* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AJUN YETO VAS PHULANA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662542
  • Edition : 5
  • Publishing Year : SEPTEMBER 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 84
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE FLOWERS STILL SMELL: WHAT IS LIFE? IT IS A MANIFESTATION OF ALL SEASONS RIGHT FROM THE SPRING TO THE AUTUMN, FROM THE SHADING OF ALL LEAVES TO THE APPEARANCE OF NEW FOLIAGE, EVERYWHERE. THE TENDER YEARS OF CHILDHOOD ARE LIKE SAPPY STORIES WHILE THE OLD AGE IS A TRAGEDY. LIFE AWAKENS WITH LOTS OF DREAMS, GETS READY TO CARRY THE CROSS OF MANHOOD AND ENDS INTO A TRAGIC ORDEAL, HOW, WHEN, NO ONE CAN TELL. STILL, THE FRAGRANCE FROM THE PAST GIVES CONFIDENCE TO LIVE LIFE AGAIN WITH NEW ENTHUSIASM. THESE SHORT ESSAYS REVEAL THE FACT THAT THE HUMAN LIFE IS ACTUALLY A SEARCH FOR THE LOST FRAGRANCE OF LIFE. THESE SHORT ESSAYS ARE DISCERNING, ACUTE YET THEY HAVE A DELICACY IN THEIR COMPOSITION. IN A WAY, THEY ARE REVEALING HIS TRUE SELF, THROUGHOUT THEM HE HAS TRIED TO DIGEST THE BITTERNESS TO WHICH THE AUTHOR IN HIM WAS EXPOSED. HE ELUCIDATES THE INNER CORES OF LIFE WITH HIS INTROSPECTIVE VISION. HIS WORDS AND EXPRESSIONS GIVE REASSURING STRENGTH TO THOSE WHO ARE FADE UP WITH LIFE, WHO HAVE LOST THE FRAGRANCE IN THEIR LIFE. THESE WORDS MAKE LIFE TOLERABLE FOR THEM. THESE ESSAYS CARRY ALL THE SIGNS AND SYMPTOMS OF HIS PROGRESS AS AN ESSAYIST. THEY ARE HIS INTENSE EXPOSITION OF A LIFE FULL OF EXPERIENCES
जीवन म्हणजे चैत्रपालवी ते पानगळीपर्यन्तच्या वैविध्यपूर्ण ऋतुंचा अविष्कार. यातलं बालपण म्हणजे सुरस कथा तर वृद्धत्व शोकान्तिका! स्वप्नं घेऊन जन्मलेलं जीवन घरगृहस्थीचे क्रूस वागवत सुळावरची पोळी केव्हा होतं कळत सुद्धा नाही. असं असलं तरी गतकालच्या सुकलेल्या फुलांचा सुगंध माणसास जगण्याची उभारी देत रहातो. माणसाचं सारं आयुष्य हरवलेल्या जीवनगंधाचा पुनर्शोधच असतो, हे समजाविणारे वि. स. खांडेकरांचे हे लघुनिबंध. लालित्याबरोबर मार्मिकता घेऊन येणारे. व्यक्तिगत जीवनातील कटुता पचवत लिहिले गेलेले हे निबंध एका अर्थाने लेखकाचा आत्मशोधच! या निबंधातील खांडेकरांची अन्तर्मुख वृत्ती वाचकांना जीवनाचे अंतरंग अशा रितीने उलगडून दाखवते की ज्यामुळे असह्य स्थितीतून मार्गक्रमण करु इच्छिणारयाना ‘अजून येतो वास पुलांना’... असा आश्वासक आधार मिळतो, जीवन सुसह्य वाटू लागतं! खांडेकरांच्या लघुनिबंध लेखन विकासाच्या पाऊल खुणा घेऊन येणारे हे निबंध म्हणजे अनुभव संपन्न जीवनाचं उत्कट भाष्यच!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #अजून येतो वास फुलांना
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 15-04-2018

    प्रतिभावंत ललित निबंधकार... खांडेकरांचे अभिजात ललित निबंध आपल्याला त्यांच्या विस्तृत अनुभव विश्वात घेऊन जातात, त्यांच्या तरल, कल्पनाशक्तीचे दर्शन घडवतात, आणि सुंदर भाषाशैलीने प्रभावित करतात. ते वाचत असताना आपल्या लक्षात येते, की प्रतिभासंपन्न ललित नबंधकाराला विषयांची कमतरता कधी जाणवतच नाही. कारण साध्या विषयातला अपेक्षित आनंद किंवा मोठा आशय शोधून काढणे हे कवीप्रमाणे लघुनिबंधकाराचेही कार्य असते. त्यामुळेच लोकांना क्षुद्र आणि निरर्थक वाटणाऱ्या विषयातलासुद्धा आनंद त्याला हळुवारपणे टिपता येतो आणि वाचकांपर्यंत पोहोचवता येतो. -अरविंद बोंद्रे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT

    एखादा विषय डोळ्यांसमोर ठेवायचा. त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टींसह तो लिहायचा. असे काहीसे लघुनिबंधाचे स्वरूप असते. वि. स. खांडेकर लिखित ‘अजून येतो वास फुलांना’ हा लघुनिबंध संग्रह आहे. १९६४ ते १९७३ या कालावधीत लघुनिबंधांचा यात समावेश आहे. खांडेकरांपाश निबंधाच्या सुरुवातीलाच वाचकांना आपलंसं करण्याची विलक्षण हातोटी आहे. अगदी साध्या विषातूनही ते गहिरी जीवनमूल्ये समजावतात. खांडेकरी लिखाण म्हणताच आठवते ती ध्येयासक्ती, शब्दांची उधळण आणि पल्लेदार वाक्यरचना! मात्र या संग्रहाचे स्वरूप यापेक्षा काहीसे वेगळे आहे. एखाद्या नावावरून सुचणारे विचार यात आहेत. स्वप्नरंजन हा जीवनाचा आधार असल्याचे प्रतिपादन आहे. कुणाच्या उद् गारांवरून केलेले चिंतन आहे. म्हातारपणी वाटणाऱ्या भावनांचे वास्तव चित्रण दाखवतानाच खांडेकर भारतीयांच्या मानसिकतेचंही दर्शन घडवतात. मोठ्यांचे संदेश आणि लहान मुलांच्या गोष्टी अशी तारेवरची कसरत ते सहजपणे करतात. अद्भूत, अनुभवसंपन्न, वास्तवदर्शी, जीवनस्पर्शी म्हणून रामायणाला अधिक पसंती देतात. महाकाव्यातील नजरेआड झालेली पात्रे आणि दखलपात्रांच्या जीवनात न झालेल्या नाट्यमय घटनांचे अदृश्य धागे ते विणतात. जीवनाचा शोध, पूर्णत्वाचे अपूर्ण राहणे आणि नव्या दृष्टीचा आशावाद दाखवत खांडेकर आपले लेखन करतात. या संग्रहातील एकूण पंधरा लघुनिबंधात विषयवैविध्य आढळते. या निबंधांना साहित्यसोबत सामाजिक मूल्येही आहेत. कल्पनेचा रंगीबेरंगी विलास, चमत्कृती नर्मविनोद, उत्कट असणारा काव्यगुण यात आहे. खांडेकरांच्या या आधीच्या साहित्यात आढळणारी वैशिष्ट्यपूर्ण जीवनदृष्टी या संग्रहातही जाणवते. त्यांनी केलेले गूढ-गहीरे चिंतन विचार करण्यास प्रवृत्त करते. त्यांची काहीशी आत्मशोधक वृत्तीही यातून प्रगटू पाहते. डॉ. सुनीलकुमार लवटे हे या संग्रहाचे संपादक आहेत. ‘माणूसपणाचा शोध’ या प्रस्तावनेत ते त्यांचे मनोगत सांगतात. खांडेकरी शैलीचा अभ्यास करणाऱ्यांना हा संग्रहही उपयुक्त ठरेल. मुखपृष्ठाचे रेखाटन, त्यावरील प्राजक्ताची फुले ही पुस्तकनामाला साजेशी आहेत. लेखांचा क्रम व त्यांची मांडणी सुसंगत आहे. लालित्याबरोबर मार्मिकता घेऊ न येणारी ही फुलं जुनी असली तरी त्यांचा गंध मात्र अवीट आहे. -राधिका ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 21-12-2003

    खांडेकरी निबंधाची मोहिनी... वि. स. खांडेकर यांनी लघुनिबंधांना प्रतिष्ठित केले. ना.सी. फडके यांच्या गुजगोष्टींनी त्यांच्याशी काही काळ पहिलेपणाचा वाद घातला. त्याचा निर्णय काहीही असो, खांडेकरांचे लघुनिबंध आजतागायत मोहिनी घालत आहेत हे नक्की. डॉ. सुनीलकुार लवटे यांनी संपादित केलेल्या ‘अजून येतो वास फुलांना’ या संग्रहातही ही मोहिनी आढळते. ती का असावी? दैनंदिन आयुष्यातील प्रसंग, अनुभवातील संपन्नता, दार्शनिकाच्या जवळ जाणारे भाष्य आणि बोलीभाषेतील संवाद यामुळे खांडेकरांचे लघुनिबंध टिकून राहिले असावेत. सध्याच्या आक्रस्ताळी धर्माभिमानी वातावरणात भारतीय संस्कृतीचे माहात्म्य संयमी वैचारिकतेत असल्याचे सांगणारे त्याचे लघुनिबंध महत्त्वाचे ठरावेत. पुराणकथांबद्दलचे चिंतन, कृतज्ञता भाव, मृत्युबद्दलच्या विविध भावना कायम राहणार असल्याने हे लघुनिबंधही कायम टवटवीत राहतील. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 28-09-2003

    कालप्रवाहाशी सुसंगत निबंध… लघुनिबंधांना साहित्यप्रकार म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचं वि. स. खांडेकर यांचं श्रेय रसिकांना कधी डावलता येणार नाही. खांडेकरांना जाऊन ३० वर्षे होत आली तरी त्यांच्या निबंधांची मोहिनी रसिकमनावरून उतरलेली नाही. रोजच्याच आयु्यातले प्रसंग, रोजच्याच बोलीभाषेतील संवाद आणि अनुभव संपन्नतेतून आकाराला आलेलं खांडेकराचं दार्शनिकाच्या जवळपास जाणारं भाष्य. हे सारं त्यांच्या लघुनिबंधांमधून प्रकर्षाने जाणवतं. काळासोबत लोकांचे प्राधान्यक्रम बदलतात असं म्हटलं जातं. लोक तांत्रिक प्रगतीमुळे अधि विशाल दृष्टीचे होत जावेत असा आपला समज असतो. आजच्या अनेकांना खांडेकर भाबड्या विचारांचे प्रतीक वाटतात. ‘एक चटका’ या निबंधाने खांडेकरांनी त्यांना चोख उत्तर दिले आहे. साधेपणा, सोज्वळपणा म्हणजे अंधश्रद्ध किंवा धार्मिक जुन्या समजुतींना कवटाळून बसणे, दैववादी होणे नव्हे. धर्म आणि भारतीय संस्कृती यांच्याबद्दलच्या अवास्तव कल्पनांना खांडेकरांनी या निबंधात खोडून काढले आहे. मात्र त्यात कोणताही आवेश वा संघर्षाचा पवित्रा नाही. भारतीय संस्कृतीचे माहात्म्य या संयमी वैचिारिकतेतच नाही का? म्हणूनच ३५ वर्षांपूर्वीचा हा निबंध आजच्या आक्रस्ताळी धर्माभिमानी वातावरणात महत्त्वाचा ठरतो. काळाच्या ओघात टिकून राहणारे तेच खरे साहित्य, या नात्याने खांडेकरांचे हे निबंध साहित्य म्हणून आजही वाचनीय ठरतात. दैववादी सदैव कुरकुरणाऱ्या माणसांबद्दल अनास्था, गांधीवादातून प्रेरित असलेली काटकसर, मृत्यूबद्दलच्या विविध भावना, पुराणकथांबद्दलचे सततचे चिंतन, कृतज्ञतेचा वेध घेण्याचा प्रयत्न या मानवी भावना तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली तरी कायम राहणारच आहेत आणि म्हणूनच खांडेकरांचे निबंधही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more