ANITA NAIR

About Author

Birth Date : 26/01/1966


ANITA NAIR IS AN INDIAN NOVELIST WHO WRITES HER BOOKS IN ENGLISH. SHE IS BEST KNOWN FOR HER NOVELS A BETTER MAN, MISTRESS, AND LESSONS IN FORGETTING.

अनिता नायर ह्या नामांकित भारतीय लेखिका आहेत. त्यांनी आपल्या अनेक पुस्तकांचे लेखन इंग्रजी भाषेत केले आहे. केरळ राज्यातील मुंडाकोट्टाकुरिसी येथे त्यांचा जन्म झाला. चेन्नई (मद्रास) येथून ‘इंग्रजी भाषा आणि साहित्य’ या विषयांत त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी बेंगळरूमधील जाहिरात वंÂपनीत ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळला. त्याच काळात त्यांनी ‘सॅटर ऑफ सबवे’ हा आपला पहिला लघुकथा संग्रह लिहिला. तो पुढे हर-आनंद प्रेसला विवूÂन टाकला. पुढे ह्या लघुकथा संग्रहाला व्हर्जिनिया सेंटरच्या वतीने देण्यात येणारी ‘क्रिएटिव्ह आर्ट’ची पेÂलोशिपही प्राप्त झाली. प्रदीर्घ काळ लेखन केल्यामुळे त्यांची अनेक पुस्तवंÂ पुस्तकाच्या स्वरूपात आकाराला आली. त्यांच्या अनेक कथा आणि कविता संग्रहांना अफाट लोकप्रियता लाभल्यामुळे सर्वाधिक खपाची नोंद आहे. ‘द बेटर मॅन’ ह्या त्यांच्या कादंबरीचा २१ भाषांत अनुवाद झाला आहे. मूळ इंग्रजी भाषांतील त्यांची पुस्तवंÂ देश-विदेशातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. २००० साली ‘द बेटर मॅन’ ह्या पुस्तकाला युरोप आणि अमेरिकेत प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर २००२ साली ‘मलबार माइंड’ ह्या कविता संग्रहालाही चांगलीच प्रसिध्दी मिळाली. २००१ मध्ये अनिता नायर यांची ‘लेडीज वूÂपे’ ही कादंबरी खूपच गाजली. २००२ सालच्या सर्वोत्कृष्ट पाच कादंबNयांमध्ये ह्या कादंबरीचा समावेश करण्यात आला. वाचनीय अशा ह्या कादंबरीचा जगातील तब्बल २५ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
LADIES COUPÉ Rating Star
Add To Cart INR 600
VISMARNATACHA SARVAKAHI Rating Star
Add To Cart INR 320

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more