* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386745187
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 1997
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHYAM BHURKE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"THIS BOOK IS A COMPILATION OF MANY MEMORIES REGARDING THE GREAT MARATHI HUMORIST, P.K. ATRE. HE HAD EXTENSIVELY WRITTEN IN THE ‘NAVYUG’. THIS BOOK PRESENTS SELECTIVE WRITINGS. ALONG WITH A FEW POEMS AND SMALL INCIDENCES THERE ARE MANY NOTES INCLUDED HERE. ATRE WAS AN EDITOR OF NEWSPAPER, BUT, HIS WRITING WAS NOT LIMITED BY IT. RATHER, HE WAS A VERSATILE LITTERATEUR. THIS BOOK TRIES TO FATHOM THE VASTNESS OF VARIOUS FORMS OF HIS WRITING. ‘NAVKAVINCHI TOLDHAD’, ‘OLAVA KAVITECHA’, ‘KAVICHE PIK’, ‘MIRZA GALIB’, ‘CHORANCHE SAMMELAN’, ETC. ARE A FEW OF HIS FAMOUS WORKS. THIS BOOK TELLS US MORE ABOUT THE DRAMAS WRITTEN BY HIM. THESE INCLUDE NOTES ON ‘NAMAN NATVARA’, ‘MARATHITIL PAHILE BOOKISH NATAK’, ‘MARATHI NATYSAMMELANE VA TYANCHE ADHYAKSH’, ETC. A FEW ARTICLES BASED ON THE CINE WORLD LIKE ‘NUTANLA ADVILE’, ‘TAPORYA DOLYANCHI HASARI NATI-MALA SINHA’, ‘GA DI MANNI LACH GHETALI’, ‘SANDHECHA SINHASHI SAMNA’, DAMUANNA MALVANKAR’, ETC. ARE INCLUDED HERE. ‘KON SUNDER? STREE KI CHANDRA?’, ‘STRI MHANJE RAMY KAVY’, ‘BAYKANCHI SHUDDH MARATHI’, ETC. ARE ARTICLES WRITTEN WITH WOMEN AT THE CENTRE. ATRE WAS FAMOUS FOR HIS LECTURES. A FEW OF THE ARTICLES INCLUDED HERE ARE BASED ON ‘PU LANCHE VYAKHYAN’, ‘ASE VAKTE ASHA SABHA’, ‘VAKTRUTVACHYA GAMTI’, ETC. WHERE LECTURE IS THE MAIN CONCEPT. A FEW ARTICLES ARE WRITTEN ON FAMOUS PERSONALITIES LIKE DURGA KHOTE, NATH MADHAV, NANA JAGANNATH SHANKARSHETH, FAMOUS OLYMPIC PLAYER MILKHA SINGH AND OTHERS. AS THESE ALL ARE NEWSPAPER ARTICLES, THERE IS A LOT OF VARIETY SEEN. ‘TAPAL SANSTHECHI TEENSHE VARSH’, ‘MUMBAITALA PAHILA BARF’, ‘SAATH SALATIL BHRASHTACHAR’, ‘AMBRASAT KOKANI KAVA’ ARE A FEW TO NAME. THE POEMS INCLUDED HERE ARE ‘SHETANICHE PREMPATR’, ‘KASHAS KAY MHANU NAYE’, ‘BHUPALI VINAKARYACHI’, ‘RABAR JINKACH’, ETC. SHIRISH PAI HAD INTERVIEWED LATA MANGESHKAR UNDER THE TITLE ‘TULSHICHI MANJIRI-LATA’. IT IS INCLUDED IN THIS BOOK. THE MANGALASHTAKA BY SOPANDEV CHOUDHARI, ESPECIALLY FOR SHIRISH PAI’S MARRIAGE ARE INCLUDED HEREIN. EXTENSIVE NOTES ON ‘ATRE-PHADKE VAAD’, ‘ATRE ANI MATE’ ARE INCLUDED HERE. PROF. KRUSHNAJI PANDURANG KULKARNI HAD PREPARED A LIST OF HUNDRED MOST IMPRESSIVE MAHARASHTRIANS FOR THE 1945 DIWALI EDITION OF NAVYUG. IT IS INCLUDED HERE. THIS BOOK IS THUS BECOME A KALEIDOSCOPE WITH THE MANY FORMS OF LITERATURE BY P. K. ATRE "
"‘खुमासदार अत्रे’ हे एक प्रसन्न संकलन आहे, म्हटलं तर इतिहासातील काही नोंदी आहेत. अत्र्यांच्या ‘नवयुग’च्या वीस वर्षांतील अंकांमधून वेचलेलं हे साहित्य आहे. या साहित्यातील छोट्या छोट्या टिपणांचा या पुस्तकात समावेश केला आहे. अर्थातच ही टिपणं विविधरंगी आहेत. काही कविता, एखादी सूची इ. बाबी संपूर्णपणेही समाविष्ट केल्या आहेत. अत्रे हे केवळ वृत्तपत्राचे संपादक नव्हते, तर त्यांच्या अनेक पैलूंपैकी एक अत्यंत सामथ्र्यशाली पैलू होता साहित्याचा. ते अष्टपैलू साहित्यिक होते. या वेचलेल्या साहित्यामध्ये साहित्यविषयक अनेक टिपणं आहेत. जसे ‘नवकवींची टोळधाड,’ ‘ओलावा कवितेचा,’ ‘कवीचे पीक,’ ‘मिर्झा गालिब’, चोरांचे संमेलन’ इ. नाटककार अत्रे हा अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक प्रभावशाली पैलू. साहजिकच नाटक या विषयावरची अनेक टिपणं या पुस्तकातून वाचायला मिळतात. उदा. ‘नमन नटवरा’, ‘मराठीतील पहिले बुकीश नाटक’, ‘मराठी नाट्यसंमेलने व त्यांचे अध्यक्ष’ इ. सिनेसृष्टीविषयीची काही टिपणंही यात समाविष्ट आहेत. जसे ‘नूतनला अडविले’, ‘टपोNया डोळ्यांची हसरी नटी - मालासिन्हा’, ‘ग. दि. मांनी लाच घेतली’, ‘संध्येचा सिंहाशी सामना,’ ‘दामुअण्णा मालवणकर.’ इ. ‘कोण सुंदर? स्त्री की चंद्र?’, ‘स्त्री म्हणजे रम्य काव्य’, ‘स्त्री व विनोद’, ‘बायकांची शुद्ध मराठी’ असे स्त्रीविषयक लेख यात आहेत. अत्र्यांची व्याख्यानं हाही एक वैशिष्ट्यपूर्ण विषय. त्यामुळे व्याख्यानांबाबतचे ‘पु. लं.चे व्याख्यान,’ ‘असे वत्तेÂ, अशा सभा’, ‘वत्तृÂत्वाच्या गमती’ इ. लेख या पुस्तकात आहेत. काही व्यक्तिविषयक टिपणंही यात आहेत. जसे ‘दुर्गा खोटे’, ‘नाथमाधव’, ‘नाना जगन्नाथ शंकरशेठ’, ‘ऑलिंपिकपटू मिल्खासिंग’इ. अर्थातच ही वृत्तपत्रांतील टिपणं असल्यामुळे त्यात कमालीची विविधता आहे. ‘टपाल संस्थेची तीनशे वर्षे’, ‘मुंबईतला पहिला बर्पÂ’, ‘साठ सालातील भ्रष्टाचार’, ‘आंबरसात कोकणी कावा’ इ. अनेक प्रकारची टिपणं यात वाचायला मिळतात. ‘शेटाणीचे प्रेमपत्र’, ‘कशास काय म्हणू नये’, ‘भूपाळी विणकNयाची’, ‘रबर जिंकाच’ या कवितांचाही समावेश या पुस्तकात आहे. लता मंगेशकर यांच्या शिरीष पै यांनी घेतलेल्या मुलाखतीचं टिपण ‘तुळशीची मंजिरी लता’ या शीर्षकासह या पुस्तकात वाचायला मिळतं. तर शिरीष पै यांच्या लग्नासाठी सोपानदेव चौधरी यांनी रचलेल्या मंगलाष्टकाचाही या पुस्तकात समावेश आहे. ‘अत्रे-फडके वाद’, ‘अत्रे आणि माटे’ ही टिपणंही वाचण्यासारखी आहेत. येवढंच नाही तर प्रा. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी १९४५ सालच्या नवयुगच्या दिवाळी अंकात दीडशे वर्षातील शंभर कर्तबगार महाराष्ट्रीयन व्यक्तींची जी सूची दिली आहे, तिचाही समावेश या पुस्तकात आहे. तर हे पुस्तक म्हणजे विविधरंगी टिपणांचं, कवितांचं, लेखांचं, विडंबनांचं संकलन आहे."

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #KHUMASDARATRE #KHUMASDARATRE #खुमासदारअत्रे #SHORTSTORIES #MARATHI #SHYAMBHURKE #श्यामभुर्के "
Customer Reviews
  • Rating Starलोकप्रभा ९/२/२०१८

    आचार्य अत्रे म्हणजे मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव. त्यांनी मांडलेले विषय, विचार हे आजही तितकेच ताजे आहेत. त्यांच्या शैलीची वाहवा आजहा होतेच. अत्रे यांनी ‘नवयुग’ या साप्ताहिकात अनेक वर्षं लेखन केलं होतं. त्यांच्या या लेखनाचं संकलन म्हणजे ‘खुमासदर अत्रे’ हे पुस्तक होय. प्रा. श्याम भुर्के यांनी ‘नवयुग’ या साप्ताहिकाचे अनेक अंक चाळून, वाचून केलेला मधुसंचय म्हणजे ‘खुमासदार अत्रे’ होय. हे पुस्तक वाचून वाचकांना आचार्य अत्रे यांच्या उत्साहवर्धक आणि प्रसन्नतेनं बहरलेल्या सहवासाचा आनंद मिळेल हे निश्चित! ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 21-01-2018

    अत्रे यांच्या खुमासदार टिपणाचं अनोखे संकलन... श्याम भुर्के यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चीफ मॅनेजर, रिजनल मॅनेजर, ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य, तीन बँकांवर संचालक म्हणून काम केले. सध्या आझेलटेक प्रा. लि. पुणे आणि अमेरिका येथे संचालक आहेत. आतापर्यंत वििध विषयांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘खुमासदार’ ज्यातून त्यांनी आ. अत्रे यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकांचे अंक वाचून त्यातला खुशखुशीत भाग निवडला आणि तो पुस्तकात संग्रहित केला. या पुस्तकात अत्रे त्यांच्या लेखणीनं प्रसवलेला स्फोटक मजकूर तर आहेच, पण दत्तू बांदेकरांचे, मजेदार, विनोदी किस्से आणि वचनं आहेत. ‘नवयुग’च्या वीस वर्षांच्या आमदानीत जे जे लेखकाच्या दृष्टिकोनातून-लक्षणीय लेखन ‘नवयुग’मध्ये आले ते इथं वाचकांच्या भेटीला आले आहे. त्याची मांडणी खास श्याम भुर्केच्या शैलीतून आहे. हे पुस्तक वाचताना आ. अत्रे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आणि निष्णात संपादनाचा प्रत्यय तर येतोच, पण महाराष्ट्रातील वीस वर्षांच्या महत्त्वाच्या घटनांचा एक चित्रपटच डोळ्यांसमोरून सरकत जातो. नामवंत लेखकांच्या भेटीही या पुस्तकातून घडतात. त्यांची विशेष मौज वाटते. लेखकाला उत्तम विनोददृष्टी असल्यामुळे त्यांनी जे जे संग्रहित केलं ते निश्चितच ‘खुमासदार’ आहे. पुस्तकाचे वाचन करताना त्यातील विविधतेनं मन थक्क होते आणि क्षणभरही पुस्तक खाली ठेवावेसं वाटत नाही हे या सग्रहाचे खरे यश. ‘नवयुग’ने महाराष्ट्राच्या जीवनात एकमेद्वितीय स्थान सतत वीस वर्षे मिळवलं होतं. त्यांच्या यशात अत्रे यांच्या लेखणीचा सिंहाचा वाटा होता. पण दत्तू बांदेकरांचा खुसखुशीत विनोद, श्री. बाळ ठाकरेंची व्यंगचित्रे आणि महाराष्ट्रातले अनेक नामवंत लेखक ‘नवयुग’मधून उदयाला आले. ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलना’त तर या ‘नवयुग’ जी कामगिरी केली ती अजोड आहे. महाराष्ट्राचा सारा सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिक इतिहास म्हणजे ‘नवयुग’. एखाद्या विस्मृत बहारदार उपवनातून मधमाशीनं हिंडून हिंडून मध गोळा करावा तसं ‘नवयुग’चे वीस वर्षांचे असंख्य अंक बारकाईनं वाचून श्याम भुर्के यांनी त्यातून जो मधुसंचय केला त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन. काही खुमासदार उदा. ‘कोण सुंदर? स्त्री की चंद्र?’ हा वाद मिटवण्यासाठी परमेश्वराने एक मोठा सोन्याचा तराजू आणला. एका पारड्यात स्त्रीला आणि दुसऱ्या पारड्यात चंद्राला घातले. अन् तराजू वर उचलला तो काय? चंद्राचे पारडं वर गेलं. तो राहिला आभाळात आणि स्त्री पृथ्वीतलावर!’ ‘ओळंबा कवितेचा’- आ. अत्रे एकदा अनंत काणेकर यांना म्हणाले, ‘तुम्हाला एक गणित सांगतो या गणिताचे उत्तर तुम्ही बरोबर दिलंत तरच नवकाव्य तुम्हाला एकदम समजेल!’ ‘हे घ्या गणित, दोन पैशांना चार पेरू, तर फडक्यांच्या हौदात पाणी किती?’ अशा रीतीने नवकाव्यातल्या अर्थहीनतेची ते टर उडवीत. -डॉ. शैलजा यादवाड ...Read more

  • Rating Starसकाळ १९.११.२०१७

    प्र.के.अत्रे यांनी वेगवेगळ्या साहित्यप्रकारातून मांडलेल्या विनोदाचं संकलन प्रा. भुर्के यांनी केलं आहे. मंदस्मित करायला लावणाऱ्या विनोदापासून खदखदून हसायला लावणाऱ्या विनोदपर्यंत अनेक प्रकार अत्रे यांच्या लेखनातून दिसतात. भुर्के यांनी त्यातले नेमके आणिखुमासदार विनोद निवडले आहेत. कोणतही पान उघडावं आणि अत्रे यांच्या लेखणीतून उतरलेल्या विनोदाचा आस्वाद घ्यावा असं हे पुस्तक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.