* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HOW TO ACHIEVE SUCCESS
  • Availability : Available
  • Translators : CHARULATA PATIL
  • ISBN : 9788171615988
  • Edition : 6
  • Publishing Year : OCTOBER 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
  • Available in Combos :ANANT PAI COMBO SET-4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN THIS BOOK, THE AUTHOR DISCUSSES THE VARIOUS ASPECTS CONCERNED WITH BEING SUCCESSFUL. HE SAYS, `ONCE YOU FIND THE MAGIC LAMP OF CONFIDENCE THEN YOU SURELY WILL ACHIEVE EVERY SINGLE THING SET IN YOUR MIND. YOU JUST HAVE TO THINK ABOUT THE THING AND IT WILL BE YOURS!` BUT THERE IS A SPECIFIC WAY OF SOWING THE SEEDS OF CONFIDENCE IN YOUR MIND. THE AUTHOR HAS DISCUSSED THE SAME IN DETAIL IN THIS BOOK. HE DESCRIBES IN A VERY SIMPLE LANGUAGE THE VARIOUS WAYS TO CROSS ALL THE OBSTACLES IN THE PATH OF YOUR SUCCESS. EVERYONE, AT THE STAGE OF ADOLESCENCE SHOULD READ THIS BOOK.
या पुस्तकात लेखकांनी यश संपादन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध घटकांची सांगोपांग चर्चा केलेली आहे. ते म्हणतात, ‘‘एकदा का तुमच्या हाती आत्मविश्वासाचा जादूचा दिवा आला, की बस्स! तुम्ही मनात इच्छा करायचाच अवकाश, की तुमची ती इच्छा पूर्ण झालीच, म्हणून समजा!’’ मात्र मनात ती इच्छा रुजवण्याचं देखील एक तक तंत्र आहे; आणि तेच या पुस्तकात लेखकांनी सविस्तर सांगितलेलं आहे. तुमच्या यशाच्या आड येणारे सगळे अडथळे कसे दूर सारायचे, हे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत या पुस्तकात सांगितलेलं आहे... त्यामुळं पौगंडावस्थेत पदार्पण करणाया प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SELFHELP #ANANTPAI #SUCESS #मार्गदर्शनपर #अनुवाद #अनंतपै #यश #व्यक्तिमत्वविकसन
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    आयुष्यात यशस्वी कसे, मित्र कसे मिळवावेत, पैसा कसा राखावा, आनंद कसा मिळवावा, याबद्दल मार्गदर्शन करणारी बरीच पुस्तके असतात. कळते पण वळत नाही, अशीच वाचणाऱ्यांची अवस्था होते. काही वेळा लेखकाने सुचवलेले उपाय वरवरचे वाटतात. यशाचा पाया सकारात्मक विचारसरणी ह आहे. अमूक एक गोष्ट मी नक्की करीन, असा स्वत:विषयी विश्वास, निश्चय आवश्यक आहे. निराशा भोवताली भरून राहिली तरी कोलंबस डगमगला नाही. त्याने वल्हवत रहा, असाच संदेश साथीदारांना दिला. बोटीत जे पाणी शिरते तेच बोट बुडवते. एरवी भोवताली भ्रष्टाचार, हिंसा यांचे वातावरण असले तरी ते आपल्या मनात झिरपू देऊ नये. मनोबल वाढवण्याचे अनेक उपाय श्री. पै सांगतात. तीर्थयात्रांच्या शारीरिक कष्टांमुळे मनोबल वाढते हेही सांगतात. शारीरिक अपंगत्वावर मात करून यश मिळवणाऱ्या विथोव्हेन, सुधा चंद्रन, हेलन केलर, रुझवेल्ट, लुईस ब्रेल यांची उदाहरणे दिली आहेत. तरुणांना हे पुस्तक वाचण्यात रस वाटू शकेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.