* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE WHISTLEBLOWER
  • Availability : Available
  • Translators : SINDHU JOSHI
  • ISBN : 9788184989168
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2015
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 220
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : MEMOIR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHEN NEBRASKA POLICE OFFICER AND DIVORCED MOTHER OF THREE KATHRYN BOLKOVAC SAW A RECRUITING ANNOUNCEMENT FOR PRIVATE MILITARY CONTRACTOR DYNCORP INTERNATIONAL, SHE APPLIED AND WAS HIRED. GOOD MONEY, WORLD TRAVEL, AND THE CHANCE TO HELP REBUILD A WAR-TORN COUNTRY SOUNDED LIKE THE PERFECT JOB. BOLKOVAC WAS SHIPPED OUT TO BOSNIA, WHERE DYNCORP HAD BEEN CONTRACTED TO SUPPORT THE UN PEACEKEEPING MISSION. SHE WAS ASSIGNED AS A HUMAN RIGHTS INVESTIGATOR, HEADING THE GENDER AFFAIRS UNIT. THE LACK OF PROPER TRAINING PROVIDED SOUNDED THE FIRST ALARM BELL, BUT ONCE SHE ARRIVED IN SARAJEVO, SHE FOUND OUT THAT THINGS WERE A LOT WORSE. AT GREAT RISK TO HER PERSONAL SAFETY, SHE BEGAN TO UNRAVEL THE UGLY TRUTH ABOUT OFFICERS INVOLVED IN HUMAN TRAFFICKING AND FORCED PROSTITUTION AND THEIR CONNECTIONS TO PRIVATE MERCENARY CONTRACTORS, THE UN, AND THE U.S. STATE DEPARTMENT. AFTER BRINGING THIS EVIDENCE TO LIGHT, BOLKOVAC WAS DEMOTED, FELT THREATENED WITH BODILY HARM, WAS FIRED, AND ULTIMATELY FORCED TO FLEE THE COUNTRY UNDER COVER OF DARKNESS?BRINGING THE INCRIMINATING DOCUMENTS WITH HER. THANKS TO THE EVIDENCE SHE COLLECTED, SHE WON A LAWSUIT AGAINST DYNCORP, FINALLY EXPOSING THEM FOR WHAT THEY HAD DONE. THIS IS HER STORY AND THE STORY OF THE WOMEN SHE HELPED ACHIEVE JUSTICE FOR.
नेब्रास्कातील पोलीस अधिकारी आणि मुलांची घटस्फोटित माता कॅथरीन बोल्कोव्हॅक खासगी लष्करी कंत्राटदार डीनकॉर्प इंटरनॅशनल या कंपनीची नोकरभरतीची जाहिरात बघते, अर्ज करते आणि भरती होते. चांगली कमाई, जगभर प्रवास आणि युद्धामुळे छिन्नभिन्न झालेल्या देशाची पुनर्बांधणी करण्याची संधी म्हणजे तिच्यासाठी उत्कृष्ट संधी असते. लवकरच ती बोस्नियात पोहोचते. युनोच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या कामगिरीत मदत करण्यासाठी डीनकॉर्पला कंत्राट दिले जाते. तिच्याकडे मानवी हक्क अन्वेषक आणि लिंगविषयक विभागाची प्रमुख म्हणून काम सोपवण्यात येते. योग्य असे प्रशिक्षण दिले गेले नसल्याने तिच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागते; परंतु साराजेव्होत आल्यानंतर तिला कल्पना नव्हती, इतक्या वाईट गोष्टींचा ती छडा लावते. जीव धोक्यात घालून कॅथी अत्यंत घृणास्पद गोष्टींचा शोध घेऊ लागते. खासगी भाडोत्री सैनिकांच्या कंत्राटदाराबरोबर, युनो व अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याबरोबर साटेलोटे असणाऱ्या मानवी व्यापारात गुंतलेल्या महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्याची बिंगे ती फोडते. लवकरच तिची पदावनती करून तिला नोकरीवरून बडतर्फ केले जाते. जिवे मारले जाण्याच्या भीतीने ती बोस्निया सोडते. गोळा केलेले सर्व पुरावे सतत जवळ बाळगून ठेवल्यामुळे डीनकॉर्पविरुद्ध दाखल केलेला खटला ती जिंकते. डीनकॉर्पची काळी कृत्ये उजेडात आणण्यात यशस्वी होते. इथे दुसऱ्या देशात खेळवल्या जाणाऱ्या युद्धाच्या मुळाशी असणारे धोके ओळखून कॅथी सावध राहण्याचा इशारा देत आहे. रक्षण आणि गुलामीसदृश आयुष्य कंठणाऱ्याची शांतता काळात सुटका करण्याच्या जबाबदारीची ती जाणीव करून देते. तुलना होऊ न शकणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीबरोबर मुकाबला करताना आपल्या मनाची पकड घेणारी आणि चांगली कामे करण्यास उत्तेजन देऊन आश्चर्यचकित करणारी, धैर्य आणि प्रतिष्ठा अबाधित ठेवणारी ही सत्य कहाणी. अन्यायाविरुद्ध उठणारा फक्त एक आवाज किती किमया करू शकतो, याचा प्रत्यय देते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #EKAKIBAND #THEWHISTLEBLOWER #एकाकीबंड #MEMOIR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SINDHUJOSHI #KATHRYN BOLKOVACCARILYNN "
Customer Reviews
  • Rating StarDivya Marathi 16.12.16

    लैगिंक शोषणासाठी मानवी व्यापार करणा-या लष्करी कंत्राटदाराच्या विरोधात लेखिकेचा न्यायासाठी लढा म्हणजेच द व्हिस्टल बॉलर अर्थात एकाकी लढा हे पुस्तक. नेब्रास्कातील पोलिस अधिकारी आणि मुलांची घटस्फोटित माता कॅथरिन बोल्कोव्हॅक खासगी लष्करी कंत्राटदार डीनकर्प इंटरनॅशनल या कंपनीची नोकरीभरतीची जाहिरात बघते, अर्ज करते आणि भरती होते. चांगली कमाई, जगभर प्रवास आणि युद्धामुळे छिन्न-भिन्न झालेल्या देशाची पुनर्बांधणी करण्याची कामगिरी म्हणजे तिच्यासाठी उत्कृष्ट संधी असते. लवकरच ती बोस्नियात पोहोचते. युनोच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या कामगिरीत मदत करण्यासाठी डीनकॉर्पला कंत्राट दिले जाते. तिच्याकडे मानवी हक्क अन्वेषक आणि लिंगविषयक विभागाची प्रमुख म्हणून काम सोपवण्यात येते. योग्य असे प्रशिक्षण दिले गेले नसल्याने तिच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागते. पण साराजेव्होत आल्यानंतर तिला कल्पना नव्हती, इतक्या वाईट गोष्टींचा ती छडा लावते. जीव धोक्यात घालून कॅथी अत्यंत घृणास्पद गोष्टींचा शोध घेऊ लागते. खासगी भाडोत्री सैनिकांच्या कंत्राटाबरोबर, युनो व अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याबरोबर साटेलोटे असणा-या मानवी व्यापारात गुंतलेल्या महिलांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणा-या अधिका-यांनी भिंगे ती फोडते. लवकरच तिची पदावनती करून तिला नोकरीवरून बडतर्फ केले जाते. जिवे मारले जाण्याच्या भीतीने ती बोस्निया सोडते. गोळा केलेले सर्व पुरावे सतत जवळ बाळगून ठेवल्यामुळे डीनकॉर्पविरूद्ध दाखल केलेला खटला ती जिंकते. डीनकॉर्पची काळी कृत्ये उजेडात आणण्यात यशस्वी होते. अशा सगळ्या घटनांची एक तरल कथा या ‘एकाकी बंड’ या पुस्तकातून देण्यात आली आहे. कॅथरिन बोल्कोव्हॅक आणि कॅरी लीन यांनी ‘द व्हिस्टलबॉलर’ या नावाने हे पुस्तक लिहिले असून सिंधू जोशी यांनी ‘एकाकी बंड’ या नावाने त्याचा अनुवाद केला आहे. विशेष म्हणजे या पुस्तकावर आधारित चित्रपट देखील प्रदर्शित झालेला आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून मानवी व्यापारातील बळींच्या पाठीशी उभे राहण्याचे आणि निर्भीडपणे सत्य समोर आणण्याचे विलक्षण धाडस करणारी कॅथी एक असामान्य स्त्री आहे. हे तर या पुस्तकातून कळतेच, पण एक नवी प्रेरणाही मिळते. ...Read more

  • Rating StarLOKSATTA 7-2-16

    ही कहाणी आहे एका धाडसी स्त्रीची. कॅथरिन बोल्कोव्हॅक ही अमेरिकेतील नेब्रास्का राज्यातील माजी पोलिस अधिकारी. तिचा जन्म बोल्कोव्हॅक घराण्यातला. ती वडिलांच्या घराण्याकडून क्रोएशिअन आहे, तर तिची आई मूळची ओहायो राज्यातील रहिवासी; पण तिच्या आई-वडिलांबरोबर अेक वर्ष दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य केलेली. आई-वडील दोघांकडूनही तिला दणकट शरीरयष्टीचा वारसा लाभला. भावंडांत दुसरी असणारी कॅथरिन लहानपणापासूनच तब्येतीने एकदम धडधाकट, सशक्त होती. सहा फुटांच्या आसपास सणसणीत उंची आणि दणकट बांधा असणाऱ्या कॅथरिनला फुटबॉल, व्हॉलीबॉल असे धसमुसळे खेळ मनापासून आवडायचे. भरपूर व्यायाम करायचा आणि भरपूर आहार घ्यायचा असा तिचा लहानपणापासूनचा दिनक्रम होता. पदवीधर होण्याच्या आतच लवकर लग्न करून वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत ती तीन मुलांची आई झाली. सुरुवातीची काही वर्षं तिने हॉटेलमध्ये नोकरी केली. लग्नानंतर दहा वर्षातच तिने घटस्फोट घेतला आणि नवऱ्यापासून विभक्त झाली. अपयशी ठरल्याच्या भावनेनं तिला घेरून टाकलं. त्याच सुमारास वर्तमानपत्रात आलेल्या लिंकन पोलीस खात्याच्या एका जाहिरातीनं तिचं लक्ष वेधून घेतलं. १९८९ मध्ये तिने त्यासाठी मुलाखत दिली आणि तिची निवड झाली. कामाला सुरुवात केल्यानंतर जणू त्याच कामाकरता आपला जन्म झाला आहे, एवढी आत्मीयता तिला त्या कामाबद्दल वाटू लागली. तिच्या नीडर कार्यपद्धतीमुळे तिला ‘झेना’ (एक लढाऊ राजकन्या) असं टोपणनावही मिळालं. पण आठ-नऊ वर्ष सलग काम केल्यानंतर गुन्हेगार आणि त्यांच्या जगाशी कामामुळे येणारा सततचा संपर्क आणि त्यातील धोके यापासून तिला दूर जावसं वाटू लागलं. आणि त्याच वेळेस तिच्या पोलीस स्टेशनात डीनकॉर्प कंपनीची ‘युनो’च्या ‘इंटरनॅशनल पोलीस टास्क फोर्स बोस्निया’मध्ये एक वर्षाकरिता निवृत्त पोलीस अधिकाऱयांच्या भरतीविषयीची जाहिरात झळकली. तिने लगेच ती संधी साधून अर्ज भरला आणि अर्थातच प्रशिक्षणाकरिता तिची निवड झाली. इतकचं नव्हे तर त्यातूनही ठणठणीत तब्येत आणि खणखणीत मन यांच्या जोरावर ‘आयपीटीएफ’मध्ये ती दाखलही झाली. वयाच्या अडतिसाव्या वर्षी एका वर्षाकरिता मुलांपासून दूर ५००० मैलांवर असलेल्या ठिकाणी जाण्याचा तिचा निर्णय सोपा नक्कीच नव्हता. परंतु मुलांनीच तिला मनापासून धीर आणि पाठिंबा दिला आणि जून १९९९ मध्ये ती तिच्या पथकाबरोबर बोस्नियातील सारायेव्हो शहरात ‘यूनो’च्या कार्यालयात दाखल झाली. इथे ‘आयपीटीएफ’तर्फे निवडले गेलेले आणि ‘यूनो’च्या ४५ सभासद देशांमधून आलेले जवळजवळ २००० पोलीस अधिकारी एकत्र आले. त्या सर्वांकडे जी कामगिरी सोपवण्यात आलेली होती, त्याला त्या भूप्रदेशातील अनेक वर्ष चाललेल्या युद्धाची पार्श्वभूमी होती. १९९२च्या सुरुवातीला युगोस्लाव्हिया या देशातील साम्यवादाचं, कम्युनिस्ट सत्तेचं उच्चाटन झालं. परंतु त्याचवेळी सर्बिया प्रांताच्या अध्यक्षांची सत्ता प्रबळ होत होती. या दोन गोष्टींमुळे बोस्निया आणि हरझेगोव्हिया या दोन प्रांतांनी युगोस्लाव्हियापासून स्वतंत्र व्हायचं ठरवलं. त्या दोन प्रांतांत पूर्वीपासूनच कॅथलिक पंथाचे क्रोएटस्, सनातनी वृत्तीचे सर्ब आणि मुस्लीम असे भिन्नधर्मीय लोक एकत्र नांदत होते. पण एप्रिल १९९२ नंतर हे सर्व चित्र बदलत गेलं. सर्बियन लोकांनी सारायेव्हो शहरातील मुस्लीम आणि क्रोएट्स समुदायांवर हल्ले करायला सुरुवात केली. जिथे जिथे बोस्नियन नागरिक राहत होते तिथे तिथे हे हल्ले चालू होते. शेवटी तर सर्बियन हुकूमशहाने सारायेव्हो शहराची नाकेबंदी करून शहराला सैनिकांचा वेढा घातला. आजवर जगभरात झालेल्या अनेक युद्धांच्या इतिहासात एखाद्या राजधानीच्या शहराची सर्वात जास्त काळ केलेली ही नाकेबंदी ठरली. शेवटी डिसेंबर १९९५ मध्ये ‘डेटन शांती करारा’’ने साडेतीन वर्ष चाललेल्या या एकतर्फी युद्धाचा शेवट झाला आणि बोस्निया आणि हरझेगोव्हिया असे दोन नवे देश अस्तित्वात आले. ‘डेटन शांती करारा’प्रमाणे ‘यूनो’च्या सुरक्षा समितीने बोस्निया आणि हरझेगोव्हिया या देशांत मनुष्यहिताची कामं करणं अपेक्षित होतं त्यात युद्धात निर्वासित झालेल्या लोकांची सोय बघणं, जमिनीत पेरलेले सुरुंग नष्ट करणं, मानवी हक्कांची जपणूक करणं, निवडणूक घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं, आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना करणं, रस्ते, नागरी आणि पायाभूत सुविधा यांची पुर्नबांधणी करणं, पोलीस यंत्रणा नव्याने उभारणं, त्याकरिता पोलीस भरती करणं आणि त्या निवडलेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण करणं, अशी ही अनेक कामांची यादी होती. त्याकरिता बोस्नियात ‘इंटरनॅशनल पोलीस टास्क फोर्स’ (आयटीपीएफ) आणि नागरी कामांकरिता कार्यालय स्थापन करण्यातं आलं. ‘आयटीपीएफ’ तयार करण्याकरिता ‘यूनो’ला सभासद देशांच्या अंतर्गत पालिस यंत्रणेतून माणसं पुरवण्यात आली. अपवाद होता तो अमेरिकेचा. कारण त्या देशात पोलीस व्यवस्था ही त्या- त्या शहराची आणि राज्याची जबाबदारी असते. म्हणून तिथे अशी भरती करण्याकरता ‘डीन कॉर्प’ या खाजगी संस्थेला कंत्राट देण्यात आलं. ‘डीन कॉर्प’तर्फे कॅथरिन सारायेव्होत दाखल झाली, पण तिला फक्त कार्यालयीन कामात रस नव्हता. म्हणून तिने मानवी हक्क जपणुकीसंबंधीचं कामाचं क्षेत्र निवडलं. त्याकरिता इलिझा गावात तिची नेमणूक करण्यात आली. तिथे तिच्याबरोबर व्हेनेटा नावाची एक अमेरिकन सहकारीही होती. तिच्यावर आता युद्धकाळात घर सोडून पळून गेलेल्या लोकांचं पुनर्वसन करण्याची किचकट जबाबदारी होती. कारण युद्धापूर्वी युगोस्लाव्हियातील बोस्नियात सर्व लोक, क्रोएट्स आणि मुस्लिम लोक वेगवेगळ्या भागांत वस्त्या करून राहत होते. परंतु युद्धानंतर सर्वत्र अंदाधुंदी माजली होती. निर्वासितांच्या छावणीत जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा होता. त्यांची सोय लावण्याचं काम कॅथरिनला दिवसभर पुरून उरायचं. याशिवाय बोस्नियातील पोलीस खात्याची नव्याने उभारणी करण्याचं कामही तिच्याच विभागाकडे सोपवण्यात आलेलं होतं. मुळातच अतिशय कमी वेतनावर काम करणाऱ्या तिथल्या पोलीस खात्यात लाचखाऊपणा आणि भ्रष्टाचाराला ऊत आला होता. पोलीसांची नागरिकांशी वर्तणूक मग्रुरीची आणि उर्मट होती. याला वळण लावण्याच्या अतिशय अवघड कामात कॅथरिन तिच्या सहकाऱ्यांसमवेत गुंतली. त्यानंतर काही काळातच तिच्यातील गुणवत्ता हेरून तिच्यावर स्त्रियांवरील हिंसाचाराची परिणामकारक उकल करणं- अशा स्वरूपाची जबाबदारी सोपवण्यात आली. आणि ऑक्टोबर १९९९ ते डिसेंबर १९९९ या कालावधीत झेनिया या सारायेव्होच्या उत्तरेला असलेल्या गावात तिने आपल्या कामाची सूत्र हाती घेतली. या ठिकाणी प्रसंगी जीव धोक्यात घालून कॅथरिनने अत्यंत घृणास्पद गोष्टींचा शोध लावला. ‘डीन कॉर्प’ सारख्या खाजगी भाडोत्री सैनिकांच्या कंत्राटदाराबरोबर, ‘यूनो’ आणि अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याबरोबर साटंलोटं असणाऱ्या अधिकाऱयांची मानवी व्यापारात अडकलेल्या स्त्रियांना जबरदस्तीने वेश्या-व्यवसाय करायला भाग पाडण्याची बिंग तिने उघडकीला आणली. ही गोष्ट ‘डीन कॉर्प’लाच काय, पण अमेरिकन परराष्ट्र खात्यालाही परवडण्याजोगी नव्हती. परिणामी लवकरच तिची पदावनती करून तिला कामावरून काढून टाकलं गेलं. पुढे जिवाला धोका उत्पन्न झाल्यामुळे कॅथरिनने बोस्निया सोडलं आणि ती मायदेशी- अमेरिकेला परतली. पण मुळात एक धडाडीची पोलीस अधिकारी असलेल्या कॅथरिनने आपल्या शोधाचे सर्व पुरावे जपून ठेवले होते. त्याच्या भक्कम आधारावर तिने ‘डीन कॉर्प’ कंपनी विरुद्ध खटला दाखल केला आणि तो जिंकला. ‘डीन कॉर्प’ कंपनीची काळी कृत्यं उजेडात आणण्यात ती यशस्वी झाली. ‘द व्हिसल ब्लोअर’ या मूळ इंग्रजी कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे. मुळात या पुस्तकाच्या कथनाचा आवाका मोठा आहे. त्याला वस्तुस्थितीतील राजकीय संदर्भ आहेत. त्यामुळे अनुवादाचं काम कौशल्याचं होतं. ते ठीक झालं आहे. परंतु काही वेळा शैली बोजड वाटते. ती अधिक सहज असायला हवी होती असं जाणवतं. एरवी बातम्या ऐकताना ज्यांची नावं आपल्या कानावर पडली तरी आपण ज्यांची फारशी दखल घेत नाही, अशा देशांपैकी एका देशातील घडामोडी मराठी वाचकांपर्यंत आवर्जून पोहोचवण्याचं श्रेय या पुस्तकाला द्यावंच लागेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more