ANANT P. LABHSHETWAR

About Author

Birth Date : 01/01/1939


NA

सुवर्णपदांकित डॉ. लाभसेटवार शिष्यवृत्ती मिळवून पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. जननशास्त्र आचार्याची पदवी संपादन केल्यावर त्यांनी या क्षेत्रात मूलभूत संशोधन केलं व १०० हून अधिक पेपर सन्मानित आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले. कलकत्ता विद्यापीठाच्या आचार्याच्या पदवीसाठी ते बाह्य परीक्षक होते. आचार्य पदव्युत्तर प्रशिक्षणासाठी (POSTDOCTORAL FELLOWSHIP) त्यांनी मार्गदर्शन देखील केलं. त्यानंतर त्यांनी संशोधन क्षेत्राचा सन्यास घेऊन औद्योगिक जगात प्रवेश केला व १००० एकर शेती, ४ व्यापारसंकुलं, आकाशवाणी केंद्र व बँक विकत घेतली. अमेरिकेत स्वत:ची बँक विकत घेणारे ते पहिले भारतीय समजले जातात. याबाबतीत त्यांना पत्नीची (सौ. लता) खूपच मदत झाली. त्यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी संपादन केल्यावर अमेरिकेत स्त्रीरोगशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं व आपला स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय स्थापन केला. २००० मध्ये या दांपत्यानं स्वत:चे १ कोटी रुपये घालून डॉ. अनंत व लता लाभसेटवार धर्मादाय प्रन्यास नागपूरला स्थापन केला. ही संस्था दरवर्षी मराठी ललित साहित्य व संतती नियमन या क्षेत्रात पारितोषिकं प्रदान करते. आपल्या देशाच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर सुरू केलेलं हे पहिलं पारितोषिक म्हणून ओळखल्या जात. याशिवाय त्यांच्या प्रन्यासानं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात वि. स. खांडेकर जयंती व्याख्यानमाला पुरस्कृत केली. अशाच व्याख्यानमाला लवकरच मुंबई व पुणे विद्यापीठातही सुरू होत आहे. डॉ. लाभसेटवारांना मराठी साहित्यात विद्यार्थीदशेपासूनच रस आहे. आचार्यांच्या पदवीचा अभ्यास करतांना त्यांनी आजची अमेरिका नावाची लेखमाला अमृत मासिकात ३ वर्ष चालवली. प्रथमच अमेरिकन जीवनाचं चित्रण मराठी वाचकांसमोर मांडण्यात आलं– ते अतिशय लोकप्रिय ठरलं कारण मासिकाचा खप एकदम वाढला. त्यांनी अमेरिकेतील वाटचाल नावाची दुसरी लेखमाला त्याच मासिकात मार्च २००४ पासून सुरू केली. त्यांचं अमेरिकेतील धावपळ हे परचुरे प्रकाशित आत्मचरित्रातही लोकप्रिय ठरलं. आतापावेतो त्याच्या दोन आवृत्त्या निघून त्याच हिंदी रूपांतर प्रकाशनाच्या मार्गावर आहे. याशिवाय त्यांच्या ४ कादंब-या व एक लघुकथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांचे लेख सकाळ (सोलापूर) व तरुण भारत (कोल्हापूर) मध्ये नियमितपणे प्रकाशित होत असतात. मूळचा औद्योगिक पिंड असल्यामुळे त्यांच्या लिखाणाला निराळं परिमाण लाभलं आहे. अमेरिकेत दीर्घकाळ वास्तव्याला असल्यामुळे त्यांनी तिथल्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या लिखाणातून मराठी वाचकाला अमेरिकन जीवनाचं दर्शन घडतं.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more