* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MANZADHAR
  • Availability : Available
  • ISBN : 9788171617326
  • Edition : 3
  • Publishing Year : 1959
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE VERSES IN THE SHORT ESSAY SHOULD BE LIKE THE SOFT GOLDEN SHADES OF THE SETTING SUN, THE HUMOR SHOULD BE AS CHARMING AS A HALF-BLOOMED LOTUS, BUT DELICATE...NOT A BELLY LAUGH, JUST A CHEEK-STIRRING...AND THE PHILOSOPHY IT IMPLIES SHOULD BE AS SPARSE, BUT BEAUTIFUL, AS THE MOONS JUST BEGINNING TO SHINE ON THE HORIZON. KHANDEKAR`S PERCEPTION OF SUCH IDEAL SHORT ESSAYS SHOULD BE.
वि.स.खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या मूळ बृहदसंग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंधांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न या संग्रहात ग्रथित केलेल्या लघुनिबंधांत दिसतो. लघुनिबंधातली काव्यस्थळं मावळत्या सूर्याच्या सौम्य सोनेरी छटांसारखी असावीत, त्यांतला विनोद हा अर्धवट मिटलेल्या कमळांसारखा मोहक, पण नाजूक... पोट धरून हसवणारा नव्हे, नुसता गालाला खळी पाडणारा... असावा, आणि त्यातून सूचित होणारे तत्वविचार क्षितिजावर नुकत्याच चमकू लागलेल्या चांदण्यांप्रमाणे विरळ, पण सुंदर असावेत, अशा आदर्श लघुनिबंधांविषयीच्या खांडेकरांच्या धारणा होत्या. प्रत्यक्षात खांडेकरांच्या लघुनिबंधात तत्वदर्शन, भावनाविहार आणि कल्पनाविलास हे तीन गुण प्रकर्षानं आढळत असले, तरी आणखी एका महत्वाच्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवश्यक आहे. तो आहे विचारशक्तीचा उच्छृंखल विलास. हा असा गुणसंपन्न लघुनिबंधसंग्रह वाचकांना नक्कीच मंत्रमुग्ध करील, असा विश्वास वाटतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MANJADHAR #V S KHANDEKAR #SHRI #TILGUL #SUKLELYA PHULANCHA SUGANDH #NAU GUNTHE #JAMIN #PRAVAS #CHIMNICHE PILLU #PHOTOGRAPHERCHYA DUKANAT #DIVYA BHAS #TACHANYA #UPEKSHIT NAYIKA #DON SHABDHA #PUNHA EKDA #DAINANDINI #JUNI CHITRE #CRICKET ANI NATAK #EK ABHIPRAY #AKASHWANI #DULAKI #GOD SHEVAT #मंझधार #वि. स. खांडेकर # श्री #तिळगूळ #सुकलेल्या फुलांचा सुगंध #नऊ गुंठे #जमीन # प्रवास #चिमणीचे पिल्लू #फोटोग्राफरच्या दुकानात #दिव्य भास #टाचण्या #उपेक्षित नायिका # दोन शब्द #पुन्हा एकदा #दैनंदिनी #जुनी चित्रे #क्रिकेट आणि नाटक #एक अभिप्राय #आकाशवाणी #डुलकी #गोड शेवट#
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL, NASHIK 12-10-1997

    मंझधार : सर्वस्पर्शी लघुनिबंध संग्रह… वि. स. खांडेकर यांच्या प्रिती विलासाच्या मध्यान्हकाळी म्हणजे १९५९ मध्ये त्यांचा ‘मंझधार’ हा ६१ लघुनिबंधाचा संग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यात खांडेकरी लघुनिबंधाची वैशिष्ट्ये, गुणदोष यांचे एकत्रित दर्शन एकाच ग्रंथा होत असे. अशा समग्र ग्रंथाचे विभाजन करून ‘पहिले पान’, ‘मंझधार’ आणि ‘धुके’ असे तीन लघुनिबंध संग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने अलीकडेच प्रसिद्ध केले. त्यामुळे कदाचित ग्रंथ विक्री-वितरणाची व्यावहारिक सोय झाली असली तरी अभ्यासकांना मात्र असे विभाजन क्लेशकारक वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जी विशिष्ट दृष्टी ठेवून खांडेकरांनी आपल्या लघुनिबंधांची क्रमवारी मांडणी केलेली असे तिलाच तिलांजली मिळण्याचा संभव अशा परिस्थितीत निर्माण होतो. थोर साहित्यिकांचे अभिप्रेत दृष्टिकोनही इतिहासजमा होऊ नयेत. असेच कोणाही साहित्यप्रेमीला वाटत राहणार. ‘मंझधार’या लघुनिबंधसंग्रहात वीस लघुनिबंधांचा समावेश करण्यात आला आहे. १९४८ ते १९५६ या काळात त्यांचा लेखनाविष्कार झालेला आहे. १९४८ मधील ‘उपेक्षित नायिका’ आणि १९४९चा ‘एक अभिप्राय’ हे दोन लघुनिबंध वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तुकारामाची पत्नी जिजाईच्या जीवनदृष्टीचा अत्यंत सुरेख व सखोल परामर्श खांडेकरांनी घेतला आहे. तिची तुलना चांदबिबी, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, शकुंतला, सीता, वसंतसेना आदींशी कौशल्याने केली आहे. सारखा तोंडाचा पट्टा चालविणाऱ्या जिजाईसमोर तुकाराम हा वीर पुरुषही होता. हे नमूद करून त्याच्या जागी आपण असतो तर एके दिवशी इंद्रायणीच्या पात्रात आपले प्रेत लोकांना दिसले असते, असा चमत्कृतीपूर्ण शेवट केला आहे. ‘एक अभिप्राय’ या लघुनिबंधात भाजीमास्तर, पोस्टमास्तर, शाळामास्तर आणि स्टेशनमास्तर यांची खुसखुशीत तुलना आढळते. ‘स्टेशन मास्तरांच्या कामासारखे रुक्ष काम’ हा अभिप्राय न रुचल्यामुळे खांडेकरांनी येथे स्वैर कल्पनाविलास केला आहे. १९५० मध्ये लिहिलेले ‘फोटोग्राफरच्या दुकानात’ आणि ‘दैनंदिनी’ हे दोन लघुनिबंध आहेत. पहिल्यात ‘फोटोमधल्या कृत्रिमतेची शिस्त’ अतिशयोक्त करून सांगितली आहे. लोक आपल्या भावना आणि आवडीनिवडीपेक्षा इतरांना काय बरे दिसेल हे लक्षात घेऊन फोटो काढून घेतात, हे निरीक्षण मांडले आहे. ‘दैनंदिनी’मध्ये दैनंदिनी लिहिणे म्हणजे जाणुनबुजून ढोंगी होणे– असे जगावेगळे मत व्यक्त होते. १९५१ मधील ‘सुकलेल्या पुâलांचा सुगंध’ ‘क्रिकेट आणि नाटक’ व ‘दिव्य भास’ हे तीन लघुनिबंध आहेत. पहिल्या लघुनिबंधात जुन्या पुराण्या पुस्तकांसंबंधी वाटणारी ओढ काव्यमय शैलीत विशद केली आहे. दुसऱ्या क्रिकेट आणि नाटकाची तुलना करताना ‘मनुष्य हा यंत्र नाही, पोपट नाही, राक्षस नाही, देव नाही; तो मनुष्यच आहे!’ हे सूत्र कल्पकतेने गुंफलेले आहे. १९५२ मधील तीन लघुनिबंध म्हणजे ‘जुनी चित्रे’, ‘डुलकी’ आणि ‘गोड शेवट’ हे होत. पहिल्यात ‘पांडव प्रताप’ पोथीतल्या चित्रांचे रासग्रहण आढळते. दुसऱ्या लघुनिबंधात नेपोलियनच्या डुलकी घेण्याच्या सवयीचे वर्णन ‘त्याने निसर्गावर विजय मिळवला. हवी तेवहा हुकमी डुलकी घ्यायची आणि हवे तेव्हा पुन्हा जागे होऊन कामाला लागायचे हे येरागबाळ्याचे काम नाही’ अशा मार्मिक शब्दांत केले आहे. ‘गोड शेवट’ हा लघुकथेच्या अंगाने लिहिलेला लघुनिबंध वाटतो. ‘मानवी जीवनाची खरीखुरी जाणीव शोकान्त कथा करून देतात. सुखान्त कथात ते सामर्थ्य आढळणार नाही.’ हा विचार मननीय वाटतो. ‘श्री’ आणि ‘तिळगूळ’ हे दोन लघुनिबंध १९५३मधील आहेत. ‘श्री’ मध्ये इंग्रज समुद्रातल्या बेटावर राहणारे असल्याने त्यांची मुळाक्षरे लाटांसारखी झाली आणि मराठे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणारे असल्याने आपली मुळाक्षरे अवघड जागी बांधलेल्या किल्ल्यासारखी झाली, असे मार्मिक निरीक्षण मांडलेले आहे. ‘तिळगूळ’ मध्ये काव्यरचना तंत्राचा मिश्किल परिहास केलेला आहे. कोणत्याही विषयावर काव्य न लिहिले हेच उत्कृष्ट काव्य कसे ठरते, हे सुचविले आहे. १९५४ मध्ये लिहिलेला ‘दोन शब्द’ हा एकुलता एक लघुनिबंध असून, त्यात ‘अच्छा’ आणि ‘इश्श्य’ या दोन शब्दांची सुरेख फिरकी घेतली आहे. विशेषत: बायकांच्या तोंडी ‘अच्छा’ शब्द ऐकल्यावर खांडेकरांना काय वाटते, हे मुळातून वाचण्यासारखे आहे. मानवी जीवनाचा सर्वस्पर्शी वेध घेण्याचे सामर्थ्य वि. स. खांडेकर त्यांच्या लघुनिबंधामध्ये आढळते. चिंतन-मनन-वाचन-व्यासंग या चार स्तंभांवर त्यांच्या लघुनिबंधाची भरभक्कम वास्तू उभी राहिलेली आहे. तिला मतमतांतराच्या परीक्षणा-निरीक्षणयुक्त बळकट खिडक्या-दारे आढळतात. प्रतिमा-अलंकारयुक्त भाषाशैलीचा मुलामा या वास्तूला आगळीच शोभा आणतो. त्यांचे लघुनिबंध वाचणे हा जत्रेतल्या रहाट पाळण्यात बसल्याचा अनुभव असतो. वक्रोक्ती, चमत्कृती, अतिशयोक्ती अशा उक्तिविशेषांचे मनोज्ञ दर्शन त्यांचा कोणताही लघुनिबंध घडवतो. ‘मंझधार’ ही त्याला अपवाद नाही. अराऊंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स’ असा अनुभव घ्यायचा असेल त्याने खांडेकरांचा कोणताही लघुनिबंध संग्रह वाचायला हरकत नाही. -विजय काचरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more