* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MODEN PAN VAKNAR NAHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663693
  • Edition : 22
  • Publishing Year : OCTOBER 1970
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V. P. KALE COMBO SET-52 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE NAME SUGGESTS THE FOUNDATION OF THE STORIES. THIS IS AN EXCLUSIVE COLLECTION OF ONLY 8 STORIES BASED ON SOME WHIMSICAL CHARACTERS. EVERY MAIN CHARACTER IN ALL THESE STORIES HAS ONE THING IN COMMON. IN A TRUE SENSE, THEY ARE NOT WHIMSICAL; ACTUALLY THEY HAVE SET THEIR OWN DOCTRINES AND HAVE STUCK TO THEM, NO MATTER WHATEVER HAPPENS. IN ONE OF THE STORIES, THE HERO DIES JUST BECAUSE OF HIS DOCTRINES. THE OTHER STORY IS BASED ON THE MENTALITY OF BEING LAME; IT PROVES THAT MANY A TIMES THOSE WHO ARE PHYSICALLY DISABLED ARE MORE FIRM THAN THOSE WHO ARE PHYSICALLY CAPABLE OF DOING EVERYTHING BUT HAVE A LAME AND LIMP MIND. ONE STORY IS BASED ON THE INSECURITY; HERE THE HEROINE WHO HAD REFUSED SOMEONE WHOM SHE LOVED SO MUCH COMES INTO CONTACT WITH HIM AGAIN. SHE FEELS THAT HE WILL BLACKMAIL HER BUT FAILS TO UNDERSTAND HIM, AT THE END, THOUGH VERY BEAUTIFUL, HER INSECURE MIND SHOWS ITS UGLINESS. EACH AND EVERY STORY HAS SOME SPLENDID FELLING OR OTHER TO SHARE WITH US, TO REVEAL THE VASTNESS AND THE INSULARITY OF THE MIND.
जगाला विक्षिप्त वाटतील अशा स्वतःच्या एखाद्या मतप्रणालीच्या पूर्ततेसाठी, हट्टामुळे नामशेष होऊन जाणाऱ्या, पण माघार ण घेणाऱ्या अशा विक्षिप्त व्यक्तींची एकेक तऱ्हा रंगविणाऱ्या आठ खाशा कथांचा संग्रह
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
25TH MARCH #SANVADINI #VAPU 85 #NAVRA MHANAVA AAPALA #MODEN PAN VAKNAR NAHI #ONE FOR THE ROAD #ZOPALA #MAYABAJAR #CHATURBHUJ #INTIMATE #GULMOHAR #VAPURVAI #HUNKAR #MI MANUS SHODHATOY #BAI BAYKO CALENDER #SWAR #BHULBHULAIYA #KA RE BHULALASI #VALAY #KARMACHARI #AIK SAKHE #GOSHTA HATATLI HOTI #TAPTAPADI #GHAR HARAVLELI MANASA #DOST #MAHOTSAV #KAHI KHAR KAHI KHOTA #SAKHI #RANG MANACHE #AAPAN SARE ARJUN #THIKARI #TU BHRAMAT AAHASI VAYA #HI VAT EKTICHI #PARTNER #DUNIYA TULA VISAREL #PREMAMAYEE #FANTASY EK PREYASI #PANPOI#NIMITTA #MAZA MAZYAPASHI? #PLEASURE BOX BHAG 1 #PLEASURE BOX BHAG 2 #KATHA KATHANACHI KATHA #VAPURZA #RANGPANCHAMI #SANGE VADILANCHI KIRTI #CHEERS #MANASA #JAPUN TAK PAUL #LALITKALECHYA SAHAWASAT #DAHAVYA RANGETUN #२५ मार्च #संवादिनी #वपु# ८५ # नवरा म्हणावा आपला #मोडेन पण वाकणार नाही #वन फॉर द रोड#झोपाळा #मायाबाजार #चतुर्भुज #इन्टिमेट #गुलमोहर #वपुर्वाई #हुंकार #मी माणूस शोधतोय #बाई, बायको, कॅलेंडर #स्वर #भुलभुलैय्या #का रे भुललासी #वलय #कर्मचारी #ऐक सखे #गोष्ट हातातली होती! #तप्तपदी #घर हरवलेली माणसं #दोस्त #काही खरं काही खोटं #सखी #महोत्सव #रंग मनाचे #आपण सारे अर्जुन #ठिकरी #तू भ्रमत आहासी वाया #"ही वाट एकटीची #(राज्य पुरस्कार १९७०-७१)" #पार्टनर #दुनिया तुला विसरेल #प्रेममयी #फॅण्टसी एक प्रेयसी #पाणपोई #निमित्त #माझं माझ्यापाशी? #प्लेझर बॉक्स भाग-१ #प्लेझर बॉक्स भाग-२ #कथाकथनाची कथा #वपुर्झा #रंगपंचमी #सांगे वडिलांची कीर्ती #चिअर्स #माणसं #जपून टाक पाऊल! # ललितकलेच्या सहवासातून #दहाव्या रांगेतून
Customer Reviews
  • Rating StarHansraj Patil

    वपु च्या कथा म्हणजे काहीतरी वेगळेपण असणारच..हे मानत वाचायला घेतलं..सगळ्या कथा मनाला भिडणाऱ्या आहेत ..खूपच सुंदर पुस्तक...

  • Rating StarManoj Mohale

    "भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय देईलच ह्याची खात्री नसते.प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून पाहायची असते हि माझी शिकवणं आहे.भावना प्रधान माणसाला जगात सारखे आधार शोधावे लागतात.पण बुद्धी प्रधान माणुस हा स्वतःलाच नव्हे तर ईतराना सुद्धा आधर देतो".. मी हे पुस्तक चार पाच वेळा हाती घेतलं पण पूर्ण वाचण्याचा काही योग आला नाही काल संपवलं वाचुन बर का 😋 तसे वपु काळे माझे आवडते लेखक याची पुस्तक म्हणजे माझ्या साठी एक नेहमीच मेजवाणी राहते.जशे जशे आपण यातले काही कथा वाचता जातो तेव्हा आपल्याला समजत वपु कशे लिहतात त्याचा ऐकुन एक शब्द मला लागतो!म्हणून मी नेहमी याची पुस्तके वाचतो..आपण सुद्धा वाचून पाहा आणि अनुभव सांगा धन्यवाद 🙏😊... ...Read more

  • Rating Starसौ. शीला मराठे

    वसंत पुरुषोत्तम काळे यांचा ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा कथा संग्रह वाचनात आला. एकूण बारा कथांचा हा कथा संग्रह आपल्याला प्रत्येक कथेतून निराळ्याच सौंदर्याने चमकताना दिसतो. व. पु. काळे यांनी या कथा संग्रहाद्वारे वाचकांच्या हृदयात एक अनोखं स्थान निर्माण कले आहे. कथा वाचताना गाभाऱ्यात नकळत व सहज कोरला जातो. कथेतील वास्तववादी जीवन व प्रगट करण्यासाठी वापरलेली भाववाही भाषा शैली यांचा सुंदर संगम कथा वाचताना अनुभवास येतो. या संग्रहातील प्रत्येक कथेत आपल्याला जिद्द. करारीपणा, चिकाटी व त्यासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत चालत असलेला झगडा दिसून येतो. हिऱ्याच्या पैलूप्रमाणे निरनिराळ्या पात्रांच्या रूपाने माणसाच्या स्वभावाचे पैलू चमकताना दिसतात. सजीव चित्रण व साधी सरळ भाषाशैली हे याच्या कथेचे मोठे वैशिष्ट्य होय. ‘‘सुंभ जळतो पीळ उरतो.’’ यामधील न्यायासाठी आमरण उपोषण करणारा धाकटा भाऊ तर ‘‘जंक्शन’’ मधील आपल्या हक्काची वाद लावून घेणारी रेवती, सारख्याच करारीपणानं वागताना दिसतात. ‘निगेटिव्ह’ मध्ये स्वार्थापायी स्टुडिओ जाळण्याचे सुचित्राने केलेले नीच कारस्थान तर रविंद्राचे तितकेच उदार अंत:करण यांचा अपूर्व संगम या कथेत पहावयास मिळतो. सुंदर असूनही शारीरिक पंगुत्वामुळे मुलींची लग्नाच्या बाजारात होणारी हेळसांड. पण त्याहीपेक्षा मानसिक दुबळेपणाने वागणारा आजचा तरुण वर्ग किती असमर्थ आहे याचे प्रत्यंतर ‘पंगु’ या कथेद्वारे येते. स्वाभिमानी के जी काकांना अखेर रस्त्यावर सामान विकणाऱ्या पंकजपुढे हार खावी लागली. एका क्षुल्लक मुलाने आपल्या प्रेमळ व उदार स्वभावाने सगळ्यांना भारावून टाकले. याचा अनुभव ‘पराधीन आहे जगती’ यामध्ये येतो. स्वाभिमानी सरोजने पैशाचा गर्व असलेल्या कुमारला हे दाखवून दिले की, ‘गरीब माणसं ही श्रीमंतीच्या हातातली नक्की खेळणी होऊ इच्छित नाहीत.’’ या वास्तववादी सत्याचा साक्षात्कार ‘खेळणी’ या कथेत होतो. मंगलसारख्या निष्पाप भाबड्या मुलीच्या क्षणभरच लाभलेल्या प्रेमाशी बेईमानी न करणारा रमेश ‘जलधारा’मध्ये बिजलीसारखा चमकून जातो तर समाजातील सुखदु:खाचा अनुभव घेऊन ती किती फसवी आहेत याचा साक्षात्कार होताच त्यांना वाळूच्या कणाप्रमाणे झटकून टाकणारी सुरेखा ‘‘वाळू’’चा कथेत पाहावयास मिळते. ‘‘पाळणा’’ मध्ये माया मिथ्याचा लेखकाला आलेला साक्षात्कार अनुभवास येतो. ‘‘ही वाट एकटीची’’ या कथेतील सत्याने वागणारी बाबी तर ‘‘जिद्द’’ मधील जिद्दीने वागणारे दादा सारख्याच महत्त्वाचे ठरतात. ‘‘पापा’’ कथेतील आईच्या व पपांच्या वात्सल्य प्रेमाची चाललेली कुचंबणा व ते प्रेम व्यक्त न करता दाबून ठेवण्यासाठी चाललेला प्रयत्न हा स्वभाव चित्रणाचा उत्तम नमुना खरोखरीच आपल्या मनावर प्रभाव पाडून जातो. अशा तऱ्हेने ‘‘मोडेन पण वाकणार नाही’’ मधील सगळीच पात्रे या नावाप्रमाणेच अपूर्व व उदात्त जीवन जगताना दिसतात. व. पु. काळे यांचा हा कथासंग्रह वाचकांना एक नवी दृष्टी देऊन जातो त्यात शंकाच नाही. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 06-12-1970

    श्री. व. पु. काळे यांच्या आगळ्या शैलीने रंगलेल्या गूढ जीवनकथा... कुठल्याशा वाळवंटात पावसाची एक सर अचानक येते अन् जवळ असणारं एखादं वाळक झाड आणखी तग धरून राहतं... पानं, फुलं, नसतातच पण तरी ते वाकत नसतं, क्वचित वादळ जोराचच झालं तर उन्मळून मात्र पडत. तेझाड वाळवंटातच असेल असेही नाही. सुपीक प्रदेशातसुद्धा वठलेलं, वाळकं झाड दिसत नाही असं नाही. ‘मोडेन पण ... वाकणार नाही. जिवात जी असे तो ताठ मानेनं राहीन’ पण कशापुढंही हार नाही पत्करणार, अशाच बाण्यानं जगणारी माणसं या आपल्या समाजात पाहायला मिळतात... ती माणसंही कधी त्या झाडाप्रमाणे उन्मळून पडणार असतात. पण त्याची त्यांना पर्वा नसते. वसंत पुरुषोत्तम काळे यांच्या निरीक्षणातून अन् अनुभवातून तर अशी माणसं सुटणं कठीणच नाही का? अर्थात हे पटलं ते त्यांचा हा कथासंग्रह वाचूनच. कुठेतरी धागा गुंफला जातो... पु. लं. च्या ‘व्यक्ति आणि वल्ली ची चटकन आठवण होते हा कथा संग्रह वाचताना. लिहीण्याची धाटणी तशाच पद्धतीची. वाचल्याबरोबर लेखकाला विचारावंत वाटवणारी की, ही व्यक्ती कुठंय ती वल्ली तुम्हाला कुठं भेटली?’’ अनुभव असे मिळतात म्हणून कथा लिहिल्या जातात की त्या गोष्टीतल्या प्रमाणे आपण प्रसंग अनुभवतो? आता हेच पहा ना! ‘जलधारा’ मधील मंदा नाईक ही अगदी आपल्यातली. पण गर्दी असताना सिनेमाचं तिकिट ऑफर करणारा उमदा रमेश अन् त्याचा मोकळा स्वभाव कुठला? ही ‘मोडेन पण वाकणार नाही’ या बाण्याचा! मंगला नामक एका मुलीशी एका जलधारित पडलेल्या बाणाशी एकनिष्ठ राहणारा! ‘सुंभ वळतो पीळ उरतो’ मधले लेखकांच्या मित्राचे मित्र ‘धाकटा’ अन् ‘मोठा’ यांचे स्वभाव असे चमत्कारीकच. प्रोड्यूसर होण्याच्या आशेनं नटीच्या घरी ‘टॉमी’ असलेलेला मोठा भाऊ अन् लेटमार्क केला जाऊ नये यासाठी उपोषण करीत मृत्यूला मिठी मारणारा धाकटा दोघेही जिद्दीच नव्हे तर काय? ‘जिद्द’ मधला जिद्दी दादाही असाच पिळाचा माणूस. पुरुषांप्रमाणेच स्त्रियासुद्धा मोडतील पण वाकत नाहीत अशातल्या! या स्त्रियासुद्धा तशा जिद्दी! किंबहुंना कथासंग्रहात पुरुषांपेक्षा अशाच स्त्रियांचे विविध नमूने आहेत. ‘पंगू’ मधली मोहिनी अगदी मनात ठाण मांडून बसते. कथा वाचता वाचता आपणसुद्धा तिच्या मनानं मानानं पंगूच आहोत काय असा मधली रेवती आपल्यासमोर सारखी नाचत राहते. पूर्वाश्रमी रविद्रांबरोबर मजा केलेली सुचित्रा विवाहबद्ध झाल्यावर, रविंद्र अन् तिचे सहवासातील ‘फोटोच्या ‘निगेटिव्हज् ’ मिळवण्यासाठी त्याच्या स्टुडिओला आग लावते. ही सुचित्रा कोण? हिच्या अंगी होता तो बाणा कोणता? ती मोडली? की वाकली? ‘ही वाट एकटीची’ मधली बाबी तर फारच वेगळी. आपल्यापेक्षा आपला बच्चा सवाई होईल. ताठ मानेनं जगेल, कोणापुढं मान तुकविणार नाही या आकांक्षेनं, कोणताहि प्रसंग आला तरी सत्याला सामोरी जात स्वत: आयुष्य खऱ्या अर्थाने जगते. आठले मास्तरांनी तिची कुंतीशी केलेली तुलना तिला आवडलेली नाही. लग्ना आधी मूल झालं तर पाप म्हणून या मुलाला जगात येण्याचा अधिकार न देण्याइतकी ती क्रूर नाही. पण अशानं या जगात तिला सुख केवळ मानसिक लाभलं. सत्यप्रिय व सत्यनिष्ठ जगात पुनर्जन्म घेण्याची तिची इच्छा आहे. ‘खेळणी’ मधलं सरोजच व्यक्तिमत्त्व आणखीच निराळ! ती म्हणजे खरोखरच न फुटणारं खेळणं आहे. दुसऱ्याला मोडायला अन् वाकायला लावणारी सरोज स्वत: अगदी ताठ आहे, चौपाटीवर बसल्यानंतर कपड्यांना लागणारी वाटू जितक्या सहजपणे झटकावी तितक्याच सहजी निरनिराळ्या पुरुषांना आपल्यापासून झटकणारी अन् जगातील बरेवाईट बरेच अनुभव घेऊन लग्न करण्याची जिद्द बाळगणारी ‘वाळू’ तली सुरेखा काही औरच आहे. आणखी किती तरी व्यक्ति ध्यानात राहतात. कितीतरी वाक्यं, संवाद लक्षात राहतात. पण किती म्हणून सांगावेत? त्यापेक्षा पुस्तक वाचाव हेच बरं. आगळी, लोभस शैली करमणूक म्हणून काळ्यांचा हा कथासंग्रह वाचायला घेतला तरी तो वाचल्यावर ‘केवळ करमणूक’ म्हणून एवढंच त्याचं स्थान निश्चितच राहत नाही. मनाच्या खोल गाभ्यापर्यंत काही व्यक्ति भिडतात, तर काही वाक्यं अंतरंगात खोलवर कोरली जातात. अननुभवी व्यक्तीला क्वचित त्या व्यक्तीचं भयही वाटेल. पण त्यात भिण्यासारखं काही नाही. उलट, अशी जिद्द मोडेन पण वाकणार नाही. बाण्याची माणसं जीवनात भेटायलाच हवीत, त्या आगळ्या जीवनाची थाडीशी तरी ओळख व्हायला हवी की! काळ्याचं नाव कथालेखक. म्हणून प्रसिद्धच आहे. छोट्या छोटया वाक्यांतून बराच मोठा आशय सांगण्याची त्याची हातोटी आता आपल्या परिचयाची आहे. मानवी जीवनातल्या तत्वज्ञानाच्या कधी कधी तर ते इतक्या जवळून जातात; पण न वाकणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून प्रत्येकाचं निराळं तत्त्वज्ञान ऐकताना त्यात रुक्षपणा किंवा कठोरपणा मुळीच जाणवत नाही. लालित्यातूनच ते जीवनाचा हा मागोवा घेतात हेच तर ‘वपुं’चे वैशिष्ट्य. -कालिंदी घाणेकर ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more