* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KALAKAR
  • Availability : Available
  • ISBN : 9789386175403
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 112
  • Language : MARATHI
  • Category : ESSAYS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A PLAYWRIGHT PENS DOWN THE PROBLEMS IN THE SOCIETY AND A VETERAN ACTOR LIKE GANPATRAO JOSHI PERFORMS THE ROLE APTLY. I STRONGLY BELIEVE THAT A GOOD ACTOR IS EQUALLY IMPORTANT LIKE A GOOD WRITER. GANPATRAO WAS ONE SUCH ACTOR. YEARS BACK, ACTORS WERE LOOKED DOWN BY THE SOCIETY. GANPATRAO STOOD FIRMLY TO PROVE HIS ABILITY AND HELPED THE ACTORS TO GAIN PRESTIGE IN THE SOCIETY. FOR THE THIRTY-SIX LONG YEARS THAT HE PERFORMED ON THE STAGE, HE SUCCEEDED IN KEEPING HIS PROBLEMS AT BAY. HE MIGHT HAVE EMBRACED A PEG OR TWO DURING THIS JOURNEY, BUT IT NEVER HAMPERED HIS ACTING SKILLS. ALL THE WHILE, EACH OF HIS PERFORMANCES GAVE IMMENSE HAPPINESS TO PEOPLE ALL AROUND. HE ENJOYED THEATER AND SPREAD HAPPINESS DURING HIS CAREER AS AN ACTOR WHICH ITSELF IS A HERCULEAN TASK. STICKING AROUND TO THE THEATRE IS NOT AN EASY JOB, IT CAN BE COMPARED ONLY WITH THE DILIGENCE THAT ONE TAKES TO FEEL THE PRESENCE OF ALMIGHTY. THE ONCE WHO PERFORMANCE IT IS SIMPLE GREAT. GANPATRAO JOSHI WAS INDEED ONE SUCH PERSON.
लेखक वुंÂभोजकरांचा पहिलाच व्यक्तिचित्र संग्रह. यात जसे चित्रपटांत भूमिका करणारे नट आहेत, तसे नाटकात नामवंत ठरलेले कलावंत आहेत आणि गायिकाही आहेत. उषा चव्हाणसारखी नर्तिकाही आहे. कथालेखक, नाटककार, कवी सर्वांचे व्यक्तिचित्र आत्मीयतेने व रसिकतेने साकारले आहे. जे लिहायचे ते ललित अंगाने लिहायचे, असा कटाक्ष त्यांनी ठेवला आहे. नाटककार हा समाजाची दु:खे मांडतो आणि गणपतराव जोशी यांच्यासारखा कलावंत ती तेवढ्याच ताकदीने प्रेक्षकांच्या मनात उतरवतो. म्हणून मला वाटते, चांगला नट चांगल्या नाटककाराइतकाच श्रेष्ठ असतो. गणपतराव ही तेवढेच श्रेष्ठ होते. नटांना समाज जेव्हा मानत नव्हता, तेव्हा त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली ती गणपतरावांनी. ज्या रंगभूमीच्या जगात ते सतत छत्तीस वर्षे वावरले, त्या जगात शिरताना स्वत:चे कौटुंबिक दु:ख ते विसरले. कधीतरी हे दु:ख मदिरेच्या प्याल्यात त्यांनी बुडविले असेल; नाही असे नाही. पण लाखो लोकांना कलेचा निर्भेळ आनंद त्यांनी दिला. त्यांचे जीवन आनंदी बनविले. असा आनंद देणे आणि घेणे, ही सामान्य गोष्ट नव्हे. परमेश्वराच्या साधनेइतकीही श्रेष्ठ साधना आहे. अशी साधना करणाNया कलावंताला श्रेष्ठ म्हणायचे नाही, तर काय! गणपतराव जोशी यांना तो मान दिलाच पाहिजे!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
PRABHAT FILM #BABURAOPENDHARKAR #GANPATRAO JOSHI #DAJI BHAATVADEKAR #APPA TIPANIS #DINKAR KAMANNA #ANANT DHUMAL #DAMUANNA MALWANKAR #MANIK VERMA #ARTI ANKALIKAR-TIKEKAR #VASANT DESHPANDE #GANGADHARAPANTA LONDHE #MRS. USHA KHANDEKAR #MA. #AVINASH USHA CHAVAN #HANS PICTURES #KALAKAR, R.A. KUMBHOJKAR
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL SAPTRANG 18-12-2016

    रा.अ.कुंभोजकर यांनी वेगवेगळ्या कलाकारांविषयी केलेलं हे लेखन. जुन्या काळातले अनेक कलाकार या पुस्तकातून भेटतात, नवी माहिती मिळते. प्रभात फिल्म कंपनी, बाबूराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दिनकर कामण्णा अशा कलाकारांविषयी कुंभोजकर यांनी लिहिलं आहे. उषा चव्हाण,आरती अंकलीकर-टिकेकर अशा कलाकारांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या आहेत. केवळ जंत्री न मांडता त्या त्या कलाकाराचं सामर्थ्य, त्याचं वैशिष्ट्य, त्याच्यासंबंधीचे किस्से, त्या काळचं वातावरण अशा गोष्टी त्यांनी मांडल्या आहेत. नाटक, मराठी-हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ या लेखनातून उभा राहतो. ...Read more

  • Rating StarDAINIK MAHARASHTRA TIMES 4-12-2016

    सिनेमा-नाटकांतल्या कलावंतांच्या आयुष्याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता असते. ही उत्सुकता जशी कलावंत म्हणून असते, तशीच त्यांच्या माणूसपणाचीही असते. या उत्सुकतेच्या पुरेपूर कसोटीला उतरणारं पुस्तक म्हणजे रा. अ. कुंभोजकर यांचं अलीकडेच प्रकाशित झालेलं ‘कलाकार :सर्जनशील मनांचा व्यक्तिवेध’. कुंभोजकर यांनी आपल्या या पुस्तकात बाबुराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दिनकर कामण्णा, दामुअण्णा मालवणकर, अनंत धुमाळ, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, दाजी भाटवडेकर, उषा चव्हाण अशा एक काळ गाजवणाऱ्या कलावंतांच्या आयुष्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचाही अतिशय रसाळ वेध घेतला आहे. यातली बहुतेक व्यक्तिमत्त्व ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट जमान्यातली आहेत. कदाचित आजच्या पिढीला यातली अनेक नावं ठाऊकही नसतील. परंतु म्हणूनच आजच्या पिढीसाठी हे पुस्तक अधिक उपयुक्त आहे. आजचं नाटक-सिनेमाचं ग्लॅमर तेव्हाच्या कलावंताना नसेल, परंतु माणूस म्हणून ही कलावंत मंडळी किती मोठी होती, ते कुंभोजकरांनी रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिचित्रणातून अलवार उलगडत जातं. ...Read more

  • Rating StarSMITA PATWARDHAN, SANGLI 22-11-2016

    ‘कलाकार : सर्जनशील मनांचा व्यक्तीवेध’ हे श्री. रा.अ. कुंभोजकर यांचे पुस्तक वाचनीय ललित लेखसंग्रह आहे. महाराष्ट्रातील मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, त्यांची आपल्या व्यवसायाशी असलेली निष्ठा, त्यासाठी त्यांनी केलेले श्रम यांची रोचक आणि वाचनी माहिती या पुस्तकातून मिळते. आताच्या पिढीला ज्ञात नसलेले अनेक कलाकार, त्यांची असामान्य अभिनय क्षमता, दिग्दर्शकांची कल्पकता आणि चित्रपट संस्थाचालकांची कलाकारांना समजून घ्यायची मनोवृत्ती व व्यावसायिक शिस्त या पुस्तकातून वाचकांना समजते. श्री. कुंभोजकर हे सुरुवातीला वि.स. खांडेकरांकडे लेखनिकाचे काम करत होते. खांडेकरांना जवळचे लोक ‘भाऊ’ म्हणत. भाऊंकडे बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, कवी यशवंत यांसारखे अनेक लेखक-कवी भेटायला येत. त्यांच्या साहित्यिक गप्पांतून लेखक बहुश्रुत झाले. त्याच प्रमाणे भाऊंकडून लेखकाला लेखनाचे तंत्र आणि मंत्रही मिळाले. त्याचाच परिणाम म्हणून हे लेख वाचताना वाचक पुस्तकाला चिकटून बसतो. ओघवती भाषाशैली हे या लेखांचे वैशिष्ट्य आहे. कुंभोजकरांनी ‘अमृत’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ या प्रसिद्ध मासिकांमधे सहाय्यक संपादक किंवा कार्यकारी संपादक अशी पदे भूषवली आहेत. बेळगावच्या तरुण भारतच्या रविवारच्या अक्षरयात्रा पुरवणीचे संपादकपदही भूषवले आहे. या वाटचालीत त्यांचा चित्रपट, नाटक आणि संगीत क्षेत्रातील दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबर संपर्क आला. त्यातूनच ही व्यक्तीचित्रणे निर्माण झाली. सदर पुस्तकात एकूण १५ व्यक्तीचित्रणे आहेत. ‘प्रभात फिल्म कंपनी’ हा लेख म्हणजे प्रभात फिल्म कंपनीशी जोडलेल्या अनेकांचे एकत्रित व्यक्तीचित्रण आहे. प्रभातचे मुख्य चालक विष्णुपंत दामले, फत्तेलाल, व्ही.शांताराम तसेच प्रभातच्या प्रसिद्ध कलाकारांशी संबंधित घटना पुस्तकात वाचायला मिळतात. प्रभातने सामाजिक महत्वाचे विषय जसे जरठ-कुमारी विवाह हे आपल्या चित्रपटातून मांडले. दिग्दर्शक म्हणून शांतारामबापू कसे होते त्याचे चित्रण प्रभात फिल्म कंपनी या लेखात वाचायला मिळते. प्रभात मधे काम करणार्‍या कलाकारांना आपल्या भूमिकेचे इथे सोने होत आहे याची जाणीव असायची. सध्याच्या तरुण पिढीला यातील बरीचशी नावे माहिती नाहीत. या पुस्तकामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील चित्रपट आणि नाट्यसृष्टीबद्दल बर्‍यापैकी माहिती मिळते. त्यातून अभ्यासूंची उत्सुकता वाढेल. बाबुराव आणि भालजी पेंढारकर यांनी पार्श्वनाथ आळतेकरांच्या सोबत ‘वंदे मातरम’ हा त्याच नावाचा त्यांच्या संस्थेचा पहिला बोलपट काढला. इंग्रजी राजवटीत हा चित्रपट ४ वेळा सेन्सॉर झाला. यावरची लेखकाची टिप्पणी चपखल आहे. ते म्हणतात, ‘चार-पाच वेळा गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची जी अवस्था होईल तीच या चित्रपटाची झाली. तो सपशेल आपटला.’ बाबुरावांनी मुख्यत: खलपुरुष साकारला. पण त्याबरोबर ‘भक्त दामाजी’ मधील विठू महार, ‘अमृत’ मधील कृष्णा चांभार, ‘श्यामची आई’ मधील भाऊराव, ‘महात्मा फुले’तील जोतिबा अशा विविधांगी आणि अभिनयाचा कस लावणार्‍या भूमिका त्यांनी केल्या. बाबुराव पेंढारकर, गणपतराव जोशी, दाजी भाटवडेकर, अप्पा टिपणीस, दिनकर कामण्णा, धुमाळ असे जुने कलाकार आणि आरती अंकलीकर-टिकेकर या सध्याच्या प्रसिद्ध गायिका आपल्याला या पुस्तकात भेटतात. विशेष म्हणजे वि.स.खांडेकरांच्या पत्नी उषाताईंचेही व्यक्तीचित्रण यात अंतर्भूत केले आहे. एका साहित्यिकाचा संसार चालवायची कसरत ही देखील कलाच म्हणली पाहिजे असा त्यामागचा दृष्टीकोन असावा. खरतर रोचक ललित लेखन ही देखील एक कलाच आहे. त्यामुळे एक वाचनीय ललितलेखांचा संग्रह देणारे लेखक श्री. कुंभोजकर हेही एक कलाकारच म्हणले पाहिजेत. एका कलाकाराने इतर कलाकारांना दिलेली ही मानवंदनाच आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more