* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PLANCHET
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668803
  • Edition : 4
  • Publishing Year : NOVEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A LONG JOURNEY BETWEEN BIRTH AND DEATH; EVERYONE HAS BEEN A VOYAGER DURING THIS JOURNEY. MANY A TIMES, MAN COMES ACROSS SOMETHING MYSTIC DURING THIS JOURNEY. BUT THE REALLY MYSTERY LIES IN THE JOURNEY BEFORE BIRTH AND AFTER DEATH. MAN HAS ALWAYS BEEN FASCINATED BY BOTH THESE JOURNEYS. HE IS TREMENDOUSLY IN LOVE OF THE FUTURE AND THIS MAKES THE FUTURE MORE FASCINATING. ONCE A MIND IS CAPTIVATED WITH THE FUTURE OR WITH THE MYSTERY THEN….THEN TAKES BIRTH A STORY BASED ON IT; MAY BE SUSPENSE, FANTASY OR SOMETHING CLOSE TO IT WITH A DIMENSION OF SOME SUPER POWER. THIS BOOK PRESENTS BEFORE US THE COLLECTION BASED ON SUCH POWERFUL FEELINGS, TRYING TO UNFOLD THE NATURE OF THE MIND; DIFFICULT TO UNDERSTAND.
जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास माणूस करतच असतो. पण या प्रवासातही काही वेळा त्याला गूढत्व जाणवते. पण खरा गूढ आणि अनाकलनीय प्रवास आहे जन्मापूर्वीचा आणि नंतरचा... या गूढाचे माणसाला विलक्षण आकर्षण वाटते. त्याला आणखी आकर्षण वाटते ते भविष्याचे. आणि एकदा या गूढाचे किंवा भविष्याचे वेध लागले की... आणि यातूनच जन्म घेतात गूढकथा, संदेहकथा, रहस्यकथा, फॅन्टसीज, कूटकथा आणि भयकथा.... आणि इतर अशाच अनेक... माणसांच्या या मनोव्यापारांचे रहस्य उलगडत टिपलेल्या या कथा... तशा विलक्षण आणि वेगळ्या...

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PLANCHET #PLANCHET #प्लँचेट #HORROR&GHOSTSTORIES #MARATHI SNEHALJOSHI #स्नेहलजोशी "
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    अनिल डोंगरे गूढकथा म्हटले की, मराठीत हटकून रत्नाकर मतकरी नारायण धारप यांची नावे आठवतात. कोणी काही म्हटलं तरी मराठी गूढकथांवर मतकरींचा ठसा आहेच. मराठी गूढकथांना ज्या ‘नवल’ मासिकाने प्रतिष्ठा मिळवून दिली त्याच ‘नवल’ मासिकात सातत्याने लेखन करून पुढे आलल्या स्नेहल जोशी यांचा ‘प्लँचेट’ हा नवा गूढकथासंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. गूढकथा पुरुष लेखकानेच लिहावी हा तथाकथित समजही स्नेहल जोशी यांनी आपल्या सकस कथांनी चक्क मोडीत काढला आहे. एक स्त्री न भिता मानवी मनाला भोवळ आणणारे, तर्क न ओलांडणारे, गूढ व विलक्षण लिहू शकते याचा प्रत्यय ‘प्लँचेट’मध्ये वारंवार येतो. स्नेहल जोशी यांनी यापूर्वी ‘कॉलगर्ल’ आणि ‘अधांतर’ या कादंबऱ्या व विपुल कथालेखन केलं. पण नंतर त्या प्रामुख्याने गूढकथांमध्ये रमल्या. ‘प्लँचेट’मध्ये एकूण १४ गूढकथा आहेत. त्यापैकी भृगुसंहितेचा बळी, काव.. काव.., सुश्रुत-बी १४, निरोप, मिस्टर राईट, सफर अशा कथात मानवी जीवनातल्या अतक्र्य घटना तर्क कोठेही विस्कटू न देता मनाची पकड घेतात आणि आपण त्या सलग वाचतच जातो. गूढकथांची खरी शक्ती वातावरण निर्मितीची असते व ती इथे पुरेपूर आढळून येते. भीती हा तर माणसाचा स्थायीभाव. चंचल स्वभाव, मनातले द्वंद्व, अद्भुत भास याला जर विचित्र घटनांची मालिका चिकटली, तर माणूस त्यात गरगरत राहतो. हाच अनुभव यातील प्लँचेट, ओझं, निरोप, झपाटलेली, इजा बिजा तिजा, जेथे राघव तेथे सीता अशा कथा देतात. उत्सुकता आणि धक्कादायक शेवट हीही गूढकथांची वैशिष्ट्ये. ती तर स्नेहल जोशी यांची बलस्थाने ठरवीत अशा पद्धतीने एकेक कथा अनुभवांना धक्के देत विलक्षण वेगाने वेगळ्या वाटेने जाते. जन्म आणि मृत्यू याचे कोणत्याही माणसाला विलक्षण आकर्षण वाटते. एकदा गूढाचे वा भविष्याचे वेड लागले की, मनोव्यापार कसा बदलत जातो याचे अर्थपूर्ण प्रत्यंतर ‘भृगुसंहितेचा बळी’ कथेत येते. गूढकथालेखिका म्हणून स्नेहल जोशी यांची वाटचाल पक्की होण्यास ‘प्लँचेट’ संग्रह मदतरूप होईल यात वाद नसावा. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.