* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663693
  • Edition : 23
  • Publishing Year : OCTOBER 1970
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NAME SUGGESTS THE FOUNDATION OF THE STORIES. THIS IS AN EXCLUSIVE COLLECTION OF ONLY 8 STORIES BASED ON SOME WHIMSICAL CHARACTERS. EVERY MAIN CHARACTER IN ALL THESE STORIES HAS ONE THING IN COMMON. IN A TRUE SENSE, THEY ARE NOT WHIMSICAL; ACTUALLY THEY HAVE SET THEIR OWN DOCTRINES AND HAVE STUCK TO THEM, NO MATTER WHATEVER HAPPENS. IN ONE OF THE STORIES, THE HERO DIES JUST BECAUSE OF HIS DOCTRINES. THE OTHER STORY IS BASED ON THE MENTALITY OF BEING LAME; IT PROVES THAT MANY A TIMES THOSE WHO ARE PHYSICALLY DISABLED ARE MORE FIRM THAN THOSE WHO ARE PHYSICALLY CAPABLE OF DOING EVERYTHING BUT HAVE A LAME AND LIMP MIND. ONE STORY IS BASED ON THE INSECURITY; HERE THE HEROINE WHO HAD REFUSED SOMEONE WHOM SHE LOVED SO MUCH COMES INTO CONTACT WITH HIM AGAIN. SHE FEELS THAT HE WILL BLACKMAIL HER BUT FAILS TO UNDERSTAND HIM, AT THE END, THOUGH VERY BEAUTIFUL, HER INSECURE MIND SHOWS ITS UGLINESS. EACH AND EVERY STORY HAS SOME SPLENDID FELLING OR OTHER TO SHARE WITH US, TO REVEAL THE VASTNESS AND THE INSULARITY OF THE MIND.
जगाला विक्षिप्त वाटतील अशा स्वतःच्या एखाद्या मतप्रणालीच्या पूर्ततेसाठी, हट्टामुळे नामशेष होऊन जाणाऱ्या, पण माघार ण घेणाऱ्या अशा विक्षिप्त व्यक्तींची एकेक तऱ्हा रंगविणाऱ्या आठ खाशा कथांचा संग्रह
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarHansraj Patil

    वपु च्या कथा म्हणजे काहीतरी वेगळेपण असणारच..हे मानत वाचायला घेतलं..सगळ्या कथा मनाला भिडणाऱ्या आहेत ..खूपच सुंदर पुस्तक...

  • Rating StarManoj Mohale

    "भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय देईलच ह्याची खात्री नसते.प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून पाहायची असते हि माझी शिकवणं आहे.भावना प्रधान माणसाला जगात सारखे आधार शोधावे लागतात.पण बुद्धी प्रधान माणुस हा स्वतःलाच नव्हे तर ईतराना सुद्धा आधर देतो".. मी हे पुस्तक चार पाच वेळा हाती घेतलं पण पूर्ण वाचण्याचा काही योग आला नाही काल संपवलं वाचुन बर का 😋 तसे वपु काळे माझे आवडते लेखक याची पुस्तक म्हणजे माझ्या साठी एक नेहमीच मेजवाणी राहते.जशे जशे आपण यातले काही कथा वाचता जातो तेव्हा आपल्याला समजत वपु कशे लिहतात त्याचा ऐकुन एक शब्द मला लागतो!म्हणून मी नेहमी याची पुस्तके वाचतो..आपण सुद्धा वाचून पाहा आणि अनुभव सांगा धन्यवाद 🙏😊... ...Read more

  • Rating Starसौ. शीला मराठे

    वसंत पुरुषोत्तम काळे यांचा ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा कथा संग्रह वाचनात आला. एकूण बारा कथांचा हा कथा संग्रह आपल्याला प्रत्येक कथेतून निराळ्याच सौंदर्याने चमकताना दिसतो. व. पु. काळे यांनी या कथा संग्रहाद्वारे वाचकांच्या हृदयात एक अनोखं स्थान निर्माण कले आहे. कथा वाचताना गाभाऱ्यात नकळत व सहज कोरला जातो. कथेतील वास्तववादी जीवन व प्रगट करण्यासाठी वापरलेली भाववाही भाषा शैली यांचा सुंदर संगम कथा वाचताना अनुभवास येतो. या संग्रहातील प्रत्येक कथेत आपल्याला जिद्द. करारीपणा, चिकाटी व त्यासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत चालत असलेला झगडा दिसून येतो. हिऱ्याच्या पैलूप्रमाणे निरनिराळ्या पात्रांच्या रूपाने माणसाच्या स्वभावाचे पैलू चमकताना दिसतात. सजीव चित्रण व साधी सरळ भाषाशैली हे याच्या कथेचे मोठे वैशिष्ट्य होय. ‘‘सुंभ जळतो पीळ उरतो.’’ यामधील न्यायासाठी आमरण उपोषण करणारा धाकटा भाऊ तर ‘‘जंक्शन’’ मधील आपल्या हक्काची वाद लावून घेणारी रेवती, सारख्याच करारीपणानं वागताना दिसतात. ‘निगेटिव्ह’ मध्ये स्वार्थापायी स्टुडिओ जाळण्याचे सुचित्राने केलेले नीच कारस्थान तर रविंद्राचे तितकेच उदार अंत:करण यांचा अपूर्व संगम या कथेत पहावयास मिळतो. सुंदर असूनही शारीरिक पंगुत्वामुळे मुलींची लग्नाच्या बाजारात होणारी हेळसांड. पण त्याहीपेक्षा मानसिक दुबळेपणाने वागणारा आजचा तरुण वर्ग किती असमर्थ आहे याचे प्रत्यंतर ‘पंगु’ या कथेद्वारे येते. स्वाभिमानी के जी काकांना अखेर रस्त्यावर सामान विकणाऱ्या पंकजपुढे हार खावी लागली. एका क्षुल्लक मुलाने आपल्या प्रेमळ व उदार स्वभावाने सगळ्यांना भारावून टाकले. याचा अनुभव ‘पराधीन आहे जगती’ यामध्ये येतो. स्वाभिमानी सरोजने पैशाचा गर्व असलेल्या कुमारला हे दाखवून दिले की, ‘गरीब माणसं ही श्रीमंतीच्या हातातली नक्की खेळणी होऊ इच्छित नाहीत.’’ या वास्तववादी सत्याचा साक्षात्कार ‘खेळणी’ या कथेत होतो. मंगलसारख्या निष्पाप भाबड्या मुलीच्या क्षणभरच लाभलेल्या प्रेमाशी बेईमानी न करणारा रमेश ‘जलधारा’मध्ये बिजलीसारखा चमकून जातो तर समाजातील सुखदु:खाचा अनुभव घेऊन ती किती फसवी आहेत याचा साक्षात्कार होताच त्यांना वाळूच्या कणाप्रमाणे झटकून टाकणारी सुरेखा ‘‘वाळू’’चा कथेत पाहावयास मिळते. ‘‘पाळणा’’ मध्ये माया मिथ्याचा लेखकाला आलेला साक्षात्कार अनुभवास येतो. ‘‘ही वाट एकटीची’’ या कथेतील सत्याने वागणारी बाबी तर ‘‘जिद्द’’ मधील जिद्दीने वागणारे दादा सारख्याच महत्त्वाचे ठरतात. ‘‘पापा’’ कथेतील आईच्या व पपांच्या वात्सल्य प्रेमाची चाललेली कुचंबणा व ते प्रेम व्यक्त न करता दाबून ठेवण्यासाठी चाललेला प्रयत्न हा स्वभाव चित्रणाचा उत्तम नमुना खरोखरीच आपल्या मनावर प्रभाव पाडून जातो. अशा तऱ्हेने ‘‘मोडेन पण वाकणार नाही’’ मधील सगळीच पात्रे या नावाप्रमाणेच अपूर्व व उदात्त जीवन जगताना दिसतात. व. पु. काळे यांचा हा कथासंग्रह वाचकांना एक नवी दृष्टी देऊन जातो त्यात शंकाच नाही. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 06-12-1970

    श्री. व. पु. काळे यांच्या आगळ्या शैलीने रंगलेल्या गूढ जीवनकथा... कुठल्याशा वाळवंटात पावसाची एक सर अचानक येते अन् जवळ असणारं एखादं वाळक झाड आणखी तग धरून राहतं... पानं, फुलं, नसतातच पण तरी ते वाकत नसतं, क्वचित वादळ जोराचच झालं तर उन्मळून मात्र पडत. तेझाड वाळवंटातच असेल असेही नाही. सुपीक प्रदेशातसुद्धा वठलेलं, वाळकं झाड दिसत नाही असं नाही. ‘मोडेन पण ... वाकणार नाही. जिवात जी असे तो ताठ मानेनं राहीन’ पण कशापुढंही हार नाही पत्करणार, अशाच बाण्यानं जगणारी माणसं या आपल्या समाजात पाहायला मिळतात... ती माणसंही कधी त्या झाडाप्रमाणे उन्मळून पडणार असतात. पण त्याची त्यांना पर्वा नसते. वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या निरीक्षणातून अन् अनुभवातून तर अशी माणसं सुटणं कठीणच नाही का? अर्थात हे पटलं ते त्यांचा हा कथासंग्रह वाचूनच. कुठेतरी धागा गुंफला जातो... पु. लं. च्या ‘व्यक्ति आणि वल्ली ची चटकन आठवण होते हा कथा संग्रह वाचताना. लिहीण्याची धाटणी तशाच पद्धतीची. वाचल्याबरोबर लेखकाला विचारावंत वाटवणारी की, ही व्यक्ती कुठंय ती वल्ली तुम्हाला कुठं भेटली?’’ अनुभव असे मिळतात म्हणून कथा लिहिल्या जातात की त्या गोष्टीतल्या प्रमाणे आपण प्रसंग अनुभवतो? आता हेच पहा ना! ‘जलधारा’ मधील मंदा नाईक ही अगदी आपल्यातली. पण गर्दी असताना सिनेमाचं तिकिट ऑफर करणारा उमदा रमेश अन् त्याचा मोकळा स्वभाव कुठला? ही ‘मोडेन पण वाकणार नाही’ या बाण्याचा! मंगला नामक एका मुलीशी एका जलधारित पडलेल्या बाणाशी एकनिष्ठ राहणारा! ‘सुंभ वळतो पीळ उरतो’ मधले लेखकांच्या मित्राचे मित्र ‘धाकटा’ अन् ‘मोठा’ यांचे स्वभाव असे चमत्कारीकच. प्रोड्यूसर होण्याच्या आशेनं नटीच्या घरी ‘टॉमी’ असलेलेला मोठा भाऊ अन् लेटमार्क केला जाऊ नये यासाठी उपोषण करीत मृत्यूला मिठी मारणारा धाकटा दोघेही जिद्दीच नव्हे तर काय? ‘जिद्द’ मधला जिद्दी दादाही असाच पिळाचा माणूस. पुरुषांप्रमाणेच स्त्रियासुद्धा मोडतील पण वाकत नाहीत अशातल्या! या स्त्रियासुद्धा तशा जिद्दी! किंबहुंना कथासंग्रहात पुरुषांपेक्षा अशाच स्त्रियांचे विविध नमूने आहेत. ‘पंगू’ मधली मोहिनी अगदी मनात ठाण मांडून बसते. कथा वाचता वाचता आपणसुद्धा तिच्या मनानं मानानं पंगूच आहोत काय असा मधली रेवती आपल्यासमोर सारखी नाचत राहते. पूर्वाश्रमी रविद्रांबरोबर मजा केलेली सुचित्रा विवाहबद्ध झाल्यावर, रविंद्र अन् तिचे सहवासातील ‘फोटोच्या ‘निगेटिव्हज् ’ मिळवण्यासाठी त्याच्या स्टुडिओला आग लावते. ही सुचित्रा कोण? हिच्या अंगी होता तो बाणा कोणता? ती मोडली? की वाकली? ‘ही वाट एकटीची’ मधली बाबी तर फारच वेगळी. आपल्यापेक्षा आपला बच्चा सवाई होईल. ताठ मानेनं जगेल, कोणापुढं मान तुकविणार नाही या आकांक्षेनं, कोणताहि प्रसंग आला तरी सत्याला सामोरी जात स्वत: आयुष्य खऱ्या अर्थाने जगते. आठले मास्तरांनी तिची कुंतीशी केलेली तुलना तिला आवडलेली नाही. लग्ना आधी मूल झालं तर पाप म्हणून या मुलाला जगात येण्याचा अधिकार न देण्याइतकी ती क्रूर नाही. पण अशानं या जगात तिला सुख केवळ मानसिक लाभलं. सत्यप्रिय व सत्यनिष्ठ जगात पुनर्जन्म घेण्याची तिची इच्छा आहे. ‘खेळणी’ मधलं सरोजच व्यक्तिमत्त्व आणखीच निराळ! ती म्हणजे खरोखरच न फुटणारं खेळणं आहे. दुसऱ्याला मोडायला अन् वाकायला लावणारी सरोज स्वत: अगदी ताठ आहे, चौपाटीवर बसल्यानंतर कपड्यांना लागणारी वाटू जितक्या सहजपणे झटकावी तितक्याच सहजी निरनिराळ्या पुरुषांना आपल्यापासून झटकणारी अन् जगातील बरेवाईट बरेच अनुभव घेऊन लग्न करण्याची जिद्द बाळगणारी ‘वाळू’ तली सुरेखा काही औरच आहे. आणखी किती तरी व्यक्ति ध्यानात राहतात. कितीतरी वाक्यं, संवाद लक्षात राहतात. पण किती म्हणून सांगावेत? त्यापेक्षा पुस्तक वाचाव हेच बरं. आगळी, लोभस शैली करमणूक म्हणून काळ्यांचा हा कथासंग्रह वाचायला घेतला तरी तो वाचल्यावर ‘केवळ करमणूक’ म्हणून एवढंच त्याचं स्थान निश्चितच राहत नाही. मनाच्या खोल गाभ्यापर्यंत काही व्यक्ति भिडतात, तर काही वाक्यं अंतरंगात खोलवर कोरली जातात. अननुभवी व्यक्तीला क्वचित त्या व्यक्तीचं भयही वाटेल. पण त्यात भिण्यासारखं काही नाही. उलट, अशी जिद्द मोडेन पण वाकणार नाही. बाण्याची माणसं जीवनात भेटायलाच हवीत, त्या आगळ्या जीवनाची थाडीशी तरी ओळख व्हायला हवी की! काळ्याचं नाव कथालेखक. म्हणून प्रसिद्धच आहे. छोट्या छोटया वाक्यांतून बराच मोठा आशय सांगण्याची त्याची हातोटी आता आपल्या परिचयाची आहे. मानवी जीवनातल्या तत्वज्ञानाच्या कधी कधी तर ते इतक्या जवळून जातात; पण न वाकणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून प्रत्येकाचं निराळं तत्त्वज्ञान ऐकताना त्यात रुक्षपणा किंवा कठोरपणा मुळीच जाणवत नाही. लालित्यातूनच ते जीवनाचा हा मागोवा घेतात हेच तर ‘वपुं’चे वैशिष्ट्य. -कालिंदी घाणेकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more