MANJIREE GOKHALE JOSHI

About Author


ORIGINALLY FROM PUNE, MANJIRI IS CURRENTLY HEAD OF PROJECT MANAGEMENT AT PRIMAL PICTURES INFORMA BUSINESS INFORMATION IN LONDON. SHE IS THE CO-FOUNDER OF MAYA CARE, A NON-PROFIT ORGANIZATION WORKING FOR THE ELDERLY.

मूळच्या पुण्याच्या असलेल्या मंजिरी, सध्या लंडनमधील ‘प्राइमल पिक्चर्स इन्फोर्मा बिझनेस इन्फॉर्मेशन’मध्ये प्रकल्प व्यवस्थापन प्रमुख आहेत. त्या ‘माया केअर’ या वृद्धांसाठी कार्य करणाऱ्या ना-नफा तत्त्वावरील संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. त्यांनी ‘द इंडियन एक्स्पे्रेस’मध्ये वार्ताहर म्हणून, ‘डाटाक्वेस्ट’ मासिकाच्या साहाय्यक संपादिका म्हणून, ‘इन मुंबई टेलिव्हिजन’मध्ये कार्यक्रम संचालक म्हणून काम केले आहे. याशिवाय ‘झेंसार टेक्नॉलॉजीज्’च्या बीपीओ विभागाच्या मनुष्यबळ विभाग प्रमुख, तसेच ‘कॉन्टॅक्ट सेन्टर प्रमुख’ म्हणून आणि ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुअरन्स’मध्ये राष्ट्रीय व्यवस्थापक, मार्केटिंग म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांना ब्रिटिश उच्चायुक्तांची ‘शेवेनिंग शिष्यवृत्ती’ मिळाली असून, २००६ साली यूकेमध्ये आयोजित केलेल्या ‘लीडरशीप अ‍ॅन्ड मॅनेजमेंट’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निवडण्यात आलेल्या १२ भारतीय व्यावसायिकांमध्ये – ‘प्रोफेशनल्स’मध्ये त्यांचा समावेश होता. त्या सध्या सैद बिझनेस स्कूल, ऑक्स्फर्ड विद्यापीठ येथे विशाल प्रकल्प व्यवस्थापनाच्या मास्टर्स पदवीचे शिक्षण घेत आहेत. मंजिरी गोखले जोशी यांचे पहिले पुस्तक ‘इन्स्पायर्ड’ २००६ साली प्रकाशित झाले. (सहलेखक – डॉ. गणेश नटराजन) दुसरे पुस्तक ‘क्रशेस, करिअर्स अ‍ॅन्ड सेलफोन्स’ २०११ साली प्रकाशित झाले आहे, तर तिसरे पुस्तक ‘बॉसेस ऑफ द वाइल्ड’ ‘मॅकग्रॉ हिल एज्यूकेशन’, दिल्लीतर्फे २०१३ साली प्रकाशित झाले. मंजिरी व त्यांचे पती अभय जोशी, मिल्टन कीन्स, यूकेमध्ये राहतात. तन्वी व मही या त्यांच्या दोन मुली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
EK SANGU Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more