* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184982732
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 456
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE WORK SHABDACHARCHA CONTAINS A COLLECTION OF ABOUT A THOUSAND WORDS OF MARATHI LANGUAGE, WHICH MOSTLY OCCUR IN PRINTED BOOKS AS WELL AS IN PRINTED PERIODICALS. MANY A TIME SOME OF THESE WORDS ARE MIS-SPELT AS REGARDS THE LONG AND SHORT VOWELS IN THEM. AT TIMES THE MEANING OF SOME SEEMS TO HAVE BEEN MIS-CONCEIVED. THIS HAPPENS DUE TO THE LACK OF AWARENESS ON THE PART OF THE WRITERS AS TO THE ORIGIN AND/OR ETYMOLOGY OF THE WORDS. NOW-A-DAYS MARATHI SPEAKING STUDENTS BEING EDUCATED THROUGH ENGLISH MEDIUM FACE THIS DIFFICULTY TO A GREAT EXTENT. THESE WORDS ARE THEREFORE DISCUSSED AND EXPLAINED FROM THE POINT OF VIEW OF EXACT GRAMMATICAL FORM, CORRECT WRITING IN SCRIPT, ETYMOLOGICAL MEANING AND PROPER FIELD OF USE IN THE LANGUAGE. HAVING BEEN SERIALLY DISCUSSED FIRST IN TWO DIFFERENT MARATHI DAILY NEWS PAPERS, THEY ARE HERE ARRANGED IN AN ALPHABETICAL ORDER IN THE FORM OF A BOOK, WHICH CAN BE CONVENIENTLY USED BY STUDENTS AND TEACHERS OF MARATHI LANGUAGE, WRITERS, JOURNALISTS AND EDITORS.
‘अठरा विश्वे दारिद्र्य’ असे सर्रास बोलले, लिहिले जाते. कोणती अठरा विश्वे? नावे सांगता येतील? नाहीतच, तर कोठून सांगणार? मग हा शब्दप्रयोग आला कोठून? डॉ.म.बा. कुलकर्णी सांगतात, ‘अठराविसे’ असा शब्दप्रयोग असायला हवा. अठराविसे · ३६०. म्हणजे बाराही महिने दारिद्र्य! ‘शब्द’ हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. शब्दाला रंग-रूप असते. रस-गंध असतो. त्यामुळे ते जाणीवपूर्वक वापरता आले पाहिजेत. शब्दकोशामध्ये तर सर्वच शब्द असतात, पण तेथे ते एक प्रकारे निर्गुण-निराकार अवस्थेत असतात. देवळांमध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जसे दगडाच्या मूर्तीला ‘देवत्व’ प्राप्त होते, तसेच शब्दांचे आहे. वापरातून त्यांच्यात प्राणप्रतिष्ठा होते. ते सजीव होतात. बोलू लागतात, डोलू लागतात. ही किमया डॉ.म.बा. कुलकर्णी यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहे.
* `प्रकाशक मित्र` उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०१०-२०११ * म.वि.अकोलकर पुरस्कार २०११
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SHABDACHARCHA #SHABDACHARCHA #शब्दचर्चा #REFERENCEANDGENERAL #MARATHI #DR.M.B.KULKARNI #डॉ.म.बा.कुलकर्णी "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 21-08-2011

    भाषाप्रदूषण टाळण्यासाठी शब्दचर्चा... मराठी शब्द, त्यांची व्युत्पत्ती, त्याचा अर्थ, शुध्दाशुध्दता याविषयी चर्चा करणारे डॉ. म. बा. कुलकर्णी यांचे `शब्दचर्चा’ हे पुस्तक मेहता प्रकाशनातर्फे नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानिमित्त.. अनेक शब्द आल्या बोलण्या-लिहिण्यात असतात, पण त्यांचा नेमका अर्थ आपल्याला माहीत नसतो. कित्येक शब्दांच्या अर्थाबद्दल आपण कधी विचारच केलेला नसतो. योग्य समजुतीअभावी भाषेचा चुकीच्या पध्दतीने वापर आपण करीत असतो.. सहा-सात वर्षांपूर्वी जेव्हा `लोकमत’च्या संपादकांच्या सूचनेवरुन मी `शब्दचर्चा लिहायला सुरुवात केली, तेव्हा मराठी भाषेत ज्यांच्या स्वरुपाबद्दल चर्चा करावी, असे हजाराहून अधिक शब्द असू शकतील, असे मला प्रारंभी तरी मुळीच वाटले नव्हते. पण आता `शब्दचर्चा’ हे हजार शब्दांची चर्चा समाविष्ट झालेले पुस्तक प्रकाशित झाल्यावर मात्र, `अरे अजून काही शब्द बाकी राहिलेले आहेतच, असेच मला वाटते आहे!’ अशी शब्दचर्चा का करावी लागते? तेच आज इथे `लोकमत’मधील शब्दचर्चा या सदराचा उपसंहार म्हणून सांगायचे आहे! भाषेत `अशुध्द’ असे काही नसते, हे काही अशी खरे असले, तरी कोणतीही भाषा जर ज्ञान संक्रमणासाठी वापरायची असेल, तर तिचे एक `प्रमाण’ रुप मानावे लागते आणि त्या रुपात फार वेगाने बदल होऊ नयेत, यासाठी हे रुप मुद्रित व्यवहारात सांभाळावेही लागते. प्रमाण मराठी भाषेतील कित्येक शब्दांचे रुप, अर्थ, याबद्दल आवश्यक त्या योग्य समजुतीच्या अभावी अनेक लेखक, विशेषत: पत्रकार ही काळजी घेताना दिसत नाहीत; ही खेदाची गोष्ट आहे. वृत्तपत्रातील मजकूर वाचकांच्या दृष्टीसमोर नित्य येत असल्याने, भाषेवर त्याचा मोठाच प्रभाव पडत असतो व त्यामुळे भाषाप्रदूषण मोठ्या प्रमाणात घडत असते. हे प्रदषण टाळायला हवे आहे. मी (रोज एका शब्दाबद्दल) शब्दचर्चा लिहीत होतो, तेव्हा माझ्या लक्षात येत होते की, वृत्तपत्रांमधून अनेक चुकीचे शब्द भाषेत रुढ होऊ लागलेले आहेत. (योग्य शब्द कंसात) उदाहरणार्थ अबालवृध्द (आबालवृध्द), अधुनिक (आधुनिक), आतंकवादी (आतंककारी), दुरावस्था (दुरवस्था), सहस्त्र (सहस्त्र)... वगैरे. शब्द वापरताना त्यांची व्याकरणिक रचना लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे अयोग्य रुपे सर्रास वापरली जातात. उदाहरणार्थ घेवून (घेऊन), ठेऊन (ठेवून), रहाणे, राहणे (राहाणे), पहाणे, पाहणे (पाहाणे). हृस्व-दीर्घातील बदलाने मराठीत अर्थबदल होत नाही, असे प्रतिपादन अलीकडे आग्रहाने केले जाते आहे.. पण अनेक शब्दांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती दिसते. उदाहरणार्थ- सलिल, सलील. मिलन, मीलन. विशेष म्हणजे अशी ही उदाहरणे `संस्कृत’ भाषेतली आहेत, अशी त्यांची विल्हेवाट लावणारे आणि `भाषिक’ सारखे शब्द त्यासाठी बदलून त्याला `भाषक’ असे रुप देणारे अभ्यासक `तज्ञ’ या मराठी शब्दाला नाकारुन संस्कृत तज्ज्ञ या शब्दाचा पुरस्कार करीत असतात! शब्दांचे अर्थ हे यादृच्छिक असतात,म्हणजेच ते (arbitrary) पध्दतीने त्यांना प्राप्त झालेले असतात, असे मानले जाते; पण हे फार थोड्या व विशेषत: भाषेतील काही मूलभूत शब्दांबद्दलच खरे दिसते. कारण आपल्या मराठी भाषेत अनेक शब्द असे आहेत की त्यांचे अर्थ अन्य काही शब्दांच्या संबंधातून त्यांना प्राप्त झालेले आहेत. उदा. गुण्या, गोपालमुहूर्त, ग्राम्य, कर्णधार-अस्मिता वगैरे. काही सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक परंपरांचा आधार असलेले आणि त्यांतून अर्थ स्पष्ट होणारे अनेक शब्द आपल्या भाषेत आहेत. उदाहरणार्थ- दंपती, दक्षिणा, घटस्फोट, घंगाळ, अनसूया, गवसणे, वगैरे. या परंपरांचा बोध झाला तर या शब्दांचा वापर आपण अधिक जाणकारीने करु शकू. अनेक शब्द आपल्या बोलण्या-लिहिण्यात असतात, पण त्यांचा नेमका अर्थ काय म्हणून प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर माहीत नसते! उदाहरणार्थ- धंदा, व्यवसाय, अमावस्या, ऐरण- वगैरे. कित्येक शब्दांच्या अर्थाबद्दल आपण कधी विचारच केलेला नसतो. उदाहरणार्थ- अरण्यरुदन, गंधमुक्ती, खांदेपालट, प्रपंच, आकाश, शरीर वगैरे. शब्दांच्या काही जोड्या आपल्या भाषेत अश्या आहेत की ज्या जोडीतील दोनही शब्द भिन्नार्थक असूनही एकमेकांऐवजी वापरले जात आहेत! उदाहरणार्थ व्यग्र-व्यस्त, उपहार-उपाहार, वादातीत-वादग्रस्त, आव्हान-आवाहन, चतुरस्त्र-चतुरस्त्र विरोधाभास,गर्हणीय, अशासारखे काही शब्द तर त्यांचा अर्थ लक्षात न घेताच अनेक ज्येष्ठ पत्रकारही सतत वापरीत आलेले आहेत! वास्तविक हे शब्द संदर्भानुसार अतर्विरोध, स्तवनीय-स्तुत्य असे हवेत. वर जे अनेक शब्द उदाहरणादाखल नोंदले आहेत, त्या सर्वांची तर चर्चा शब्दचर्चेत आहेच. पण या चर्चेत अनेक शब्दांच्या नेमक्या अर्थाबद्दलची, किंवा ते ते शब्द नेमके कसे लिहिणे/छापणे योग्य होईल याबद्दलची पृच्छा, अनेक वाचकांनी व विशेषत: पत्रकारांनी केलेली होती, आणि त्यामुळे त्या त्या शब्दांबद्दल विचार केलेला आहे. यापैकी अनेक शब्दांचे मूळ मराठीची आजी असलेल्या संस्कृत भाषेत मिळत होते. त्यानुसार शब्द स्पष्ट करीत असताना अलीकडच्या काही भाषाभिमानी मराठी भाषिक अभ्यासकांच्या मनातील एक शंका-अथवा आक्षेप जाणवत असे. या अभ्यासकांचे म्हणणे असे असते की मराठीने संस्कृतचा हा आधार सोडून दिला पाहिजे! संस्कृतबद्दलचा असा तिरस्कार बाळगण्याने मराठी भाषेचे नुकसान होण्याचीच अधिक शक्यता आहे. मराठी भाषेतून संस्कृतोत्पन्न शब्द काढून टाकायचे ठरविले, तर सत्तर टक्क्यांच्या वर शब्द सोडून द्यावे लागतील! तसे करणे हा आत्मघातच होईल. जे जे शब्द `संस्कृत’ आहेत असे म्हटले जाते, ते जर मराठीत वापरात आहेत,तर ते मराठीच झालेले नाहीत काय? कोणतीही भाषा ही तिच्या व्याकरणिक प्रत्ययांच्या द्वारे केल्या जाणाऱ्या स्वतंत्र वाक्यरचनेने इतर भाषांपासून वेगळी असल्याचे लक्षात येत असते. आपण अनेक इंग्रजी शब्द या पध्दतीने मराठीत समाविष्ट केलेले आहेतच की! `स्टडीरुममधल्या टेबलावरील लँपच्या उजेडात दुसऱ्या दिवसाच्या लेक्चरची तयारी करणारे प्रोफेसर’ ही रचना मराठीच तर असते! कारण या इंग्रजी शब्दांना आपण मराठी प्रत्यय जोडलेले आहेत. मराठीला समृध्द करीत राहणाऱ्या व विशेषत: आपल्या नवनिर्माणक्षमतेचा वारसा मराठीला देणाऱ्या संस्कृतबद्दल दुजाभाव कशाला हवा? मराठी `शुध्द’ लेखनातील काही ढोबळ नियमांचे पालन टाळणेच कसे इष्ट आहे, हेही ही शब्दचर्चा करताना जाणवलेले आहे. शुध्दलेखन म्हणजे काय? ती भाषेतली एक शिस्त असते. त्या शिस्तीमागील प्रयोजन लक्षात घ्यायला हवे की नको? - असेही काही प्रश्न या शब्दचर्चेत आलेले आहेत. परंतु ही शब्दचर्चा म्हणजे केवळ शुध्दलेखनाची अथवा व्याकरणाचीच चर्चा नाही. शब्दाची व्युत्पत्ती, त्याचे लिखित रुप, अर्थक्षेत्र व त्या क्षेत्रात कालौघात झालेला बदल इत्यादी अनेक दृष्टिकोनांतून ही चर्चा, त्या त्या वेळी जाणवलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने मी केलेली आहे. `लोकमत’ने त्यासाठी मला प्रेरित केले होते त्यासाठी लोकमतचे आभार. भाषाप्रदूषण टाळण्यासाठी ही शब्दचर्चा उपयुक्त ठरावी! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more