* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788184980394
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :UMESH KADAM COMBO SET- 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EXPERIENCES GATHERED IN THE COURSE OF THE JOURNEY OF LIFE ARE A TREASURE. MEMORIES OF PEOPLE MET IN THE COURSE OF THIS JOURNEY KEEP LINGERING IN THE MIND REGARDLESS OF THEIR CAST OR CREED, NATIONALITY AND RELIGION. YOU ENCOUNTER IN THIS JOURNEY SOME UNBELIEVABLY UNIQUE PERSONALITIES WHOM YOU NEVER DREAMT TO MEET AND THEY OCCUPY A CORNER IN YOUR HEART, SO MUCH SO, THAT THEY LEAVE AN INDELIBLE IMPRINT ON YOUR MIND. YOU KEEP REMINISCING ABOUT THEM FOR THE REST OF YOUR LIFE. BECAUSE, UNKNOWINGLY YOU HAVE ALREADY BEGAN A UNIQUE FRIENDSHIP WITH THEM…EVERLASTING AND NEVER DIMINISHING…
आयुष्याच्या प्रवासात अनुभवांची शिदोरी हेच माणसाचं मोठं वैभव असतं. माणूस कोणत्याही जाती-जमातीचा, कोणत्याही पदावर काम करणारा असो; त्याचे अनुभव, आठवणी मनात रेंगाळत राहतात. काही खास व्यक्तिमत्त्वं आयुष्यात भेटतील असं स्वप्नातही वाटत नसताना अशा व्यक्ती अचानक समोर येऊन उभ्या राहतात आणि आपल्या जीवनाचा एक कोपरा व्यापून टाकतात. ण सांगता येणारे; पण आयुष्याचे रंग उजळवून टाकणारे असे काही बंध. त्या क्षणांचा सुगंध मनात दरवळत राहतो आणि त्यातूनच फुलून येते एक आगळीवेगळी मैत्री...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KEVALMAITRISATHI #KEVALMAITRISATHI #केवळमैत्रीसाठी #SHORTSTORIES #MARATHI #UMESHKADAM #उमेशकदम "
Customer Reviews
  • Rating Starराजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

    नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK NAVSHAKTI 25 -10 -2009

    ‘केवळ मैत्रीसाठी’ हा कथासंग्रह असून यामध्ये उमेश कदम यांनी त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मित्रांच्या कथा रेखाटल्या आहेत. उमेश कदम हे ज्येष्ठ कादंबरीकार बाबा कदम यांचे चिरंजीव, वडिलांकडूनच लेखनाचा वारसा त्यांना लाभला. उच्चशिक्षणासाठी त्यांनी परदेश प्वास केला, नंतरच्या काळातही सातत्याने परदेश प्रवास करण्याचे प्रसंग त्यांच्यावर आले. १९९८ पासून ते आंतरराष्ट्रीयरेड क्रॉससाठी युद्धविषयक कायद्याचे विभागीय कायदा सल्लागार म्हणून काम पाहतात. या प्रवासात त्यांना विविध देशांमध्ये नाना प्रकारच्या व्यक्ती भेटल्या. यापैकी अनेकजण त्यांचे जिवलग मित्र बनले. अशा मित्रांच्या कथा त्यांनी ‘केवळ मैत्रीसाठी’ या पुस्तकातून मांडल्या आहेत. अलंकारिक भाषेचा वापर न करता साध्या सोप्या शब्दांत मांडलेल्या या कथा आपल्याशा वाटतात. १६० पृष्ठांच्या या पुस्तकात २४ मित्र आणि त्यांचे वेगवेगळे अनुभव वाचायला मिळतात. ...Read more

  • Rating StarDAINIK DESHDOOT 11-4-2010

    मुशाफिरीत उमगला माणूस फिरत राहण्याने माणूस अनुभवसमृद्ध होतो. उमेश कदम यांनी स्वतःचं अनुभव विश्व मराठी वाचकांसमोर सढळ हाताने खुलं केलंय. उमेश कदम शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने निरनिराळया देशांमधून फिरले. त्यावेळेस त्यांना भेटलेली माणसं, त्यांचीपरिस्थिती यांची परस्पर संगती लावली. लोकांच्या मनाचा ठाव घेतला आणि त्यातून या कथा जन्माला आल्या. पर्यटनस्थळ तर कुणीही बघतं, परंतु ज्या देशात लेखक गेले त्या देशात तळागाळातून फिरस्ती केली. स्थानिक बाजार, वृत्तपत्रे, स्थानिक कर्मचारी यांचा त्यांना मदत झाली. माणूस वाचणारा लेखक म्हणून उमेश कदमांचा ‘केवळ मैत्रीसाठी’ हा कथासंग्रह मनास आल्हाद आनंद देऊन जातो. नेपाळ, फुकेत, लंडन, क्वालंलपूर, इथिओपिया, सिंगापूर, लाओस, उझबेकिस्तान इथे आलेल्या कार्यानुभवांचे आणि छोट्या-मोठ्या व्यक्तिगत प्रसंगांचे वर्णन या पुस्तकात आहे. हे पुस्तक एकाग्रतेने वाचायला हवं कारण प्रसंगांचे वर्णन या संदर्भामुळेच जिवंत होते. देश-विदेशात माणूसपणाच्या भावना एकसारख्याच आहेत. परदेशात व्हिएन्तीयेनमध्ये वियेंगविलेच्या आईने स्वादिष्ट कसे कसे खाऊ घातले आणि गावाकडच्या कौसल्याकाकी आणि बबनची आठवण कशी आली याचे सुंदर वर्णन आहे. परदेशात कठीण प्रसंग आल्यावर आपल्या देशातल्या माणसाचे भेटणे, मदत मिळणे, त्यातून निभावून जाणे याची जाणीव परांजपे काकू या गोष्टीतून मिळते. हीच या कथासंग्रहाचा ताकद ठरलीय. प्रत्येक कथेतून नकळत एक संदेश दिला गेलाय. अतिशय प्रामाणिकपणे आणि सुसंगत, रसाळ भाषेतील केवळ मैत्रीसाठी हे पुस्तक वाचकांचा आनंद द्विगुणीत करेल यात शंकाच नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more