* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
CONSTABLE NANJUNDEGOUDA GAVE A HALF-SMILE. JAYKUMAR WHO WAS LOCKED BEHIND THE BARS FAILED TO UNDERSTAND THE DIFFERENCE BETWEEN HIS REGULAR POLITE SMILE AND A HEARTY LAUGH. JAYKUMAR, A B. E., WAS AN ESTABLISHED BUSINESSMAN. ‘WHY ARE YOU SMILING?’ HE ASKED. ‘YOU ARE MY COUSIN.” SHE ANSWERED. RAISED IN BANGALORE SHE WAS RIGHT NOW STANDING BENEATH THE ORANGE TREE IN THEIR GARDEN. ‘WHO TAUGHT YOU ENGLISH?’ HE ASKED IN A STRICT TONE. NONE OF HER SCHOOL TEACHERS HAD SUCH STRICT TONE. SHE WAS OFFENDED. WHAT DOES HE THINK OF HIMSELF? IS HE MY TEACHER? ‘MY TEACHER, MY MOTHER. MY MOTHER WORKS AS A READER FOR ENGLISH.’ ‘THEN UNDERSTAND THIS WELL. I AM NOT YOUR COUSIN. I AM YOUR BROTHER, ELDER BROTHER, I AM ANNA.’ ‘BUT MY MUMMY AND DADDY ARE DIFFERENT FROM YOUR AMMA AND APPA.’ SHE HAD THIS NAGGING DOUBT. ‘SO WHAT IF THEY ARE DIFFERENT? MY APPA IS YOUR APPA’S ELDER BROTHER, SO NATURALLY, IT MAKES ME YOUR ELDER BROTHER, JUST REMEMBER THIS. THOSE WHO TEACH YOU ENGLISH HAVE NO SENSE AT ALL.’ HE CONTINUED WITH HIS TEACHINGS. THIS CONTEMPORARY NOVEL REVEALS THE CRACKS THAT INDIAN SOCIETY IS EXPRESSING IN DAY-TO-DAY LIFE. IT WILL TOUCH THE BASE OF OUR HEART.
कॉन्स्टेबल नंजुण्डेगौडा गालातल्या गालात हसला. त्याच्या खेडवळ हास्यामधला मंद आणि जोराच्या हसण्यामधला नेमका फरक लक्षात आला नाही. ‘‘हसायला काय झालं?’’ सळ्यांच्या आड असलेल्या बी.ई.पर्यंतचं शिक्षण घेऊन उद्योगपती म्हणून स्थिरावलेल्या जयकुमारनं विचारलं. ‘‘यू आर माय कझिन!’’ बंगळूरमध्ये वाढलेल्या तिनं खेड्यातल्या त्या घराच्या परसात असलेल्या संत्र्याच्या झाडाखाली उभं राहून म्हटलं. ‘‘कुणी शिकवलं तुला इंग्लिश?’’ त्याने कठोरपणे विचारलं. तिच्या स्कुलमधल्या कुठल्याही मिसच्या नसेल इतक्या कठोर आवाजात. तिला राग आला. हा काय माझा टीचर आहे, एवढं बोलायला? ‘‘माझ्या मिसनं. माझ्या मम्मीनं! माझी मम्मी इंग्लिशची रीडर आहे!’’ ‘‘नीट समजून घे. मी तुझा कझिन नाही. ब्रदर आहे! भाऊ मोठा भाऊ! अण्णा.’’ ‘‘पण माझे डॅडीमम्मी वेगळे आहेत आणि तुझे अम्माअप्पा वेगळे आहेत...’’ तिच्या मनातली शंका फिटली नाही. ‘‘वेगळे असले म्हणून काय झालं? माझे अप्पा तुझ्या अप्पांचे मोठे भाऊ; म्हणून मी तुझा दादाच आहे, लक्षात ठेव. तुला इंग्लिश शिकवलंय त्यांना अक्कल नाही!’’ त्यानं मास्तरगिरी करत म्हटलं. भारतीय समाजाला जात असलेल्या तड्याचं दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी; समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवनदर्शन घडवणारी कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarSantosh Saknur

    `स्वातंत्र्य आणि मुक्ती यांचे अर्थ न कळल्याने स्वतःचे आणि इतरांचे भावविश्व आणि आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या मानसिकतेचे विदारक कहाणी` "तडा" (कादंबरी) लेखक:- एस एल भैरप्पा मराठी अनुवाद:- उमा कुलकर्णी हे पुस्तक संपवताना मनात राग, निराशा, सहानुूती, हतबलता आणि चिंता या सर्व भावना स्व:अनुभवायला मिळतात. स्त्रीवादी विचारांचा (खरं स्वातंत्र्य आणि मुक्ती यांचा खरा अर्थ न कळता ते) मिळवण्याचा एकांगी अट्टाहास मनाला विषन्न करतो. अशा वृत्तीमुळे व सदोष कायद्यामुळे आजही समाजात संसाराच्या कितीतरी सुंदर वास्तुला कायमचा तडा बसलेला आहे. या गोष्टींचा आघात जितका पुरुषांना बसलाय त्यापेक्षा जास्त स्त्रियांनाही बसलाय,बसतोय. इर्षेच्या आणि रागाच्या भरात कायद्याच्या जोरावर मोडलेला संसार काही काळानंतर स्त्रीला पश्चातापाच्या चितेत अखंड मृत्यू वेदना देत राहतो. या कादंबरीत स्त्रीवादी भूमिका मिरवणाऱ्या मानसिकतेचं क्रूर चित्र रंगवलेलं आहे. इला, मंगळा, चित्रा,माला या त्या मानसिकतेची काही मूर्त नावे. चळवळीच्या नावाखाली स्वतःचा स्वैराचार व्यभिचार आणि नवऱ्याच्या इस्टेटी मिळवण्यासाठी सोडलेली स्वतःची पातळी तरीही त्याला मुक्ती स्वातंत्र्या अस गोंडस नाव देऊन समाजात विदुषी म्हणून मिरवतात. यांच्या मुळे कित्येक जयकुमार, चिन्मयानंद, नचिकेत, प्रभाकर अगदी मंत्री राजकारणी वकील यांचीही झालेली वाताहत पाहायला मिळते. भारतीयच नाही तर स्वतःला पुढारलेले समजणारे पाश्चात्त्य देश ही अशा तांडवात पुरते भाजत आहेत. घटस्फोटाचे खेळ, अशिलांना फशी पाडून वकिलांची मौजमजा आजही आपणास माहित आहेच, पण यात सर्वात जास्त अन्याय सहन करतात ते ज्यांनी कोणतीही चूक केलेली नसते ते म्हणजे घटस्फोटित दाम्पत्यांची अपत्ये. त्यांच्या वाट्याला आलेलं जिवंत पोरकेपण स्त्रीवादी स्वातंत्र्याची चळवळ कधीच भरून काढू शकत नाही. कायद्याचा धाक असावा पण अतिरेक असू नये याच आशयाचे ही खूपच प्रभावी पुस्तक प्रत्येक वाचकाने वाचावे व आपल्या संसाराचे भावविश्व अधिक प्रगल्भ करावे असं आपसूकच मला हे पुस्तक वाचताना वाटून गेलं. स्वतःचा संसार व भावविश्वाला समृद्ध करण्यासाठी अवश्य वाचा संतोष सकनूर दिनांक 18 जुलै 2021 ...Read more

  • Rating StarRajendra Dhole

    स्वातंत्र आणि मुक्ती यांचे अर्थ न कळल्याने स्वत:चे आणि इतरांचे भावविश्व आणि आयुष्य उद् ध्वस्त करणार्‍या मानसिकतेची विदारक कहाणी भारतिय समाजाला जात असलेल्या तड्यांच दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी, समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवन- दर्शन घडवणारी कादबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more