* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHETHER JUSTICE
  • Availability : Available
  • Translators : PRIYANKA KULKARNI
  • ISBN : 9788184983425
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS BOOK GIVES THE SILENT A VOICE, THE FORGOTTEN A NAME AND THE ABUSED, THE JUSTICE THAT THEY CRAVE. WHITHER JUSTICE IS A DAUNTING AND DISTURBING LOOK AT WOMEN IN INDIAN PRISONS; THESE ARE STORIES OF THEIR BATTLE AGAINST VARIOUS FORCES: THE GOVERNMENT, FAMILY AND POVERTY. NANDINI OZA, COMPLETED HER POST-GRADUATION IN SOCIAL WORK FROM BARODA. SHE WAS PLACED IN CENTRAL JAIL AS A PART OF HER FIELD WORK, AND LATER, AS A FULL-TIME ACTIVIST IN THE NARMADA BACHAO ANDOLAN. SHE WAS IMPRISONED SEVERAL TIMES - EXPERIENCES THAT EXPOSED HER TO THE STORIES OF WOMEN PRISONERS. SHE CURRENTLY WORKS WITH A TRUST.NANDINI OZA, COMPLETED HER POST-GRADUATION IN SOCIAL WORK FROM BARODA. SHE WAS PLACED IN CENTRAL JAIL AS A PART OF HER FIELD WORK, AND LATER, AS A FULL-TIME ACTIVIST IN THE NARMADA BACHAO ANDOLAN. SHE WAS IMPRISONED SEVERAL TIMES - EXPERIENCES THAT EXPOSED HER TO THE STORIES OF WOMEN PRISONERS. SHE CURRENTLY WORKS WITH A TRUST.
अनेक शतके परीघाबाहेर राहिल्यानंतर आज भारतीय स्त्रियांनी सार्वजनिक क्षेत्रात आघाडीवर स्थान मिळवलं आहे. स्वतंत्र अन् निर्भय झाल्यामुळे आज स्त्रिया दररोज नवनवीन अडथळे ओलांडताहेत, अधिकाधिक सबल बनताहेत. ह्या पुस्तकात अशा स्त्रिया नाहीत. हे पुस्तक मूक स्त्रियांचे बोल मांडते, विस्मृतीत गेलेल्यांच्या नावांना उजाळा देते आणि शोषित स्त्रिया ज्यासाठी झुरतात तो न्याय त्यांना देते. ‘व्हिदर जस्टिस’ हा भारतातील तुरूंगातील स्त्रियांवर टाकलेला एक भयभीत आणि अस्वस्थ दृष्टिक्षेप आहे. ह्यात हकीकती आहेत त्यांनी दिलेल्या विवीध कढ्यांच्या - सरकारविरुद्ध, कुटुंबियांविरुद्ध, गरीबीविरुद्ध. समाज स्वत:च खलप्रवृत्तींना जन्मास घालतो. अन् त्यांना विनाविलंब सजाही देतो. ह्या बिनचेह-याच्या, बिनआवाजाच्या आणि विस्मृतीत गेलेल्या स्त्रिया अशा समाजात राहून लढा देत राहतात. चूरचूर झालेली स्वप्ने आणि तरीही मागे रेंगाळणा-या आशा यांच्या हकीकती येथे कथारूपात मांडलेल्या आहेत. ही मांडणी झाली आहे एका अशा व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जी प्रत्यक्ष त्यांच्यासोबत राहिलेली आहे. लेखकाने त्यांची हताशा आणि सामथ्र्य यांचे हुबेहूब वर्णन केलेलं आहे. नंदिनी ओजा यांनी बरोड्यातून समाजकार्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. त्यावेळी कार्यक्षेत्रात काम करण्याच्या अनुभवाचा एक भाग म्हणून त्या मध्यवर्ती कारागृहात राहिल्या होत्या आणि नंतर ‘नर्मदा बचाव आंदोलना’ची पूर्ण वेळ कार्यकर्ती म्हणून कैक वेळा तुरूंगवास भोगावा लागला. ह्या दोन अनुभवांदरम्यान कैदी स्त्रियांच्या हकीकती त्यांना भिडल्या. सध्या त्या एका न्यासासमवेत काम करतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #NANDINI OZA #PRIYANKA KULKARNII #MYNAMEISSALMA #WHITHERJUSTICE #व्हिदरजस्टिस
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKPRABHA 01-05-2015

    स्त्री-पुरुष समानता, स्त्री सक्षमीकरण, स्त्रीवाद अशा अनेक मुद्यांवरून महिलांबाबत चर्चासत्र, मतमतांतरे हे सुरुच असतं स्त्रीवादी साहित्यही मराठीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यातली सक्षम, स्वावलंबी, सुशिक्षित स्त्रिया या पुस्तकात नाहीत. खरंतर बऱ्ाच गोष्टी सकारात्मकदृष्ट्या बदलल्यामुळे अनेक क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर आहेत. पण अशा निर्भय स्त्रियांची कहाणी इतर काही पुस्तकांमधून वाचायला मिळाली असेल, पण `व्हिदर जस्टीस` हे पुस्तक स्त्रियांचं वेगळं रूप समोर आणते. भारतातील तुरुंगातील स्त्रियांवर टाकलेला एक भयभीत आणि अस्वस्थ दृष्टिक्षेप या पुस्तकातून समोर येतो. लढा हा स्त्रिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग, मग तो कुटुंबाविरुध्दचा असो, गरिबीविरुद्धचा, सरकारविरुद्धचा किंवा समाजातल्या घटनांविरुद्धचा. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दिलेल्या लढ्यांमधून नेहमीच काही मिळतं असं नाही, पण लढणं त्यांच्यासाठी महत्वाचं असतं. अशाच काही लढ्यांची कथा या पुस्तकात मांडली आहे. त्यांनी पाहिलेली स्वप्नं पूर्ण झाली नसली तरी आशेवर रेंगाळणाऱ्या त्यांच्या या कथा मांडलेल्या आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BACKSTAGE
BACKSTAGE by MONTEK SINGH AHLUWALIA Rating Star
महाराष्ट्र टाईम्स.. ६.९.२०२६

भारताच्या आर्थिक सुधारणांवर अनेक पुस्तके आजवर प्रसिद्ध झाली आहेत. काहींमध्ये आकडेवारीचे जंजाळ असते, काही धोरणांचे विश्लेषण करतात, तर काही विशिष्ट नेत्यांची जाहिरातबाजी करतात. मात्र माँटेकसिंग अहलुवालिया यांचे `बॅकस्टेज : भारताच्या उच्च वाढीच्या र्षांमागची कहाणी` हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण हे पुस्तक भारताच्या आर्थिक परिवर्तनाची कथा बाहेरून पाहणाऱ्या अभ्यासकाने नव्हे, तर त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तीने सांगितलेली आहे. जी. बी. देशमुख यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद सरस उतरला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माँटेकसिंग एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे, हे पुस्तक आत्मकथन नाही. आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नव्हे, तर भारताच्या आर्थिक सुधारणांचा प्रवास समजावून सांगण्यासाठी अहलुवालिया हे पुस्तक लिहितात. विषयाच्या अनुषंगाने पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ येतात, पण ते आर्थिक आणि राजकीय घडामोडी समजावून सांगण्यापुरतेच. सिकंदराबादमधील मध्यमवर्गीय वातावरणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, जागतिक बँक, अर्थ मंत्रालय, योजना आयोग आणि अखेर देशाच्या सर्वोच्च आर्थिक धोरणनिर्मितीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. हा प्रवास वाचताना स्वतंत्र भारताच्या आर्थिक विचारसरणीचा विकासक्रम उलगडत जातो. पुस्तकाचे केंद्रस्थान अर्थातच १९९१च्या आर्थिक संकटाचे आहे. त्यावेळी देशाकडे काही आठवड्यांच्या आयातीपुरताही डॉलर शिल्लक नव्हता. सोन्याचा साठा गहाण ठेवण्याची वेळ आली होती आणि आर्थिक दिवाळखोरीची शक्यता प्रत्यक्ष समोर उभी होती. अशावेळी सरकारने घेतलेले निर्णय, त्यामागील तणाव, राजकीय अनिश्चितता आणि प्रशासकीय संघर्ष यांचे वर्णन पुस्तकात अत्यंत जिवंतपणे आले आहे. नाणेनिधी किंवा जागतिक बँकेच्या दबावामुळे या सुधारणा झाल्याची धारणा माँटेकसिंग ठामपणे नाकारतात. हे पुस्तक आर्थिक सुधारणांना कोणत्याही प्रकारच्या विचारधारेच्या चष्म्यातून पाहत नाही. लेखक ना मुक्त बाजाराचे अंधसमर्थन करतात, ना राज्यनियंत्रित व्यवस्थेचे. त्यांचा दृष्टिकोन व्यवहारवादी आहे. भारतासारख्या लोकशाही देशात सुधारणा एका झटक्यात होत नाहीत; त्या राजकीय वास्तवाशी जुळवून घेत हळूहळू पुढे सरकतात, हे ते वारंवार. अधोरेखित करतात. पुस्तकात अनेक ठिकाणी `सुधारणा` हा आर्थिक नव्हे, तर राजकीय प्रक्रियेचाही विषय आहे, हे प्रकर्षाने जाणवते. अहलुवालिया या पुस्तकात अनेक व्यक्ती, अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख करतात. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांच्यापासून ते विविध सनदी अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची भूमिका ते प्रामाणिकपणे नोंदवतात. योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना अहलुवालिया यांनी जवळून अनुभवलेला काळ येथे उभा राहतो. सन २००४ ते २०११ या काळातील उच्च आर्थिक वाढ, दारिद्रयनिर्मूलनातील प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचे मूल्यमापन ते करतात. विशेषतः भारताने सलग अनेक वर्षे सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान वाढ नोंदवली, ती केवळ जागतिक परिस्थितीचा. परिणाम नव्हती; १९९० नंतरच्या सुधारणांनी घातलेल्या पायावर उभे राहून ती शक्य झाली, हा त्यांचा युक्तिवाद पटण्याजोगा वाटतो. मात्र पुस्तकाचे खरे सामर्थ्य यशोगाथेत नाही, तर आत्मपरीक्षणात आहे. यूपीए-२ दरम्यान निर्माण झालेली निर्णयप्रक्रियेतील अडचण, गुंतवणुकीतील वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक मंदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेले वातावरण आणि धोरणात्मक संकोच यावर लेखक थेट भाष्य करतात. अनुवादक जी. बी. देशमुख यांनी मूळ पुस्तकातील आर्थिक संकल्पना सहज आणि प्रवाही मराठीत मांडल्या आहेत. यात कृत्रिमता जाणवत नाही. आर्थिक विषयावरील पुस्तक असूनही भाषा जड वाटत नाही. आर्थिक सुधारणांच्या व्यापक सामाजिक परिणामांचा स्वतंत्र आणि सविस्तर ऊहापोह येथे अपेक्षेपेक्षा कमी आढळतो. मात्र, हे पुस्तक ज्या उद्देशाने लिहिले गेले आहे त्या उद्देशात ते अत्यंत यशस्वी ठरते. `बॅकस्टेज` हे केवळ पुस्तक नाही; ते भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा प्रत्यक्षदर्शी दस्तऐवज आहे. १९९१ नंतर भारताने घेतलेल्या वळणाचा अर्थ समजून घ्यायचा असेल, उच्च वाढीच्या वर्षामागील वास्तविक कथा जाणून घ्यायची असेल आणि धोरणनिर्मितीच्या पडद्यामागे काय घडत असते याचा मागोवा घ्यायचा असेल, तर हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक ठरते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आर्थिक सुधारणांचा इतिहास आणि त्यांचे परिणाम समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून ओळखले जाऊ शकते. मराठीत उपलब्ध असलेला हा अनुवाद त्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे. ...Read more

HACHYUKISUNASKI
HACHYUKISUNASKI by ABA MAHAJAN Rating Star
Dinesh

This is a different planet. This is a different world. And this is a truly different book. I loved it. You should also buy it and read it. I’m sure you will love it too. Hachyukisunaski is a fantastic Book.