* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662634
  • Edition : 5
  • Publishing Year : 1991
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS AGAIN A COLLECTION OF SHORT STORIES. WHAT IS HISTORY? IT IS THE CHAIN OF SUCH EVENTS IN THE PAST WHICH ARE DEEPLY ENGRAVED ON OUR MINDS. OFTEN, SOME MOMENTS, SOME INCIDENCES ARE IMPRINTED ON OUR MIND AND VERY FEW OF SUCH INCIDENCES HAVE THE STRENGTH TO REMIND US OF THE SORROW, OF THE IMMENSE PAIN. THIS COLLECTION IS OF SUCH TENDER MOMENTS, OF THOSE MEMORIES WHICH WE THINK WE HAVE FORGETTEN, BUT NOW WHEN REVEALED STILL POSSESS THE SAME VIGOUR TO TOUCH US; UNMISTAKABLY BY RANJIT DESAI, A WRITER WITH MUCH UNDERSTANDING OF THE WORDS AND THE LITERATURE.
जे घडून गेलं; पण मनामनावर कोरलं गेलं त्याचा ‘इतिहास’ होतो. अनेक क्षण, प्रसंग काळावर आपले ठसे उमटवून गेले. काही चाहूल न लागताही आपले अवशेष मागे ठेवून गेले. काही प्रसंगाचे ओरखडे मात्र आज आठवणीनंही जखम ओली करतात. अशाच फार फार जुन्या आठवणींचा हळूवार पडदा बाजूला सारत, त्या क्षणांचा अनुभव ताजा करणारा, बोलीभाषेचा बाज घेऊन रणजित देसाई यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाचा अक्षरसाज लेवून आलेला कथाविष्कार...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarJANSHAKTI 11-08-1991

    बाबुलमोरा भरजरी, मखमली कथा संग्रह... सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. रणजित देसाई यांचे वाङ्मय प्रसिद्ध करण्याची देखण्या आणि आकर्षक स्वरुपात पेश करण्याची बरीचशी कामगिरी पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसने घेतली आहे. त्यांनी रणजित देसार्इंच्या कथांचे तीन संगरह प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी ‘बाबुलमोरा’ ही रागदारीच्या गाण्याचा मुखडा असलेला एक कथा संग्रह आहे. ‘स्वामी’कार रणजित देसाई हे कादंबरीकार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके कथाकार म्हणून वाचकांना कमी परिचयांचे आहेत. परंतु त्यांच्या लेखनांचा बहर जरी कादंबऱ्यांमधून अधिक जाणवत असला तरी त्यांची प्रतिभेच्या क्षेत्रातली मुलुखगिरी कथा लेखनानेच झाली. यापूर्वी त्यांचे दोन तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले होते. पण त्यांतील कथांचे सामाजिक, ग्रामीण, निसर्ग, संगीत कथा असे वर्गीकरण करून त्यांचे संग्रह प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते. आता मेहता पब्लिकेशनने हे वर्गीकरण करुन त्यांचे तीन कथा संग्रह प्रसिद्ध केले आहेत. या त्यांच्या कथा विश्वातील ‘बाबुलमोरा’ हा काहीसा भुतकाळातील ऐतिहासिक (खरे तर वाङ्मयीनदृष्ट्या ही वर्गवारी चूकच आहे) व संगीताच्या प्रांतातील कथांचा ‘‘बाबुलमोरा’’हा संग्रह या देसार्इंच्या वाङ्मयांच्या पैलूचे दर्शन घडवून जातो. या संग्रहातील सर्वच कथांना एकप्रकारचा खानदानी भरजरी व मखमली असा भावनात्मक स्पर्श आहे. मराठी कथांच्या क्षेत्रात अरविंद गोखले, गंगाधर गाडगीळ यांनी सुरुवातीला अनेक नवनवीन प्रयोग करुन एका अर्थाने नवे मन्वन्तर घडवून आणले. विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वच नूतन लेखकांनी ‘कथा’ प्रधानतेशी नाते विलग करीत करीत नव्या वाटा यशस्वीपणे चोखाळल्या आहेत. परंतु रणजित देसार्इंच्या या संग्रहातील कथा या जुन्या घटना प्रधान वाटेनेच जातात. त्यांत काही कथा या इतिहासातील घटनांशी संबंधित असल्यामुळे त्यातून उमलणारे व्यक्तिमत्त्व, भावना या अधिक पवाढगाणाऱ्या आहेत. ‘वेडात दौडले सात’ या अशा सोळा कथांमधील पाच कथांपैकी प्रातिनिधीक कथा. मराठ्यांचे एक सेनापती प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमांची गाथा या कथेत शब्दबद्ध केली आहे. या पाचही कथांमध्ये रेखाटलेल्या व्यक्तिरेखा त्यांच्या नावाने आपणास ज्ञात असल्या तरी त्यांच्या जीवनातील स्वभाव वैशिष्ट्यांचा लेखकाने घेतलेला आढावा चमत्कृतीजन्य असला तरी त्यातली पूर्वग्रहीत गौरव पूजाही आपणाला काहीवेळा पारंपारिक वाटते. शब्दांच्या साह्याने रेखाटलेली व्यक्ती चित्रेही वाचनीय झाली असली तरी अंत:करणाला भिडत नाहीत. त्यातली कलाकुसर देखणी वाटते इतकेच. कथा संग्रहाच्या सुरुवातीची नादतरंगा ही कथाही कलावंत आणि राजकन्या यांच्या भावविश्वाचे चित्रण करणारी असली तरी खूप पौराणिक धाटणीची आहे, परंतु ‘अवशेष’मधील संस्थांनिकांच्या व्यथा वास्तव असल्या तरीसुद्धा खानदानी परंपरेचे होत असलेले दर्शन व्यक्तभूत आणि इतिहासाला अधिक जवळकीचे वाटते. या सात कथानंतर संगीताची मैफील सुरू होते. अज्ञात गवय्यांच्या जीवनासंबंधीच्या या कहाण्या आहेत. सैगलच्या आवाजातील ‘बाबुलमोरा’मधील मखमली, अलवार स्पर्श या बहुतेक सर्वच कथांचा आहे. याचा अर्थ असाही आहे की संगीताशी, संगीत साधनेशी नात सांगणाऱ्या कथा वास्तवाशी नाते सांगणाऱ्या आहेत. संगीताचीच नव्हे तर सर्वच कलांचे जे जे आविष्कार आहेत मग ती चित्रकला असो, शिल्पकला असो, वादन नैपुण्य असो वा अन्य चौसष्ट कलांचे क्षेत्र असो, तेथे तेथे भारतीय संस्कृतीतील राष्ट्रीय एकात्मतेचे मनमोकळे दर्शन घडते. महंमद रफी, तलत यांची जात कुणी विचारीत नाही. पंडीत पलुस्करांच्या आत्मपात कुणी जातीयतेचा सूर न धुंडाळता मनसोक्त दाद सारेच देतात. गावस्करचा शैलीदार चौकार, फटकेबाजी पाहून सारे प्रेक्षक पेंडॉल दणाणून सोडतात तर अझरुद्दीनचा स्वीपचा फटका बघताच सगळा पेंडॉल हर्षभराने, उत्साहाने भारुन जातो. कारण तो ‘स्विप’ भारतीय असतो. आज कलांचे हे एकच राज्य असे आहे की ते भारतीय आहे एकात्म आहे. रणजित देसार्इंच्या संगीताच्या प्रांतातील हळुवार भावनांचे दर्शन घडत असताना राष्ट्रीय एकात्मतेची जाणिव किती ‘गहरी’ आहे याची सुप्त जाणीव होत राहते आणि वाटते ‘मिले सूर हमारा’ फक्त तो सूर अंत:करणाच्या गाभाऱ्यांतून बाहेर पडलेला हुंकार असला पाहिजे. रणजित देसार्इंच्या या कथा वाचताना या कलाक्षेत्रातील जीवनांचे हळुवार, मखमली समर्थ दर्शन तर घडतेच पण सैगलच्या सुरांचा ‘बाबुलमोरा’ ‘नैहर छुटोरे जाय’मधली व्याकुळताही मधुरपंखी स्पर्शाने मनमोहक वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो