* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AGAINST ALL ODDS
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184980271
  • Edition : 5
  • Publishing Year : MAY 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 96
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AY, WE ALL SEE THE VAST EMPIRE OF "RELIANCE` BUILT BY DHIRUBHAI AMBANI. WE PRAISE HIM FOR HIS GOOD LUCK, FOR HIS EFFORTS. WE MUST REALIZE THAT WHILE IN THE PROCESS OF BUILDING THIS EMPIRE, HE HAD SUFFERED A LOT. HE UNDERWENT TREMENDOUS PRESSURE, COMPETITION. HE FACED VERY DIFFICULT AND TOUGH SITUATIONS. BUT HE OVERCAME EVERYTHING; HE WANTED TO FULFILL HIS DREAM OF A VAST EMPIRE. HE CONQUERED IT. THE SUCCESS RELIANCE AND DHIRUBHAI HAVE ACHIEVED IS SO SPECTACULAR THAT MOSTLY ALL FAIL TO SEE BEYOND IT. HE HAS STRUGGLED, SUFFERED AND SACRIFICED SO MUCH FOR ACHIEVING HIS DREAM. VERY FEW REALIZE THIS. THIS STORY OF DHIRUBHAI WILL GIVE COURAGE TO PEOPLE READING IT; THEY WILL BE FILLED WITH A PASSION OF DREAMING AND LATER WORKING TOWARDS ACHIEVING IT. DHIRUBHAI`S VICTORY WILL GIVE THEM COURAGE TO PURSUE THEIR DREAMS. AT THE SAME TIME, IT WILL MAKE THEM REALIZE THAT "WE HAVE TO LOSE SOMETHING IN ATTEMPT TO GAIN SOMETHING.` THIS IS THE STORY OF SUCCESS AND INDOMITABLE OPTIMISM, THIS IS THE STORY OF CONQUER OVER THE ADVERSITIES OF LIFE. A.G.KRISHAMURTI, IS THE FOUNDER-CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR OF "MUDRA COMMUNICATION` AN ADVERTISING COMPANY. HE ESTABLISHED THE COMPANY WITH A MERE DEPOSIT OF 35 THOUSANDS AND JUST ONE CUSTOMER. TODAY, AFTER 9 YEARS, MUDRA COMMUNICATION IS ONE AMONG THE THREE TOPMOST COMPANIES IN INDIA. MR. KRISHNAMURTI IS THE CHAIRMAN OF AGK BRAND CONSULTING. HE IS A RESIDENT OF AHMEDABAD AND HYDERABAD. HE STAYS THERE WITH HIS THREE DAUGHTERS AND ONE SON.
धीरुभाई अम्बानींनी स्वप्नपूर्तीच्या मार्गात आलेल्या अनंत अडथळ्यांवर मात करत ‘रिलायन्स’चं भव्य साम्राज्य उभारलं. धीरुभाई व रिलायन्सचं यश इतकं अपूर्व आहे, की बऱ्याच जणांना त्यांच्या संपत्तीच्या झगमगाटापलीकडचं पाहताच येत नाही. पण त्यांचं यश असं सहजी लाभलेलं नव्हतं. ते कष्टसाध्य होतं. या कहाणीतून वाचकांना केवळ स्वप्नं पाहण्याची स्फूर्तीच नव्हे, तर त्यावर पकड मिळवण्याचं धाडसही लाभेल. त्याचबरोबर प्रत्येक स्वप्नाची किंमत चुकवावीच लागते याची जाणीवही होईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
UNIQUEINSIGHTSOFDHIRUBHAIAMBANI #MUKESHAMBANI #ENTERPRENUERSHIP #मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SUPRIYAVAKIL #DHIRUBHAISM #धीरूभाईझम #सुप्रियावकील #ए.जी.कृष्णमूर्ती #A.G.KRISHNAMURTHY #PRATIKULTEVARMAAT #प्रतिकूलतेवरमात #AGAINSTALLODDS #असामान्ययशप्राप्तीसाठीदहासामान्यसूत्रे #TENMUCH #ASAMANYAYASHPRAPTISATHIDAHASAMANYASUTRE #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKASHA 19 -07 -2009

    धीरूभाई अंबानी... रिलायन्स उद्योगसमुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी हे आता जगभरातील कोट्यवधी तरुण-तरुणींसाठी एक आदर्श झाले आहेत. कमी काळात अधिकाधिक पैसा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणारे तरुण धीरूभाई अंबानी यांच्या आयुष्यपटाचा अभ्यास करीत असतात. १९५६साली पापड, लोणचे विकणारे धीरूभाई अंबानी १९८० साली देशातील प्रमुख उद्योगपती झाले आणि २००३ साली त्यांचा उद्योगसमूह जगातील एक प्रमुख उद्योगसमूह झाला. जगभरातील पहिल्या पन्नास श्रीमंत उद्योजकात रिलायन्स ग्रुपचा समावेश झाला. खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यापासून दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीचे किंवा विचाराचे बाजारीकरण सुरू झाले आहे. आता धीरूभाई अंबानी यांच्या नावाचेच मार्केट होत आहे. धीरूभाई अंबानी यांचे नाव त्यांची जन्मकथा रिलायन्स उद्योगाची जन्मकथा, वाढ या साऱ्या बाबी बाजारात चांगल्या किमतीला विकल्या जात आहेत. त्याचा फायदा भांडवलदार मंडळी घेणार नाहीत तरच नवल म्हणावे लागेल. अलीकडेच धीरूभाई अंबानी यांच्यासंबंधी ए. जी. कृष्णमूर्ती यांनी दोन पुस्तके लिहिले असून या पुस्तकांचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ही दोन्ही पुस्तके बाजारात मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेने आणली आहेत. या दोन्ही पुस्तकांना मुकेश अंबानी यांची प्रस्तावना आहे. धीरूभाई अंबानी पापड, लोणचे विक्रीच्या व्यवसायापासून रिलायन्स कापड उद्योग उभारण्याकडे वळले. पाताळगंगा येथील रिलायन्स कपडा निर्मिती प्रकल्प उभारताना त्यांना काय अडचणी आल्या आणि त्या अडचणी सोडविण्यासाठी धीरूभाई अंबानी यांनी काय केले याची माहिती या पुस्तकातून मिळते. रिलायन्स कपडा उद्योग उभा राहिला आणि धीरूभाई अंबानी इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्सुक होते, परंतु त्यांनी नव्या प्रकल्पासाठी दिलेले प्रस्ताव बँका कर्ज देण्यासाठी मान्य करेनात. त्यावर धीरूभाई अंबानी यांनी सर्वसामान्य लोकांकडूनच पैसा उभारण्याचा निर्णय घेतला आणि देशातील लोकांना पहिल्यांदा शेअर मार्केटची ओळख करून दिली. लोकांनी रिलायन्सचे शेअर घेतले पण परतावा किती मिळतो त्याबद्दल लोकांना शंका होती त्यावेळची सेबीची स्थापना झालेली नव्हती. लोकांनी फक्त धीरूभाई अंबानी यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून शेअर्स घेतले ही बाब धीरूभाई ओळखून होते. आपण शेअर्स धारकांना योग्य परतावा देऊ शकत नाही तर देशात शेअर बाजार उभा राहणार नाही याची जाणीव त्यांना होती. धीरूभार्इंनी शेअर्स विकताना दिलेले आश्वासन पाळले. पाच रुपयाचा शेअर्स विकत घेणाऱ्याला त्यावेळी दरवर्षी पन्नास रुपयापेक्षा अधिक परतावा मिळाला. या एकाच घटनेमुळे रिलायन्सची लोकप्रियता आकाशाला पोहोचली आणि पुढील काळात रिलायन्सला भाग भांडवलासाठी कधीच कसलीही अडचण आली नाही. रिलायन्स म्हणजे योग्य परतावा देणारी कंपनी. रिलायन्स म्हणजे फसवणुकीची भीती नसलेली कंपनी अशी प्रतिमा तयार झाली. धीरूभाई अंबानीने तयार केलेल्या या प्रतिमेचा फायदा आजही मुकेश आणि अनिल या अंबानी बंधूंना मिळतो आहे. धीरूभाई अंबानी हे एक अजब व्यक्तिमत्व होते. त्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. या माणसाने भारताच्या विकासासाठी दिलेले योगदान खूपच महत्त्वाचे ठरते. गुजराती माणसे कोणताही व्यवसाय प्रचंड निष्ठेने करतात त्यामुळे त्याचा फायदा गुजराती माणसाला मिळतो ही बाब धीरूभाई अंबानी यांनी दाखवून दिली. धीरूभाईचे अनुकरण आज सर्वच स्तरावर होत आहे. अनेक मोठे उद्योजक धीरूभाईच्या चरित्र आणि स्वभावाचा अभ्यास करतात. या पाश्र्वभूमीवर त्यांच्याविषयी आलेली ही दोन्ही पुस्तके सर्वार्थाने महत्त्वाची ठरतात. तरुण मंडळींनी या दोन्ही पुस्तकाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जीवनातील यश हे सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतात. धीरूभाईचे चरित्र याच बाबी सांगत असते. या दोन्ही पुस्तकांची किंमत ८० आणि ७० रुपये आहे. ही दोन्ही पुस्तके समाजाला निश्चितच मार्गदर्शक करणारे ठरतील याबद्दल शंका नाही. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKASHA 19 -07 -2009

    धीरूभाई अंबानी... रिलायन्स उद्योगसमुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी हे आता जगभरातील कोट्यवधी तरुण-तरुणींसाठी एक आदर्श झाले आहेत. कमी काळात अधिकाधिक पैसा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणारे तरुण धीरूभाई अंबानी यांच्या आयुष्यपटाचा अभ्यास करीत असतात. १९५६साली पापड, लोणचे विकणारे धीरूभाई अंबानी १९८० साली देशातील प्रमुख उद्योगपती झाले आणि २००३ साली त्यांचा उद्योगसमूह जगातील एक प्रमुख उद्योगसमूह झाला. जगभरातील पहिल्या पन्नास श्रीमंत उद्योजकात रिलायन्स ग्रुपचा समावेश झाला. खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यापासून दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीचे किंवा विचाराचे बाजारीकरण सुरू झाले आहे. आता धीरूभाई अंबानी यांच्या नावाचेच मार्केट होत आहे. धीरूभाई अंबानी यांचे नाव त्यांची जन्मकथा रिलायन्स उद्योगाची जन्मकथा, वाढ या साऱ्या बाबी बाजारात चांगल्या किमतीला विकल्या जात आहेत. त्याचा फायदा भांडवलदार मंडळी घेणार नाहीत तरच नवल म्हणावे लागेल. अलीकडेच धीरूभाई अंबानी यांच्यासंबंधी ए. जी. कृष्णमूर्ती यांनी दोन पुस्तके लिहिले असून या पुस्तकांचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे. ही दोन्ही पुस्तके बाजारात मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेने आणली आहेत. या दोन्ही पुस्तकांना मुकेश अंबानी यांची प्रस्तावना आहे. धीरूभाई अंबानी पापड, लोणचे विक्रीच्या व्यवसायापासून रिलायन्स कापड उद्योग उभारण्याकडे वळले. पाताळगंगा येथील रिलायन्स कपडा निर्मिती प्रकल्प उभारताना त्यांना काय अडचणी आल्या आणि त्या अडचणी सोडविण्यासाठी धीरूभाई अंबानी यांनी काय केले याची माहिती या पुस्तकातून मिळते. रिलायन्स कपडा उद्योग उभा राहिला आणि धीरूभाई अंबानी इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्सुक होते, परंतु त्यांनी नव्या प्रकल्पासाठी दिलेले प्रस्ताव बँका कर्ज देण्यासाठी मान्य करेनात. त्यावर धीरूभाई अंबानी यांनी सर्वसामान्य लोकांकडूनच पैसा उभारण्याचा निर्णय घेतला आणि देशातील लोकांना पहिल्यांदा शेअर मार्केटची ओळख करून दिली. लोकांनी रिलायन्सचे शेअर घेतले पण परतावा किती मिळतो त्याबद्दल लोकांना शंका होती त्यावेळची सेबीची स्थापना झालेली नव्हती. लोकांनी फक्त धीरूभाई अंबानी यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून शेअर्स घेतले ही बाब धीरूभाई ओळखून होते. आपण शेअर्स धारकांना योग्य परतावा देऊ शकत नाही तर देशात शेअर बाजार उभा राहणार नाही याची जाणीव त्यांना होती. धीरूभार्इंनी शेअर्स विकताना दिलेले आश्वासन पाळले. पाच रुपयाचा शेअर्स विकत घेणाऱ्याला त्यावेळी दरवर्षी पन्नास रुपयापेक्षा अधिक परतावा मिळाला. या एकाच घटनेमुळे रिलायन्सची लोकप्रियता आकाशाला पोहोचली आणि पुढील काळात रिलायन्सला भाग भांडवलासाठी कधीच कसलीही अडचण आली नाही. रिलायन्स म्हणजे योग्य परतावा देणारी कंपनी. रिलायन्स म्हणजे फसवणुकीची भीती नसलेली कंपनी अशी प्रतिमा तयार झाली. धीरूभाई अंबानीने तयार केलेल्या या प्रतिमेचा फायदा आजही मुकेश आणि अनिल या अंबानी बंधूंना मिळतो आहे. धीरूभाई अंबानी हे एक अजब व्यक्तिमत्व होते. त्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. या माणसाने भारताच्या विकासासाठी दिलेले योगदान खूपच महत्त्वाचे ठरते. गुजराती माणसे कोणताही व्यवसाय प्रचंड निष्ठेने करतात त्यामुळे त्याचा फायदा गुजराती माणसाला मिळतो ही बाब धीरूभाई अंबानी यांनी दाखवून दिली. धीरूभाईचे अनुकरण आज सर्वच स्तरावर होत आहे. अनेक मोठे उद्योजक धीरूभाईच्या चरित्र आणि स्वभावाचा अभ्यास करतात. या पाश्र्वभूमीवर त्यांच्याविषयी आलेली ही दोन्ही पुस्तके सर्वार्थाने महत्त्वाची ठरतात. तरुण मंडळींनी या दोन्ही पुस्तकाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जीवनातील यश हे सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतात. धीरूभाईचे चरित्र याच बाबी सांगत असते. या दोन्ही पुस्तकांची किंमत ८० आणि ७० रुपये आहे. ही दोन्ही पुस्तके समाजाला निश्चितच मार्गदर्शक करणारे ठरतील याबद्दल शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more