* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MORAVALA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177660715
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 1998
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :SHIVAJI SAWANT COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MORAVALA IS THE AMLA OR GOOSEBERRY PRESERVE. THIS BOOK PRESERVES LOT OF THINGS. IT IS SCIENTIFICALLY PROVEN THAT MORAVALA HAS INDEED MANY GOOD CHARACTERISTICS. SIMILARLY, THIS BOOK IS PRESERVED IN SUGAR WITH ALL ITS GOOD CONTENTS. IT IS USEFUL. IT HAS LOST ITS SOUR-SWEET-BITTER-PUNGENT TASTE AND HAS BECOME VERY TASTY NOW. THE CONTENTS HERE HAVE ALL THE CHARACTERISTICS OF HUMAN MIND-EGO, HATRED, JEALOUSY…YET, THEY ARE SWEETLY MOLDED TOGETHER. ALL THE SHADRIPUS-THE SIX ENEMIES- HAVE CAST OFF THEIR QUALITIES AND HAVE SOAKED THE SWEETNESS NOW. SHRI SHIVAJI SAWANT’S MIGHTY PEN HAS ONCE AGAIN PRESENTED THE LITERATURE IN EXTREMELY WELL FASHION-WITH A TOUCH OF THE LOCAL LANGUAGE OF KOLHAPUR. HE HAS PORTRAYED MANY PEOPLE FROM VARIOUS FIELDS OF LIFE THROUGHOUT HIS JOURNEY-THEY ARE POLITICS, EDUCATION, PUBLICATION AND LITERATURE AS WELL. A FEW RURALITES MAKE A PERMANENT IMPRESSION ON OUR MINDS. SINCE THE BEGINNING TO THE LAST PAGE, THE BOOK PRESENTS THESE SKETCHES FOR US IN A TANTALIZING MANNER LEAVING US MESMERISED.
हा आहे ‘शब्द- मोरावळा’. लेखक मनोगतात म्हणतो : शरीरस्वास्थ्याच्या शास्त्राप्रमाणं साधा आवळा अति गुणकर असतो, हे सिद्ध झालंय. हा तर आहे साखरेच्या मधुर पाकात अंगभर मुरलेला मोरावळा. गुणकर, तसाच तुरटपणा टाकून चविष्ट झालेला. त्यातही हा शब्दमोरावळा, साहित्यिकमोरावळा आहे. मानवी मनाचा सारा अहंपणा, मत्सर, द्वेष अशा षड्रिपूंचा बेचव तुरटपणा टाकून ललितरम्य भाषेत सादर केलेला. श्री. शिवाजी सावंत यांच्या सशक्त भाषाशैलीत हा ‘शब्दमोरावळा’ साकारला आहे, त्यांच्या खास कोल्हापुरी बाजात नि ढंगात. इथं सावंतांच्या जीवनयात्रेत भेटलेली राजकारण, शिक्षण, प्रकाशन व साहित्य अशा विविध क्षेत्रांतील बलदंडांची आखीव रेखांकने आहेत. त्यांत एक-दोन खास ठाामीण अफलातूनही भेटतात. मोरावळ्याचा पहिलाच तुकडा जिभेवर ठेवताच खरा रसज्ञ मिटकी मारत नकळतच म्हणतो, ‘व्वा!’ तसंच काही हा ‘शब्दमोरावळा’ चाखताना रसिक वाचकाला वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको!!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#अशी मने असे नमुने #छावा #छावा #कांचनकण #कवडसे #मोरावळा #मृत्युंजय-नाटक #शेलका साज #युगंधर #ASHI MANE ASE NAMUNE #CHHAVA - NATAK #CHHAWA #KANCHANKAN #KAVADASE #MORAVALA #MRUTYUNJAY - NATAK #SHELKA SAJ #YUGANDHAR
Customer Reviews
  • Rating Star1-11-1998

    ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांना त्यांच्या आयुष्यात भेटलेल्या काही व्यक्तींची शब्दचित्रे ‘मोरावळा’ या संग्रहात समाविष्ट करण्यात आली आहेत. यात राजकारणी-समाजकारणी, कवी-लेखक प्रकाशक आहेत. तशा काही निखळ ग्रामीण व्यक्तिरेखाही आहेत. अण्णा (ग. दि. मा), ना.स. इनामदार, कॉटिनेंटलचे अनंतराव कुलकर्णी या व्यक्ती शिवाजी सावंत यांनी आपल्या शब्दसामथ्र्याने वाचकांसमोर साक्षात् उभ्या केल्या आहेत. ज्यांनी अण्णांना पाहिले नसेल त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचे रसिक अघळ-पघळ व्यक्तिमत्त्व उभे करण्याची किमया सावंतांच्या भाषेत आहे. अनंतराव कुलकर्णी हे ‘मृत्युंजय’चे प्रकाशक. त्यांच्यात आणि लेखकात या कादंबरीच्या शेवटाबाबत घडलेला प्रसंग यात रंगविला आहे. त्यातून प्रकाशक म्हणून अनंतराव किती बारकाईने विचार करतात आणि अखेर लेखकाला प्रभावीपणे आपले म्हणणेच कसे पटवून देतात याचे दर्शन घडते आणि त्यांच्या यशाचे रहस्यही सहजपणे उमगते. कै. यशवंतराव चव्हाणांमधली रसिकता आपल्याला जाणवते तसा केज गावी एका गावरान वृद्धेनं यशवंतरावाना मुलांच्या खाऊसाठी म्हणून वाटेत अडवून दिलेला सव्वा रूपया आणि त्यावेळची चव्हाणांची वागणूक हा एखाद्या ऐतिहासिक कादंबरीत शोभावा असाच प्रसंग आहे. ना. स. इनामदार आणि लेखक यांच्यातील स्नेह आणि लेखाला दिलेले स्नेहश्रीमंत इनामदार हे शीर्षक इनामदारांचे ऐतिहासिक लेखनही सूचित करते. ही झाली नामवंतांची व्यक्तिचित्रे, पण तानमावशी आणि चिलू मोरवळा ही दोन ग्रामीण व्यक्तिचित्रेही वाचनीय आहेत. सावंतांचा हा मोरावळा संग्रही ठेवावा असाच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more