* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661965
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :DADASAHEB MORE COMBO OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IN HIS NOVEL, PROF. MORE ILLUSTRATES THE TRUTHFUL AND SCORCHING SIDE OF THE WORLD TODAY. VERY RARELY, THE SLUMS ARE DESCRIBED WITH SUCH INTENSITY REVELING THE UGLY FACTS AND TERRIBLE ACTUALITY. THE NOVEL HAS REACHED A HEIGHT OWING TO THE PERFECT PORTRAYAL OF THE TWO ENDS; RURAL CULTURE AND URBAN TENDENCY OF SELF-INDULGENCE IN ADDITION TO THE TENSIONS AND ATTEMPTS FOR MERE SURVIVAL. THE HERO POSSESSING MANY QUALITIES AND HAS IMMENSE CAPACITY TO BE IN HARMONY YET REMAIN NEUTRAL WITH HIS SURROUNDING OFFERS UNIQUE ANGLE TO THE OVERALL WRITING. THOUGH IN MARATHI, IT IS NOT CONFINED TO OUR STATE, RATHER WITH ITS FOCUS ON VARIOUS ASPECTS OF LIFE, IT HAS SIMPLY CONQUERED THE READERS AT A UNIVERSAL LEVEL. IT IS A MILE-STONE IN THE LITERARY WORLD. THIS NOVEL HAS INDEED SOUGHT A PROFOUND PLACE IN THE MARATHI LITERATURE.
’अंधाराचे वारसदार’ या कादंबरीत प्रा. मोरे यांनी आजच्या बदलत्या समाज वास्तवाचे प्रखर आणि दाहक दर्शन घडविलेले आहे. झोपडपट्टीतील जीवनाचे असे विदारक दर्शन अपवादानेच मराठी साहित्यात आढळते. ठाामीण जीवनातील खोलवर रूजलेले संस्कार आणि शहरी भोगवादी, चंगळवादी जीवनाची ओढ, त्यातील ताणतणाव, जगण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष यांचे कलात्मकतेने केलेले चित्रण या कादंबरीची उंची वाढविते. कलावंताकडे असणारी वर्ण्यविषयासंबंधीची तादात्म्यता, तटस्थता आणि आंतरिक तळमळ यामुळे ही कादंबरी, एकूण मराठी कादंबरी वाङ्मयाला वेगळे परिमाण प्राप्त करून देणारी ठरली आहे. आजच्या युवा पिढीची मानसिकता, जगण्याची अपरिहार्यता उलगडत जाताना ही कादंबरी प्रादेशिकतेच्या, भाषेच्या सीमा ओलांडून वैश्विकतेकडे झेप घेते. हेच या कादंबरीचे यश आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ANDHARACHE VARASDAR #DADASAHEB MORE #अंधाराचे वारसदार #दादासाहेब मोरे #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% MORE #अंधाराचे वारसदार #दादासाहेब मोरे
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    झोपडपट्टीतील कुटुंबावर कायम घोटाळणारे अस्थिरतेचे कृष्णमेघ... अंधाराचे वारसदार ही झोपडपट्टीच्या जीवनाची एक विदारक झलक दाखवणारी कादंबरी. `गबाळ` मध्ये कुडमुड्या जोशी जमातीचे चित्रण करणाऱ्या दादासाहेब मोरे यांनी आता त्या जमातीबाहेरच्या जगाकडे, शहरातील झपडपट्ट्यांमधील स्थलांतरितांच्या जीवनसंघर्षाकडे आपले लक्ष वळविले आहे. कॉलेजमध्ये नव्यानेच जाणारा तरुण रमेश सिनेमाची तिकिटं ब्लॅकनं विकणाऱ्या एका टोळीत नकळत ओढला जातो आणि पहिल्याच झटक्यात पोलिसांच्या तावडीत सापडतो. गणपा हातभट्टीवाला व त्याचे साथीदार त्याला जामिनावर सोडवतात खरा, पण दारू, मटका, गर्द, वेश्या, पान सिगारेट– या सर्वांची चटक त्याला लागते; आणि ब्लॅकमध्ये तिकिटे विकून या व्यसनांची नशा पूर्ण करण्याची त्याची धडपड चालू राहते. पैसे मिळतात पण ते कधीच पुरे पडत नाहीत. नेहमीच कडकी चालू राहते. उधार उसनवार करावी लागते. तशात शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन स्थलांतर करण्याची योजना कार्यान्वित होते. आठ-दहा झोपडपट्ट्यातील हजार-बाराशे कुटुंबांना शहरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या काळ्या रानात हलवण्यात येते. प्रत्येकी पंधरा बाय दहा फुटांची जागा, अशा चाळीस-पन्नास घरांची रांग, दोन रांगांमध्ये कच्चा मुरुम टाकून केलेले रस्ते– नगरपालिकेनं तयार केलेल्या यादीनुसार जागांचे वाटप होत राहते. घरे कधी बांधून होणार याचे वेळापत्रक कोणालाच ठाऊक नसते. तात्पुरती सोय म्हणून प्रत्येक कुटुंबाला थोडे कळक दिले होते. त्या बांबूच्या कळकांनी खोपटं किंवा झोपडी उभी करून तात्पुरता निवारा ज्याचा त्यानं उभा करायचा होता. त्याप्रमाणं लोक कुठून-कुठून पालापाचोळा, पत्रे, प्लॅस्टिक शीट वगैरे आणून आपला उघड्यावरचा संसार झाकण्याचा प्रयत्न करत होते. उघड्यावरच चुल धडधडत होत्या. खाणं-पिणं चालू होतं. बायाबापड्या चार-सहा घरात धुणं-भांडी करून संसाराला हातभार लावत. शाळा लांब. त्यामुळं मुलं आळस करत. झोपडपट्टीतल्या लोकांचे नाना उद्योग. कोणी माकडवाले होते, कोणी चिंध्या कागद गोळा करणारे. कोणी गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करीत. कोणी आडत दुकानात हमाली करत. पोपटवाले जोशी पोपटाचा पिंजरा घेऊन भविष्य सांगत. कोणी भाकरीचे शिळे तुकडे वाळवून बिस्किटाच्या कारखान्यात, पाव-ब्रेडच्या बेकरीत देत. दादासाहेब मोरे या झोपडपट्टीतील वेगवेगळ्या माणसांचे व समस्यांचे वैविध्य दाखवू पाहतात. त्यासाठी रमेशच्या कुटुंबाप्रमाणेच सुनीलच्या कुटुंबालाही मध्यवर्ती स्थान देतात. स्थानांतरामुळे अनेकांच्या रोजी-रोटीतही व्यत्यय येतो. सुनीलचा बाप रामाप्पा व आई सावित्रीबाई चौथ्या मजल्यावरच्या स्लॅबचं सिमेंट ओतण्याच्या कामाला जातात. शिडीवरून पाट्या वर पोचवताना रामाप्पा खाली पडतो. लोखंडी सळ्यांवर पडल्याने, त्याच्या मांडीत सळ्या घुसतात. रक्त वाहू लागते. त्याला ठेकेदार हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सावित्रीबाईही त्याच्या मागोमाग जाते. डॉक्टर उजवा पाय मांडीपासून कापतात. ते म्हणतात, ``महिनाभर हालचाल करायची नाही. कुबड्या लावून चालायची सवय करावी लागेल. दर आठवड्याला तपासणीसाठी या.`` मुलगा सुनील शाळा चुकवू लागतो. आईलाही कामावर जाणे कठीण होते. इमारतीचा मालक औषध-पाण्यासाठी थोडे पैसे देतो. झोपडपट्टीवाल्यांच्या घरबांधणीच्या कामाकडे कोणीच लक्ष देत नाही. तेव्हा मोर्चा काढण्याचे ठरते. सुदाम, नऱ्या, रमेश व इतर तरुण मोर्चाची तयारी करतात. ``तुम्ही मोर्चात आला तरच तुम्हाला घर मिळेल. निवेदनावर सही नाहीतर आंगठा करा.`` त्या निवेदनाच्या प्रती कलेक्टर, पोलीस स्टेशन, वृत्तपत्रे यांना देण्यात येतात. कापडी बॅनर्स तयार करण्यात येतात. मोर्चापुढे सुदामचे भाषण होते. निवेदन नगराध्यक्षांना देण्यात येते. रमेशचा दोस्त नऱ्या एकदा रमेशच्या बहिणीला– शेवंतीला एकटीच गाठतो. ``तुझ्या भावाचा दोस्त तर आहेच. मग तुझा दोस्त झालो तर काम बिघडलं? ... ``शेवंता त्याच्या अंगावर तांब्या भिरकावते. डोकं धरून तो झोपडीबाहेर पळतो. लोक झोपडीपुढे जमतात. पण गुंड नऱ्याशी वैर घ्यायला कोणीच तयार नसते. पण तेवढ्यात रमेश चाकू घेऊन नऱ्याचा बदला घ्यायला येतो. गणपाला बघून मात्र तो पाय मागे घेतो. नगरपालिकेच्या निवडणुकांची धांदल सुरू होते. तशात या झोपडपट्टीला आग लागते. अग्निशामक दलाच्या गाड्या येईपर्यंत बहुतेक झोपड्या जळून खाक होतात. पुढारी झोपडपट्टीला भेट देतात. आश्वासने देतात. गुंड नऱ्या इतर टोळीवाल्यांना सांगतो, ``आपण मदतीसाठी फेऱ्या काढू. धान्य, पैसा इ. काही हाती लागले तर बघू. नाहीतर झोपडीही गेली आणि संधीही गेली असं होईल. आपल्यातली परस्परांची दुश्मनी या प्रसंगापुरती विसरून कामाला लागलं तरच! ज्याच्या ज्याच्या गँगच्या हाताला जे लागेल ते त्याचं.`` मग हे तरुण गटागटानं शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरून पैसे– मदत गोळा करतात. लोकही कमी-जास्त मदत करतात. धान्य, कपडे, भांडी, ब्रेड, पैसे– निवडणुकीतले उमेदवारही साड्या, चादरी वाटतात. मताला शंभर रुपये भाव देतात. प्रत्येक टोळी प्रमुखाला उमेदवार गणपा दहा-दहा हजार रुपये देतो. मते न आणली तर मात्र जिवंत ठेवणार नाही असा दमही भरतो. गणपा दारूवाला निवडून येतो. ब्लॅकने तिकिटे विकताना रमेशची आणि अरुणची मारामारी होते. नऱ्याही रमेशला मारतो. रमेश कसाबसा पळत घरी येतो. आई त्याला हळद मलमपट्टी करते. रमेश रात्री नऱ्याला रस्त्यात गाठून त्याच्यावर चाकूचे वार करतो. त्याच्याबरोबरचे सुनील व अकबर पळ काढतात. पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून रमेशही पळ काढतो. आपण पोलिसांच्या हाती सापडलो तर अंधारकोठडीत डांबले जाणार; नाहीतर झोपडपट्टीत लपून राहून अंधाराचे वारसदार म्हणून दिवस काढणार. आपल्या जीवनाला लागलेले हे भेसूर भयानक वळण; त्यातून आपली सुटका नाही. या विचाराने तो त्या भेसूर अंधारात रस्ता दिसेल तिकडे धावत सुटतो... त्याची सगळी स्वप्ने उद्ध्वस्त झालेली असतात. झोपडपट्टीत राहण्याची पाळी आलेल्या तरुणांना जी संगत मिळते ती त्यांना गुन्हेगारीकडे आणि व्यसनांकडे नेते आणि शेवटी त्यांना अंधाराचे वारसदार बनवते. दादासाहेब मोरे यांनी या झोपडपट्टीतील गरीब रहिवाशांच्या आयुष्यातील परवड वेगवेगळ्या संदर्भासह वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. रमेश हा नायक म्हणून प्रामुख्याने त्यांनी रंगवला आहे. नऱ्या हा खलनायक. सुनील व इतर गँगवाले, रमेश व सुनील यांची कुटुंबे व त्या झोपडपट्टीतील एकमेव धनिक गणपा दारूवाला– या मोजक्या पात्रांनिशी झोपडपट्टीतील लोकांच्या सुख-दु:खाची एक झलक या कादंबरीत मोरे यांनी दाखवली आहे. तटस्थपणे झोपडपट्टीवासीयांच्या ससेहोलपलटीचे भिन्न-विभिन्न प्रकार मोरे पेश करतात; गुन्हेगारी जगाचाही फेरफटका घडवून आणतात. क्रौर्याला सामोरे जाताना मोरे हे काहीसे दचकत दबकतच पुढे जातात. फार खोलात जाण्याचे टाळतात. झोपडपट्टीबद्दल लिहितानाही त्यांना आपण अप्रिय कर्तव्य करत आहो असे काहीतरी जाणवत असावे. त्यात तसा त्वेष नाही. चीड नाही. असहाय अगतिकता आहे. साक्षीभावाने सगळे अध:पतन बघताना या जीवनाचा भेसूर भयानक शेवट होणार ही खंत त्यांना सर्वाधिक सतावते. ``उद्याच्या भेसूर जीवनाची कल्पना कोणीतरी आपल्याला वेळीच द्यायला हवी होती`` अशी पश्चात्तापाची भावना रमेशमध्ये शेवटी जागी होते. पण आता ती निरुपयोगी असते. सरळ रेषेत जायचे कितीही मनात असो, अंधारात वाट वाकडी-तिकडी होण्याची शक्यता अंधाराच्या वारसदारांबाबत विशेषच राहते– असा इशारा ही कादंबरी देते. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-06-2002

    संयमित आविष्कार... समकालीन जीवनाचा तलस्पर्शी वेध घेणारा साहित्य प्रकार म्हणून ‘कादंबरी’चा उल्लेख केला जातो. त्यामुळे जीवनात प्रत्यही घडणारी परिवर्तने कादंबरीतून पाहायला मिळतात. मध्यमवर्गीय जीवनातली स्थित्यंतरे हा अगिणत कादंबऱ्यांचा गाभा आहे, त्याच्य जोडीला साठोत्तरी कालखंडात झोपडपट्टीवासीयांचे जीवन, त्यांच्या व्यथा वेदनांसह टिपण्याचा प्रयत्न सुरू झाला. शहरांशी निगडीत झोपडपट्ट्यांची दखल मराठीत ‘चक्र’, ‘वासूनाका’, ‘माहीमची खाडी’ आदी कादंबऱ्यांनी प्रथमच प्रभावीपणाने घेतली, त्यांच्यामधून झोपडपट्टीचे सांस्कृतिक अनुबंध, सामाजिक संबंध, आर्थिक आकृतिबंध यांचा मराठी वाचकांना परिचय होत गेला. हा संपन्न वारसा सांभाळत दादासाहेब मोरे यांची ‘अंधाराचे वारसदार’ ही कादंबरी अवतरली आहे. तिच्यात झोपडपट्टीतील जीवनकलहाचा मुकाटपणा, सोशिकपणा आणि भाबडेपणाही अनेक घटना, प्रसंगांतून वर्णन केलेला आहे. ग्रामीण भागातील माणसे जिवंत राहण्यासाठी शहरात येऊन स्थायिक होतात, त्यांना झोपडपट्टीचा आश्रय मिळतो. अशा माणसांना शहरी जीवनात रुळताना दुभंगलेपणाचा भोग अटळपणाने भोगावा लागतो. भकासपणा त्यांच्या जीवनाचा भाग बनतो. अशा माणसांच्या पुढील पिढीला बकालपणा शाप वाट्याला येतो. भय, भूक आणि भ्रष्टाचार यांच्या विळख्यात झोपडपट्टीचे जीवन सापडते. साहजिकच एकेकाळी प्रकाशाचे शिल्पकार असलेल्या ग्रामीण कुटुंबातून शहरी पर्यावरणात ‘अंधाराचे वारसदार’ कसे निर्माण होतात याचे हृदय आणि सुरेख चित्रण दादासाहेब मोरे यांनी केले आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही आदिम काळापासूनची मानवी शुभेच्छा असूनही जगातील अगणित मानवगटांना अंधारातून अंधाराकडे वाटचाल करावी लागत आहे. अशा अभावग्रस्त ‘अंधाराचे वारसदार’ या कादंबरीत असाच एक उल्लेखनीय प्रयत्न झाला आहे. स्वत:च्या पोटासाठी, मुलांच्या पाटी, पेन्सिलीसाठी शहराच्या आश्रयाला आलेल्या ग्रामीण समूहाच्या नशिबी ‘आगीतून फुफाट्यात पडणे’ कसे येते याचे विदारक चित्रण या कादंबरीत केले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात ही कादंबरी सिद्रामचे कुटुंब, नऱ्याची टोळी, गणपा दादाचा गोतावळा, झोपडपट्टीची दिनचर्या यांच्याशी निगडीत आहे. सिद्राम आपली पत्नी राधाबाई आणि मुले रमेश, सुरेश शेवंतासह लवंगी गावाहून सांगली शहराच्या झोपडपट्टीत राहू लागतो. इथे त्याला आणखी दोन मुले होतात. एकवीस वर्षांचा रमेश महाविद्यालयीन युवक आहे. तो सिनेमाची तिकिटे काळ्या बाजारात विकणाऱ्या नऱ्याच्या टोळीकडे ओढला जातो. यानिमित्ताने पहिल्या प्रकरणात सिनेमा तिकिटांच्या काळ्या बाजाराच्या यंत्रणेवर भेदक प्रकाश टाकला आहे. सहज मिळणाऱ्या पैशामुळे नऱ्या, सुनील, विलास, अकबर, रमेश असे अनेक युवक व्यसनांच्या आहारी जातात. मद्यप्राशन, वेश्यागमन, धूम्रपानही त्यांच्या अंगवळणी पडतात. एका झोपडपट्टीची दिनचर्या हा कादंबरीचा गाभा आहे. दुसऱ्या प्रकरणाच्या प्रारंभी रिमांड होमजवळील झोपडपट्टीचे नव्या जागेत पुनर्वसन होणार म्हणून तेथील लोकांच्या आशा पल्लवित होतात. तिसऱ्या प्रकरणात झोपडपट्टीला पुनर्वसन मंत्री ना. पोटारते साहेब भेट देतात. त्यांच्या कार्यक्रमाचा आँखो देखा हाल सादर केलेला आहे. पाचव्या प्रकरणात झोपडपट्टीचे नव्या जागेत स्थलांतर होते. त्यामुळे शिक्षण, सुविधा, रोजगारविषयक नव्या समस्या निर्माण होतात. सहाव्या प्रकरणात झोपडपट्टीला पाऊस झोडपून काढतो. आठव्या प्रकरणात गणपा दादाच्या पुढाकारने झोपडपट्टीवासीयांचा मोर्चा काढण्यात येतो. दहाव्या प्रकरणात नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने झोपडपट्टीचे जीवन ढवळून निघते. याच वेळी तिला भीषण आग लागते. अकराव्या प्रकरणात जळितग्रस्तांच्या मदतीसाठी झोपडपट्टीतील युवक गावभर फिरून मदत गोळा करतात. तिच्या वाटपात भ्रष्टाचार होतो. निवडणुकीच्या आदल्या रात्री पद्धतशीर पैसे वाटप होऊन गणपा दादा निवडून येतो, अशा झोपडपट्टीच्या दिनचर्येत दादासाहेब मोरेंनी अनेक नाट्यपूर्ण घटना, प्रसंग कौशल्याने गुंफले आहेत. दलित, मुस्लिम, मातंग, गोसावी, साप गारुडी, माकडवाले, मराठा, कुणबी अशा लोकांचीही बहुजिनसी झोपडपट्टी आहे. हे लोक उपजीविकेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या करतात. त्यापैकी अहमद, रशीद आणि मुन्ना यांच्या नाग-मुंगसाचा सार्वजनिक खेळ तपशीलवार वर्णन केला आहे. त्यांची लुटुपुटूची लढाई खरोखरची होऊन त्यात मुंगूस नागाला मारून टाकतो. या कादंबरीच्या शेवटी रमेश नऱ्याचा खून करतो. या दोन्ही घटनांमधील सूचकता लक्षणीय आहे. झोपडपट्टी जीवनाच्या पार्श्वभूमीवर नऱ्या, रमेश, सुनील, विलास, अकबर अशा काही प्रातिनिधिक युवकांचा अध:पात दाखवणे हे या कादंबरीचे मध्यवर्ती अंत:सूत्र आहे. पहिल्या प्रकरणात साक्षीभूत असलेला रमेश पुढे गुन्हेगारी जगताचा एक भाग बनतो. त्याचे घरांपासून तुटत जाणे अधिक तपशिलात हवे होते. कदाचित, घुमेपणा, निमूटपणा, नेमस्तपणा हे रमेशचे व्यक्तिमत्त्व विशेष कादंबरीकाराला अभिप्रेत असावेत. आपल्या तरुण बहिणीवर- शेवंतावर नऱ्याने अतिप्रसंग केला म्हणून सूडाच्या भावनेने रमेश पेटतो. त्याच्या नैतिक कल्पनांना धक्का बसून तो नऱ्याची हत्या करतो. सुनील गर्दच्या आहारी गेला आहे. नशा करण्यासाठी तो घरातील भांडी विकतो. त्याचे वडील रामाप्पा आणि सावित्रीबाई यांची कहाणी करुणामय वाटते. या संपूर्ण कादंबरीत ‘अंधाराचा वारसदार’ म्हणून खऱ्या अर्थाने नऱ्या वावरतो. तो रगेल, रंगेल, दिलदार, बेंडर, समजदार अशा वृत्ती प्रवृत्तीचा आहे. सुरेश रमेशच्या पावलावर पावले टाकू लागतो. तेव्हा, रमेश, सुनील, सुरेश ही तरुण मुले प्रकाशाचे वारसदार होण्याचे टाळून अंधाराचे वारसदार कसे होतात, याचे प्रभावी चित्रण दादासाहेब मोरे यांनी केले आहे. ते करताना त्यांनी भडक, उथळ, बटबटीतपणा न दाखवता, सूक्ष्म, संयमशील, संवेदनायुक्त आविष्कार साधला आहे. आततायी, आक्रस्ताळी दृष्टी न ठेवता विवेकपूर्ण अभिव्यक्ती केली आहे म्हणून ही कादंबरी वाचनीय झाली आहे. प्रा. विजय काचरे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 16-09-2001

    ‘अंधाराचे वारसदार’ या कादंबरीत दादासाहेब मोरे यांनी आजच्या बदलत्या समाज वास्तवाचे प्रखर आणि दाहक दर्शन घडविले आहे. झोपडपट्टीतील जीवनाचे असे विदारक दर्शन अपवादानेच मराठी साहित्यात आढळते. ग्रामीण जीवनातील खोलवर रुजलेले संस्कार आणि शहरी भोगवादी, चंगळवाद जीवनाची ओढ, त्यातील ताण-तणाव, जगण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष यांचे कलात्मकतेने केलेले चित्रण या कादंबरीची उंची वाढविते. कलावंताकडे असणारी वर्ण्यविषयासंबंधीची तादात्म्यता, तटस्थता आणि आंतरिक तळमळ यामुळे ही कादंबरी एकूण मराठी कादंबरी वाङमयाला वेगळे परिणाम प्राप्त करून देणारी ठरेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more