* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"CHHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ THE GREAT MARATHA WARRIOR… A MUCH CONTROVERSIAL HISTORICAL FIGURE… WHO IS THE INITIATOR OF THIS INJUSTICE…? LITTERATEURS? HISTORIANS? BAKHARKARS? WHY DID THE DISPUTE START ON RAIGAD? WHY DID SAMBHAJI RAJE JOIN DILERKHAN? HOW TRUE IS VASANT KANETKAR’S ANALYSIS? IT THE ‘GODAVARI’ INCIDENCE TRUE? WHAT IS QUEEN SOYARA’S ROLE IN PORTRAYING SAMBHAJI’S CHARACTER? WHY DID SAMBHAJI RAJE PUNISH HIS MINISTERS? WAS SAMBHAJI RAJE RESPONSIBLE FOR LOSING HINDVI SWARAJ OR WAS HE THE SAVIOUR? HOW DID SAMBHAJI RAJE FACE HIS DEATH? THE GREAT SENIOR HISTORIAN OF MAHARASHTRA, DR. JAYASINGRAO PAWAR HAS ANALYSED MANY SUCH QUESTIONS RELATED TO SAMBHAJI RAJE. "
"छत्रपती संभाजी हा एक रंगेल, बेजबाबदार, व्रूÂर राजा (युवराज) होता, असं चित्र काही ऐतिहासिक कागदपत्रांमुळे निर्माण झालं; पण त्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचं काम इतिहासकारांनी केलं नाही. परिणामी, संभाजीराजांची मलीन प्रतिमा साहित्यिक, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली; पण काही मोजक्या इतिहास संशोधकांनी योग्य कागदपत्रांचा शोध घेऊन, उपलब्ध पुराव्यांची शहानिशा करून संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेष अधोरखित करण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजांची विपरीत प्रतिमा निर्माण करणारी कागदपत्रं, संशोधकांनी त्याची केलेली चिकित्सा आणि संभाजीराजांचे गुणविशेष अधोरेखित करणारी कागदपत्रं, यांचा सम्यक आढावा घेणारं पुस्तक म्हणजे...‘छत्रपती संभाजी : एक चिकित्सा.’ संभाजीराजांची विपरीत प्रतिमा निर्माण करणाNया विविध ऐतिहासिक साधनांचा आढावा या पुस्तकातून घेतला गेला आहे. संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले होते. त्याचं कारण काही ऐतिहासिक कागदपत्रांत असं सांगितलं गेलं आहे, की एका ब्राह्मणकन्येवर संभाजीराजे फिदा झाले होते. तिच्याशी त्यांचे अनैतिक संबंध होते. शिवाजी महाराजांना हे समजल्यावर ते संतापले. आता ते आपल्याला कडक शिक्षा देतील असं संभाजीराजांना वाटलं. म्हणून ते मोगलांना जाऊन मिळाले. काहींच्या मते रायगडावर हळदी-वुंÂकवासाठी आलेल्या एका ब्राह्मण युवतीवर संभाजीराजांनी बलात्कार केला. त्याबद्दल शिवाजी महाराज त्यांना कडक शासन करतील या भीतीने ते मोगलांना जाऊन मिळाले. आपली चूक उमगल्यावर ते स्वराज्यात परत आले. त्यांची आणि शिवाजी महाराजांची दिलजमाई झाली; पण संभाजीराजे मोगलांकडून परत आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या भेटीचंही काही इतिहासकारांनी विपर्यस्त वर्णन केलं. त्यानंतर थोड्याच अवधीत शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. संभाजीराजांनी त्यांच्यावर विषप्रयोग केला, असाही एक आरोप संभाजीराजांवर केला गेलेला काही कागदपत्रांत आढळतो."

No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#CHHATRAPATI SAMBHAJI: EK CHIKITSA# DR. JAYSINGRAO PAWAR#छत्रपती संभाजी : एक चिकित्सा# डॉ. जयसिंगराव पवार# शोकान्तिका# आद्य इतिहासकारांचा# मराठी बखरींतील# संभाजी-दर्शन# नवी जाणीव# सुसंस्कृत# पराक्रमी# युवराज# गृहकलह# दुर्वर्तन# दिलेरखान# स्वराज्यात# औरंगजेब# युद्धक्षेत्र# हत्या# वैÂद# कवि #कलश# सिद्दी व पोर्तुगीज# शहाजादा# अकबर# "
Customer Reviews
  • Rating StarNitin Mahanwar

    अत्ताच डॉ जयसिंगराव पवार लिखीत छत्रपती संभाजी एक चिकित्सा हे अभ्यासपुर्ण पुस्तक वाचले . स्पर्धा परीक्षा तयारी करताना संरांचे पुस्तक वाचनात आलेले होते परंतु छ. संभाजी राजे बद्दल मनांत नेहमीच आदर ज्वाज्वल्य प्रेरणा होती आणि आहेच परंतु महारांजा बद्दलचेजे समज गैरसमज ऐतिहासिक आणि वस्तुनिष्ठ निरपेक्ष पने जाणून घेण्याची खूप दिवसापासूनची ईच्छा या पुस्तकाने पूर्ण झाली ! त्याबद्दल सरांचे मनापासून आभार , हे पुस्तक वाचताना सरांनी मुद्दे निहाय गैरसमज त्याचे संदर्भ साहित्य आणि ऐतिहासिक तथ्य याबाबत दिलेले विविध संदर्भ व त्यामागचे तार्किक स्पष्टीकरण यामुळे हे पुस्तक ज्यांना ज्यांना संभाजी राजेना जानून घ्यायची इच्छा आहे त्याने आवर्जून वाचावे !!!! ...Read more

  • Rating StarDhananjay Chandrakant Deshpande

    छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा आत्तापर्यंत तुम्ही छावा किंवा संभाजी कांदबरी वाचली असेल परंतु अस्सल कागदपत्रे आणि पुरावे यांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल नक्कीच हे छोटेखानी पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल. खालील काही बाबींवर त्या प्रकाश टाकण्यात आला आहे. १) संभाजी महाराजांच्या आयुष्यातील गोदावरी, थोरतांची कमळा वगैरे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. २) चिटनीसी बखर ही मल्हार रामराव चिटणीसाने त्याच्या पूर्वजांना हत्तीच्या पायी दिल्याच्या रागातून फक्त संभाजी महाजांची बदनामी करायला लिहिली. ३) संभाजी महाराजांसमोर राज्य विभाजनाचा प्रस्ताव जेव्हा थोरल्या महाराजांनी ठेवला तेव्हा त्यांनी तो फेटाळून लावत आम्ही आपल्या पायाशी दूध भात खाऊन राहू असे सांगितले ४) संभाजी महाराज त्यांना डावललं जात असल्याचा भावनेतून दिलेरखनास जाऊन मिळाले ही त्यांची एकमेव चूक ५) छत्रपती झाल्यानंतर औरंगजेबाशी ९ वर्ष प्रखर संघर्ष एकाच वेळी पाच शाह्यांवर वर्चस्व ६) पित्यासारखे संपूर्ण निर्व्यसनी ७) शिर्क्यांसारखे आपलेच माणसं फितूर झाल्याने घात. ८)पकडले गेल्यावरही बाणेदारपणे औरंगजेबाला सामोरे गेले. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकातून मिळतील.. शेवटी एकच यावन रावण की सभा, संभू बंध्यो बजरंग। लहु लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रनरंग। ज्यो रवि छवि लखत ही, खद्योत होत बदरंग। त्यो तुव तेज निहारी के तखत तज्यो अवरंग।। मराठ्यांचे दुसरे छत्रपती शंभू राजेंस मानाचा मुजरा! ...Read more

  • Rating StarSandeep Chavan

    "रूढार्थाने हे पुस्तक संभाजी महाराजांचे चरित्र नाही. ही संभाजी चरित्राची कागदपत्रांच्या आधारे केलेली चिकित्सा आहे. म्हणूनच संभाजी महाराजांची निर्माण झालेली (की केलेली?) विकृत प्रतिमा‚ तिची कारणमीमांसा‚ युवराज संभाजीराजांची जडणघडण‚ त्यांचा पित्याशी झाेला संघर्ष‚ त्यांच्यावरील दुर्वर्तनाचे आरोप व त्याची शहानिशा‚ रायगडावरील सोयराबाई व प्रधानांची कटकारस्थाने‚ त्यांना झालेल्या शिक्षा आणि शेवटी संभाजी महाराजांची कैद व हत्या अशा संभाजी चरित्रातील अनेक वादग्रस्त विषयांची चर्चा येथे अधिक खोलात जाऊन केली आहे. ...Read more

  • Rating StarNilesh Maral Deshmukh‎

    संभाजी राजेंच्या बलिदानानंतर सभासद बखर,चिटणीस बखरितून त्वेशापोटी जे काही चुकीचं लिखाण झालं त्याला पुराव्यासाहित खोडून काढणारी अभ्यासू चिकीत्सा नक्की वाचा.....

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more