THERE ARE A TOTAL OF SEVENTEEN STORIES IN THIS COLLECTION. THE STORIES ‘ANI TUMHI MHANATA, ‘DAY-CARE’, ‘RAMAYANA-RAMAYANA’ SHED LIGHT ON THE LIVES OF THE ELDERLY FROM DIFFERENT ANGLES. WHILE THE STORY ‘KSHAN’ REVEALS THE LUSTFUL DESIRE OF MAN… IN THE STORY ‘GARAHANA’, THE MISTRESS ASKS THE GODDESS FOR RESPECT FOR HER MAID. THE STORY ‘CORRIDOR’ EXPRESSES THE ANGUISH OF ARU, A NURSE WHO HAS COME OUT OF A COMA. THE STORY ‘JAJSAHEB’ EXPRESSES THE THOUGHTS OF A MAN WHO IS SUFFERING FROM HIS WIFE. THE TWO STORIES ‘TARRI’ AND ‘SAHAJ’ COMMENT ON FACEBOOK FRIENDSHIP. THESE STORIES ARE BASED ON THE FORMULA OF EMOTIONAL, MIXED REFLECTIONS ON A SPECIFIC TOPIC.
या कथासंग्रहात एकूण सतरा कथा आहेत. ‘...आणि तुम्ही म्हणता’, ‘डे-केअर’, ‘रामायण- रामायण’ या कथा वेगवेगळ्या अंगाने वृद्धांच्या जीवनावर प्रकाश टाकतात. तर ‘क्षण’ या कथेतून प्रकटते माणसाची किळसवाणी लालसा... ‘गाऱ्हाणं’ कथेतील मालकीण आपल्या मोलकरणीसाठी देवीकडे मागते सन्मान. ‘कॉरिडॉर’मधून व्यक्त होते कोमातून बाहेर आलेल्या अरू या नर्सची व्यथा. ‘जजसाहेब’ या कथेतून व्यक्त होतं पत्नीपीडित पुरुषाचं मनोगत. ‘तर्री’ आणि ‘सहज’ दोन कथा फेसबुक मैत्रीवर भाष्य करणाऱ्या आहेत. एका विशिष्ट विषयावर केलेलं भावरूपी, व्यामिश्र चिंतन, अशा सूत्रातून या कथा साकारल्या आहेत.