* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DURING HIS TENURE, RAJARSHEE SHAHU CHHATRAPATI CHAIRED MANY SOCIAL MEETINGS AND CONFERENCES. THIS IS A COMPILATION OF ALL HIS SPEECHES. THEY ARE QUITE IMPORTANT AS THEY ARE AN AID TO UNDERSTAND HIM AS A PERSON. HIS SOCIAL REFORMATION SKILLS ARE WELL PORTRAYED THROUGH THEM. SCHOLARS WILL FIND THEM USEFUL. THEY ARE MORE LIKE HIS CODE OF SOCIAL REFORM.
"राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सामाजिक सभांच्या आणि परिषदांच्या व्यासपीठांवरून अध्यक्ष अथवा प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भाषणांचा हा संग्रह आहे. महाराजांच्या चरित्रवाङ्मयात या भाषणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराजांच्या समाजक्रांतीच्या विचारांचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी या भाषणांचे अभ्यासकांना तसेच सामान्य शाहूप्रेमींना मोलाचे मार्गदर्शन होते. १. ‘पूर्वजांची कीर्ती निष्कलंक राखावी’ हा राजर्षी शाहू महाराजांचा मराठा पलटणीस उद्देशून काढलेला जाहीरनामा आहे . (दि. २३ मार्च १९१६). दुसNया महायुद्धात इंग्रजांच्या लष्करातील मराठा पलटण इराकमध्ये तैग्रीस नदीच्या तीरावर एका वेढ्यात अडकून पडली. इंग्रजांना तिच्याकडे अन्नधान्याची रसद पोहोचविता येईना. तेव्हा मराठा सैनिकांवर उपासमारीची पाळी आली. त्यांना घोड्याचे मांस भक्षण करण्यावाचून पर्याय राहिला नाही. परंतु असे मांसभक्षण केल्यास आपण जातिबहिष्कृत होऊ, अशी भीती त्यांना वाटत होती. ही वार्ता समजल्यावर शाहू महाराजांनी आपल्या ज्ञातिबांधवांचे प्राण वाचाविण्यासाठी काढलेला हा जाहीरनामा आहे. प्राप्त परिस्थितीत प्राण वाचवून पूर्वजांची कीर्ती निष्कलंक राखण्याचे आवाहन त्यांनी येथे केले आहे."

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#RAJASHRI SHAU CHATTRAPATICHI BHASHNE# DR. JAYSINGRAO PAWAR#राजर्षी शाहू छत्रपतींची भाषणे# डॉ. जयसिंगराव पवार
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NADIMUKH
NADIMUKH by PERUMAL MURUGAN Rating Star
सुरेश काळे

कालपासून मानसीने भाषांतरित केलेलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पेरुमाल मुरुगन् यांच्या मूळ तमिळ पुस्तकाचं मराठीत भाषांतर वाचायला घेतलं आणि काय सांगू? खालीच ठेववेना! त्याची ओघवती भाषा व आधुनिक कम्प्युटर आणि मोबाईल ह्यांनी घातलेला गोंधळ, रुण पिढीवर केलेली जादू यांनी भारावून गेलो. एक उत्तम पुस्तक वाचनात आलं, असं वाटू लागलं. ते बऱ्याच जणांच्या बाबतीत डोळ्यात अंजन घालणार ठरेल असं वाटलं. विशेषतः किरकिर करणाऱ्या, सतत रडत राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईलची सवय लावणाऱ्या पालकांना हा मोठा झटकाच आहे. यातील नायक कुमारासुर हा असुर-संगणक नावाच्या राक्षसाच्या मायाजालाला म्हणजेच इंटरनेटपासून जेवढा स्वतःला दूर ठेवत जातो तसतसा तो त्यातच गुंतत जातो. त्याचा मुलगा हा संगणकतज्ज्ञ बनू पाहतो. त्याला म्हणजे नायक मेघासला कोणकोणत्या दिव्यातून प्रवास करावा लागतो याचे या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकात चित्रण केले आहे. भाषांतरकाराने पण त्याच्या ओघवत्या शैलीने त्याचे प्रामुख्याने वर्णन छान केलंय. विशेषतः कॉलेजची विद्यार्थी वर्गाप्रती आणि आपल्याच महाविद्यालयाने पहिल्या वर्गात यावे याची केलेली व्यवस्था अतिशय वास्तववादी झाली आहे. असे घडू शकते आणि सर्वसामान्य माणसाला ही मायावी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस कुठल्या दर्जाचे विद्यार्थी घडवतात आणि त्यांच्या जीवाशी खेळतात हे कळून येईल इतके प्रभावी चित्रण ह्यात केले आहे. एका ज्वलंत विषयाला आपल्या सडेतोड भाषेने व लेखणीने जनतेपुढे आणण्याबद्दल अत्यंत आभार! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
...ए.के.देशमुख, पेनसिल्वेनिया (यु.एस.ए.)

`छाटितो गप्पा` हे मी वाचलेलं जी.बी.देशमुखांचं पाचवं पुस्तक. अमेरिकेत मुलीकडे मुक्कामी आलो असता मिळालेल्या निवांत वेळेत मी हे पुस्तक वाचलं. पुस्तक वाचताना खुप मजा वाटली. लेखकापेक्षा मी वयाने ज्येष्ठ असल्यामुळे मला अमरावती शहराची रचना, तिथली संस्कती आणि इतर संदर्भात त्या काळी झालेला विकास लेखकाच्या आधी अनुभवण्याची संधी मिळाली होती. राजेंद्र कॉलनी अस्तित्वात आल्यापासूनच माझ्या परिचयाची होती आणि तिथल्या घर क्र. १० मधे काही काळ माझा निवास देखील होता. `छाटितो गप्पा` वाचताना अंबागेट ते राजेंद्र काॅलनी दरम्यान अनेक वेळा सायकल किंवा सायकल-रिक्षाने केलेल्या येरझारा आठवल्या. त्या वेळी अमरावतीचा बहुचर्चित रेल्वे पुल देखील बांधला गेला नव्हता. "छाटितो गप्पा " हे पुस्तक मला अमरावती मधील माझ्या महाविद्यालयातील मोरपंखी दिवसात घेऊन गेले. त्या दिवसात अनेक जागी दिलेल्या भेटिंची पुन्हा एकदा उजळणी झाली. तेव्हाची व आजची अमरावती नजरेसमोर तरळू लागली. आयुष्यात अशा लहान सहान गोष्टी आपण सर्वच अनुभवत असतो पण लेखकाने त्या पुस्तक रुपात अत्यंत खुमासदार पद्धतीने वाचकांसमोर आणल्या. म्हणून लेखकाचे विषेश अभिनंदन व आगामी लेखनाकरीता खुप खुप शुभेच्छा. ...Read more