* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: NEVER TO RETURN
  • Availability : Available
  • Translators : SUNITA KATTI
  • ISBN : 9788184984019
  • Edition : 2
  • Publishing Year : 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 236
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN SANDY REID WAS TAKEN INTO CARE HE WAS JUST ONE YEAR OLD. LITTLE DID HIS MOTHER KNOW THAT SHE WOULD NEVER SEE HIM AGAIN. NEVER TO RETURN IS THE EXTRAORDINARY TRUE STORY OF SANDY REID AND HIS BIG SISTER MAGGIE AND WHAT HAPPENED TO THEM WHEN THEY WERE TAKEN AWAY FROM THEIR PARENTS AND THEIR WAY OF LIFE. IT WAS THE MIDDLE OF WINTER WHEN THE AUTHORITIES SWOOPED ON THE TRAVELLERS` WOODLAND CAMP, DETERMINED TO TAKE THE YOUNGEST CHILDREN INTO CARE AND GIVE THEM A BETTER LIFE. BUT IT DIDN`T WORK OUT THAT WAY. DENIED ANY ACCESS TO HIS PARENTS, SANDY WAS TO SPEND THE REST OF HIS CHILDHOOD MOVING FROM DISINTERESTED FOSTER PARENTS TO CHILDREN`S HOMES AND FINALLY INTO THE CLUTCHES OF THE NOTORIOUS `UNCLE DAVE` WHO SYSTEMATICALLY ABUSED THE CHILDREN IN HIS CARE. THIS IS THE SHOCKING STORY OF HOW A CHILD`S LIFE WAS DESTROYED AND OF A STOLEN GENERATION, SNATCHED IN THE NIGHT AND FORBIDDEN FROM SEEING THEIR FAMILIES. IT`S ALSO THE STORY OF HOW ONE BOY ENDURED TERRIBLE HARDSHIP AND ABUSE AND HOW HE SURVIVED AGAINST ALL ODDS.
एका हिरावलेल्या बालपणाची अंत:करण पिळवटून टाकणारी सत्यकथा! समाजकल्याण खात्यानं सँडी रीडला आपल्या ताब्यात घेतलं, तेव्हा तो फक्त एक वर्षाचा होता. त्या वेळी त्याच्या आईला कल्पनाही नव्हती की, तो तिच्या नजरेला जन्मात परत कधी पडणार नव्हता. नेव्हर टू रिटर्न ही स्कॉटलंडमधील टिंकर ह्या भटक्या जमातीत जन्मलेल्या सँडी रीड व त्याची मोठी बहीण मॅगी ह्यांची एक विलक्षण गोष्ट आहे. कोवळ्या वयात त्यांना त्यांच्या आई-वडिलांपासून व विशिष्ट जीवनपद्धतीपासून दूर केल्यानंतर त्यांच्या आयुष्याची काय आणि कशी परवड झाली ह्याची ही गोष्ट आहे. एका हिवाळ्यातील रात्री समाजकल्याणखात्याच्या अधिका-यांनी भटक्या जमातीच्या ह्या लोकांच्या जंगलातील तंबूवर छापा घातला. त्यांच्या छाप्याचा उद्देश होता, त्यांच्या सगळ्यात लहान मुलांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना चांगले जीवन देणे, पण त्यांनी विचार केला होता तसे जास्त चांगले आयुष्य ह्या मुलांना मिळालेच नाही. शेवटी तर तो आपल्या ताब्यात असणा-या मुलांचे पद्धतशीर शोषण करणा-या कुप्रसिद्ध ‘अंकल डेव्ह’च्या मगरमिठीत अडकला. या एका पिढीतील मुलांची आयुष्ये कशी उद्ध्वस्त केली गेली, एक संपूर्ण पिढीच आपले बालपण कशी हरवून बसली, याची ही एक धक्कादायक कहाणी आहे. या परिस्थितीवर आणि शोषणावर मात करून एका मुलाने कशी तग धरली, ह्याचेही यात चित्रण आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SUNITAKATTI #SANDYREID #NEVERTORETURN
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more