* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AJUN YETO VAS PHULANA
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177662542
  • Edition : 6
  • Publishing Year : SEPTEMBER 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 84
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE FLOWERS STILL SMELL: WHAT IS LIFE? IT IS A MANIFESTATION OF ALL SEASONS RIGHT FROM THE SPRING TO THE AUTUMN, FROM THE SHADING OF ALL LEAVES TO THE APPEARANCE OF NEW FOLIAGE, EVERYWHERE. THE TENDER YEARS OF CHILDHOOD ARE LIKE SAPPY STORIES WHILE THE OLD AGE IS A TRAGEDY. LIFE AWAKENS WITH LOTS OF DREAMS, GETS READY TO CARRY THE CROSS OF MANHOOD AND ENDS INTO A TRAGIC ORDEAL, HOW, WHEN, NO ONE CAN TELL. STILL, THE FRAGRANCE FROM THE PAST GIVES CONFIDENCE TO LIVE LIFE AGAIN WITH NEW ENTHUSIASM. THESE SHORT ESSAYS REVEAL THE FACT THAT THE HUMAN LIFE IS ACTUALLY A SEARCH FOR THE LOST FRAGRANCE OF LIFE. THESE SHORT ESSAYS ARE DISCERNING, ACUTE YET THEY HAVE A DELICACY IN THEIR COMPOSITION. IN A WAY, THEY ARE REVEALING HIS TRUE SELF, THROUGHOUT THEM HE HAS TRIED TO DIGEST THE BITTERNESS TO WHICH THE AUTHOR IN HIM WAS EXPOSED. HE ELUCIDATES THE INNER CORES OF LIFE WITH HIS INTROSPECTIVE VISION. HIS WORDS AND EXPRESSIONS GIVE REASSURING STRENGTH TO THOSE WHO ARE FADE UP WITH LIFE, WHO HAVE LOST THE FRAGRANCE IN THEIR LIFE. THESE WORDS MAKE LIFE TOLERABLE FOR THEM. THESE ESSAYS CARRY ALL THE SIGNS AND SYMPTOMS OF HIS PROGRESS AS AN ESSAYIST. THEY ARE HIS INTENSE EXPOSITION OF A LIFE FULL OF EXPERIENCES
जीवन म्हणजे चैत्रपालवी ते पानगळीपर्यन्तच्या वैविध्यपूर्ण ऋतुंचा अविष्कार. यातलं बालपण म्हणजे सुरस कथा तर वृद्धत्व शोकान्तिका! स्वप्नं घेऊन जन्मलेलं जीवन घरगृहस्थीचे क्रूस वागवत सुळावरची पोळी केव्हा होतं कळत सुद्धा नाही. असं असलं तरी गतकालच्या सुकलेल्या फुलांचा सुगंध माणसास जगण्याची उभारी देत रहातो. माणसाचं सारं आयुष्य हरवलेल्या जीवनगंधाचा पुनर्शोधच असतो, हे समजाविणारे वि. स. खांडेकरांचे हे लघुनिबंध. लालित्याबरोबर मार्मिकता घेऊन येणारे. व्यक्तिगत जीवनातील कटुता पचवत लिहिले गेलेले हे निबंध एका अर्थाने लेखकाचा आत्मशोधच! या निबंधातील खांडेकरांची अन्तर्मुख वृत्ती वाचकांना जीवनाचे अंतरंग अशा रितीने उलगडून दाखवते की ज्यामुळे असह्य स्थितीतून मार्गक्रमण करु इच्छिणारयाना ‘अजून येतो वास पुलांना’... असा आश्वासक आधार मिळतो, जीवन सुसह्य वाटू लागतं! खांडेकरांच्या लघुनिबंध लेखन विकासाच्या पाऊल खुणा घेऊन येणारे हे निबंध म्हणजे अनुभव संपन्न जीवनाचं उत्कट भाष्यच!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #अजून येतो वास फुलांना
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT

    एखादा विषय डोळ्यांसमोर ठेवायचा. त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टींसह तो लिहायचा. असे काहीसे लघुनिबंधाचे स्वरूप असते. वि. स. खांडेकर लिखित ‘अजून येतो वास फुलांना’ हा लघुनिबंध संग्रह आहे. १९६४ ते १९७३ या कालावधीत लघुनिबंधांचा यात समावेश आहे. खांडेकरांपाश निबंधाच्या सुरुवातीलाच वाचकांना आपलंसं करण्याची विलक्षण हातोटी आहे. अगदी साध्या विषातूनही ते गहिरी जीवनमूल्ये समजावतात. खांडेकरी लिखाण म्हणताच आठवते ती ध्येयासक्ती, शब्दांची उधळण आणि पल्लेदार वाक्यरचना! मात्र या संग्रहाचे स्वरूप यापेक्षा काहीसे वेगळे आहे. एखाद्या नावावरून सुचणारे विचार यात आहेत. स्वप्नरंजन हा जीवनाचा आधार असल्याचे प्रतिपादन आहे. कुणाच्या उद् गारांवरून केलेले चिंतन आहे. म्हातारपणी वाटणाऱ्या भावनांचे वास्तव चित्रण दाखवतानाच खांडेकर भारतीयांच्या मानसिकतेचंही दर्शन घडवतात. मोठ्यांचे संदेश आणि लहान मुलांच्या गोष्टी अशी तारेवरची कसरत ते सहजपणे करतात. अद्भूत, अनुभवसंपन्न, वास्तवदर्शी, जीवनस्पर्शी म्हणून रामायणाला अधिक पसंती देतात. महाकाव्यातील नजरेआड झालेली पात्रे आणि दखलपात्रांच्या जीवनात न झालेल्या नाट्यमय घटनांचे अदृश्य धागे ते विणतात. जीवनाचा शोध, पूर्णत्वाचे अपूर्ण राहणे आणि नव्या दृष्टीचा आशावाद दाखवत खांडेकर आपले लेखन करतात. या संग्रहातील एकूण पंधरा लघुनिबंधात विषयवैविध्य आढळते. या निबंधांना साहित्यसोबत सामाजिक मूल्येही आहेत. कल्पनेचा रंगीबेरंगी विलास, चमत्कृती नर्मविनोद, उत्कट असणारा काव्यगुण यात आहे. खांडेकरांच्या या आधीच्या साहित्यात आढळणारी वैशिष्ट्यपूर्ण जीवनदृष्टी या संग्रहातही जाणवते. त्यांनी केलेले गूढ-गहीरे चिंतन विचार करण्यास प्रवृत्त करते. त्यांची काहीशी आत्मशोधक वृत्तीही यातून प्रगटू पाहते. डॉ. सुनीलकुमार लवटे हे या संग्रहाचे संपादक आहेत. ‘माणूसपणाचा शोध’ या प्रस्तावनेत ते त्यांचे मनोगत सांगतात. खांडेकरी शैलीचा अभ्यास करणाऱ्यांना हा संग्रहही उपयुक्त ठरेल. मुखपृष्ठाचे रेखाटन, त्यावरील प्राजक्ताची फुले ही पुस्तकनामाला साजेशी आहेत. लेखांचा क्रम व त्यांची मांडणी सुसंगत आहे. लालित्याबरोबर मार्मिकता घेऊ न येणारी ही फुलं जुनी असली तरी त्यांचा गंध मात्र अवीट आहे. -राधिका ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 21-12-2003

    खांडेकरी निबंधाची मोहिनी... वि. स. खांडेकर यांनी लघुनिबंधांना प्रतिष्ठित केले. ना.सी. फडके यांच्या गुजगोष्टींनी त्यांच्याशी काही काळ पहिलेपणाचा वाद घातला. त्याचा निर्णय काहीही असो, खांडेकरांचे लघुनिबंध आजतागायत मोहिनी घालत आहेत हे नक्की. डॉ. सुनीलकुार लवटे यांनी संपादित केलेल्या ‘अजून येतो वास फुलांना’ या संग्रहातही ही मोहिनी आढळते. ती का असावी? दैनंदिन आयुष्यातील प्रसंग, अनुभवातील संपन्नता, दार्शनिकाच्या जवळ जाणारे भाष्य आणि बोलीभाषेतील संवाद यामुळे खांडेकरांचे लघुनिबंध टिकून राहिले असावेत. सध्याच्या आक्रस्ताळी धर्माभिमानी वातावरणात भारतीय संस्कृतीचे माहात्म्य संयमी वैचारिकतेत असल्याचे सांगणारे त्याचे लघुनिबंध महत्त्वाचे ठरावेत. पुराणकथांबद्दलचे चिंतन, कृतज्ञता भाव, मृत्युबद्दलच्या विविध भावना कायम राहणार असल्याने हे लघुनिबंधही कायम टवटवीत राहतील. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 28-09-2003

    कालप्रवाहाशी सुसंगत निबंध… लघुनिबंधांना साहित्यप्रकार म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचं वि. स. खांडेकर यांचं श्रेय रसिकांना कधी डावलता येणार नाही. खांडेकरांना जाऊन ३० वर्षे होत आली तरी त्यांच्या निबंधांची मोहिनी रसिकमनावरून उतरलेली नाही. रोजच्याच आयु्यातले प्रसंग, रोजच्याच बोलीभाषेतील संवाद आणि अनुभव संपन्नतेतून आकाराला आलेलं खांडेकराचं दार्शनिकाच्या जवळपास जाणारं भाष्य. हे सारं त्यांच्या लघुनिबंधांमधून प्रकर्षाने जाणवतं. काळासोबत लोकांचे प्राधान्यक्रम बदलतात असं म्हटलं जातं. लोक तांत्रिक प्रगतीमुळे अधि विशाल दृष्टीचे होत जावेत असा आपला समज असतो. आजच्या अनेकांना खांडेकर भाबड्या विचारांचे प्रतीक वाटतात. ‘एक चटका’ या निबंधाने खांडेकरांनी त्यांना चोख उत्तर दिले आहे. साधेपणा, सोज्वळपणा म्हणजे अंधश्रद्ध किंवा धार्मिक जुन्या समजुतींना कवटाळून बसणे, दैववादी होणे नव्हे. धर्म आणि भारतीय संस्कृती यांच्याबद्दलच्या अवास्तव कल्पनांना खांडेकरांनी या निबंधात खोडून काढले आहे. मात्र त्यात कोणताही आवेश वा संघर्षाचा पवित्रा नाही. भारतीय संस्कृतीचे माहात्म्य या संयमी वैचिारिकतेतच नाही का? म्हणूनच ३५ वर्षांपूर्वीचा हा निबंध आजच्या आक्रस्ताळी धर्माभिमानी वातावरणात महत्त्वाचा ठरतो. काळाच्या ओघात टिकून राहणारे तेच खरे साहित्य, या नात्याने खांडेकरांचे हे निबंध साहित्य म्हणून आजही वाचनीय ठरतात. दैववादी सदैव कुरकुरणाऱ्या माणसांबद्दल अनास्था, गांधीवादातून प्रेरित असलेली काटकसर, मृत्यूबद्दलच्या विविध भावना, पुराणकथांबद्दलचे सततचे चिंतन, कृतज्ञतेचा वेध घेण्याचा प्रयत्न या मानवी भावना तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली तरी कायम राहणारच आहेत आणि म्हणूनच खांडेकरांचे निबंधही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more