* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MAKING THE CUT
  • Availability : Available
  • Translators : DEODATT KETKAR
  • ISBN : 9788184982381
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 192
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
TO BE A SURGEON IS TO STAND, WITHOUT FLINCHING, IN THE SEA OF HUMAN SUFFERING AND USE ONES ENTIRE RESOURCE OF KNOWLEDGE, SKILL AND INTELLIGENCE TO BATTLE IT.AN INTERN MAKES HIS FIRST CUT AND IS RIDICULED BY HIS TUTOR. AN OLD WOMAN IS BROUGHT BACK TO LIFE AGAINST HER WILL, ONLY FOR THE UNEXPECTED TO STRIKE A WEEK LATER. A NOTORIOUS SURGEON IS DRIVEN CRAZY BY A MASSIVE BRAIN TUMOUR. THE MOTHER OF A LEUKEMIARIDDEN CHILD IS DRIVEN TO DESPERATION IN THIS COMPELLING AND BEAUTIFULLY WRITTEN IMPRESSIONISTIC MEMOIR, MOHAMED KHADRA RECOUNTS STORIES FROM HIS LIFE AS A SURGEON, FROM THE GRUELLING YEARS OF TRAINING TO THE DEBILITATING SLEEPLESS NIGHTS ON CALL. HE LOOKS BACK AT THE DOCTORS AND PATIENTS WHO SHAPED HIS CAREER; AT THE ENDLESS STREAM OF HUMANITY COURAGEOUS, PITIFUL, ADMIRABLE AND DISLIKABLE WHO PASSED UNDER HIS KNIFE, AS HE RECALLS SHOCKING TALES OF MISTAKES IN THEATRE AND THE SHATTERED LIVES OF DOCTORS DEFEATED BY THE STRESSES OF THE JOB.DOCUMENTING THE DAMAGING POLITICS IN OUR HEALTHCARE SYSTEM, THE SOULDESTROYING CHOICES MADE FOR PATIENTS AND THE MISPLACED HOPE SO COMMON IN THE FACE OF DEATH, HIS DRAMATIC ACCOUNT OF A SURGICAL LIFE SHOWS WHAT HAPPENS WHEN EXTRAORDINARY EVENTS OVERTAKE EVERYDAY LIVES INCLUDING, EVEN, HIS OWN.
सर्जन असण्याचा अर्थ असतो, मानवी यातनांच्या सागरात अविचल उभं राहणं. आपलं ज्ञान, कौशल्य आणि बुद्धिमत्ता पणाला लावून त्याच्याशी झुंज देणं. एक इंटर्न, त्याचा पहिला छेद घेतो आणि शिक्षक त्याची खिल्ली उडवतात. आठवड्यानंतर, एका वृद्धेच्या इच्छेविरुद्ध तिचा जीव वाचवण्याची अनपेक्षित घटना घडते. मेंदूच्या कर्करोगामुळे एका कुप्रसिद्ध सर्जनला वेड लागतं. ल्युकेमिया झालेल्या मुलाची आई अगतिक होऊन जाते. या खिळवून ठेवणाऱ्या अप्रतिम स्मृतिचित्रांमधून, मोहम्मद खाद्रा सर्जन म्हणून त्यांचं आयुष्य उलगडून दाखवतात. खडतर प्रशिक्षणापासून ते निद्रानाश करणाऱ्या अविरत कामापर्यंत. त्यांचं आयुष्य घडवणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णांच्या स्मृती ते जागवतात. मानवतेचा अखंड ओघ – धैर्यवान, केविलवाणी, कौतुकास्पद, तिरस्कार उत्पन्न करणारी अशा अनेक माणसांच्या या कहाण्या आहेत. ऑपरेशन थिएटरमध्ये घडणाऱ्या धक्कादायक चुकांच्या आणि तणावामुळे उद्ध्वस्त झालेल्या डॉक्टरांचे हे कथानक आहे. राजकारणामुळे आरोग्यसेवेची झालेली दैना आपल्याला इथे दिसते. मृत्यु समोर दिसत असताना; रुग्णांनी घेतलेले आत्मनाशी निर्णय, बाळगलेल्या वेड्या आशा दिसतात. त्यांच्या स्वत:च्याही दैनंदिन आयुष्यात घडलेल्या असाधारण घटनांमुळे निर्माण होणारं नाट्य इथे दिसतं.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #MAKINGTHECUT #MAKINGTHECUT #मेकिंगदकट #BIOGRAPHY #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #DEODATTKETKAR DR. MOHAMED KHADRA "
Customer Reviews
  • Rating StarShrinivas Ranjanikar

    सर्जन असण्याचा अर्थ असतो,मानवी यातनांच्या सागरात अविचल उभं राहणं,आपलं ज्ञान,कौशल्य, आणि बुद्धिमत्ता पणाला लावून त्याच्याशी झुंज देणं.... एका बुद्धिमान डॉक्टर ची संघर्ष कथा, एका डॉक्टर च्या आयुष्यात फक्त दुसऱ्याच्या वेदनांच असतात.....नक्की वाचाच

  • Rating Starप्रशांत पाटील

    एका सर्जनाच्या आयुष्यातील थरार डॉं मोहम्मद खाद्रा एक इंटर्न म्हणून त्याचा पहिला छेद घेताना डॉं मोहम्मद खाद्रा याला त्याच्या पुढील व्यावसायिक वाटचालीची पहिली झलक मिळते. दीर्घ व खडतर प्रशिक्षण, निद्रानाश करणारे अविरत काम, डॉक्टरी पेशात घडणाऱ्या क्कादायक मानवी चुका, तणावामुळे उध्वस्त झालेले डॉक्टर, कठोर नियतीशी झुंजून मिळवलेले विजय, त्या विजयाची नशा उतरवणारे पराजय अशी खिळवून ठेवणारी स्मृतिचित्रे डॉं खाद्रा या पुस्तकात मांडतात. आशा, प्रेम, अगतिकता, तिरस्कार, भीती अशा मानवी भावनांच्या कल्लोळापासून स्वत:ला अलिप्त ठेवून, आपले निर्णयकौशल्य व बुद्धिमत्ता पणाला लावून डॉक्टरांनी केलेल्या ऑपेरेशंसच्या गंभीर कथा एखाद्या साहसी खेळाप्रमाणे वाचकाला मंत्रमुग्ध करतात. आयुष्याच्या एका वळणावर डॉं खाद्रा हे स्वत:च एका टर्मिनल आजाराचे रुग्ण बनून ऑपरेशन थिएटरमध्ये येतात. यावेळेस त्यांचा रोल हा डॉक्टरचा नसून रुग्णाचा असतो. "डॉं हॅरिसन आता पेटलाच होता. त्याने सिरींज घेतली आणि दोन बरगड्यांच्या मधून थेट हृदयात इंजेक्शन दिले. त्याची नजर मॉंनिटर वर होती. देवाचा धावा चालू होता..." ...Read more

  • Rating StarMaharashtra Times 20.11.11

    सर्वसामान्यांच्या दृष्टीने डॉक्टर्सचं आयुष्य म्हणजे सुरुवातीला कष्ट आणि नंतर खोऱ्याने पैसा ओढून मस्त. पण डॉक्टर होण्यासाठी त्यांनी केलेली धडपड आणि डॉक्टर झाल्यानंतरही वरिष्ठपदावर पोहोचण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, मेहनत या सर्व गोष्टी मात्र सर्वसामा्य माणसापर्यंत थेट पोहोचत नाहीत. या सर्वांसाठी `मेकिंग द कट’ हे पुस्तक माहितीपूर्ण ठरावं. डॉ. मोहम्मद खाद्रा या स्थलांतरित लेबनिज मुस्लिम डॉक्टरची ही `व्यावसायिक’ आत्मकथा आहे. इंटर्नशिपपासून निवृत्तीपर्यंतचा कार्यकाळ त्यांनी यात रेखाटला आहे. नवीनच ग्रॅज्युएट झालेल्या प्रत्येकाला स्वत:ची हुशारी दाखवण्याची खुमखुमी असते. अशावेळी अतिउत्साहात अनुभवी व्यक्तीसमोर हुशारी दाखवताना झालेला विचका पहिल्याच प्रकरणात हुबेहूब व्यक्त करुन खाद्रा यांनी सुरुवात छान केली आहे. इच्छामरणासंबंधीही आपलं मत खाद्रा यांनी अतिशय स्पष्टपणे मांडलं आहे. एखादी व्यक्ती मरण्याच्या दाढेत पोहोचली असल्याचं माहिती असतानाही त्याला वाचविण्याचा प्रयत्न करण्याला त्यांचा ठाम विरोध आहे. स्वत:ची आई या अवस्थेत असतानाही त्यांच्यातील `मुलगा’ यामध्ये आलेला नाही. अतिशय धीरगंभीरपणे त्यांनी आईचं मरणही स्वीकारलं आहे. किंबहुना तिच्या पुढच्या यात्रेविषयी त्यांनी स्थितप्रज्ञतेने व्यक्त केलेलं समाधान खरंच कौतुकास्पद आहे. नव्या डॉक्टरला खाजगी प्रॅक्टीस सुरु करण्यासाठी करावी लागणारी धडपड, शिक्षण पूर्ण झाल्यावरही पूर्णपणे नव्याने करावा लागणारा संघर्ष रेखाटताना डॉ. खाद्रा अतिशय नैतिकतेने रुग्णसेवा करतात. केवळ पैसा मिळवायचा म्हणून रुग्णांना विविध टेस्ट करायला लावण्याची त्यांची सवय नाही. त्यामुळेच रुग्ण त्यांच्या हुशारीवर शंका घेतात व त्यांच्या सहकार्याकडे जाऊन उपचार घेतात. हा प्रसंगही तटस्थपणे व्यक्त करण्याची त्यांची हातोटी लाजवाब. पैशाच्या मागे धावणारे डॉक्टर, दिवसरात्र एक करण्याचा त्यांचा आटापिटा, त्यासाठी अंमली पदार्थाचा वापर या गोष्टी डॉक्टरी व्यवसायातील काहीशी अज्ञात बाजू उघड करतात. रुग्णसेवेचा व्यवसाय करणं तत्त्वात बसत नसल्याने पुढे जाऊन ते खाजगी प्रॅक्टिसला रामराम ठोकून पुन्हा प्रोफेसर म्हणून कामाला सुरुवात करतात. यावेळी त्यांच्या प्राध्यापकांबरोबर सहकारी म्हणून काम करण्याचा अनुभव, ग्लोबलायझेशनच्या नावाखाली बदलत चाललेल्या वातावरणावर वरिष्ठांशी झालेल्या गप्पा वास्तववादी आहेत. स्वत: डॉक्टर असतानाही प्रकृतीकडे केलेलं दुर्लक्ष, त्यावरुन जीवावर उठलेला आजार, पेशंट म्हणून असहायता, कॅन्सरची भीती, रुग्णालयातील परिचारिकांची वागणूक, अस्वच्छता आणि या सर्व गोष्टीचा झालेला पश्चाताप व्यक्त करण्यात खाद्रा कुठेही हात आखडता घेत नाहीत. सर्वात शेवटी आजारपणामुळे एका तज्ज्ञ सर्जनला सेवेतून घ्यावा लागणारा विराम, शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांशी साधलेला त्रोटक संवादही अर्थपूर्ण वाटून जातो. विविध प्रसंग, पेशंट, घटना, सहकारी यांच्यासोबतच्या प्रसंगातून पुस्तक पुढे सरकत जातं, त्यामुळे कंटाळा येत नाही. मात्र या पुस्तकात त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील घडामोडींचा फारसा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे काहीसा रुक्षपणा येतो. या पुस्तकाचे अनुवादक डॉ. देवदत्त केतकर स्वत: व्यवसायाने डॉक्टर असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील संज्ञांचा अर्थ सोप्या भाषेत, चांगल्या पध्दतीने समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रसंग, घटना अगदी डोळ्यासमोर उभी राहते. त्यामुळे सर्वसामान्यांसह वैद्यकीय विश्वातील व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील घटनांचा पुनःप्रत्यय येईल. मात्र प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला डॉ. खाद्रा यांनी काही महान कवींच्या कविता दिल्या आहेत. त्यांचे बऱ्याच अंशी शब्दश: भाषांतर करण्याचा प्रयत्न अनुवादकांनी केल्यामुळे या कविता समजण्यास थोड्या कठीण जातात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more