* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
CONSTABLE NANJUNDEGOUDA GAVE A HALF-SMILE. JAYKUMAR WHO WAS LOCKED BEHIND THE BARS FAILED TO UNDERSTAND THE DIFFERENCE BETWEEN HIS REGULAR POLITE SMILE AND A HEARTY LAUGH. JAYKUMAR, A B. E., WAS AN ESTABLISHED BUSINESSMAN. ‘WHY ARE YOU SMILING?’ HE ASKED. ‘YOU ARE MY COUSIN.” SHE ANSWERED. RAISED IN BANGALORE SHE WAS RIGHT NOW STANDING BENEATH THE ORANGE TREE IN THEIR GARDEN. ‘WHO TAUGHT YOU ENGLISH?’ HE ASKED IN A STRICT TONE. NONE OF HER SCHOOL TEACHERS HAD SUCH STRICT TONE. SHE WAS OFFENDED. WHAT DOES HE THINK OF HIMSELF? IS HE MY TEACHER? ‘MY TEACHER, MY MOTHER. MY MOTHER WORKS AS A READER FOR ENGLISH.’ ‘THEN UNDERSTAND THIS WELL. I AM NOT YOUR COUSIN. I AM YOUR BROTHER, ELDER BROTHER, I AM ANNA.’ ‘BUT MY MUMMY AND DADDY ARE DIFFERENT FROM YOUR AMMA AND APPA.’ SHE HAD THIS NAGGING DOUBT. ‘SO WHAT IF THEY ARE DIFFERENT? MY APPA IS YOUR APPA’S ELDER BROTHER, SO NATURALLY, IT MAKES ME YOUR ELDER BROTHER, JUST REMEMBER THIS. THOSE WHO TEACH YOU ENGLISH HAVE NO SENSE AT ALL.’ HE CONTINUED WITH HIS TEACHINGS. THIS CONTEMPORARY NOVEL REVEALS THE CRACKS THAT INDIAN SOCIETY IS EXPRESSING IN DAY-TO-DAY LIFE. IT WILL TOUCH THE BASE OF OUR HEART.
कॉन्स्टेबल नंजुण्डेगौडा गालातल्या गालात हसला. त्याच्या खेडवळ हास्यामधला मंद आणि जोराच्या हसण्यामधला नेमका फरक लक्षात आला नाही. ‘‘हसायला काय झालं?’’ सळ्यांच्या आड असलेल्या बी.ई.पर्यंतचं शिक्षण घेऊन उद्योगपती म्हणून स्थिरावलेल्या जयकुमारनं विचारलं. ‘‘यू आर माय कझिन!’’ बंगळूरमध्ये वाढलेल्या तिनं खेड्यातल्या त्या घराच्या परसात असलेल्या संत्र्याच्या झाडाखाली उभं राहून म्हटलं. ‘‘कुणी शिकवलं तुला इंग्लिश?’’ त्याने कठोरपणे विचारलं. तिच्या स्कुलमधल्या कुठल्याही मिसच्या नसेल इतक्या कठोर आवाजात. तिला राग आला. हा काय माझा टीचर आहे, एवढं बोलायला? ‘‘माझ्या मिसनं. माझ्या मम्मीनं! माझी मम्मी इंग्लिशची रीडर आहे!’’ ‘‘नीट समजून घे. मी तुझा कझिन नाही. ब्रदर आहे! भाऊ मोठा भाऊ! अण्णा.’’ ‘‘पण माझे डॅडीमम्मी वेगळे आहेत आणि तुझे अम्माअप्पा वेगळे आहेत...’’ तिच्या मनातली शंका फिटली नाही. ‘‘वेगळे असले म्हणून काय झालं? माझे अप्पा तुझ्या अप्पांचे मोठे भाऊ; म्हणून मी तुझा दादाच आहे, लक्षात ठेव. तुला इंग्लिश शिकवलंय त्यांना अक्कल नाही!’’ त्यानं मास्तरगिरी करत म्हटलं. भारतीय समाजाला जात असलेल्या तड्याचं दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी; समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवनदर्शन घडवणारी कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarSantosh Saknur

    `स्वातंत्र्य आणि मुक्ती यांचे अर्थ न कळल्याने स्वतःचे आणि इतरांचे भावविश्व आणि आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मानसिकतेचे विदारक कहाणी` "तडा" (कादंबरी) लेखक:- एस एल भैरप्पा मराठी अनुवाद:- उमा कुलकर्णी हे पुस्तक संपवताना मनात राग, निराशा, सहानुूती, हतबलता आणि चिंता या सर्व भावना स्व:अनुभवायला मिळतात. स्त्रीवादी विचारांचा (खरं स्वातंत्र्य आणि मुक्ती यांचा खरा अर्थ न कळता ते) मिळवण्याचा एकांगी अट्टाहास मनाला विषन्न करतो. अशा वृत्तीमुळे व सदोष कायद्यामुळे आजही समाजात संसाराच्या कितीतरी सुंदर वास्तुला कायमचा तडा बसलेला आहे. या गोष्टींचा आघात जितका पुरुषांना बसलाय त्यापेक्षा जास्त स्त्रियांनाही बसलाय,बसतोय. इर्षेच्या आणि रागाच्या भरात कायद्याच्या जोरावर मोडलेला संसार काही काळानंतर स्त्रीला पश्चातापाच्या चितेत अखंड मृत्यू वेदना देत राहतो. या कादंबरीत स्त्रीवादी भूमिका मिरवणाऱ्या मानसिकतेचं क्रूर चित्र रंगवलेलं आहे. इला, मंगळा, चित्रा,माला या त्या मानसिकतेची काही मूर्त नावे. चळवळीच्या नावाखाली स्वतःचा स्वैराचार व्यभिचार आणि नवऱ्याच्या इस्टेटी मिळवण्यासाठी सोडलेली स्वतःची पातळी तरीही त्याला मुक्ती स्वातंत्र्या अस गोंडस नाव देऊन समाजात विदुषी म्हणून मिरवतात. यांच्या मुळे कित्येक जयकुमार, चिन्मयानंद, नचिकेत, प्रभाकर अगदी मंत्री राजकारणी वकील यांचीही झालेली वाताहत पाहायला मिळते. भारतीयच नाही तर स्वतःला पुढारलेले समजणारे पाश्चात्त्य देश ही अशा तांडवात पुरते भाजत आहेत. घटस्फोटाचे खेळ, अशिलांना फशी पाडून वकिलांची मौजमजा आजही आपणास माहित आहेच, पण यात सर्वात जास्त अन्याय सहन करतात ते ज्यांनी कोणतीही चूक केलेली नसते ते म्हणजे घटस्फोटित दाम्पत्यांची अपत्ये. त्यांच्या वाट्याला आलेलं जिवंत पोरकेपण स्त्रीवादी स्वातंत्र्याची चळवळ कधीच भरून काढू शकत नाही. कायद्याचा धाक असावा पण अतिरेक असू नये याच आशयाचे ही खूपच प्रभावी पुस्तक प्रत्येक वाचकाने वाचावे व आपल्या संसाराचे भावविश्व अधिक प्रगल्भ करावे असं आपसूकच मला हे पुस्तक वाचताना वाटून गेलं. स्वतःचा संसार व भावविश्वाला समृद्ध करण्यासाठी अवश्य वाचा संतोष सकनूर दिनांक 18 जुलै 2021 ...Read more

  • Rating StarRajendra Dhole

    स्वातंत्र आणि मुक्ती यांचे अर्थ न कळल्याने स्वत:चे आणि इतरांचे भावविश्व आणि आयुष्य उद् ध्वस्त करणार्‍या मानसिकतेची विदारक कहाणी भारतिय समाजाला जात असलेल्या तड्यांच दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी, समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवन- दर्शन घडवणारी कादबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
मीना कश्यप शाह

भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more