* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982732
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 456
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORK SHABDACHARCHA CONTAINS A COLLECTION OF ABOUT A THOUSAND WORDS OF MARATHI LANGUAGE, WHICH MOSTLY OCCUR IN PRINTED BOOKS AS WELL AS IN PRINTED PERIODICALS. MANY A TIME SOME OF THESE WORDS ARE MIS-SPELT AS REGARDS THE LONG AND SHORT VOWELS IN THEM. AT TIMES THE MEANING OF SOME SEEMS TO HAVE BEEN MIS-CONCEIVED. THIS HAPPENS DUE TO THE LACK OF AWARENESS ON THE PART OF THE WRITERS AS TO THE ORIGIN AND/OR ETYMOLOGY OF THE WORDS. NOW-A-DAYS MARATHI SPEAKING STUDENTS BEING EDUCATED THROUGH ENGLISH MEDIUM FACE THIS DIFFICULTY TO A GREAT EXTENT. THESE WORDS ARE THEREFORE DISCUSSED AND EXPLAINED FROM THE POINT OF VIEW OF EXACT GRAMMATICAL FORM, CORRECT WRITING IN SCRIPT, ETYMOLOGICAL MEANING AND PROPER FIELD OF USE IN THE LANGUAGE. HAVING BEEN SERIALLY DISCUSSED FIRST IN TWO DIFFERENT MARATHI DAILY NEWS PAPERS, THEY ARE HERE ARRANGED IN AN ALPHABETICAL ORDER IN THE FORM OF A BOOK, WHICH CAN BE CONVENIENTLY USED BY STUDENTS AND TEACHERS OF MARATHI LANGUAGE, WRITERS, JOURNALISTS AND EDITORS.
‘अठरा विश्वे दारिद्र्य’ असे सर्रास बोलले, लिहिले जाते. कोणती अठरा विश्वे? नावे सांगता येतील? नाहीतच, तर कोठून सांगणार? मग हा शब्दप्रयोग आला कोठून? डॉ.म.बा. कुलकर्णी सांगतात, ‘अठराविसे’ असा शब्दप्रयोग असायला हवा. अठराविसे · ३६०. म्हणजे बाराही महिने दारिद्र्य! ‘शब्द’ हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. शब्दाला रंग-रूप असते. रस-गंध असतो. त्यामुळे ते जाणीवपूर्वक वापरता आले पाहिजेत. शब्दकोशामध्ये तर सर्वच शब्द असतात, पण तेथे ते एक प्रकारे निर्गुण-निराकार अवस्थेत असतात. देवळांमध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जसे दगडाच्या मूर्तीला ‘देवत्व’ प्राप्त होते, तसेच शब्दांचे आहे. वापरातून त्यांच्यात प्राणप्रतिष्ठा होते. ते सजीव होतात. बोलू लागतात, डोलू लागतात. ही किमया डॉ.म.बा. कुलकर्णी यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहे.
* `प्रकाशक मित्र` उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०१०-२०११ * म.वि.अकोलकर पुरस्कार २०११
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SHABDACHARCHA #SHABDACHARCHA #शब्दचर्चा #REFERENCEANDGENERAL #MARATHI #DR.M.B.KULKARNI #डॉ.म.बा.कुलकर्णी "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 21-08-2011

    भाषाप्रदूषण टाळण्यासाठी शब्दचर्चा... मराठी शब्द, त्यांची व्युत्पत्ती, त्याचा अर्थ, शुध्दाशुध्दता याविषयी चर्चा करणारे डॉ. म. बा. कुलकर्णी यांचे `शब्दचर्चा’ हे पुस्तक मेहता प्रकाशनातर्फे नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानिमित्त.. अनेक शब्द आल्या बोलण्या-लिहिण्यात असतात, पण त्यांचा नेमका अर्थ आपल्याला माहीत नसतो. कित्येक शब्दांच्या अर्थाबद्दल आपण कधी विचारच केलेला नसतो. योग्य समजुतीअभावी भाषेचा चुकीच्या पध्दतीने वापर आपण करीत असतो.. सहा-सात वर्षांपूर्वी जेव्हा `लोकमत’च्या संपादकांच्या सूचनेवरुन मी `शब्दचर्चा लिहायला सुरुवात केली, तेव्हा मराठी भाषेत ज्यांच्या स्वरुपाबद्दल चर्चा करावी, असे हजाराहून अधिक शब्द असू शकतील, असे मला प्रारंभी तरी मुळीच वाटले नव्हते. पण आता `शब्दचर्चा’ हे हजार शब्दांची चर्चा समाविष्ट झालेले पुस्तक प्रकाशित झाल्यावर मात्र, `अरे अजून काही शब्द बाकी राहिलेले आहेतच, असेच मला वाटते आहे!’ अशी शब्दचर्चा का करावी लागते? तेच आज इथे `लोकमत’मधील शब्दचर्चा या सदराचा उपसंहार म्हणून सांगायचे आहे! भाषेत `अशुध्द’ असे काही नसते, हे काही अशी खरे असले, तरी कोणतीही भाषा जर ज्ञान संक्रमणासाठी वापरायची असेल, तर तिचे एक `प्रमाण’ रुप मानावे लागते आणि त्या रुपात फार वेगाने बदल होऊ नयेत, यासाठी हे रुप मुद्रित व्यवहारात सांभाळावेही लागते. प्रमाण मराठी भाषेतील कित्येक शब्दांचे रुप, अर्थ, याबद्दल आवश्यक त्या योग्य समजुतीच्या अभावी अनेक लेखक, विशेषत: पत्रकार ही काळजी घेताना दिसत नाहीत; ही खेदाची गोष्ट आहे. वृत्तपत्रातील मजकूर वाचकांच्या दृष्टीसमोर नित्य येत असल्याने, भाषेवर त्याचा मोठाच प्रभाव पडत असतो व त्यामुळे भाषाप्रदूषण मोठ्या प्रमाणात घडत असते. हे प्रदषण टाळायला हवे आहे. मी (रोज एका शब्दाबद्दल) शब्दचर्चा लिहीत होतो, तेव्हा माझ्या लक्षात येत होते की, वृत्तपत्रांमधून अनेक चुकीचे शब्द भाषेत रुढ होऊ लागलेले आहेत. (योग्य शब्द कंसात) उदाहरणार्थ अबालवृध्द (आबालवृध्द), अधुनिक (आधुनिक), आतंकवादी (आतंककारी), दुरावस्था (दुरवस्था), सहस्त्र (सहस्त्र)... वगैरे. शब्द वापरताना त्यांची व्याकरणिक रचना लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे अयोग्य रुपे सर्रास वापरली जातात. उदाहरणार्थ घेवून (घेऊन), ठेऊन (ठेवून), रहाणे, राहणे (राहाणे), पहाणे, पाहणे (पाहाणे). हृस्व-दीर्घातील बदलाने मराठीत अर्थबदल होत नाही, असे प्रतिपादन अलीकडे आग्रहाने केले जाते आहे.. पण अनेक शब्दांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती दिसते. उदाहरणार्थ- सलिल, सलील. मिलन, मीलन. विशेष म्हणजे अशी ही उदाहरणे `संस्कृत’ भाषेतली आहेत, अशी त्यांची विल्हेवाट लावणारे आणि `भाषिक’ सारखे शब्द त्यासाठी बदलून त्याला `भाषक’ असे रुप देणारे अभ्यासक `तज्ञ’ या मराठी शब्दाला नाकारुन संस्कृत तज्ज्ञ या शब्दाचा पुरस्कार करीत असतात! शब्दांचे अर्थ हे यादृच्छिक असतात,म्हणजेच ते (arbitrary) पध्दतीने त्यांना प्राप्त झालेले असतात, असे मानले जाते; पण हे फार थोड्या व विशेषत: भाषेतील काही मूलभूत शब्दांबद्दलच खरे दिसते. कारण आपल्या मराठी भाषेत अनेक शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अन्य काही शब्दांच्या संबंधातून त्यांना प्राप्त झालेले आहेत. उदा. गुण्या, गोपालमुहूर्त, ग्राम्य, कर्णधार-अस्मिता वगैरे. काही सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक परंपरांचा आधार असलेले आणि त्यांतून अर्थ स्पष्ट होणारे अनेक शब्द आपल्या भाषेत आहेत. उदाहरणार्थ- दंपती, दक्षिणा, घटस्फोट, घंगाळ, अनसूया, गवसणे, वगैरे. या परंपरांचा बोध झाला तर या शब्दांचा वापर आपण अधिक जाणकारीने करु शकू. अनेक शब्द आपल्या बोलण्या-लिहिण्यात असतात, पण त्यांचा नेमका अर्थ काय म्हणून प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर माहीत नसते! उदाहरणार्थ- धंदा, व्यवसाय, अमावस्या, ऐरण- वगैरे. कित्येक शब्दांच्या अर्थाबद्दल आपण कधी विचारच केलेला नसतो. उदाहरणार्थ- अरण्यरुदन, गंधमुक्ती, खांदेपालट, प्रपंच, आकाश, शरीर वगैरे. शब्दांच्या काही जोड्या आपल्या भाषेत अश्या आहेत की ज्या जोडीतील दोनही शब्द भिन्नार्थक असूनही एकमेकांऐवजी वापरले जात आहेत! उदाहरणार्थ व्यग्र-व्यस्त, उपहार-उपाहार, वादातीत-वादग्रस्त, आव्हान-आवाहन, चतुरस्त्र-चतुरस्त्र विरोधाभास,गर्हणीय, अशासारखे काही शब्द तर त्यांचा अर्थ लक्षात न घेताच अनेक ज्येष्ठ पत्रकारही सतत वापरीत आलेले आहेत! वास्तविक हे शब्द संदर्भानुसार अतर्विरोध, स्तवनीय-स्तुत्य असे हवेत. वर जे अनेक शब्द उदाहरणादाखल नोंदले आहेत, त्या सर्वांची तर चर्चा शब्दचर्चेत आहेच. पण या चर्चेत अनेक शब्दांच्या नेमक्या अर्थाबद्दलची, किंवा ते ते शब्द नेमके कसे लिहिणे/छापणे योग्य होईल याबद्दलची पृच्छा, अनेक वाचकांनी व विशेषत: पत्रकारांनी केलेली होती, आणि त्यामुळे त्या त्या शब्दांबद्दल विचार केलेला आहे. यापैकी अनेक शब्दांचे मूळ मराठीची आजी असलेल्या संस्कृत भाषेत मिळत होते. त्यानुसार शब्द स्पष्ट करीत असताना अलीकडच्या काही भाषाभिमानी मराठी भाषिक अभ्यासकांच्या मनातील एक शंका-अथवा आक्षेप जाणवत असे. या अभ्यासकांचे म्हणणे असे असते की मराठीने संस्कृतचा हा आधार सोडून दिला पाहिजे! संस्कृतबद्दलचा असा तिरस्कार बाळगण्याने मराठी भाषेचे नुकसान होण्याचीच अधिक शक्यता आहे. मराठी भाषेतून संस्कृतोत्पन्न शब्द काढून टाकायचे ठरविले, तर सत्तर टक्क्यांच्या वर शब्द सोडून द्यावे लागतील! तसे करणे हा आत्मघातच होईल. जे जे शब्द `संस्कृत’ आहेत असे म्हटले जाते, ते जर मराठीत वापरात आहेत,तर ते मराठीच झालेले नाहीत काय? कोणतीही भाषा ही तिच्या व्याकरणिक प्रत्ययांच्या द्वारे केल्या जाणाऱ्या स्वतंत्र वाक्यरचनेने इतर भाषांपासून वेगळी असल्याचे लक्षात येत असते. आपण अनेक इंग्रजी शब्द या पध्दतीने मराठीत समाविष्ट केलेले आहेतच की! `स्टडीरुममधल्या टेबलावरील लँपच्या उजेडात दुसऱ्या दिवसाच्या लेक्चरची तयारी करणारे प्रोफेसर’ ही रचना मराठीच तर असते! कारण या इंग्रजी शब्दांना आपण मराठी प्रत्यय जोडलेले आहेत. मराठीला समृध्द करीत राहणाऱ्या व विशेषत: आपल्या नवनिर्माणक्षमतेचा वारसा मराठीला देणाऱ्या संस्कृतबद्दल दुजाभाव कशाला हवा? मराठी `शुध्द’ लेखनातील काही ढोबळ नियमांचे पालन टाळणेच कसे इष्ट आहे, हेही ही शब्दचर्चा करताना जाणवलेले आहे. शुध्दलेखन म्हणजे काय? ती भाषेतली एक शिस्त असते. त्या शिस्तीमागील प्रयोजन लक्षात घ्यायला हवे की नको? - असेही काही प्रश्न या शब्दचर्चेत आलेले आहेत. परंतु ही शब्दचर्चा म्हणजे केवळ शुध्दलेखनाची अथवा व्याकरणाचीच चर्चा नाही. शब्दाची व्युत्पत्ती, त्याचे लिखित रुप, अर्थक्षेत्र व त्या क्षेत्रात कालौघात झालेला बदल इत्यादी अनेक दृष्टिकोनांतून ही चर्चा, त्या त्या वेळी जाणवलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने मी केलेली आहे. `लोकमत’ने त्यासाठी मला प्रेरित केले होते त्यासाठी लोकमतचे आभार. भाषाप्रदूषण टाळण्यासाठी ही शब्दचर्चा उपयुक्त ठरावी! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more