* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"DID YOU KNOW THAT BRAHMA ONCE HAD FIVE FACES? WHY DO SNAKES HAVE A FORKED TONGUE? DO GODS CHEAT? WHY DOES SHIVA SPORT A CRESCENT MOON ON HIS HEAD? THE TRINITY, CONSISTING OF BRAHMA, SHIVA AND VISHNU, IS THE OMNIPRESENT TRIO RESPONSIBLE FOR THE SURVIVAL OF THE HUMAN RACE AND THE WORLD AS WE KNOW IT. THEY ARE POPULAR DEITIES OF WORSHIP ALL OVER INDIA, BUT WHAT REMAIN LARGELY UNKNOWN ARE SOME OF THEIR EXTRAORDINARY STORIES. AWARD-WINNING AUTHOR SUDHA MURTY WALKS BY YOUR SIDE, WEAVING ENCHANTING TALES OF THE THREE MOST POWERFUL GODS FROM THE ANCIENT WORLD. EACH STORY WILL TAKE YOU BACK TO A MAGICAL TIME WHEN PEOPLE COULD TELEPORT, ANIMALS COULD FLY AND REINCARNATION WAS SIMPLY A FACT OF LIFE. "
"ब्रह्मदेवाला कोणे एके काळी पाच मस्तकं होती हे तुम्हास माहीत आहे का? भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्रकोर का धारण केली आहे, याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? देव इतरांची फसवणूक करतात का? आपणा सर्वांना एक गोष्ट निश्चित माहीत आहे – ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं चराचरात अस्तित्व असून, हे जग आणि आपली मानवजात अस्तित्वात आहे, ती केवळ त्यांच्यामुळेच. संपूर्ण भारतात सगळीकडे या तीनही देवतांची उपासना केली जाते; परंतु या देवतांबद्दलच्या अनेक सुरस आणि चमत्कृतीजन्य कथा अजूनही फारशा कुणाला माहीत नसतात. अनेक पुरस्कारविजेत्या लेखिका सुधा मूर्ती या वाचकांना हाताला धरून या अनोख्या, अज्ञात प्रदेशात घेऊन जातात. प्राचीन युगातील या तीन अत्यंत शक्तिशाली देवतांविषयीच्या अद्भुतरम्य कथा त्या वाचकांसमोर उलगडतात. कथा संग्रहातील प्रत्येक कथा तुम्हा सर्वांना एका वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात घेऊन जाईल. त्या कथा ज्या कालखंडात घडतात, तेव्हाच्या व्यक्ती मनोवेगाने दूरदूरच्या प्रदेशात भ्रमंती करू शकतात, यातले प्राणी उडू शकतात आणि यात पुनर्जन्म तर नेहमीच होत असतात. "

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 23-12-2018

    असे घडले त्रिमूर्ती... कोणीही मनुष्य आस्तिक असो वा नास्तिक. त्याला देवीदेवतांच्या अस्तित्वाबद्दल आणि पौराणिक कथांबद्दल जाणून घेण्याची एक इच्छा असे. देवीदेवतांचं अस्तित्व कसं निर्माण झालं याबद्दल आपल्या मनात कुतूहल असतं. हे कुतूहल बऱ्यापैकी क्षमवण्यां काम सुधा मूर्ती लिखित आणि लीना सोहोनी अनुवादित ‘गरुडजन्माची कथा’ हे पुस्तक करतं. ललित लेखनात स्वत:च्या लेखणीचा ठसा उमटवणाऱ्या सुधा मूर्तींचं पौराणिक कथांबाबतचं हे लिखाण आपल्या मनात घर निर्माण करतं. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्ती म्हणजे लाखो लोकांचं आराध्य दैवत. यांच्यासंबंधी अनेक कथा लहानपणापासून आपण वाचलेल्या किंवा वयस्क माणसांकडून ऐकलेल्या असतात. सुधा मूर्ती यांनी या तीन देवतांच्या आणि त्यांच्या विविध रूपांच्या गोष्टी अत्यंत साध्या, सोप्या शैलीत आपल्या लिखाणातून मांडल्या आहेत. या पुस्तकात समुद्रमंथनाची. शंकर-पार्वतीची, ब्रह्मदेवाची, विष्णुची दशावतारांची, गणपतीच्या सामर्थ्याची, चंद्रदेवाच्या कक्षेत संचार करणाऱ्या नक्षत्रांची, रामाने स्वयंवरात उचललेल्या शिवधनुष्याची, शंकराच्या हरीहर आणि अर्धनारीनटेश्वर रूपाची इ. अनेक कथा आपल्याला वाचायला मिळतात. या कथांना अनुषंगून देशाच्या विविध भागांत उभी असलेली मंदिरं आणि त्यांचे वर्णन सुधा मुर्तींनी या पुस्तकात केले आहे. त्यामुळे या कथांना एक विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. या पुस्तकाची गम्मत अशी की, वर्षानुवर्षे ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहत आहोत, उदा. चंद्र आणि नक्षत्र, गणेशाला अर्पण केल्या जात असणाऱ्या दुर्वा, शंकराच्या पिंडीवर वाहत असलेल्या बेलाची महती इ. अनेक छोट्या छोट्या गोष्टीचा इतिहास आणि संदर्भ यापुस्तकातून सुधा मूर्तींनी सांगितला आहे. कारण परंपरागत आपण वर्षानुवर्षे या गोष्टींशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे जेव्हा या गोष्टीमागची कहाणी समजते तेव्हा आपणही आश्चर्यचकित होऊन जातो. उदा. चंद्राच्या कक्षेत वावरणारी नक्षत्रं ही मूलत: चंद्रदेवाच्या पत्नी आहेत. या पुस्तकामध्ये अजून एक समान धागा सापडतो. तो म्हणजे असूर आणि देव यांचे नाते अमरत्व मिळून पृथ्वीवर स्वत:चं वर्चस्व निर्माण करावं या इर्ष्येपोटी असुरांनी महान तपश्चर्या करून देवांना प्रसन्न करण्यास यश मिळाले. असूर असो वा मनुष्य भक्ताची इच्छा पूर्ण करण्यास देव नेहमीच तयार असतात. त्यामुळे असुरांना अमरत्वाचा वर देत असतानाच होणाऱ्या परिणामांची जाणीव असल्याने चाणाक्ष देवांनी हा वर देत असतानाच काही अटी असुरांसमोर ठेवल्या होत्या. त्यामुळे असुरांनी कितीही उच्छाद माजवला तरी त्यांना मृत्यूला समोरे जावे लागले. शिशुपाल, हिरण्यकश्यपु आदी असुरांच्या अशा कथा या पुस्तकात दिसून येतात. सुधा मूर्तींनी अत्यंत रंजक शैलीत या कथा लिहिल्या आहेत. त्यांनी अनेक कथांचा आवाका त्यातील मर्म जाणून तो कमी शब्दांमध्ये शब्दबद्ध केला आहे. उदा. समुद्रमंथनाच्या मोठ्या अध्यायाची माहिती त्यांनी मोजक्या शब्दात आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. त्याचबरोबर सूक्ष्म संदर्भाचा वापर त्यांनी केलेला पाहायला मिळतो तसेच या त्रिमूर्तींना आणि विशेषकरून भगवान शंकरासंबंधी असलेल्या आख्यायिकांचा समावेशसुद्धा या पुस्तकात आहे. पेंग्विन रॅण्डम हाऊस इंडिया यांच्या सौजन्याने प्रत्येक कथेला अनुसरून असलेली चित्रं आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ अत्यंत सुंदर झालं आहे. लीना सोहोनी यांनी सुधा मूर्तींच्या या कथांचा तितक्याच समर्थपणे मराठीत अनुवाद केला आहे. एकूणच हिंदू पुराणातील अनेक तपशील जाणून घेण्यासाठी ‘गरुजन्माची कथा’ हे पुस्तक आवर्जून संग्रही ठेवण्यासारखं आहे. – देवेंद्र जाधव ...Read more

  • Rating Starsakal 24 April 2018

    गोष्टीवेल्हाळ सुधा मूर्ती यांनी ब्रह्मदेव विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीशी संबंधित कथा या पुस्तकात सांगितल्या आहेत. देवतांशी संबंधित एका वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात त्या घेऊन जातात. ‘द मॅन फ्रॉम द एग’ या त्यांच्या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद लिना सोहनी यांनी केला आहे. सकाळ दि. २९/४/२०१८ ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.