* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386175403
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A PLAYWRIGHT PENS DOWN THE PROBLEMS IN THE SOCIETY AND A VETERAN ACTOR LIKE GANPATRAO JOSHI PERFORMS THE ROLE APTLY. I STRONGLY BELIEVE THAT A GOOD ACTOR IS EQUALLY IMPORTANT LIKE A GOOD WRITER. GANPATRAO WAS ONE SUCH ACTOR. YEARS BACK, ACTORS WERE LOOKED DOWN BY THE SOCIETY. GANPATRAO STOOD FIRMLY TO PROVE HIS ABILITY AND HELPED THE ACTORS TO GAIN PRESTIGE IN THE SOCIETY. FOR THE THIRTY-SIX LONG YEARS THAT HE PERFORMED ON THE STAGE, HE SUCCEEDED IN KEEPING HIS PROBLEMS AT BAY. HE MIGHT HAVE EMBRACED A PEG OR TWO DURING THIS JOURNEY, BUT IT NEVER HAMPERED HIS ACTING SKILLS. ALL THE WHILE, EACH OF HIS PERFORMANCES GAVE IMMENSE HAPPINESS TO PEOPLE ALL AROUND. HE ENJOYED THEATER AND SPREAD HAPPINESS DURING HIS CAREER AS AN ACTOR WHICH ITSELF IS A HERCULEAN TASK. STICKING AROUND TO THE THEATRE IS NOT AN EASY JOB, IT CAN BE COMPARED ONLY WITH THE DILIGENCE THAT ONE TAKES TO FEEL THE PRESENCE OF ALMIGHTY. THE ONCE WHO PERFORMANCE IT IS SIMPLE GREAT. GANPATRAO JOSHI WAS INDEED ONE SUCH PERSON.
लेखक कुंभोजकरांचा पहिलाच व्यक्तिचित्र संग्रह. यात जसे चित्रपटांत भूमिका करणारे नट आहेत, तसे नाटकात नामवंत ठरलेले कलावंत आहेत आणि गायिकाही आहेत. उषा चव्हाणसारखी नर्तिकाही आहे. कथालेखक, नाटककार, कवी सर्वांचे व्यक्तिचित्र आत्मीयतेने व रसिकतेने साकारले आहे. जे लिहायचे ते ललित अंगाने लिहायचे, असा कटाक्ष त्यांनी ठेवला आहे. नाटककार हा समाजाची दु:खे मांडतो आणि गणपतराव जोशी यांच्यासारखा कलावंत ती तेवढ्याच ताकदीने प्रेक्षकांच्या मनात उतरवतो. म्हणून मला वाटते, चांगला नट चांगल्या नाटककाराइतकाच श्रेष्ठ असतो. गणपतराव ही तेवढेच श्रेष्ठ होते. नटांना समाज जेव्हा मानत नव्हता, तेव्हा त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली ती गणपतरावांनी. ज्या रंगभूमीच्या जगात ते सतत छत्तीस वर्षे वावरले, त्या जगात शिरताना स्वत:चे कौटुंबिक दु:ख ते विसरले. कधीतरी हे दु:ख मदिरेच्या प्याल्यात त्यांनी बुडविले असेल; नाही असे नाही. पण लाखो लोकांना कलेचा निर्भेळ आनंद त्यांनी दिला. त्यांचे जीवन आनंदी बनविले. असा आनंद देणे आणि घेणे, ही सामान्य गोष्ट नव्हे. परमेश्वराच्या साधनेइतकीही श्रेष्ठ साधना आहे. अशी साधना करणाऱ्या कलावंताला श्रेष्ठ म्हणायचे नाही, तर काय! गणपतराव जोशी यांना तो मान दिलाच पाहिजे!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
PRABHAT FILM #BABURAOPENDHARKAR #GANPATRAO JOSHI #DAJI BHAATVADEKAR #APPA TIPANIS #DINKAR KAMANNA #ANANT DHUMAL #DAMUANNA MALWANKAR #MANIK VERMA #ARTI ANKALIKAR-TIKEKAR #VASANT DESHPANDE #GANGADHARAPANTA LONDHE #MRS. USHA KHANDEKAR #MA. #AVINASH USHA CHAVAN #HANS PICTURES #KALAKAR, R.A. KUMBHOJKAR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL SAPTRANG 18-12-2016

    रा.अ.कुंभोजकर यांनी वेगवेगळ्या कलाकारांविषयी केलेलं हे लेखन. जुन्या काळातले अनेक कलाकार या पुस्तकातून भेटतात, नवी माहिती मिळते. प्रभात फिल्म कंपनी, बाबूराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दिनकर कामण्णा अशा कलाकारांविषयी कुंभोजकर यांनी लिहिलं आहे. उषा चव्हाण,आरती अंकलीकर-टिकेकर अशा कलाकारांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या आहेत. केवळ जंत्री न मांडता त्या त्या कलाकाराचं सामर्थ्य, त्याचं वैशिष्ट्य, त्याच्यासंबंधीचे किस्से, त्या काळचं वातावरण अशा गोष्टी त्यांनी मांडल्या आहेत. नाटक, मराठी-हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ या लेखनातून उभा राहतो. ...Read more

  • Rating StarDAINIK MAHARASHTRA TIMES 4-12-2016

    सिनेमा-नाटकांतल्या कलावंतांच्या आयुष्याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता असते. ही उत्सुकता जशी कलावंत म्हणून असते, तशीच त्यांच्या माणूसपणाचीही असते. या उत्सुकतेच्या पुरेपूर कसोटीला उतरणारं पुस्तक म्हणजे रा. अ. कुंभोजकर यांचं अलीकडेच प्रकाशित झालेलं ‘कलाकार :सर्जनशील मनांचा व्यक्तिवेध’. कुंभोजकर यांनी आपल्या या पुस्तकात बाबुराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दिनकर कामण्णा, दामुअण्णा मालवणकर, अनंत धुमाळ, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, दाजी भाटवडेकर, उषा चव्हाण अशा एक काळ गाजवणाऱ्या कलावंतांच्या आयुष्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचाही अतिशय रसाळ वेध घेतला आहे. यातली बहुतेक व्यक्तिमत्त्व ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट जमान्यातली आहेत. कदाचित आजच्या पिढीला यातली अनेक नावं ठाऊकही नसतील. परंतु म्हणूनच आजच्या पिढीसाठी हे पुस्तक अधिक उपयुक्त आहे. आजचं नाटक-सिनेमाचं ग्लॅमर तेव्हाच्या कलावंताना नसेल, परंतु माणूस म्हणून ही कलावंत मंडळी किती मोठी होती, ते कुंभोजकरांनी रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिचित्रणातून अलवार उलगडत जातं. ...Read more

  • Rating StarSMITA PATWARDHAN, SANGLI 22-11-2016

    ‘कलाकार : सर्जनशील मनांचा व्यक्तीवेध’ हे श्री. रा.अ. कुंभोजकर यांचे पुस्तक वाचनीय ललित लेखसंग्रह आहे. महाराष्ट्रातील मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, त्यांची आपल्या व्यवसायाशी असलेली निष्ठा, त्यासाठी त्यांनी केलेले श्रम यांची रोचक आणि वाचनी माहिती या पुस्तकातून मिळते. आताच्या पिढीला ज्ञात नसलेले अनेक कलाकार, त्यांची असामान्य अभिनय क्षमता, दिग्दर्शकांची कल्पकता आणि चित्रपट संस्थाचालकांची कलाकारांना समजून घ्यायची मनोवृत्ती व व्यावसायिक शिस्त या पुस्तकातून वाचकांना समजते. श्री. कुंभोजकर हे सुरुवातीला वि.स. खांडेकरांकडे लेखनिकाचे काम करत होते. खांडेकरांना जवळचे लोक ‘भाऊ’ म्हणत. भाऊंकडे बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, कवी यशवंत यांसारखे अनेक लेखक-कवी भेटायला येत. त्यांच्या साहित्यिक गप्पांतून लेखक बहुश्रुत झाले. त्याच प्रमाणे भाऊंकडून लेखकाला लेखनाचे तंत्र आणि मंत्रही मिळाले. त्याचाच परिणाम म्हणून हे लेख वाचताना वाचक पुस्तकाला चिकटून बसतो. ओघवती भाषाशैली हे या लेखांचे वैशिष्ट्य आहे. कुंभोजकरांनी ‘अमृत’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ या प्रसिद्ध मासिकांमधे सहाय्यक संपादक किंवा कार्यकारी संपादक अशी पदे भूषवली आहेत. बेळगावच्या तरुण भारतच्या रविवारच्या अक्षरयात्रा पुरवणीचे संपादकपदही भूषवले आहे. या वाटचालीत त्यांचा चित्रपट, नाटक आणि संगीत क्षेत्रातील दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर संपर्क आला. त्यातूनच ही व्यक्तीचित्रणे निर्माण झाली. सदर पुस्तकात एकूण १५ व्यक्तीचित्रणे आहेत. ‘प्रभात फिल्म कंपनी’ हा लेख म्हणजे प्रभात फिल्म कंपनीशी जोडलेल्या अनेकांचे एकत्रित व्यक्तीचित्रण आहे. प्रभातचे मुख्य चालक विष्णुपंत दामले, फत्तेलाल, व्ही.शांताराम तसेच प्रभातच्या प्रसिद्ध कलाकारांशी संबंधित घटना पुस्तकात वाचायला मिळतात. प्रभातने सामाजिक महत्वाचे विषय जसे जरठ-कुमारी विवाह हे आपल्या चित्रपटातून मांडले. दिग्दर्शक म्हणून शांतारामबापू कसे होते त्याचे चित्रण प्रभात फिल्म कंपनी या लेखात वाचायला मिळते. प्रभात मधे काम करणार्‍या कलाकारांना आपल्या भूमिकेचे इथे सोने होत आहे याची जाणीव असायची. सध्याच्या तरुण पिढीला यातील बरीचशी नावे माहिती नाहीत. या पुस्तकामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील चित्रपट आणि नाट्यसृष्टीबद्दल बर्‍यापैकी माहिती मिळते. त्यातून अभ्यासूंची उत्सुकता वाढेल. बाबुराव आणि भालजी पेंढारकर यांनी पार्श्वनाथ आळतेकरांच्या सोबत ‘वंदे मातरम’ हा त्याच नावाचा त्यांच्या संस्थेचा पहिला बोलपट काढला. इंग्रजी राजवटीत हा चित्रपट ४ वेळा सेन्सॉर झाला. यावरची लेखकाची टिप्पणी चपखल आहे. ते म्हणतात, ‘चार-पाच वेळा गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची जी अवस्था होईल तीच या चित्रपटाची झाली. तो सपशेल आपटला.’ बाबुरावांनी मुख्यत: खलपुरुष साकारला. पण त्याबरोबर ‘भक्त दामाजी’ मधील विठू महार, ‘अमृत’ मधील कृष्णा चांभार, ‘श्यामची आई’ मधील भाऊराव, ‘महात्मा फुले’तील जोतिबा अशा विविधांगी आणि अभिनयाचा कस लावणार्‍या भूमिका त्यांनी केल्या. बाबुराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दाजी भाटवडेकर, अप्पा टिपणीस, दिनकर कामण्णा, धुमाळ असे जुने कलाकार आणि आरती अंकलीकर-टिकेकर या सध्याच्या प्रसिद्ध गायिका आपल्याला या पुस्तकात भेटतात. विशेष म्हणजे वि.स.खांडेकरांच्या पत्नी उषाताईंचेही व्यक्तीचित्रण यात अंतर्भूत केले आहे. एका साहित्यिकाचा संसार चालवायची कसरत ही देखील कलाच म्हणली पाहिजे असा त्यामागचा दृष्टीकोन असावा. खरतर रोचक ललित लेखन ही देखील एक कलाच आहे. त्यामुळे एक वाचनीय ललितलेखांचा संग्रह देणारे लेखक श्री. कुंभोजकर हेही एक कलाकारच म्हणले पाहिजेत. एका कलाकाराने इतर कलाकारांना दिलेली ही मानवंदनाच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more