* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
KARN, THE SURYAPUTRA (SON OF GOD) WHO SPENDS HIS WHOLE LIFE BEING MOCKED AS SUTPUTRA. KARN, THE JAYSHTHA KAUNTYA(ELDEST SON OF KUNTI, THE QUEEN MOTHER) WHO IS BETTER KNOWN AS RADHAY. KARN WHO WAS EQUALLY ADMIRED AND LOVED BY PANCHALI (THE EMPRESS) AND VRISHAALI. KARN, THE INVINCIBLE, BORN WITH A SHEATH WHICH COULD NEVER BE PENETRATED IS THE MOST SOFT HEARTED PHILANTHROPIST;KARN,THE ONE WHO NEVER RETURNED ANYBODY FROM HIS DOOR EMPTY HANDED BUT COULD NEVER FILL UP HIS OWN HANDS .
असा हा कर्ण, भीष्माचं पतन होईपर्यंत समरांगणात पायच टाकणार नव्हता! इंद्रानं पूर्वीच त्याची कवचकुंडलं आपल्या पुत्रासाठी अर्जुनासाठी म्हणून दानाच्या मिषानं त्याच्यापासून हस्तगत केलीच होती. परशुरामांनी, ‘तुला ऐन युद्धाप्रसंगी ब्रह्मास्त्र स्फूरणार नाही.’ असा मर्मभेदी शाप त्याला दिला होता. महेंद्र पर्वतावरच्या ब्राह्मणाचे ‘तुझ्या रथाचं चक्र, भूमीही युद्धात अशीच रूतवून ठेवील!’ हे उद्गार कोणीही विसरू शकत नव्हतं. जगात अनेकांनी दान केलं असेल पण पण मरणाच्या दारातील एवढं चित्तथरारक, उत्तुंग एकनिष्ठ, अजोड दान तो एकटाच करू जाणत होता पहिला पांडव! ज्येष्ठ कौंतेय! अजोड दानवीर, सूर्यपुत्र!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating StarPratibha Mahajan - Mali

    मृत्युंजय ही मराठीतील एक अजरामर कलाकृती आहे. 2005 ला डी.एड् ला असताना वाचली होती... पण आता परत वाचावीशी वाटली... 1800 पानांचे हे हस्तलिखित पूर्णत्वास नेण्यासाठी लेखकांना 7 वर्षांचा कालावधी लागला.प्रचंड मोठा आवाका असणारे मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक िवाजी सावंत.... लेखकांच्या अफाट मेहनतीला,तळपत्या लेखनीला व वाचकाला खिळवून ठेवणार्या लेखनशैलीला मानाचा मुजरा!!! कर्णकथा,दानशूर कर्ण,ज्येष्ठ कौतेय,राधेय सूर्यपूत्र कर्ण ! कर्ण ! कर्ण ! त्याचा त्याग,त्याने भोवलेल्या यातना,सोसलेले कष्ट,सूर्यपूत्र असूनही त्याला आयुष्यभर सूतपुत्राची अवहेलना सहन करावी लागली,त्याचे निव्वळ मित्रप्रेम,त्याचा आदर्शवाद.....कादंबरी मधील पात्रांचे आत्मकथन सारं काही खिळवून ठेवणारं आहे. ...Read more

  • Rating StarVishwanath Joshi

    `कर्णा`, तु `मृत्युंजय` नव्हतास! काही पुस्तकं मनावर गारूड करतात , सहजासहजी अशी गारुडं मग खाली उतरवता येत नाहीत . त्या पुस्तकातील काही व्यक्तिरेखाही मनावर प्रभाव करतात . एकुणच ते पुस्तक वाचून झाल्यावरही आपण त्या पुस्तकाच्या धुंदीतच असतो! माझ्या ाचनात अशी फार पुस्तके आली नाही पण काही पुस्तकांनी माझ्यावर विलक्षण प्रभाव टाकला . त्यातीलच एक पुस्तक म्हणजे `मृत्युंजय`!! कै. `शिवाजीराव सावंत` यांची अजरामर साहित्यकलाकृती! साधारणपणे ज्यांना मराठी साहित्याची गोडी नाही त्यांना मृत्युंजय वाचायला द्यावी . मराठी भाषेची गोडी सहज लागेल . आज मराठी वाचकांमध्ये असे क्वचित वाचक असतील ज्यांनी मृत्युंजय वाचली नाहीये . `वि. स. खांडेकरां`च्या `ययाति`नंतर इतकं शब्दसौदर्य असलेली कादंबरी म्हणजे मृत्युंजय होय! इथेच एक प्रांजळ कबुलीजबाब देऊ इच्छितो की इतिहासाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास मृत्युंजयचे स्थान हे शुन्य आहे . व्यासांच्या महाभारतात काही प्रसंग नाहीच आहेत जे मृत्युंजयमध्ये आहेत . त्यामुळे मृत्युंजय मधील शब्द अन शब्द खरा आहे असा गैरसमज करुन घेऊ नये! मृत्युंजयची ओघवती भाषा , सावंतांची ती अनोखी शब्दरचना , निसर्गांचं केलेलं वर्णन , या सर्व बाबींचा मात्र विचार केला तर मृत्युंजयचे स्थान फार वरचे आहे हे निश्चित! काही पुस्तकं अशी असतात जी वाचायला घेतल्यावर खाली ठेवावी असं वाटतच नाही , मृत्युंजय अशांमधीलच एक आहे! मृत्युंजय या कादंबरीमुळे मराठी भाषेला एक संजीवनी मिळाली . मराठी भाषेचे वाचक वाढले . लोकांना पुन्हा एकदा कादंबर्‍यांनी भुरळ घालायला सुरुवात केली असे अनेक फायदे मृत्युंजयचे आहेत पण तेवढेच तोटे देखील आहेत . मृत्युंजय ही `महाभारत`कालीन महारथी `कर्णा`ची भावस्पर्शी कथा आहे . इथे एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण ती कादंबरी वाचत जातो . सुरुवातीला स्वत: कर्ण आपली कथा सांगायला सुरुवात करतो . त्याच्या त्या गावाचं - `चंपानगरी`चं तर वर्णन इतकं सुरेख आहे की इथुनच ही कादंबरी आपल्या मनावर पकड घेते . मग `कुंती` कर्णाविषयी सांगते . खरं सांगायचं तर वैयक्तिकपणे कुंतीचं सांगणं मला वाचायला कंटाळा देणारं होतं! पण कर्णाची जन्मकथा आपल्याला कुंतीच सांगते आणि त्यावेळी सावंतांनी तीथे अगदी प्रसंगानुरूप लेखणी वापरल्यामुळे कर्ण भाव खाऊन जातो! कर्णाची पत्नी `वृशाली` ही देखील कर्णाविषयी सांगते आणि कर्ण आणि वृशाली दोन्ही सहानुभूती मिळवतात. स्त्रीचं जीवन म्हणजे पतीच्या चरणांवर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं एक कमलपुष्प असतं! पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य . पतीच्या जीवनाची अर्धी बाजु सावरण्याची पवित्र शपथ तिनं सप्तपदीच्या मंगल वेळी अग्निनारायणाला साक्ष ठेवून घेतलेली असते . अशा वाक्यांमुळे माझ्या मनात वृशालीने एक वेगळाच आदर मिळवला . शिवाय `शोण`, `दुर्योधन` यांची मनोगतं देखील भारावून टाकणारी होती . शेवटचं `श्रीकृष्णा`चं मनोगत वाचताना मध्येच डोळे डबडबलेले होते! शेवटी मृत्युंजय वाचून पुर्ण केलं! मृत्युंजय वाचल्यावर एक वर्णनविलक्षण भावना मनात चेतवली गेलेली होती . मृत्युंजय वाचल्यावर `कर्ण` आमच्यासाठी `हिरो` झाला होता . एक कर्ण आणि दुसरा `दिलीप कुमार` हे त्या काळातील आमचे हिरो होते . मृत्युंजय मधल्या अनेक वाक्यांनी मनावर जबरदस्त पकड घेतली होती . "तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन" यांसारख्या वाक्यांनी मनाचा तळठाव व्यापला होता . मृत्यंजयमधील काही प्रसंग वाचल्यावर मनामध्ये एक विषण्णता जाणवली . जन्म झाल्यावर त्याला आईनेच आपल्यापासून दूर केलं होतं . `गुरु द्रोणां`चा आदर करुनही द्रोणांनी त्याच्या पदरी उपेक्षाच टाकली होती . तो ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी महेंद्र पर्वतावर `भार्गव परशुरामां`कडे गेला आणि त्याने सर्वस्व पणाला लावले पण पुन्हा एकदा त्याच्या पदरात जळजळीत निखारेच पडले आणि एक धगधगता शाप! शेवटी अंगावर धारण केलेली कवच - कुंडलेही इंद्राने दान म्हणून मागीतली आणि त्याच्यासोबत छळ केला आणि हे सगळं झाल्यावर कुंती त्याच्यासमोर आली! कुंतीसाठी त्याने एकाच म्हणजे फक्त अर्जुनालाच वधेन बाकीच्यांचा वध करणार नाही असं वचन दिलं! `गंगापुत्र भिष्मां`ची अवज्ञा होईल म्हणून हा रणधुरंधर पहिले दहा दिवस रणांगणात उतरला नाही! अर्जुनासाठी राखुन ठेवलेली `वैजयंती` त्याला `घटोत्कचा`वर सोडावी लागली . शेवटी नखं नसलेल्या सिंहासारखी त्याची अवस्था झाली होती! पण तरिही मनामध्ये अदम्य जिद्द ठेवून हा रणमार्तंड सेनानायक रणांगणात उतरला आणि पांडवांचे दुर्दै़वाचे दशावतार दिसु लागले . शेवटी कृष्णाच्या सांगण्यावरुन अर्जुनाने त्याच्यावर बाण चालवला आणि एक वादळ शांत झाले! कुरुक्षेत्रावर सुर्यास्त झाला!! `कर्ण`पर्व समाप्त झाले होते!! कर्णाचं गारुड मनावर ठेवूनच मग पुन्हा एक दोनदा मृत्युंजय पूर्ण वाचुन काढलं . पुन्हा पुन्हा कर्णाने माझ्या मनात वादळ उठवलं! मधल्या काळात माझं वाचन वाढलं . विविध दृष्टीकोनातून मी महाभारत वाचु लागलो . प्रत्येक वेळी कर्ण वेगळा वाटत गेला असला तरीही मृत्युंजयमुळे मी भारावून गेलो होतो . मग पणशीकरांचं `कर्ण कोण होता?` हे पुस्तक वाचनात आलं . नंतर परम पुज्य `वरदानंद भारती` यांचे कर्णावरचे लेख वाचनात आलं . या दोन्ही पुस्तकांमध्ये कर्णाविषयी नकारात्मकता वाचायला मिळाल्यामुळे संदर्भासहित महाभारत वाचायला घेतले आणि कर्णविषयी सत्य हळुहळू समजत गेले . बुद्धीला ते सत्य पटत होते मात्र मनाला पटत नव्हते . मग मात्र मृत्युंजय मधील अवास्तव , काल्पनिकतेवर असलेला भर हे सगळं स्पष्ट झालं मग कर्णापेक्षा कितीतरी पटीने मला इतर व्यक्तिरेखा भावल्या . विशेषतः भीष्मांनी माझ्यावर विलक्षण प्रभाव टाकला . कर्ण हा कुणी महात्मा /वीरपुरुष नसुन तो खलपुरुष होता हे देखील मला चिंतन केल्यावर समजु लागलं . शेवटी माझ्या मनावर दीर्घ काळ राज्य करणारा कर्ण माझ्या मनातुन अखेर हद्दपार झाला!! सुरुवातीला कर्णाच्या कृतींचं आम्ही समर्थन करायचो . आता मात्र तसं करताना स्वता:हाचीच लाज वाटु लागली . द्रौपदीला तो भर सभेत वेश्या म्हणाला असं वाचताना पुर्वी आम्हाला काही विशेष वाटलं नव्हतं पण आता मात्र तो विचार करतानाही मन धजवत होतं! भार्गव परशुरामांना असत्य सांगुन अंधारात ठेवणार्‍या कर्णाची प्रवृत्ती किती हिणकस असावी असं वाटु लागलं . गरीब ब्राह्मणाची गाय मारुन कर्णाला काय मिळालं? स्वता:हाच्या धनुर्विद्येच्या टिमक्या मिरविणारा कर्ण गांधर्व युद्धात निष्पभ्र का ठरला ? असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले आणि कर्ण हा माझ्या मनात इतिहासजमा होवुन बसला! आजही मी मृत्युंजय वाचतो पण कर्णासाठी नाही तर त्यातील अमोघ भाषेसाठी . साहित्य कलाकृतींमध्ये मृत्युंजय फार वर आहे मात्र त्यात इतिहास मिसळला गेला तर अज्ञानाचं प्रदुषण पसरतं. `श्रीमान योगी`/`छावा` किंवा मृत्युंजय या कादंबर्‍या अवश्य वाचाव्यात पण त्यातील काल्पनिकता ही खरी मानु नये . किमान सुज्ञ आणि विवेकी वाचकाने ही गोष्ट नोंद करुन घ्यावी! कर्णाशी माझं काहीच वैर नाही . तो पराक्रमी होता , त्याने अनेक दिग्वीजयही केले , त्याच्या दानशुरपणाला तोड नाही हे सगळं खरं पण तो अराजक प्रवृत्तीला पाठिंबा देणारा अधर्मी होता असं व्यासांनी म्हटलयं . आम्ही नाही!! आज एकुणच कर्णाकडे वळुन पाहताना जास्त काही म्हणावसं वाटतं नाही . दोन ओळीच खुप आहेत , कर्णा , तु मृत्युंजय नव्हतास रे! मृत्युंजय नव्हतास!! धन्यवाद! ...Read more

  • Rating StarDatta Shinde Patil

    एक वेळ अवश्य वाचावं असं पुस्तक

  • Rating StarSomnath Rathod

    आज जेव्हा शिवाजी सावंत यांची लोकप्रिय कादंबरी मृत्यूंजय वाचून समाप्ती झाली तेव्हा कळाले. "अंगराज कर्ण. सुतपुञ कर्ण. कौरव दिग्विजयी सेनापती कर्ण .जेष्ठ कौंतिया कर्ण. राधेय कर्ण . साक्षात इंद्रदेवाला आपल्या दारात याचक म्हणून उभा करणारा दानीर कर्ण आपला मिञ दुर्योधन व कौरव पराभूत होणार माहीत असताना मिञाला दिलेल्या शब्द खातीर शेवट पर्यंत जिगरांने लढणारा कर्ण. मृत्यू च्या दारात उभा असताना याचक वृद्ध ब्राम्हणाला स्वतःचे दोन सोन्याचे दात दगडाने तोडून देण्याचे मुलाला आदेश देणारा दानविर कर्ण प्रत्येक माणसात एक कर्ण असतोच..! १० दिवस डोक्यात गरागरा फिरणारा कर्ण आज डोक्यासह शांत झाला.! कादंबरी कार शिवाजी सांवत ना कोटि कोटि प्रणाम. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MANSA ASHI ANI TASHIHI
MANSA ASHI ANI TASHIHI by RAVINDRA BHAGAVATE Rating Star
ठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३

कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही. एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजू‌बाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते. `अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात. `अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे. उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही. भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत. `तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात. `कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे. `इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात. त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे. त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते. या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात. कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more

THE HUNGRY TIDE
THE HUNGRY TIDE by AMITAV GHOSH Rating Star
जयश्री सोनवणे

बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे. ...Read more