MANJIREE GOKHALE JOSHI

About Author


ORIGINALLY FROM PUNE, MANJIRI IS CURRENTLY HEAD OF PROJECT MANAGEMENT AT PRIMAL PICTURES INFORMA BUSINESS INFORMATION IN LONDON. SHE IS THE CO-FOUNDER OF MAYA CARE, A NON-PROFIT ORGANIZATION WORKING FOR THE ELDERLY.

मूळच्या पुण्याच्या असलेल्या मंजिरी, सध्या लंडनमधील ‘प्राइमल पिक्चर्स इन्फोर्मा बिझनेस इन्फॉर्मेशन’मध्ये प्रकल्प व्यवस्थापन प्रमुख आहेत. त्या ‘माया केअर’ या वृद्धांसाठी कार्य करणाऱ्या ना-नफा तत्त्वावरील संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. त्यांनी ‘द इंडियन एक्स्पे्रेस’मध्ये वार्ताहर म्हणून, ‘डाटाक्वेस्ट’ मासिकाच्या साहाय्यक संपादिका म्हणून, ‘इन मुंबई टेलिव्हिजन’मध्ये कार्यक्रम संचालक म्हणून काम केले आहे. याशिवाय ‘झेंसार टेक्नॉलॉजीज्’च्या बीपीओ विभागाच्या मनुष्यबळ विभाग प्रमुख, तसेच ‘कॉन्टॅक्ट सेन्टर प्रमुख’ म्हणून आणि ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुअरन्स’मध्ये राष्ट्रीय व्यवस्थापक, मार्केटिंग म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांना ब्रिटिश उच्चायुक्तांची ‘शेवेनिंग शिष्यवृत्ती’ मिळाली असून, २००६ साली यूकेमध्ये आयोजित केलेल्या ‘लीडरशीप अ‍ॅन्ड मॅनेजमेंट’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निवडण्यात आलेल्या १२ भारतीय व्यावसायिकांमध्ये – ‘प्रोफेशनल्स’मध्ये त्यांचा समावेश होता. त्या सध्या सैद बिझनेस स्कूल, ऑक्स्फर्ड विद्यापीठ येथे विशाल प्रकल्प व्यवस्थापनाच्या मास्टर्स पदवीचे शिक्षण घेत आहेत. मंजिरी गोखले जोशी यांचे पहिले पुस्तक ‘इन्स्पायर्ड’ २००६ साली प्रकाशित झाले. (सहलेखक – डॉ. गणेश नटराजन) दुसरे पुस्तक ‘क्रशेस, करिअर्स अ‍ॅन्ड सेलफोन्स’ २०११ साली प्रकाशित झाले आहे, तर तिसरे पुस्तक ‘बॉसेस ऑफ द वाइल्ड’ ‘मॅकग्रॉ हिल एज्यूकेशन’, दिल्लीतर्फे २०१३ साली प्रकाशित झाले. मंजिरी व त्यांचे पती अभय जोशी, मिल्टन कीन्स, यूकेमध्ये राहतात. तन्वी व मही या त्यांच्या दोन मुली आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
EK SANGU Rating Star
Add To Cart INR 250

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more