* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SMART LEADERSHIP : INSIGHTS FOR CEOS
  • Availability : Available
  • Translators : MADHURI SHANGBAUG
  • ISBN : 9788184982749
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2011
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 180
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FOR CORPORATE LEADERS, THE CHALLENGE IS TO FIND NEW WAYS OF DOING THINGS. SMART LEADERSHIP: INSIGHTS FOR CEOS PRESENTS TWELVE CEOS WHO HAVE DONE JUST THAT, AND SET NEW BENCHMARKS FOR GROWTH AND PERFORMANCE IN THEIR RESPECTIVE INDUSTRY IN THE PROCESS. MORE OUTSTANDINGLY, WHETHER IT IS KUMAR MANGALAM BIRLA, N.R. NARAYANA MURTHY, RAHUL BAJAJ OR K.V. KAMATH, THEY HAVE SHOWN HOW SUCH GROWTH CAN BE SUSTAINED, YEAR AFTER YEAR, EVEN AS THE BUSINESS ENVIRONMENT BECOMES, IN THE WORDS OF ONE CEO, ‘FEROCIOUSLY COMPETITIVE, RAPIDLY CHANGING AND FLUID’. IN THIS COMPACT BUT INSIGHTFUL BOOK, GITA PIRAMAL AND JENNIFER NETARWALA DRAW INSIGHTS FROM THESE CEOS, HEADING COMPANIES AS DIVERSE AS LIJJAT PAPAD TO TATA CONSULTANCY SERVICES, ON HOW THEY ACCOMPLISHED THEIR GOALS IN SUCH A COMPETITIVE ENVIRONMENT, AND WHAT OTHERS CAN LEARN FROM THEM. THEY COME UP WITH LESSONS ON SOME OF THE CORE ASPECTS OF LEADERSHIP: DECISION-MAKING, BUILDING TEAMS, NURTURING TALENT, MANAGING CHANGE, AND AN UNWAVERING FOCUS ON GROWTH. INDIAN COMPANIES ARE TODAY GRAPPLING WITH THE CHALLENGE OF MOVING UP TO THE NEXT LEVEL OF COMPETITION—ONE WHERE AN ORGANIZATION HAS A DEMAND FOR ITS PRODUCT OR SERVICE ANYWHERE IN THE WORLD. SMART LEADERSHIP OFFERS PRACTICAL TIPS ON EFFECTING THAT TRANSFORMATION FOR EXECUTIVES AT ALL LEVELS
बहुराष्ट्रीय उद्योगाच्या प्रमुखांना कार्यक्षमता वाढवायचे नवनवे मार्ग शोधावे लागतात. `स्मार्ट लीडरशिप – सीईओसाठी नवी दृष्टी` या पुस्तकामध्ये बारा यशस्वी सीईओंनी (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे प्रमुख कार्यकारी अधिकारी) आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. या सर्वांनी विकासाचे आणि कार्यक्षमतेचे नवे मापदंड निर्माण केले, आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सर्वश्री कुमारमंगलम् बिर्ला, एन.आर. नारायण मूर्ती, राहुल बजाज,के.व्ही. कामत यांनी वर्षानुवर्षे गुणवत्ता राखून विकासाच्या वेगात सातत्य राखता येते, हे दाखवून दिले. त्यांच्या अनुभवसमृद्धतेतून उद्योगक्षेत्रातील व्यवहाराबद्दल काही मूलभूत धडे शिकता येतात. नेतृत्व करणे, निर्णय घेणे, योग्य माणसे निवडून टीम बांधणे, गुणवत्ता ओळखून उत्तेजन देणे, बदल पचवणे आणि हे सर्व करताना विकासावरील लक्ष ढळू न देण्याचे मर्म सांगितले आहे. परिवर्तन घडवण्यासाठी `स्मार्ट लीडरशिप` सर्व स्तरांवरच्या व्यवस्थापकांना काही अनुभवसिद्ध व्यवहार्य सूचना देऊ पाहते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #GEETA PIRAMAL #JENNIFER NETARWALA #माधुरी शानभाग #MADHURI SHANGBAUG #BIOGRAPHY #स्मार्ट लीडरशिप #SMART LEADERSHIP : INSIGHTS FOR CEOS
Customer Reviews
  • Rating StarYatin Vallabh

    पुस्तकात अनुक्रमे कुमारमंगलम बिर्ला, अश्विन दाणी, दीपक पारेख, रघुनाथ माशेलकर, के. व्ही. कामत, राहुल बजाज, शिखा शर्मा, सुभाष चंद्रा, एस्. रामादुराई, एन्. आर्. नारायण मूर्ती, अजय पिरामल व ज्योती नाईक या दिग्गजांनी लिहिलेले लेख आहेत. उत्तम नेता कसा असाव, त्याची वैशिष्ट्ये काय, त्याला कोणकोणत्या बाबी हाताळाव्या लागतात, कोणत्या संकटांना त्याला सामोरे जावे लागते? त्याने संकटांना सामोरे कसे जावे? इ. या सार्‍या प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या उदाहरणांतून मांडत लेखक वाचकाला शिक्षित करताना दिसतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.