* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RANPHULE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662405
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WILD FLOWERS: THE SHORT ESSAYS INCLUDED IN THIS COLLECTION UNDER THE NAME "RANPHULE` WERE WRITTEN BY V. S. KHANDEKAR DURING 19271961. THEY WERE NOT PUBLISHED UNDER ONE TITLE TILL THE YEAR 2002. IT IS TRUE THAT HOWEVER BEAUTIFUL THE WILD FLOWERS FAIL TO ATTRACT ATTENTION, BECAUSE THEY REMAIN DESERTED, UNTOUCHED. THE ESSAYS IN TRUE SENSE RESEMBLE THE WILD FLOWERS, THEY ARE VARIED IN COLOUR, FRAGRANCE, SHAPES AND EACH IN TURN IS AN EXAMPLE OF ETERNAL BEAUTY. WE ARE PRESENTING THESE WILD FLOWERS BLOOMING IN THE ORCHARD OF MARATHI LITERATURE ESPECIALLY FOR THE CURIOUS TRUE LOVERS OF LITERATURE, FOR THE STUDIOUS RESEARCHERS, FOR THE PONDEROUS WAYFARER TO ALLOW THEM TO ENJOY THEIR BEAUTY. IN THESE SHORT ESSAYS YOU WILL BE MEETING THE MATURED THINKERS. MANY PEOPLE HAVE OFTEN THOUGHT THAT V. S. KHANDEKAR ALWAYS REPRESENTED HIGHER CLASS, BUT THESE ESSAYS WILL THROW LIGHT ON THE FACT THAT HE WAS ALSO THE SAVIOUR OF NEGLECTED AND DOWN TRODDEN PEOPLE. HIS INNOVATIVE PICTURISATION OF KAPINJAL, MAHASHWETA, PUNDARIK, VIKARNA, RAMDAS, HANUMAN, PENDYA, VRIDDHAR, ETC. WILL GIVE US A NEW INSIGHT. THIS COLLECTION IS A COMBINATION OF RURAL SWEETNESS AND URBAN SOURNESS. THIS IS A MAGICAL POTENT OF EXCLUSIVE MIXTURE. IF YOU PRESERVE IT, SAFEGUARD IT, IT WILL BECOME MORE EXPLOSIVE, SO IT IS BETTER TO READ IT AND DIGEST IT, ISN`T IT?
‘रानफुले’ हा वि. स. खांडेकरांनी सन १९२७ ते १९६१ या कालखंडात लिहिलेल्या परंतु अद्याप असंकलित राहिलेल्या लघुनिबंधांचा संग्रह. यात वाचकांना रानफुलांच्या रंग, गंध, आकार, सौंदर्याचा अस्सलपणा अनुभवायला मिळेल. रानफुले सुंदर असली तरी बऱ्याचदा उपेक्षित नि अस्पर्शित रहातात. मराठी साहित्य वाटिकेतून विहार केलेल्या अभ्यासू, संशोधक वाटसरुंचे या देशीकार सौंदर्य लेण्यांकडे अद्याप लक्ष कसं गेलं नाही याचं आश्चर्य वाटल्यावरून ती जिज्ञासू नव वाचकांसाठी मुद्दाम खुडून आणलीत. या लघुनिबंधातून तुम्हास खांडेकरांमधील विकसित, प्रौढविचारक भेटेल. खांडेकर पांढरपेशांचे प्रतिनिधी लेखक होते म्हणणाऱ्यांना या संग्रहातील अनेक निबंध ते वंचित, उपेक्षितांचे वाली कसे होते ते समजावतील. कपिंजल, महाश्वेता, पुंडरीक, विकर्ण, रामदास, हनुमान, पेंद्या, वृद्ध इत्यादी चरित्रांचे खांडेकरांनी केलेले अभिनव चित्रण प्राचीन साहित्याकडे आपणास नव्या दृष्टीने पहाण्याची शिकवण देईल. या संग्रहातील निबंधात गावरान मेव्याची मिठास जशी आहे तशी विलायती इलायचीची उग्रताही ! अनोख्या मिश्रणांचं हे अद्भुत रसायन ! जपाल, ठेवाल तसं कालौघात ते अधिक विस्फोटक होत राहणार, म्हणून वाचून रिचवणंच श्रेयस्कर नाही का?

No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #रानफुले
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA (kOLHAPUR) 05-01-2003

    वि. स. खांडेकर यांनी लघुनिबंध या फॉर्ममध्ये अनेक प्रयोग केले. त्यांच्या लघुनिबंध लेखनाची सुरुवात १९२७ मध्ये झाली. त्यांचे लघुनिबंध वाचकांशी संवाद साधणारे, त्याला आपलेसे करणारे होते. विविध नियतकालिके, दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या लघुनिंधांना लोकप्रियता मिळत होती. १९२७ ते १९६१ या कालावधीत खांडेकरांनी लिहिलेल्या परंतु अप्रकाशित राहिलेल्या लघुनिबंधांचा ‘रानफुले’ हा संग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केलेल्या या संग्रहात १६ लघुनिबंध असून ते खांडेकरांच्या लेखनवैशिष्ट्यांची साक्ष देणारे आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 27-03-2005

    न खुडलेली ‘रानफुले’… डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी वि. स. खांडेकर यांचे असंकलित साहित्य पुस्तकरूपाने संकलित करण्याचा चंग बांधून बरेच ग्रंथ अलीकडे प्रसिद्ध केले आहेत. त्यातीलच एक ग्रंथ म्हणजे ‘रानफुले’ हा लघुनिबंध संग्रह होय. लघुनिबंधाचा जनक कोण, फडके कीखांडेकर, हा वाद आता जुना झाला. तथापि खांडेकरांच्या इतर साहित्याप्रमाणे त्यांचा लघुनिबंधही आज तेवढाच लोकप्रिय आहे. तसे पाहता तयांचा लघुंनिबंध फडक्यांच्याच वळणाचा आहे. तरीही त्यातील विचारसौंदर्यामुळेच तो आजही टिकून आहे. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील लघुनिबंध हे असंकलित स्वरुपात अनेक नियतकालिकांतून विखुरलेले होते. त्यांना परिश्रमपूर्वक संकलित करून डॉ. लवटे यांनी वाचकांची मोठीच सोय केली आहे. लघुनिबंध या वाङ्मय प्रकाराच्या स्वभावाप्रमाणेच येथील निबंध अनेक विषयांवर लिहिले गेले आहेत. त्यातून खांडेकरांची कल्पकता, नर्मविनोदी शैली ठिकठिकाणी जाणवते. उदाहरणार्थ : पांढारपेशी लोकांच्या आणि मुलांच्या भिरूपणाविषयी आजवर बरेच बोलून झाले आहे. पांढरपेशी म्हणजे भित्रा असेही समीकरण रूढ झाले आहे. (इति व. पु. काळे). त्याच पद्धतीने पांढरपेशी मुलांविषयी लिहिताना खांडेकर सहजपणे सांगून जातात की, पांढरपेशी मुले लग्नातील हुंड्याखेरीज इतर कशावरही घाव घालू शकत नाहीत किंवा ‘भागूबाई’ हा शब्द पांढरपेशा वर्गातील प्रभाइतकाच प्रभाकरांनाही लागू पडेल. खांडेकरांचे हे निरीक्षण या समाजस्तराचे नेमके वर्णन करणारे आहे. फलज्योतिष, हाही असाच एक सार्वत्रिक विषय. त्यावर विश्वास ठेवावा की न ठेवावा हा वादग्रस्त विषय आहे. खांडेकरांचाही त्यावर विश्वास नाही. फलज्योतिष खरे की खोटे, हा प्रश्न अलाहिदा असला तरी त्यामुंळे त्रस्त मनांना दिलासा मिळतो ही गोष्ट मात्र खरी आहे, हे सत्य ते सहजपणे नोंदवितात. याखेरीज श्रीकृष्ण-पेंद्या यांच्या बालमैत्रीच्या निमित्ताने मित्रत्व. आवडीचा उगम माणसाच्या मनात कसा होतो, लहानपणाचे छंद, भूतदया, विषमता, सभा-संमेलने, असे अनेक विषय या लघुनिबंधातून येऊन जातात. खांडेकरांचा पाश्चात्य लेखकांचा अभ्यास होता. अनेक थोर लेखकांचे सूक्ष्म वाचन त्यांनी केलेले होते, याची साक्ष त्यांच्या साहित्यातून ठिकठिकाणी पटते तशी या लघुनिबंध संग्रहातही पटते; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत साहित्य त्यांनी मुळातून वाचले होते व पचवलेही होते असे दिसून येते. चांगले वाचल्याशिवाय चांगले लिहिता येत नाही हे खरेच आहे. ‘गंधर्वकन्ये काय बोलू?’, ‘प्रिया पंडरिका’ हे लेख वाचताना हाच प्रत्यय येतो. ‘गंधर्वकन्ये काय बोलू?’ हा लेख देवलांच्या ‘शापसंभ्रम’ नाटकाच्या संदर्भात सुचला आहे हे खरे; परंतु त्यातून खांडेकरांचे स्वतंत्र चिंतन ठिकठिकाणी प्रकट झाले आहे. उपरोक्त दोन्ही लेखांना ‘बापभट्टाच्या कादंबरी’ या महान संस्कृत ग्रंथातील कथेचा संदर्भ आहे. मराठीत आपण कादंबरी या वाङ्मय प्रकाराला कादंबरी हे नाव बाणभट्टाच्या कादंबरी या ग्रंथावरूनच दिले आहे. हे या निमित्ताने जाता जाता सांगावेसे वाटते. या ग्रंथात पुंडरीक आणि महाश्वेता यांची अलौकिक प्रेमकथा बाणभट्टाने कथन केली आहे. महाश्वेतेकडे मित्राच्या प्राणांची भीक मागणारा कपिंजल हा मित्रप्रेमाचा आदर्शच आहे. जीवन किती उदात्त असू शकते याचा हा भारावून टाकणारा प्रत्ययच ठरतो. या ग्रंथात कादंबरीचीही प्रेमकथा लेखकाने कथन केली आहे. बरेच गुंतागुंतीचे कथानक असलेला आणि अद्भुतरम्य घटनांनी भरलेला हा मोठाच ग्रंथ आहे. महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग सर्वांनाच माहिती आहे. भीष्म, द्रोण यांच्यासारखे ज्ञानवृद्ध लोक खाली मान घालून बसलेले असताना मोठमोठे योद्धे हतबल होऊन तो प्रसंग पाहत होते. कोणीही पुढे हो बोलायला धजावत नव्हता. तेव्हा दुर्योधनाचा भाऊ विकर्ण पुढे होऊन म्हणाला होता की, ‘ही दासी नाही.’ त्याच्या त्या उद्गारांवर सगळेच आश्चर्यचकित झाले होते. परंतु त्यातून त्याचे जे असामान्य धैर्य दिसून आले होते ते खांडेकरांना कायमचे लक्षात राहिले आणि त्यातूनच ‘ही दासी नाही’ हा लघुनिबंध लिहिला गेला आहे. विकर्ण हा खांडेकरांना सामान्यांचा प्रतिनिधी वाटतो. सामान्यांना चुकीचे काय, बरोबर काय हे दिसते, कळते. परंतु बोलायचे धाडस ते करत नाहीत. ते धाडस सामान्यांना प्राप्त व्हावे असे खांडेकरांना वाटते. त्यासाठी त्यांनी विकर्णासारखे धैर्य दाखवावे, त्याचा आदर्श स्वीकारावा, असा संदेश खांडेकर देतात. एकंदरीत विचारांना खाद्य पुरविणारा, काही ठिकाणी प्रासंगिक तरीही अनेक ठिकाणी चिरकालिक विषयांना हात घालणारा लघुनिबंध संग्रह संपादित करू डॉ. लवटे यांनी मराठी साहित्यात चांगली भर घातली आहे, असे म्हणता येईल. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 17-11-2002

    उपेक्षितांचे अभिनव चित्रण... वि. स. खांडेकर यांनी १९२७ ते १९६१ या काळात लिहिलेल्या पण असंग्रहित राहिलेल्या लघुनिबंधाचा संग्रह ‘रानफुले’ या नावाने डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केला आहे. लघुनिबंधात खांडेकरांचा आवेश नेहमीच प्रौढ विचारकाचा असतो. त्ाचा प्रत्यय याही निबंधात येईल. रानफुले सुंदर असली तरी बऱ्याचदा उपेक्षितच राहतात. त्यांना रस, गंध असले तरीही समाजातही समूहाच्या स्वरूपात काही गट उपेक्षित असतात. त्यांना खांडेकरांनी ‘रानफुले’मध्ये न्याय दिला आहे. त्यांच्या कपिंजल, महाश्वेता, पुंडरिक, विकर्ण, हनुमान, पेंद्या, वृद्ध आणि रामदास या लघुनिबंधांत अभिनव चित्रण दिसेल. लघुनिबंध हा प्रकार व्यक्तिनिष्ठ समजला जात असल्याने लघुनिबंधकाराने व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होणे स्वाभाविकच असते. खांडेकर पांढरपेशांचे लेखक समजले जात असले तरी त्यांनी उपेक्षितांचेही प्रतिनिधीत्व केलेले आहे. ही सर्व वैशिष्ट्ये धमाल अपुल्या गायी मध्ये पेंद्यांच्या ठिकाणी आढळून येतील. स्वैर चिंतन आणि साध्या गोष्टींत महान अर्थ शोधण्याची दृष्टी यात तर्काच्या पातळीवर खांडेकरांचा हात कोणी धरणार नाही. खांडेकरांच्या लेखनाच्या वैशिष्ट्याचा काळ आज राहिला नसला, तरी या संग्रहातील निबंधात तोच काळ पुन्हा एकदा रस, रंग आणि गंधांसह जिवंत होतो. -अनिल डोंगरे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more