* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386175403
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A PLAYWRIGHT PENS DOWN THE PROBLEMS IN THE SOCIETY AND A VETERAN ACTOR LIKE GANPATRAO JOSHI PERFORMS THE ROLE APTLY. I STRONGLY BELIEVE THAT A GOOD ACTOR IS EQUALLY IMPORTANT LIKE A GOOD WRITER. GANPATRAO WAS ONE SUCH ACTOR. YEARS BACK, ACTORS WERE LOOKED DOWN BY THE SOCIETY. GANPATRAO STOOD FIRMLY TO PROVE HIS ABILITY AND HELPED THE ACTORS TO GAIN PRESTIGE IN THE SOCIETY. FOR THE THIRTY-SIX LONG YEARS THAT HE PERFORMED ON THE STAGE, HE SUCCEEDED IN KEEPING HIS PROBLEMS AT BAY. HE MIGHT HAVE EMBRACED A PEG OR TWO DURING THIS JOURNEY, BUT IT NEVER HAMPERED HIS ACTING SKILLS. ALL THE WHILE, EACH OF HIS PERFORMANCES GAVE IMMENSE HAPPINESS TO PEOPLE ALL AROUND. HE ENJOYED THEATER AND SPREAD HAPPINESS DURING HIS CAREER AS AN ACTOR WHICH ITSELF IS A HERCULEAN TASK. STICKING AROUND TO THE THEATRE IS NOT AN EASY JOB, IT CAN BE COMPARED ONLY WITH THE DILIGENCE THAT ONE TAKES TO FEEL THE PRESENCE OF ALMIGHTY. THE ONCE WHO PERFORMANCE IT IS SIMPLE GREAT. GANPATRAO JOSHI WAS INDEED ONE SUCH PERSON.
लेखक वुंÂभोजकरांचा पहिलाच व्यक्तिचित्र संग्रह. यात जसे चित्रपटांत भूमिका करणारे नट आहेत, तसे नाटकात नामवंत ठरलेले कलावंत आहेत आणि गायिकाही आहेत. उषा चव्हाणसारखी नर्तिकाही आहे. कथालेखक, नाटककार, कवी सर्वांचे व्यक्तिचित्र आत्मीयतेने व रसिकतेने साकारले आहे. जे लिहायचे ते ललित अंगाने लिहायचे, असा कटाक्ष त्यांनी ठेवला आहे. नाटककार हा समाजाची दु:खे मांडतो आणि गणपतराव जोशी यांच्यासारखा कलावंत ती तेवढ्याच ताकदीने प्रेक्षकांच्या मनात उतरवतो. म्हणून मला वाटते, चांगला नट चांगल्या नाटककाराइतकाच श्रेष्ठ असतो. गणपतराव ही तेवढेच श्रेष्ठ होते. नटांना समाज जेव्हा मानत नव्हता, तेव्हा त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली ती गणपतरावांनी. ज्या रंगभूमीच्या जगात ते सतत छत्तीस वर्षे वावरले, त्या जगात शिरताना स्वत:चे कौटुंबिक दु:ख ते विसरले. कधीतरी हे दु:ख मदिरेच्या प्याल्यात त्यांनी बुडविले असेल; नाही असे नाही. पण लाखो लोकांना कलेचा निर्भेळ आनंद त्यांनी दिला. त्यांचे जीवन आनंदी बनविले. असा आनंद देणे आणि घेणे, ही सामान्य गोष्ट नव्हे. परमेश्वराच्या साधनेइतकीही श्रेष्ठ साधना आहे. अशी साधना करणाNया कलावंताला श्रेष्ठ म्हणायचे नाही, तर काय! गणपतराव जोशी यांना तो मान दिलाच पाहिजे!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
PRABHAT FILM #BABURAOPENDHARKAR #GANPATRAO JOSHI #DAJI BHAATVADEKAR #APPA TIPANIS #DINKAR KAMANNA #ANANT DHUMAL #DAMUANNA MALWANKAR #MANIK VERMA #ARTI ANKALIKAR-TIKEKAR #VASANT DESHPANDE #GANGADHARAPANTA LONDHE #MRS. USHA KHANDEKAR #MA. #AVINASH USHA CHAVAN #HANS PICTURES #KALAKAR, R.A. KUMBHOJKAR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL SAPTRANG 18-12-2016

    रा.अ.कुंभोजकर यांनी वेगवेगळ्या कलाकारांविषयी केलेलं हे लेखन. जुन्या काळातले अनेक कलाकार या पुस्तकातून भेटतात, नवी माहिती मिळते. प्रभात फिल्म कंपनी, बाबूराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दिनकर कामण्णा अशा कलाकारांविषयी कुंभोजकर यांनी लिहिलं आहे. उषा चव्हाण,आरती अंकलीकर-टिकेकर अशा कलाकारांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या आहेत. केवळ जंत्री न मांडता त्या त्या कलाकाराचं सामर्थ्य, त्याचं वैशिष्ट्य, त्याच्यासंबंधीचे किस्से, त्या काळचं वातावरण अशा गोष्टी त्यांनी मांडल्या आहेत. नाटक, मराठी-हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ या लेखनातून उभा राहतो. ...Read more

  • Rating StarDAINIK MAHARASHTRA TIMES 4-12-2016

    सिनेमा-नाटकांतल्या कलावंतांच्या आयुष्याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता असते. ही उत्सुकता जशी कलावंत म्हणून असते, तशीच त्यांच्या माणूसपणाचीही असते. या उत्सुकतेच्या पुरेपूर कसोटीला उतरणारं पुस्तक म्हणजे रा. अ. कुंभोजकर यांचं अलीकडेच प्रकाशित झालेलं ‘कलाकार :सर्जनशील मनांचा व्यक्तिवेध’. कुंभोजकर यांनी आपल्या या पुस्तकात बाबुराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दिनकर कामण्णा, दामुअण्णा मालवणकर, अनंत धुमाळ, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, दाजी भाटवडेकर, उषा चव्हाण अशा एक काळ गाजवणाऱ्या कलावंतांच्या आयुष्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचाही अतिशय रसाळ वेध घेतला आहे. यातली बहुतेक व्यक्तिमत्त्व ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट जमान्यातली आहेत. कदाचित आजच्या पिढीला यातली अनेक नावं ठाऊकही नसतील. परंतु म्हणूनच आजच्या पिढीसाठी हे पुस्तक अधिक उपयुक्त आहे. आजचं नाटक-सिनेमाचं ग्लॅमर तेव्हाच्या कलावंताना नसेल, परंतु माणूस म्हणून ही कलावंत मंडळी किती मोठी होती, ते कुंभोजकरांनी रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिचित्रणातून अलवार उलगडत जातं. ...Read more

  • Rating StarSMITA PATWARDHAN, SANGLI 22-11-2016

    ‘कलाकार : सर्जनशील मनांचा व्यक्तीवेध’ हे श्री. रा.अ. कुंभोजकर यांचे पुस्तक वाचनीय ललित लेखसंग्रह आहे. महाराष्ट्रातील मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, त्यांची आपल्या व्यवसायाशी असलेली निष्ठा, त्यासाठी त्यांनी केलेले श्रम यांची रोचक आणि वाचनी माहिती या पुस्तकातून मिळते. आताच्या पिढीला ज्ञात नसलेले अनेक कलाकार, त्यांची असामान्य अभिनय क्षमता, दिग्दर्शकांची कल्पकता आणि चित्रपट संस्थाचालकांची कलाकारांना समजून घ्यायची मनोवृत्ती व व्यावसायिक शिस्त या पुस्तकातून वाचकांना समजते. श्री. कुंभोजकर हे सुरुवातीला वि.स. खांडेकरांकडे लेखनिकाचे काम करत होते. खांडेकरांना जवळचे लोक ‘भाऊ’ म्हणत. भाऊंकडे बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, कवी यशवंत यांसारखे अनेक लेखक-कवी भेटायला येत. त्यांच्या साहित्यिक गप्पांतून लेखक बहुश्रुत झाले. त्याच प्रमाणे भाऊंकडून लेखकाला लेखनाचे तंत्र आणि मंत्रही मिळाले. त्याचाच परिणाम म्हणून हे लेख वाचताना वाचक पुस्तकाला चिकटून बसतो. ओघवती भाषाशैली हे या लेखांचे वैशिष्ट्य आहे. कुंभोजकरांनी ‘अमृत’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ या प्रसिद्ध मासिकांमधे सहाय्यक संपादक किंवा कार्यकारी संपादक अशी पदे भूषवली आहेत. बेळगावच्या तरुण भारतच्या रविवारच्या अक्षरयात्रा पुरवणीचे संपादकपदही भूषवले आहे. या वाटचालीत त्यांचा चित्रपट, नाटक आणि संगीत क्षेत्रातील दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर संपर्क आला. त्यातूनच ही व्यक्तीचित्रणे निर्माण झाली. सदर पुस्तकात एकूण १५ व्यक्तीचित्रणे आहेत. ‘प्रभात फिल्म कंपनी’ हा लेख म्हणजे प्रभात फिल्म कंपनीशी जोडलेल्या अनेकांचे एकत्रित व्यक्तीचित्रण आहे. प्रभातचे मुख्य चालक विष्णुपंत दामले, फत्तेलाल, व्ही.शांताराम तसेच प्रभातच्या प्रसिद्ध कलाकारांशी संबंधित घटना पुस्तकात वाचायला मिळतात. प्रभातने सामाजिक महत्वाचे विषय जसे जरठ-कुमारी विवाह हे आपल्या चित्रपटातून मांडले. दिग्दर्शक म्हणून शांतारामबापू कसे होते त्याचे चित्रण प्रभात फिल्म कंपनी या लेखात वाचायला मिळते. प्रभात मधे काम करणार्‍या कलाकारांना आपल्या भूमिकेचे इथे सोने होत आहे याची जाणीव असायची. सध्याच्या तरुण पिढीला यातील बरीचशी नावे माहिती नाहीत. या पुस्तकामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील चित्रपट आणि नाट्यसृष्टीबद्दल बर्‍यापैकी माहिती मिळते. त्यातून अभ्यासूंची उत्सुकता वाढेल. बाबुराव आणि भालजी पेंढारकर यांनी पार्श्वनाथ आळतेकरांच्या सोबत ‘वंदे मातरम’ हा त्याच नावाचा त्यांच्या संस्थेचा पहिला बोलपट काढला. इंग्रजी राजवटीत हा चित्रपट ४ वेळा सेन्सॉर झाला. यावरची लेखकाची टिप्पणी चपखल आहे. ते म्हणतात, ‘चार-पाच वेळा गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची जी अवस्था होईल तीच या चित्रपटाची झाली. तो सपशेल आपटला.’ बाबुरावांनी मुख्यत: खलपुरुष साकारला. पण त्याबरोबर ‘भक्त दामाजी’ मधील विठू महार, ‘अमृत’ मधील कृष्णा चांभार, ‘श्यामची आई’ मधील भाऊराव, ‘महात्मा फुले’तील जोतिबा अशा विविधांगी आणि अभिनयाचा कस लावणार्‍या भूमिका त्यांनी केल्या. बाबुराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दाजी भाटवडेकर, अप्पा टिपणीस, दिनकर कामण्णा, धुमाळ असे जुने कलाकार आणि आरती अंकलीकर-टिकेकर या सध्याच्या प्रसिद्ध गायिका आपल्याला या पुस्तकात भेटतात. विशेष म्हणजे वि.स.खांडेकरांच्या पत्नी उषाताईंचेही व्यक्तीचित्रण यात अंतर्भूत केले आहे. एका साहित्यिकाचा संसार चालवायची कसरत ही देखील कलाच म्हणली पाहिजे असा त्यामागचा दृष्टीकोन असावा. खरतर रोचक ललित लेखन ही देखील एक कलाच आहे. त्यामुळे एक वाचनीय ललितलेखांचा संग्रह देणारे लेखक श्री. कुंभोजकर हेही एक कलाकारच म्हणले पाहिजेत. एका कलाकाराने इतर कलाकारांना दिलेली ही मानवंदनाच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more