या जिजाईसमोर तुकाराम हा वीर पुरुषही होता. हे नमूद करून त्याच्या जागी आपण असतो तर एके दिवशी इंद्रायणीच्या पात्रात आपले प्रेत लोकांना दिसले असते, असा चमत्कृतीपूर्ण शेवट केला आहे. ‘एक अभिप्राय’ या लघुनिबंधात भाजीमास्तर, पोस्टमास्तर, शाळामास्तर आणि स्टेशनमास्तर यांची खुसखुशीत तुलना आढळते. ‘स्टेशन मास्तरांच्या कामासारखे रुक्ष काम’ हा अभिप्राय न रुचल्यामुळे खांडेकरांनी येथे स्वैर कल्पनाविलास केला आहे. १९५० मध्ये लिहिलेले ‘फोटोग्राफरच्या दुकानात’ आणि ‘दैनंदिनी’ हे दोन लघुनिबंध आहेत. पहिल्यात ‘फोटोमधल्या कृत्रिमतेची शिस्त’ अतिशयोक्त करून सांगितली आहे. लोक आपल्या भावना आणि आवडीनिवडीपेक्षा इतरांना काय बरे दिसेल हे लक्षात घेऊन फोटो काढून घेतात, हे निरीक्षण मांडले आहे. ‘दैनंदिनी’मध्ये दैनंदिनी लिहिणे म्हणजे जाणुनबुजून ढोंगी होणे– असे जगावेगळे मत व्यक्त होते. १९५१ मधील ‘सुकलेल्या पुâलांचा सुगंध’ ‘क्रिकेट आणि नाटक’ व ‘दिव्य भास’ हे तीन लघुनिबंध आहेत. पहिल्या लघुनिबंधात जुन्या पुराण्या पुस्तकांसंबंधी वाटणारी ओढ काव्यमय शैलीत विशद केली आहे. दुसऱ्या क्रिकेट आणि नाटकाची तुलना करताना ‘मनुष्य हा यंत्र नाही, पोपट नाही, राक्षस नाही, देव नाही; तो मनुष्यच आहे!’ हे सूत्र कल्पकतेने गुंफलेले आहे. १९५२ मधील तीन लघुनिबंध म्हणजे ‘जुनी चित्रे’, ‘डुलकी’ आणि ‘गोड शेवट’ हे होत. पहिल्यात ‘पांडव प्रताप’ पोथीतल्या चित्रांचे रासग्रहण आढळते. दुसऱ्या लघुनिबंधात नेपोलियनच्या डुलकी घेण्याच्या सवयीचे वर्णन ‘त्याने निसर्गावर विजय मिळवला. हवी तेवहा हुकमी डुलकी घ्यायची आणि हवे तेव्हा पुन्हा जागे होऊन कामाला लागायचे हे येरागबाळ्याचे काम नाही’ अशा मार्मिक शब्दांत केले आहे. ‘गोड शेवट’ हा लघुकथेच्या अंगाने लिहिलेला लघुनिबंध वाटतो. ‘मानवी जीवनाची खरीखुरी जाणीव शोकान्त कथा करून देतात. सुखान्त कथात ते सामर्थ्य आढळणार नाही.’ हा विचार मननीय वाटतो. ‘श्री’ आणि ‘तिळगूळ’ हे दोन लघुनिबंध १९५३मधील आहेत. ‘श्री’ मध्ये इंग्रज समुद्रातल्या बेटावर राहणारे असल्याने त्यांची मुळाक्षरे लाटांसारखी झाली आणि मराठे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणारे असल्याने आपली मुळाक्षरे अवघड जागी बांधलेल्या किल्ल्यासारखी झाली, असे मार्मिक निरीक्षण मांडलेले आहे. ‘तिळगूळ’ मध्ये काव्यरचना तंत्राचा मिश्किल परिहास केलेला आहे. कोणत्याही विषयावर काव्य न लिहिले हेच उत्कृष्ट काव्य कसे ठरते, हे सुचविले आहे. १९५४ मध्ये लिहिलेला ‘दोन शब्द’ हा एकुलता एक लघुनिबंध असून, त्यात ‘अच्छा’ आणि ‘इश्श्य’ या दोन शब्दांची सुरेख फिरकी घेतली आहे. विशेषत: बायकांच्या तोंडी ‘अच्छा’ शब्द ऐकल्यावर खांडेकरांना काय वाटते, हे मुळातून वाचण्यासारखे आहे. मानवी जीवनाचा सर्वस्पर्शी वेध घेण्याचे सामर्थ्य वि. स. खांडेकर त्यांच्या लघुनिबंधामध्ये आढळते. चिंतन-मनन-वाचन-व्यासंग या चार स्तंभांवर त्यांच्या लघुनिबंधाची भरभक्कम वास्तू उभी राहिलेली आहे. तिला मतमतांतराच्या परीक्षणा-निरीक्षणयुक्त बळकट खिडक्या-दारे आढळतात. प्रतिमा-अलंकारयुक्त भाषाशैलीचा मुलामा या वास्तूला आगळीच शोभा आणतो. त्यांचे लघुनिबंध वाचणे हा जत्रेतल्या रहाट पाळण्यात बसल्याचा अनुभव असतो. वक्रोक्ती, चमत्कृती, अतिशयोक्ती अशा उक्तिविशेषांचे मनोज्ञ दर्शन त्यांचा कोणताही लघुनिबंध घडवतो. ‘मंझधार’ ही त्याला अपवाद नाही. अराऊंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स’ असा अनुभव घ्यायचा असेल त्याने खांडेकरांचा कोणताही लघुनिबंध संग्रह वाचायला हरकत नाही. -विजय काचरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more