* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"IS IT TRUE THAT QUEEN SOYRABAI POISONED SHIV CHHATRAPATI? DID SHIVAJI HAVE CONCUBINES? WHY DID SAMBHAJI JOIN DILERKHAN? WAS HE ANNOYED WITH SHIVAJI MAHARAJ? SHIVAJI RAJE DECIDED TO PUT AN END TO ‘WATANDARI’. WAS THIS DECISION A BEGINNING OF SOCIAL REVOLUTION? WAS SHIVAJI BORN IN THE ‘GAVALI-DHANGAR’ CLAN? WHAT IS THE JAMES LANE ISSUE? DR. JAISINGRAO PAWAR HAS DISCUSSED MANY SUCH ISSUES IN THIS BOOK. "
"राणी सोयराबार्इंनी शिवछत्रपतींवर विषप्रयोग केल्याचा आरोप खरा आहे काय?... शिवछत्रपतींना उपस्त्रिया होत्या काय?.... संभाजीराजे शिवछत्रपतींना रुसून दिलेरखानास का मिळाले?.. वलने खालसाचा शिवछत्रपतींचा निर्णय म्हणजे एक आमूलाग्र समाजक्रांतीच कशी होती?...... शिवछत्रपतींचे कूळ ‘गवळी-धनगर’ होते काय?... ‘जेम्स लेन प्रकरण’ काय आहे?.... या व यासारख्या अनेक प्रश्नांची चर्चा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आपल्या या लेख-संग्रहात करत आहेत. "

No Records Found
No Records Found
Keywords
#JAYSINGRAO PAWAR #SHIVACHHATRAPATI EK MAGOVA# #जयसिंगराव पवार #शिवछत्रपती एक मागोवा #
Customer Reviews
  • Rating StarTushar Kute

    इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली? शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते? या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते? तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते? याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more

  • Rating StarRajiv Lute.

    जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि शिवरायांच्या कामगिरीवर वेळोवेळी आणि प्रसंगानुरूप अनेक लेख लिहले आहेत. त्यातील सहा लेखांचा संग्रह म्हणजे शिवछत्रपती : एक मागोवा’ हे छोटेखानी पुस्तक होय. १)शिवछत्रपती आणि त्यंचा परिवार:- शिवाजी महाराजांच्या राजपरिवारातील महत्त्वाच्या व्यक्तींशी असलेल्या शिवाजी महाराजांच्या भावनिक नात्याची चर्चा करणारा हा लेख आहे. २)शिवाजी राजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद:- दुसरा लेख ‘शिवा काशीद’ या शिवकालातील एका सामान्य माणसाच्या असामान्य हौतात्म्याबद्दल आहे. ३)शिवछत्रपती आणि युवराज संभाजीराजे:- तिसरा लेख युवराज संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व पितापुत्राच्या संबंधांची चर्चा करणारा आहे. ४)शिवछत्रपतींचा समाजक्रांतीचा एक महान प्रयत्न:- चौथा लेख शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत स्वराज्यात घडवून आणलेल्या एका महान सामाजिक क्रांतीची ओळख करून देणारा आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना ही महाराजांची थोर राजकीय कामगिरी सर्वांना सुपरिचितच आहे. त्यामुळे एक महान राजकीय क्रांतिकारक म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात रुजली आहे; पण महाराजांची ‘स्वराज्या’ची संकल्पना केवळ परकीय दास्यापासून स्वजनांची मुक्तता एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती; तर जुलमी स्वकीयांच्या पिळवणुकीपासूनची त्यांची मुक्तताही त्यामध्ये त्यांना अभिप्रेत होती. ५)शिवछत्रपतींचे कुल : वास्तव कोणते आणि मिथक कोणते?:- शिवाजी महाराजांचे घराणे जरी रजपूत कुलोत्पन्न असले‚ तरी त्यांनी स्वत:ला ‘रजपूत’ म्हणवून घेण्यात अभिमान बाळगलेला नाही‚ हेही एक ऐतिहासिक वास्तव आहे. महाराज आपणास इतर मराठा क्षत्रियांप्रमाणे ‘मराठा’च मानत होते व त्यामध्ये त्यांना भूषण वाटत होते‚ असा तत्कालीन कागदपत्रांतील‚ म्हणजे खुद्द त्यांच्याच एका पत्रातील दाखला आहे. कर्नाटक दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना मार्च १६७७मध्ये महाराजांनी कुतुबशहाशी भेट झाल्यावर मुधोळच्या मालोजीराजे घोरपडे यांना आपणास या मोहिमेत येऊन मिळावे‚ म्हणून आवाहन करणारे पत्र पाठविले होते. ६)जेम्स लेनचे शिवचरित्र आणि त्याचे ‘कवित्व’:- शेवटचा लेख - ‘जेम्स लेनचे शिवचरित्र व त्याचे कवित्व’ हा लेनच्या शिवचरित्राने व भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर झालेल्या हल्ल्याने महाराष्ट्रात उठलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर लिहिला गेला आहे. या सहा लेखांचे मिळून बनलेले ‘शिवछत्रती: एक मागोवा’ हे पुस्तक शिवप्रेमी, ऐतिहासिक विषयावरील वाचन लेखन करणारे आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणार्यां तमाम मराठी वाचकास मार्गदर्शक आहे. ...Read more

  • Rating StarSandip R Chavan

    जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि शिवरायांच्या कामगिरीवर वेळोवेळी आणि प्रसंगानुरूप अनेक लेख लिहले आहेत. त्यातील सहा लेखांचा संग्रह म्हणजे शिवछत्रपती : एक मागोवा’ हे छोटेखानी पुस्तक होय. १)शिवछत्रपती आणि त्ांचा परिवार:- शिवाजी महाराजांच्या राजपरिवारातील महत्त्वाच्या व्यक्तींशी असलेल्या शिवाजी महाराजांच्या भावनिक नात्याची चर्चा करणारा हा लेख आहे. २)शिवाजी राजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद:- दुसरा लेख ‘शिवा काशीद’ या शिवकालातील एका सामान्य माणसाच्या असामान्य हौतात्म्याबद्दल आहे. ३)शिवछत्रपती आणि युवराज संभाजीराजे:- तिसरा लेख युवराज संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व पितापुत्राच्या संबंधांची चर्चा करणारा आहे. ४)शिवछत्रपतींचा समाजक्रांतीचा एक महान प्रयत्न:- चौथा लेख शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत स्वराज्यात घडवून आणलेल्या एका महान सामाजिक क्रांतीची ओळख करून देणारा आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना ही महाराजांची थोर राजकीय कामगिरी सर्वांना सुपरिचितच आहे. त्यामुळे एक महान राजकीय क्रांतिकारक म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात रुजली आहे; पण महाराजांची ‘स्वराज्या’ची संकल्पना केवळ परकीय दास्यापासून स्वजनांची मुक्तता एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती; तर जुलमी स्वकीयांच्या पिळवणुकीपासूनची त्यांची मुक्तताही त्यामध्ये त्यांना अभिप्रेत होती. ५)शिवछत्रपतींचे कुल : वास्तव कोणते आणि मिथक कोणते?:- शिवाजी महाराजांचे घराणे जरी रजपूत कुलोत्पन्न असले‚ तरी त्यांनी स्वत:ला ‘रजपूत’ म्हणवून घेण्यात अभिमान बाळगलेला नाही‚ हेही एक ऐतिहासिक वास्तव आहे. महाराज आपणास इतर मराठा क्षत्रियांप्रमाणे ‘मराठा’च मानत होते व त्यामध्ये त्यांना भूषण वाटत होते‚ असा तत्कालीन कागदपत्रांतील‚ म्हणजे खुद्द त्यांच्याच एका पत्रातील दाखला आहे. कर्नाटक दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना मार्च १६७७मध्ये महाराजांनी कुतुबशहाशी भेट झाल्यावर मुधोळच्या मालोजीराजे घोरपडे यांना आपणास या मोहिमेत येऊन मिळावे‚ म्हणून आवाहन करणारे पत्र पाठविले होते. ६)जेम्स लेनचे शिवचरित्र आणि त्याचे ‘कवित्व’:- शेवटचा लेख - ‘जेम्स लेनचे शिवचरित्र व त्याचे कवित्व’ हा लेनच्या शिवचरित्राने व भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर झालेल्या हल्ल्याने महाराष्ट्रात उठलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर लिहिला गेला आहे. या सहा लेखांचे मिळून बनलेले ‘शिवछत्रती: एक मागोवा’ हे पुस्तक शिवप्रेमी, ऐतिहासिक विषयावरील वाचन लेखन करणारे आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणार्यां तमाम मराठी वाचकास मार्गदर्शक आहे. (पुस्तकाच्या प्रस्तावना आणि पुस्तकांमधील माहितीचे संक्षिप्त स्वरूपात संकलन) डॉ. जयसिंगराव पवार यांची ग्रंथसंपदा नव्या व आकर्षक छपाई/बांधणीत व किंडल ईबुक मध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल मेहता पब्लिशिंग हाउस धन्यवाद.🙏🙏 ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more