* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
CONSTABLE NANJUNDEGOUDA GAVE A HALF-SMILE. JAYKUMAR WHO WAS LOCKED BEHIND THE BARS FAILED TO UNDERSTAND THE DIFFERENCE BETWEEN HIS REGULAR POLITE SMILE AND A HEARTY LAUGH. JAYKUMAR, A B. E., WAS AN ESTABLISHED BUSINESSMAN. ‘WHY ARE YOU SMILING?’ HE ASKED. ‘YOU ARE MY COUSIN.” SHE ANSWERED. RAISED IN BANGALORE SHE WAS RIGHT NOW STANDING BENEATH THE ORANGE TREE IN THEIR GARDEN. ‘WHO TAUGHT YOU ENGLISH?’ HE ASKED IN A STRICT TONE. NONE OF HER SCHOOL TEACHERS HAD SUCH STRICT TONE. SHE WAS OFFENDED. WHAT DOES HE THINK OF HIMSELF? IS HE MY TEACHER? ‘MY TEACHER, MY MOTHER. MY MOTHER WORKS AS A READER FOR ENGLISH.’ ‘THEN UNDERSTAND THIS WELL. I AM NOT YOUR COUSIN. I AM YOUR BROTHER, ELDER BROTHER, I AM ANNA.’ ‘BUT MY MUMMY AND DADDY ARE DIFFERENT FROM YOUR AMMA AND APPA.’ SHE HAD THIS NAGGING DOUBT. ‘SO WHAT IF THEY ARE DIFFERENT? MY APPA IS YOUR APPA’S ELDER BROTHER, SO NATURALLY, IT MAKES ME YOUR ELDER BROTHER, JUST REMEMBER THIS. THOSE WHO TEACH YOU ENGLISH HAVE NO SENSE AT ALL.’ HE CONTINUED WITH HIS TEACHINGS. THIS CONTEMPORARY NOVEL REVEALS THE CRACKS THAT INDIAN SOCIETY IS EXPRESSING IN DAY-TO-DAY LIFE. IT WILL TOUCH THE BASE OF OUR HEART.
कॉन्स्टेबल नंजुण्डेगौडा गालातल्या गालात हसला. त्याच्या खेडवळ हास्यामधला मंद आणि जोराच्या हसण्यामधला नेमका फरक लक्षात आला नाही. ‘‘हसायला काय झालं?’’ सळ्यांच्या आड असलेल्या बी.ई.पर्यंतचं शिक्षण घेऊन उद्योगपती म्हणून स्थिरावलेल्या जयकुमारनं विचारलं. ‘‘यू आर माय कझिन!’’ बंगळूरमध्ये वाढलेल्या तिनं खेड्यातल्या त्या घराच्या परसात असलेल्या संत्र्याच्या झाडाखाली उभं राहून म्हटलं. ‘‘कुणी शिकवलं तुला इंग्लिश?’’ त्याने कठोरपणे विचारलं. तिच्या स्कुलमधल्या कुठल्याही मिसच्या नसेल इतक्या कठोर आवाजात. तिला राग आला. हा काय माझा टीचर आहे, एवढं बोलायला? ‘‘माझ्या मिसनं. माझ्या मम्मीनं! माझी मम्मी इंग्लिशची रीडर आहे!’’ ‘‘नीट समजून घे. मी तुझा कझिन नाही. ब्रदर आहे! भाऊ मोठा भाऊ! अण्णा.’’ ‘‘पण माझे डॅडीमम्मी वेगळे आहेत आणि तुझे अम्माअप्पा वेगळे आहेत...’’ तिच्या मनातली शंका फिटली नाही. ‘‘वेगळे असले म्हणून काय झालं? माझे अप्पा तुझ्या अप्पांचे मोठे भाऊ; म्हणून मी तुझा दादाच आहे, लक्षात ठेव. तुला इंग्लिश शिकवलंय त्यांना अक्कल नाही!’’ त्यानं मास्तरगिरी करत म्हटलं. भारतीय समाजाला जात असलेल्या तड्याचं दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी; समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवनदर्शन घडवणारी कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarSantosh Saknur

    `स्वातंत्र्य आणि मुक्ती यांचे अर्थ न कळल्याने स्वतःचे आणि इतरांचे भावविश्व आणि आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मानसिकतेचे विदारक कहाणी` "तडा" (कादंबरी) लेखक:- एस एल भैरप्पा मराठी अनुवाद:- उमा कुलकर्णी हे पुस्तक संपवताना मनात राग, निराशा, सहानुूती, हतबलता आणि चिंता या सर्व भावना स्व:अनुभवायला मिळतात. स्त्रीवादी विचारांचा (खरं स्वातंत्र्य आणि मुक्ती यांचा खरा अर्थ न कळता ते) मिळवण्याचा एकांगी अट्टाहास मनाला विषन्न करतो. अशा वृत्तीमुळे व सदोष कायद्यामुळे आजही समाजात संसाराच्या कितीतरी सुंदर वास्तुला कायमचा तडा बसलेला आहे. या गोष्टींचा आघात जितका पुरुषांना बसलाय त्यापेक्षा जास्त स्त्रियांनाही बसलाय,बसतोय. इर्षेच्या आणि रागाच्या भरात कायद्याच्या जोरावर मोडलेला संसार काही काळानंतर स्त्रीला पश्चातापाच्या चितेत अखंड मृत्यू वेदना देत राहतो. या कादंबरीत स्त्रीवादी भूमिका मिरवणाऱ्या मानसिकतेचं क्रूर चित्र रंगवलेलं आहे. इला, मंगळा, चित्रा,माला या त्या मानसिकतेची काही मूर्त नावे. चळवळीच्या नावाखाली स्वतःचा स्वैराचार व्यभिचार आणि नवऱ्याच्या इस्टेटी मिळवण्यासाठी सोडलेली स्वतःची पातळी तरीही त्याला मुक्ती स्वातंत्र्या अस गोंडस नाव देऊन समाजात विदुषी म्हणून मिरवतात. यांच्या मुळे कित्येक जयकुमार, चिन्मयानंद, नचिकेत, प्रभाकर अगदी मंत्री राजकारणी वकील यांचीही झालेली वाताहत पाहायला मिळते. भारतीयच नाही तर स्वतःला पुढारलेले समजणारे पाश्चात्त्य देश ही अशा तांडवात पुरते भाजत आहेत. घटस्फोटाचे खेळ, अशिलांना फशी पाडून वकिलांची मौजमजा आजही आपणास माहित आहेच, पण यात सर्वात जास्त अन्याय सहन करतात ते ज्यांनी कोणतीही चूक केलेली नसते ते म्हणजे घटस्फोटित दाम्पत्यांची अपत्ये. त्यांच्या वाट्याला आलेलं जिवंत पोरकेपण स्त्रीवादी स्वातंत्र्याची चळवळ कधीच भरून काढू शकत नाही. कायद्याचा धाक असावा पण अतिरेक असू नये याच आशयाचे ही खूपच प्रभावी पुस्तक प्रत्येक वाचकाने वाचावे व आपल्या संसाराचे भावविश्व अधिक प्रगल्भ करावे असं आपसूकच मला हे पुस्तक वाचताना वाटून गेलं. स्वतःचा संसार व भावविश्वाला समृद्ध करण्यासाठी अवश्य वाचा संतोष सकनूर दिनांक 18 जुलै 2021 ...Read more

  • Rating StarRajendra Dhole

    स्वातंत्र आणि मुक्ती यांचे अर्थ न कळल्याने स्वत:चे आणि इतरांचे भावविश्व आणि आयुष्य उद् ध्वस्त करणार्‍या मानसिकतेची विदारक कहाणी भारतिय समाजाला जात असलेल्या तड्यांच दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी, समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवन- दर्शन घडवणारी कादबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more