* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386888556
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 368
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :ATUL KAHATE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AS THE MOST POPULAR PERSON OF THE TWENTIETH CENTURY, WE CAN NAME ADOLF HITLER. HITLER, WHO HAD BEEN SUBJECTED TO ACHIEVING THE ULTIMATE GLORY OF THE DEGRADED GERMANY IN WORLD WAR I, UNEXPECTEDLY PULLED DOWN THE POWER OF GERMANY AND TRIED TO DO SOMETHING THAT WOULD NOT WORK FOR THE WELFARE. AFTER SUCCESSIVELY ESTABLISHING A DOMINION OVER ONE COUNTRY, HITLER LOST ALL THE WORLD`S SLEEP. HIS DEVOTIONAL DREAM WAS BROKEN BUT LATER IN HIS GOVERNMENT CAREER FOR ONLY A DOZEN YEARS, HITLER ACTUALLY SHRUGGED OFF. IT IS IMPORTANT TO DEAL WITH THE LOSS OF THE JEWISH PEOPLE, BEHAVE VERY VICIOUSLY WITH OUR ENEMIES, SHOW GREAT UNBELIEF ON THEIR OWN COLLEAGUES, AND NOT TO SHOW PARTIALITY OF HUMANITY BY SPEAKING TO THEM. THE DICTATORSHIP AND MONARCHY FOUND THEIR STATUS IN HIS CAREER. MANY PEOPLE SEEM TO BE DORMANT ABOUT THE BADGE LEADING TO THE WORLD`S SECOND FASTEST WAR. IN FACT, HOW HITLER BECAME SO POPULAR AND WHAT IS SAID ABOUT IT EVEN TODAY, THIS DEEPLY DEBATED ISSUE OF THIS VERY IMPORTANT ISSUE IS DONE IN VERY SIMPLE LANGUAGE FOR MARATHI READERS OF ALL AGES. THE READERS OF THIS VIEW WILL ALSO BE ABLE TO SEE WHAT SHOULD BE DONE TO PREVENT THE CREATION OF HITLER IN THE NEW WORLD.
विसाव्या शतकामधला सगळ्यात गाजलेला माणूस म्हणून आपण अ‍ॅडॉल्फ हिटलरचं नाव घेऊ शकतो. पहिल्या महायुद्धात मानहानी झालेल्या जर्मनीला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या ध्येयानं भारून गेलेल्या हिटलरनं अत्यंत अनपेक्षितरीत्या जर्मनीची सत्ता आपल्याकडे खेचून घेतली आणि भल्याभल्यांना जमणार नाही अशी कामगिरी करण्याचा चंग बांधला. एकामागून एका देशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत हिटलरनं सगळ्या जगाची झोप उडवली. त्याचं आसुरी स्वप्न मात्र नंतर भंगत गेलं. केवळ डझनभर वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत हिटलरनं अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्यू लोकांचा संहार, आपल्या शत्रूंशी अत्यंत क्रूरपणे वागणं, आपल्याच सहकाऱ्यांवर विलक्षण अविश्वास दाखवणं, माणुसकीचा अंशही वागण्याबोलण्यातून न दाखवणं, अशा त्याच्या अनेक अवगुणांचं त्याच्या गुणांबरोबरच विश्लेषण करणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं. हुकूमशाही आणि एकाधिकारशाही यांचं थैमान त्याच्या कारकिर्दीत बघायला मिळालं. जगाला वेगानं दुसNया महायुद्धाकडे नेणाऱ्या या खलनायकाविषयी अनेक जणांना सुप्त आकर्षण वाटत असतं. मुळात हिटलर इतका लोकप्रिय कसा झाला आणि त्याच्याविषयी आजसुद्धा इतकं का बोललं जातं, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा सखोल ऊहापोह अत्यंत सोप्या भाषेत सगळ्या वयोगटामधल्या मराठी वाचकांसाठी या पुस्तकात केला आहे. नव्यानं या जगात हिटलर निर्माण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, यासाठीची दृष्टीही वाचकांना या निमित्तानं मिळेल!

No Records Found
No Records Found
Keywords
#ATULKAHATE#HITLER# "#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ADOLFHITLER #ADOLFHITLER #अ‍ॅडॉल्फ हिटलर #BIOGRAPHY #MARATHI #ATULKAHATE #अतुलकहाते "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 08-04-2018

    पुन्हा एकदा हिटलर... जगात जसे रावण, कंस आणि दुर्योधनाचे अवतार जेवढे क्रूर तेवढे लोकप्रिय का असतात? आधुनिक काळातील हिटलर काय किंवा सद्दाम, लादेन, इदी अमीन यांच्यासारखे राक्षस वर्षानुवर्षे सत्तेवर राहतात आणि इतिहास रक्ताने भरून टाकतात. अशा सत्तांध, नरधमांची चरित्रे किंवा आत्मचरित्रे प्रचंड प्रमाणात वाचली जातात, असे का? फ्रॉइडने म्हटले आहे, ‘प्रत्येक माणसात एक पशू लपलेला असतो.’ या विधानाचा प्रत्यय रोज छोट्या पडद्यावर बघायला मिळतो. ‘हिटलर’ हा असाच एक दानव होता, जो मानवाच्या जिवावर उठला होता. दरवर्षी हिटरलविषयक नवनवी पुस्तके येत असतात. जग जिंकण्याच्या लालसेने पिसाटलेला हा दैत्य अखेर ‘दो गज जमीन के नीचे’ गेला. पहिल्या महायुद्धात जर्मनी हरला होता, परंतु दुसऱ्या महायुद्धात त्या देशाने प्रचंड विजय मिळविला. या यशामागे होता हिटलर. अर्थात त्याचे चाहते त्याचे भक्तिभावाने समर्थन करतात, हा भाग वेगळा. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाच्या कला अकादमीत ते चित्रकला शिकत होते, पण नापास झाल्याने तिथे आणि म्युनिक (जर्मनी)मध्ये वयाची १८ ते २५ वर्षे वाया घालवली. वयाच्या तिसाव्या वर्षी तो एका राजकीय प्रवासाकडे निघाला आणि पुढे तब्बल २६ वर्षे तो सतत यश मिळवत गेला. त्याच्या आयुष्यात अनेक लावण्यवती आल्या. त्याला ठरावीक वेळी त्या हव्याशा वाटत. इतर वेळी तो अन् त्याचे राजकारण हेच महत्त्वाचे वाटत असे. या बारीकसारीक तपशिलांसह लेखकाने सखोल अभ्यास करून या चरित्रग्रंथाची वेगळी मांडणी केली आहे. हिटलरच्या अनेक उत्तम गुणांपैकी एका होता त्याचा अफाट वाचनाचा छंद. बेकारीच्या काळात त्याने जे असंख्य ग्रंथ वाचले होते त्यांचा उपयोग पुढे फार झाला. अर्थात वाचन कधीच वाया जात नाही? (हिंदुस्थानातले किती राजकारणी वाचन करतात याचा शोध घ्यायची गरजच नाही. अनेक घरांचे मालक असणारे मंत्री शाही घरात एक पुस्तक ठेवतील तर शपथ!) असो, हिटलरची जडणघडण त्याने स्वत:च केली. निग्रही वागणे, धाडसी स्वभाव, धैर्याबरोबर शौर्य आणि पराजय मान्य न करण्याची चिकाटी हे सद्गुण होते तर दुराग्रही वागणे, बदला घेण्याची क्रूर वृत्ती, कुणावरही विश्वास न ठेवण्याची सवय हे त्याचे दुर्गुण. या गुणदोषांचे बरे-वाईट परिणाम त्याला आणि त्याच्या सहवासात आलेल्या/असलेल्या अनेक निष्ठावंतांना भोगावे लागले. प्रस्तुत चरित्रग्रंथात कहाते यांनी हिटलरच्या गुणावगुणांचे समर्थपणे दर्शन घडवले असून त्याचे यश, त्याच्या चुका आणि यासंबंधी अनेक मुद्दे अधोरेखित केले असून त्याच्या शोकांतिकेनंतर काय काय घडले, हेही सविस्तर संदर्भासहित सांगितले आहे. ३० एप्रिल १९४५ या शुभविशी ईव्हा ब्राऊनसह त्याने दुपारी ३.३० वाजता आत्महत्या केली. पुढे त्याच्या साथीदारांनी काय केले. ते कुठे लपले व पळाले हेही चित्तथरारक प्रकरण आहे. रशियन सेनेने जर्मनी ताब्यात घेऊन युरोपात शांती प्रस्थापित कशी केली. जर्मन लोकांना हेही समले की, एका क्रूरकर्मा व्यक्तीच्या भूलथापांना भुलून आपण कंगाल झालो; पण तेव्हा उशीर कसा झाला होता, हा सारा इतिहास वाचायलाच हवा. – अरविंद दोडे ...Read more

  • Rating StarRanga Joshi

    हिटलर नसता तर ज्यु शास्त्रज्ञाना देश सोडावा लागला नसता आणि अजूनही चांगले चांगले शोध लागून मनुष्य सृष्टी आनंदी झाली असती

  • Rating Star‎Amruta Chougule

    विसाव्या शतकामधला सगळ्यात गाजलेला माणूस म्हणून आपण अ‍ॅडॉल्फ हिटलरचं नाव घेऊ शकतो. पहिल्या महायुद्धात मानहानी झालेल्या जर्मनीला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या ध्येयानं भारून गेलेल्या हिटलरनं अत्यंत अनपेक्षितरीत्या जर्मनीची सत्ता आपल्याकडे खेचून घेतली णि भल्याभल्यांना जमणार नाही अशी कामगिरी करण्याचा चंग बांधला. एकामागून एका देशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत हिटलरनं सगळ्या जगाची झोप उडवली. त्याचं आसुरी स्वप्न मात्र नंतर भंगत गेलं. केवळ डझनभर वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत हिटलरनं अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्यू लोकांचा संहार, आपल्या शत्रूंशी अत्यंत क्रूरपणे वागणं, आपल्याच सहकाऱ्यांवर विलक्षण अविश्वास दाखवणं, माणुसकीचा अंशही वागण्याबोलण्यातून न दाखवणं, अशा त्याच्या अनेक अवगुणांचं त्याच्या गुणांबरोबरच विश्लेषण करणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं. हुकूमशाही आणि एकाधिकारशाही यांचं थैमान त्याच्या कारकिर्दीत बघायला मिळालं. जगाला वेगानं दुसNया महायुद्धाकडे नेणाऱ्या या खलनायकाविषयी अनेक जणांना सुप्त आकर्षण वाटत असतं. मुळात हिटलर इतका लोकप्रिय कसा झाला आणि त्याच्याविषयी आजसुद्धा इतकं का बोललं जातं, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा सखोल ऊहापोह अत्यंत सोप्या भाषेत सगळ्या वयोगटामधल्या मराठी वाचकांसाठी या पुस्तकात केला आहे. नव्यानं या जगात हिटलर निर्माण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, यासाठीची दृष्टीही वाचकांना या निमित्तानं मिळेल! ...Read more

  • Rating StarYogesh Jadhav

    Good book By again my Favorite Author... Atul Kahate...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो