* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184980622
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :CHICKEN SOUP SERIES COMBO OFFER-61 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
YOU ASKED FOR MORE CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOULSO HERE IT IS, FROM THE HEARTS OF JACK CANFIELD, MARK VICTOR HANSEN AND KIMBERLEY KIRBERGER. YOU`LL FIND 101 MORE STORIES TO HELP YOU DEAL WITH A WORLD THAT SEEMS MORE DIFFICULT EVERY DAY. JACK, MARK AND KIMBERLEY`S LATEST BATCH FOCUSES ON LOVE, FRIENDSHIP AND TOUGH STUFF, ALONG WITH SOME GREAT TEENOLD TALES OF LEARNING LESSONS, MAKING A DIFFERENCE AND GROWING UP. LIKE IN THE FIRST VOLUME OF CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL, YOU`LL FIND NO ADULTS PREACHING TO YOU ABOUT WHAT YOU SHOULD OR SHOULDN`T DO. INSTEAD, THIS BOOK IS FULL OF TEENS WHO YOU ARE, AND LOVING YOURSELFNO MATTER WHAT. THESE STORIES WILL SHOW YOU THAT NO MATTER HOW DIFFICULT YOUR SITUATION MAY SEEM, YOU CAN MAKE IT THROUGH THE TOUGH TIMES; AND THAT NO MATTER HOW LONELY YOU MAY FEEL, YOU ARE NEVER ALONE.
आयुष्याच्या प्रवासात किशोरवय हा नाजूक टप्पा असतो. एकीकडे जाणिवा उमलत असतात; डोळ्यांत नवी स्वप्नं हसत असतात. त्याच वेळी व्यवहारी जगाचं करकरीत वास्तव समोर येतं. अशा वेळी मनाला सावरणाया, धीर देणाया, आधाराचा खंबीर हात देणाया, उमेद चेतवणाया, दुखावलेल्या मनावर हळुवार फुंकर घालणाया, रोवून ठाम उभं राहायला शिकवणाया या कथा... मनाशी अगदी हळुवार संवाद साधत निखळ मैत्रीची अनुभूती देतात. गालांवर हसू फुलवता फुलवता नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या करतात.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #CHICKENSOUP #USHAMAHAJAN #JACK CANFIELD #MARKVICTORHANSEN #PRADNYAOAK #SUPRIYAVAKIL#SHYAMALGHARPURE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMACHAR 06-09-2009

    मनाला सावरणाऱ्या गोष्टी… गेल्या काही वर्षांमध्ये अनुवादीत साहित्याला मराठी रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. विविध विषयांवरील अन्य भाषातील पुस्तके मराठी अनुवादित झाली आणि त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला, विशेषत: इंग्रजी भाषेतील अनुवादित पस्तकांनी मराठीत मोठी बाजारपेठ काबीज केली. अशाच तीन अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊनसने नुकतेच केले आहे. ‘चिकन सूप फॉर द सोल’ ही मालिका इंग्रंजी साहित्यविश्वात खूप लोकप्रिय आहे. याच मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल.’ ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ ही तीन पुस्तकं मराठीत अनुवादित झाली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ या पुस्तकाचा अनुवाद श्यामला घारपुरे यांनी केला असून अन्य दोन पुस्तकं सुप्रिया वकील यांनी अनुवादित केली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ या पुस्तकात कामाच्या ठिकाणचं धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता यांच्या कथा आहेत. ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकात वयात येणाऱ्या मुलांना जीवनमूल्य कळावीत या दृष्टीने जीवन, प्रेम आणि शिकणं या विषयीच्या कथा आहेत तर ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकात ‘आईपण जागवणाऱ्या कथा आहेत. वेगवेगळ्या घटकांचा विचार करून पुस्तकं लिहिण्यात आल्यामुळे त्या त्या घटकांना प्रेरणा देणाऱ्या अशा या कथा आहेत. मनाला सावरणाऱ्या, धीर देणाऱ्या आधाराचा खंबीर हात देणाऱ्या कथा ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकातून भेटीस येतात. ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकातील कथा ‘आई’पणा भोवती गुंफलेल्या आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ या पुस्तकातून आदर्श जात, सुप्रिया वकील आणि श्यामला घारपुरे यांनी ओघवत्या भाषेत या मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला आहे. ‘चिकन सूप’ मालिका… जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हे ‘चिकन सूप’ या पुस्तकमालेचे संस्थापक सदस्य आणि निर्माते. या दोघांनी ‘चिकन सूप’ या मालिकेंतर्गत जवळजवळ २०० शीर्षकांची पुस्तके लिहिली. किम्बर्ली किर्बर्जर यांनीही त्यांना सहकार्य केले. तसेच जेनिफर हॉथॉर्न, मॅसी शिमॉथ या दोघींनीदेखील या पुस्तकमालेच्या लेखनात सहभाग घेतला आहे. छोट्या छोट्या कथांचे संकलन असलेली ही मालिका जगभर लोकप्रिय ठरली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येदेखील या पुस्तकाची नोंद झालेली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने ही पुस्तके मराठीत आणली आहेत. ही पुस्तके म्हणजे निराश मनाला प्रेरणा देणारी आणि जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकवणारी अशी आहेत. चिकन सूप फॉर टीनएज सोल हे पुस्तक जीवन, प्रेम व शिकणे याविषयी मार्गदर्शन करतील, तर चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क हे कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या अनुभवांचे संकलन आहे. चिकन सूप ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली असून, या मालिकेत आतापर्यंत ६८ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. दरवर्षीयामध्ये आणखी पुस्तकांची भर पडतच आहे. चिकन सूप या मालिकेतील पुस्तकांमध्ये आईविषयीचेही पुस्तक आहे. या तिन्ही पुस्तकांमधील छोट्या छोट्या कथा या अनुभवांवर आधारलेल्या असून, त्या प्रत्येक कथेतून एक वेगळा संदेश निश्चितच मिळतो. ‘वपुर्झा’ हे व. पु. काळे यांचे पुस्तक जसे कधीही, कुठूनही, कुठल्याही पानापासून वाचण्याचा आनंद घेता येईल, अशा धर्तीचे आहे, तसेच या तीन पुस्तकांचे आहे. अनेक लोकांनी आपल्याला आयुष्यात आलेले अनुभव या लेखकांकडे पाठविले, त्याचे उत्कृष्ट संकलन व संपादन करून ही पुस्तके आकारास आली आहेत. मराठीमध्ये आपल्याकडे पंचतंत्र किंवा हितोपदेश यामध्ये जो संदेश छोट्या छोट्या गोष्टींतून मिळतो, त्याची आठवण ही पुस्तके वाचताना आवर्जून होते. या पुस्तकांमधील सर्व कथा या आजच्या काळातील असून, अत्यंत व्यक्तिगत अशा असल्याने प्रत्येक वाचक त्याच्याशी आपले नाते जोडू शकतो. ‘चिकन सूप’च्या ‘लज्जत’दार कथा… इंग्रजी साहित्यविश्वात ‘चिकन सूप फॉर द सोल’ ही पुस्तकांची मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना छोट्या छोट्या कथांमधून मार्गदर्शन करणारी ही पुस्तकं जगभर प्रसिद्ध आहेत. या मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’, ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ ही पुस्तकं मराठीत अनुवादित झाली असून मेहता पब्लिशिंग हाऊसने ती प्रकाशित केली आहेत. धकाधकीच्या आयुष्याचा प्रवास करताना प्रत्येकालाच स्वत:ची अशी एक ‘स्पेस’ हवी असते. ती मिळाली नाही तर मानसिक आणि शारीरिक पातळीवर अनेक समस्या उभ्या राहू शकतात. संवाद, शेअरींग ही प्रत्येक जीवमात्राची नैसर्गिक गरज आज बदलत्या जीवनशैलीत पूर्णत्वास जातेच असं नाही. वेगवेगळ्या विषयांवर, स्वत:च्या समस्यांबद्दल कोणाशी तरी बोलावं, असं वाटत असलं तरी प्रत्येकवेळी ते शक्य होतंच असं नाही. किंबहुंना एखाद्याचे प्रश्न ऐकण्यामध्ये दुसऱ्या व्यक्तिला क्वचितच रस असतो. त्यामुळे बहुतेकवेळा मनातले प्रश्न मनातच राहतात. दबून ठेवलेले हे प्रश्न मग कधी अन्य मार्गाने डोकं वर काढतात. मनातल्या या विचारांना मोकळी वाट मिळावी, यासाठी आवश्यक असणारं ‘आउटलेट’ मिळण्यासाठी पुस्तकांसारखा दुसरा पर्याय नाही. आपल्याकडे ग्रंथांना गुरू मानलं जातं. ते खरंही आहे. वेगवेगळ्या विषयांवरही पुस्तकं आपली संवादाची, ज्ञानवृद्धीची भूक भागवत असतात. यातून आपल्या मनातील भावनांना वाटही मिळत असते आणि माहिती-ज्ञानाच्या कक्षाही रुंदावत असतात. एका नव्या जगाची ओळख यातून आपल्याला होते आणि आपण स्वत:कडे तटस्थ वृत्तीने पाहू शकतो. यातून स्वत:मधील गुण, अवगुण, व्यक्तिमत्त्वातील दोष यांचीही जाणीव होते. ते दूर करण्यासाठी काय करता येईल, याचं मार्गदर्शन पुस्तकातून होतं. त्यामुळेच ग्रंथ हे गुरु असतात तसेच ते मागर्दशक मित्रही असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, वेगवेगळ्या नात्यांची जबाबदारी पार पाडताना, वेगवेगळ्या भूमिका निभावताना तारेवरची कसरत करावी लागते. या प्रत्येक घटकाला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरलेली ‘चिकन सूप फॉर द सोल’ ही मालिका इंग्रजी साहित्यविश्वात खूप लोकप्रिय आहे. जॅन कॅनफिल्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सन यांनी ही मालिका लिहिली असून त्यामध्ये प्रेरणा देणाऱ्या, वेगवेगळ्या प्रसंगातून यशाचा मंत्र सांगणाऱ्या छोट्या छोट्या कथा आहेत. या मालिकेअंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. ‘चिकन सूप फॉर द प्रिझनर्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द व्हॉलेंटिअर्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द ओशन लव्हर्स सोल’, ‘चिकन सूप फॉर द हॉर्स लव्हर्स सोल’ अशी वेगवेगळी पुस्तकं याआधीच बरीच लोकप्रिय झाली आहेत. जगभरातील विविध भाषांमध्ये या पुस्तकांचे अनुवाद करण्यात आले असून त्यांनाही ही चांगली लोकप्रियता लाभली आहे. याच मालिकेतील ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’, ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ आणि ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ ही तीन पुस्तकं मराठीत अनुवादित झाली असून मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे ती प्रकाशित करण्यात आली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ या पुस्तकाचा अनुवाद श्यामला घारपुरे यांनी केला असून अन्य दोन पुस्तकं सुप्रिया वकील यांनी अनुवादित केली आहेत. ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’ या पुस्तकात कामाच्या ठिकाणचं धैर्य, अनुकंपा आणि सर्जनशीलता यांच्या कथा आहेत. ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकात वयात येणाऱ्या मुलांना जीवनमूल्य कळावीत या दृष्टीने जीवन, प्रेम आणि शिकणं याविषयीच्या कथा आहेत तर ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकात ‘आई’पण जागवणाऱ्या कथा आहेत. जॉन कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन हे चिकन सूप मालिकेचे निर्माते आणि संस्थापक आहेत. या दोघांनी लेखन आणि संकलन केलेल्या ‘चिकन सूप’ मालिकेची सध्या दोनशे शीर्षकं आहेत आणि जगभरातील चाळीस भाषांमधील वाचकांपर्यंत ती पोहोचली आहेत. आता मराठीतही ही पुस्तकं आल्याने मराठी वाचकांना त्याचा आनंद घेता येईल. छोट्या छोट्या गोष्टींतून जीवनाची मूल्य सांगणं हे मालिकेचं वैशिष्ट्य. समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून पुस्तकं लिहिण्यात आल्यामुळे त्या त्या घटकांना प्रेरणा देणाऱ्या अशा या कथा आहेत. आयुष्याच्या प्रवासात किशोरवय हा नाजूक टप्पा असतो. एकीकडे जाणिवा उमलत असतात, डोळ्यात नवी स्वप्नं हसत असतात. त्याच वेळी व्यवहारी जगाचं करकरीत वास्तवही समोर येतं. अशा वेळी मनाला सावरणाऱ्या, धीर देणाऱ्या आधाराचा खंबीर हात देणाऱ्या कथा ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकातून भेटीस येतात. ‘चिकन सूप फॉर द मदर्स सोल’ या पुस्तकातील कथा ‘आई’ पणाभोवती गुंफलेल्या आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ‘आईपण’ सारखंच असतं. या कथांमधून स्थळ, काळ या साऱ्या भेदाच्या पलीकडे जाऊन आईच्या वात्सल्याचा स्पर्श घडतो. ‘चिकन सूप फॉर द सोल अ‍ॅट वर्क’या पुस्तकातून आदर्श कार्यपद्धती उलगडत जाते. माणसं काम करताना पाट्या टाकतात, असं म्हटलं जात असलं तर सर्वसामान्य माणूस प्रसंगी प्राणही पणाला लावून अंत:करणापूर्वक सेवावृत्तीने काम करतो. त्या कामाचं कार्यात रुपांतर होतं. त्याचा आदर, गौरव अभिनव पद्धतीने करणं ही उदात्त कार्यसंस्कृती आहे. या पुस्तकातून याच संस्कृतीची ओळख होते. या तिनही पुस्तकातून जीवनविषयक आगळी मूल्यं प्रत्ययास येतात. सुप्रिया वकील आणि श्यामला घारपुरे यांनी ओघवत्या भाषेत या मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केला आहे. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांचे अनुभव वेगवेगळे असतात, त्याचबरोबर त्यांच्या समस्याही वेगवेगळ्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधण्याचं काम या मालिकेतील पुस्तकांनी केलं आहे. शाळकरी मुलं, नुकताच कॉलेजच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेले विद्यार्थी, वयात येणाऱ्या मुली, कॉलेज शिक्षण संपवून बाहेर पडणारे विद्यार्थी अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर ही पुस्तकं मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी तारांबळ, आई, वडील, पती, भाऊ, बहीण अशा भूमिका पार पाडताना होणारी कसरत, कामावरचे ताण-तणाव, सहकाऱ्यांशी असणारं वर्तन, वेगवेगळ्या कारणाने सतावणारी असुरक्षितता अशा वळणांवर ‘चिकन सूप’ मालिकेतील पुस्तकं प्रेरणादायी ठरतात. छोट्या छोट्या कथांमधून मिळणारी उर्जा वाचकाला एक नवी दृष्टी देते. या पुस्तकांचे अनुवाद आता प्रसिद्ध झाल्याने मराठी वाचकांना त्याची खुमारी अनुभवता येणार आहे. ...Read more

  • Rating StarSUJATA BELKHADE, YAVATMMAL

    अतिशय सुंदर अनुवाद करुन हे पुस्तक आम्हा पर्यन्त पोहचविण्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद!!! या अनुवादीत पुस्तकामधील प्रत्येक कहाणी निश्चितच आवडली.. ह्रदयस्पर्शी कथा या पुस्तकामधील वाचताना नकलत जगण्याची नवी उर्मी प्राप्त करुन जाते न् आपण स्वत:वरच प्रेम कराया लागतो. I am also teenager त्यामुले हे पुस्तक माझंच वाटल मला..., जणू काही माझ्याच साठी लिहीलय..... "I love you Dad" वाचून संपताक्षणीच मी बाबांना लगेच कॉल करुन " I love you Pappu" बोलू शकले जे मला फार दिवसापासून बोलायचं होतं.. Thank you madam, या पुस्तकामधील कथा म्हणजे खरेच आम्हा teenager साठी उघडा झालेला अमुल्य असा खजिनाच आहे... नवनवी उमेद चेतवणारा खजाना.. मित्रमैत्रिणींबद्दल आगलावेगला विश्वास निर्माण करणारा खजाना.. या कथा म्हणजे नवी स्वप्न आणि त्या स्वप्न पूर्ति साठीची प्रेरणा प्राप्त करुन देणारा अल्लाउद्दीनचा जादूभरा दिवाच जणू..... या कथा वाचताना नकलत आपणच आपल्या अंतरंगात डोकावत स्वत:शी संवाद साधायला लागतो नि "माझेच अस्तित्व कुठे शोधु मी?" या आम्हा teenager च्या सामान्य प्रश्नाचं उत्तर मीलत जातं या पुस्तकाच्या वाचनानंतर..... सुबोध नि आकलनयुक्त अनुवाद यामुले वारंवार हे पुस्तक वाचलं तरी प्रत्येक वेली नवाच बोध मिलणार यात शंका नाही....... ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MANSA ASHI ANI TASHIHI
MANSA ASHI ANI TASHIHI by RAVINDRA BHAGAVATE Rating Star
ठाणे वार्ता ८ डिसंबर २०२३

कथा लेखक रवींद्र भगवते हे पटकथा, संवाद लेखक,नाटककार, अनुवादक, कवी आणि निवेदक आहेत. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक लोकप्रभा, शब्द रुची, माहेर, रणांगण, गप्पागोष्टी यांमधून कथालेखन केले आहे. काही कथासंग्रह आपल्याला झपाटून टाकतात. त्यातीलच एक म्हणज भगवते यांचा हा कथासंग्रह ! `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हातात घेतला की, अधाशासारखा वाचून झाल्यानंतरच आपल्या मनाला तृप्ती मिळते. नंतर कित्येक दिवस त्यातील पात्रांच्या नशेची झिंग काही उतरत नाही. एक एक कथा वाचत पुढे गेलो की मनात अनेक अस्वस्थ भावनांचे थैमान सुरू होते. खर तर चांगल्या लेखनाचे हेच लक्षण असते की, श्री, ते वाचकांच्या बधीर संवेदना जाग्या करते. तरल मनाचे संवेदनशील कथाकार रवींद्र भगवते यांच्याकडून कोणत्या पात्राला कसा न्याय द्यायचा हे शिकायला मिळते. त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आपल्या आजू‌बाजूला फिरत असतात. रोजच्या आयुष्यात भेटतात. `माणसं अशी आणि तशीही` हा कथासंग्रह हाती घेतल्यानंतर त्याचे मुखपृष्ठच आपले लक्ष वेधून घेते. निळाशार अथांग असा समुद्र, त्यामध्ये संथ वाहणारी नाव, स्त्री आणि पुरुषाचे एकमेकांकडे पाहणारे रेखाटलेले चेहरे आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारे एकमेकांचे प्रतिबिंब, (जणू काही स्त्री आणि पुरुष हे एकमेकांशिवाय अपूर्णच) `माणसं अशी आणि तशीही` या कथासंग्रहाबद्दल सरदार जाधव यांनी रेखाटलेले हे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. एकेक कथेचा परामर्ष घेत केलेली अतिशय समृद्ध अशी प्रस्तावना ज्येष्ठ, श्रेष्ठ कथा लेखक चांगदेव काळे यांनी लिहिली आहे. या कथा सुंदर का आहेत याविषयी काळे यांनी दिलेली कारणमीमांसा नक्कीच वाचनीय आहे. या संग्रहात एकूण सोळा कथांचा समावेश केला आहे. त्यातील पंधरा कथा लघुकथा या प्रकारात मोडतात तर `अमृता` ही कथा दीर्घ कथा या प्रकारात येते. `अमृता` या कथेत, निशिकांतची आई-बहिण या अमृताला समजून घेऊ शकत नव्हत्या. तेव्हा सहजपणे समाजातील लोकांची गतिमंद माणसाकडे पाहण्याची दृष्टी एका वाक्यातच विशद केली आहे.बरेच लोक मतिमंद किंवा गतिमंद माणसांना समजू शकत नाहीत, ते असं त्यांना लांबून न्याहाळत बसतात. `अमृता` ही या कथासंग्रहातील पहिली कथा तर `रावसाहेब` ही शेवटची कथा पण या दोन्ही कथेमध्ये गतिमंद मुलीची एक वेगळीच कर्म कहाणी आहे. `अमृता` या कथेतील प्रभू काका म्हणजेच अमृताचे वडील यांची एक वेगळीच छाप मनावर उमटते. आपली गतिमंद असणारी मुलगी अमृता हिचं आपल्यानंतर कसे होणार याची काळजी त्यांच्या मनात सतत भेडसावत असते. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, अमृताला निशिकांत आवडतो, तेव्हा त्यांच्याकडे येणारा विमा एजंट निशिकांत याला दोन करोड रुपये आणि बंगला देण्याचे कबूल करून निशिकांत आणि अमृताचा त्यांनी लावून दिलेला विवाह, निशिकांत, सुनंदा या पात्र पात्रांची चित्रणे, वाचकाला अनुभवाच्या वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. मानसिक गरजेइतकीच व्यक्तीची शारीरिक गरज किती महत्त्वाची आहे ते कथा लेखक भगवतेनी अगदी अचूक मांडले आहे. उदा. `कामदेवानं त्याचं अमृताच्या हातातलं बोट काढलं आणि भारल्यासारखा निशिकांत सुनंदाच्या रुमकडे चालू लागला, तो तिच्या शयनमहालात कधी आला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही." गतिमंद असणाऱ्या अमृताचा मनापासून सांभाळ करणाऱ्या निशिकांतनं शरीराची भूक भागविण्यासाठी सुनंदाशी केलेलं दुसरं लग्न, आणि अमृताला सुनंदा त्रास देतेय म्हणून तिच्याशी अबोला धरलेला निशिकांत... पण कितीही झाले तरी अन्न, वस्त्र, निवाऱ्याइतक्याच शरीराच्या असणा-या गरजा भागवणे हे देखील नितांत गरजेच आहे. म्हणूनच कितीही झाले तरी तो अमृताचे हातातील बोट सोडवून सुनंदाकडेच जातोच. अमृता, निशिकांत आणि सुनंदा या तीन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी ही कथा वाचकाला खिळवून ठेवते. रावसाहेब ही कथा मात्र टिपिकल मर्डर मिस्टरी असली तरी ज्या ज्या व्यक्तींकडे संशयाची सुई वळते त्या त्या व्यक्तिरेखा उसठशीत झाल्यामुळे वाचकाला विचार करायला निश्चित भाग पाडते. `अमृता` या कथेतील गतिमंद अमृता असू दे, नाही तर `राबसाहेब` या कथेतील गतिमंद संगीता असू दे त्यांचा समजूतदारपणा शहाण्या सुरत्या बाईलाही जमणार नाही. भगवते यांनी साकारलेल्या पात्रांच्या जगण्यात पराकोटीचे वैविध्य आणि विषमता ठासून भरलेली आहे त्यातून ते आपापल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी कशी झुंज देतात किंवा जुळवून घेतात. याचा चलतचित्रपट जणू डोळ्यासमोर उभा राहतो. यातल्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात इतक्या चांगल्या आहेत. `तिनं सवत आणली` या कथेत, आजोबांनी कमला काकी आणि शंकरकाकांकडे बघून त्यांच्या मनातील शब्दबद्ध केलेला विचार, `मला महाभारताची आठवण झाली. जरासंधाच्या जनानखान्यात कैद केलेल्या सोळा हजार स्त्रीयांशी श्रीकृष्णानं विवाह केला होता. हा शंकर नव्हे... साक्षात कृष्ण आहे.` एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमलाकाकी, बाबू गुंडाने आणि त्याच्या सोबतच्या चार पाच व्यक्तींनी सुमनवर केलेला बलात्कार, त्यातून तिला गेलेले दिवस, अशा मुलीशी कोण लग्न करणार करणार म्हणून कमलाकाकीनं घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाची फलश्रुती याविषयी मुळातूनच ही कथा वाचायला हवी. एक मात्र खरं की भगवते यांच्या कथेतील पात्रे ही समजूतदारपणे वागतात. `कुलूप` या कथेत उद्वेगामध्ये दीपा पंडित समोर विकी ठाकूरने काढलेले उद्वार, `स्साला.... हा इतिहासच त्रास देतोय मला. इतिहासाचं काय असतं, तो बिघडत असताना आपल्याला जाणवत नाही; पण एखाद्या भुतासारखा तो आपल्या मानगुटीवर बसतो. विकी ठाकूरला दीपाच्या आक्रमक सौंदर्याची जी भुरळ पड़ते तिला दीपा कसं तोंड देते ते लेखकाच्या खास शैलीत वाचण्यासारखं आहे. `इंटरव्ह्यू` या कथेतील गावावरून आलेला विठ्ठल अडचणींचा सामना करत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी साकारलेल्या पात्रांमध्ये जिद्द आहे, सकारात्मकता आहे. त्यांच्या `लाल टिकली` या कथेतील उर्मिला हिचा नवरा अपघातामध्ये मरण पावतो. तिला समजते त्याच्या सोबत कुणी सिमरन नावाची तरुणीदेखील होती. हे समजल्यावर ऊर्मिला मृत नवऱ्याच्या चारित्र्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पड़ते तेव्हा तिला काय शोध लागतो ? शोध संपवूनच ती मुंबईला परत जाते. त्यांच्या कथेतील नायिका या जिद्दी आहेत. त्यांच्या मनात आलेल्या गोष्टी तडीस नेऊनच त्या शांत बसतात. त्यांची कथालेखनावर उत्तम पकड आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील व्यक्तिरेखा साकार करताना तिचा मनोविश्लेषणात्मक वेध ते इतक्या सूक्ष्मतेने घेतात म्हणूनच या व्यक्तिरेखा आपल्यापुढे जिवंतपणे उभ्या राहतात. त्यांच्या `गॉगल` या कथेतील घरकाम करणाऱ्या संगीतावर रिबानचा गॉगल चोरल्याचा निकिता आरोप करते. एखादा आरोप प्रामाणिक माणसाला कसा अस्वस्थ करतो तो अस्वस्थपणा या कथेत छान टिपला आहे. त्यांच्या कथेतील पात्रांचे परस्परांशी असलेले नातेसंबंध कथाविषयाचे बीज आणि त्याला अनुसरून केलेली कथेची मांडणी यातून लेखकाच्या सहजाविष्काराचं सामर्थ्य लक्षात येतं. प्रवाही भाषाशैली, तिच्यातील संवेदनशीलता आणि खिळवून ठेवणारं कथाबीज यामुळे वाचक या कथांमध्ये गुंतत जातो आणि मानवी स्वभावाचे विविध नमुने पाहून स्तिमितही होतो. लेखक भावविश्वात खोल खोल उतरत जातो आणि त्यातून प्रत्येक कथा तिच्या आंतरिक गाभ्यासह वाचकांच्या मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. त्यांच्या `वर्तुळ` या कथेतील अशोक याला प्लॅटफॉर्मवर धावणारी आपली बायको थोडीशी स्थूल वाटते, त्याला ती नकोशीही वाटते. त्याच्या बाजूने जाणारा तरुण-तरुणींचा सुगंधी घोळका पाहून लगेच त्याच्या मनात विचार येतो, अशाच एखाद्या फुलासी आपलं लग्न व्हायला पाहिजे होतं. मग काय सुगंधच सुगंध... आकाशाएवढा त्याच्या मनातलं हे वादळ शमतं का याचं उत्तर ही कथा सकारात्मक पद्धतीने देते. वास्तव जीवनात पाहण्यात येणारे सर्वसामान्यांचं जगणं, त्याची हतबलता, त्यांचं सोसणं, परिस्थितीला शरण जाण्याची वृत्ती, त्यांमधील ताणतणाव यांसारख्या वास्तवातून सापडणारी कथाबीजं लेखकाला जितकी अस्वस्थ करतात, तितकीच त्या कथा वाचणाऱ्यांनाही अस्वस्थ करून जातात. वास्तवातून फुललेल्या या कथेची पातळी वैयक्तिक अनुभवाची न राहता तिला विशाल सामाजिक भावविश्वाचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यांच्या अनेक कथामधून काळाची पावले उमटताना दिसतात. त्यांची `अनामिका` ही कथाही मनाला चटका लावून जाते. या कथासंग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे ही सहज भावनेनं वावरतात. मानवी जीवनमूल्यांची जिवापाड जपणूक करताना दिसतात. कथा विषय नेहमीचेच असले तरी लेखकाची कथा मांडणीची शैली वेगळी आहे. कसदार लेखन, भाषेचा वेगळेपणा, शब्द चमत्कृतीचा नेमका वापर, आटोपशीर प्रसंग अशा अनेक जमेच्या बाजू `माणसं अशी आणि तशीही या कथासंग्रहात दिसतात. त्यांच्या कथा विचार करायला लावतात, या कथासंग्रहातल्या इतर कथांमध्येही लेखकाने अनेक नाविन्यपूर्ण विषय हाताळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. असा हा कथासंग्रह, कथाकार रवींद्र भगवते यांनी असेच लिहीत जावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांच्या साहित्य सेवेस सुयश चिंतिते. ...Read more

THE HUNGRY TIDE
THE HUNGRY TIDE by AMITAV GHOSH Rating Star
जयश्री सोनवणे

बंगालमधील सुंदरबनच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी जन्म घेते कादंबरीत मुख्य पात्रेत अशी चार-पाचच आहेत. कनाई -हा मूळ कलकत्त्याचा पण आता दिलीत राहून तेथे येणाऱ्या परदेशी भाषिकांना दुभाषा पुरवणे हा त्याचा धंदा आहे. पेशाने तो भाषांतरकार आहे. स्वतःच्या धंद्ामध्ये खूपच व्यस्त असणारा हा ४२ वर्षाचा तरुण त्याची मावशी नीलिमा हिच्या निर्वाणीच्या आग्रहावरून तिला भेटायला वेळात वेळ काढून लुसीबारीला आलेला आहे. पिया- ही मुळची बंगाली. पण आई-वडील सिएटलला स्थायिक झाल्यामुळे आता अमेरिकन आहे. ती सुंदरबन मधील डॉल्फिनचा अभ्यास करायला इकडे आलेली आहे आणि येताना रेल्वेमध्ये तिची कनाईशी ओळख झालेली आहे. निर्मल नीलिमा- निर्मल नीलिमा हे जोडपे या प्रदेशात राहणाऱ्या गरिबीने ग्रासलेल्या बहुसंख्य लोकांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य खर्च करायचे हा आदर्श ठेवून १९७० पासून इथे स्थायिक झालेले आहे लुसीबारी येथे त्यांची बडाबन नावाची संस्था आहे दिली माने येथे दवाखाना काढलेला आहे. मोयना- ही लुसी बारीची स्थानिक तरुणी नीलिमाच्या दवाखान्यात नर्स चं काम शिकत आहे. त्याशिवाय अजूनही बरीच कामं ती करत असावी असे दिसते. कारण कनाई साठी जेवण बनवून आणायचं काम निलिमाने तिला सांगितलं आहे. फोकीर- फोकीर हा मोयनाचा नवरा आहे आणि तिथला मासेमारी करणारा कोळी आहे. खाडीच्या प्रदेशात राहत असल्याने मासेमारी व खेकडे हे मुख्य उपजीवीकेचे साधन आहे आणि ते पकडण्यात तो पटाईत आहे. तसेच त्याला इथल्या खाड्चीयां कण न कण माहिती आहे. होरेन - होरेन हा पण एक निष्णात आणि अनुभवी कोळी आहे आणि फोकीरला तो स्वतःच्या मुलासारखा मानतो. सर डॅनियल हॅमिल्टन नावाचा एक स्कॉटिश माणूस ब्रिटिश सरकारकडून १९०३ झाली ही बेटं असलेली दहा एकर जमीन विकत घेतो आणि तिथे मनुष्यवस्ती वसवण्याचा चंग बांधतो. अनेकांना ही जमीन त्याने फुकट दिली आणि १९२० सालापासून ज्यांच्याकडे मालमत्ता, जमीन काहीच नाही अशा अत्यंत गरीब लोकांना या जमिनीच्या मालकीच्या आशेने इथे येऊन वसाहत करण्यास आवाहन केले.१९७१ साली झालेल्या बांगला युद्धामध्ये आणि १९४७ साली झालेल्या फाळणीमध्ये असंख्य निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे या बेटांवर आले तेव्हा इथे फक्त वाघ, मगरी, चित्ते, नाग, आणि शार्क मासे यांचे साम्राज्य होते. असंख्य लोक त्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. जे राहिले जगले ते सतत असुरक्षिततेची मूक भावना घेऊन जगत राहिले. इथे वय वर्ष ३० च्या पुढे जगलेले तरुण खूपच कमी दिसतात. इतकंच नव्हे तर इथल्या स्त्रियांचे नेहमीचे पोशाख सुद्धा विधवेचे वस्त्र धारण करणारे असतात अशी इथली परिस्थिती अत्यंत दारुण आहे. खरंतर या कादंबरीला नायक किंवा खलनायक नाहीच आहे. जर कोणी नायक किंवा खलनायक असेल तर तो निसर्ग आहे, ती भरती-ओहोटी आहे. इथले वाघ, मगरी, साप हे सर्व खलनायक आहेत. इथले वादळी वारे, पाण्याचे सतत बदलते प्रवाह आहेत जे इथल्या मनुष्य जीवनाला कधी होत्याचे नव्हते करून टाकतील हे सांगता येत नाही. फाळणी नंतर आणि युद्धानंतर देशोधडीला लागलेले असंख्य लोक इथे आले. ते अत्यंत गरीब होते. इथल्या भरती ओहोटी, लहरी निसर्ग, हिंस्र प्राणी यांच्याशी आपल्या अस्तित्वासाठी ते लढू लागले. त्यांना जात, धर्म, कूळ, वंश यांच्याशी काही देणंघेणं नव्हतं. कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाईच एवढी बिकट होती की या कशाचं भान असण्याची परिस्थितीच नव्हती. आणि या सर्व लोकांना घुसखोर ठरवून सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना कायम त्रास दिला जात होता. तुरुंगात डांबलं जायचं आणि गोळीबारात मारलं जायचं. निर्मला मात्र क्रांतीसाठीही परिस्थिती अगदी योग्य वाटायची. आपण जेव्हाही कादंबरी वाचायला घेतो तेव्हा ती आपल्या मनाची इतकी पकड घेते की शेवटपर्यंत आपण ती सोडू शकत नाही. संपूर्ण कथानक बाळबोधपणे काळानुसार एका सरळ रेषेत न जाता नदीसारखं वळण घेत, कधी भूतकाळाच्या खाच खळग्यात अडकत, साचत पुढे जाते. मध्येच ते खूप प्रवाही होते, मध्येच संथ होते आणि मध्ये मध्ये निसरड्या शेवाळ्याप्रमाणे फसवं होत जातं. श्री अमिताभ घोष यांचे मूळ इंग्रजी पुस्तक मराठीतून वाचताना हे लक्षात येतं की अनुवादकार श्री. सुनील करमरकर यांची मराठी भाषेवरची पकड ही तितकीच पक्की आहे जितकी त्यांची इंग्रजी भाषेवर पक्की पकड आहे. कादंबरी इंग्रजीत वाचून त्याचा रसास्वाद घेणे ही सहज साध्य गोष्ट आहे. पण त्यातील तरलता आणि जीवनानुभवाला यत्किंचितही धक्का न लावता त्याचा मराठीत अनुवाद करणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान सुनील करमरकर यांनी यशस्वीपणे पेललेले आहे. मुळात इंग्रजी भाषेचा बाज, त्याची वाक्यरचना मराठी भाषेपेक्षा खूपच वेगळी असते. पण ही कादंबरी मराठीतून वाचताना कुठेही असं जाणवत नाही की हा अनुवाद आहे म्हणून. ही कादंबरी मुळात मराठीतच लिहिली गेली असावी असं वाटावं इतकी ती अस्सल उतरली आहे. माणसाच्या नात्यातील भावनांचा कल्लोळ आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरी स्वभावाचा कल्लोळ याचे चित्र रेखाटताना केलेली शब्दांची गुंफण खूपच विस्मित करणारी आहे. कादंबरी वाचताना ती माणसे, कांदळवनाचे जाळे, पाण्याचा आणि जंगलाचा गूढपणा, दरारा बसवणारं वादळ या गोष्टी जशाच्या तशा आपल्यासमोर उभ्या राहतात. श्री. सुनील करमरकर यांच्या भाषा कौशल्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात जिथे एका मराठी वाक्यात दोन इंग्रजी शब्द नसतील तर आपल्याला कमी लेखले जाईल ही भावना घेऊन भाषेचा वापर करणाऱ्या, न्यूनगंडात गेलेल्या मराठी माणसासाठी ही कादंबरी म्हणजे मराठी अस्खलीतपणाचे उदाहरण आहे. कुठेही अर्थाला, आशयाला, प्रासंगिक वर्णनाला बाधा न आणता मराठी भाषेचे वैभव श्री. सुनील करमरकर आपल्या लिखाणातून, अनुवादातून उलगडत जातात. त्यांनी हे सर्व लिखाण करताना घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. श्री सुनील करमरकर यांचे हे पहिले अनुवादित पुस्तक आहे यावर विश्वास बसणार नाही इतके हे पुस्तक उत्तम झाले आहे. ...Read more