* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: COLD STEEL
  • Availability : Available
  • Translators : SUBHASH JOSHI
  • ISBN : 9788184980974
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 368
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IN 2006 THE WORLD`S TWO LARGEST STEEL PRODUCERS WENT HEAD TO HEAD IN A BITTER STRUGGLE FOR MARKET DOMINATION, AN EPIC CORPORATE BATTLE THAT SENT SHOCKWAVES THROUGH THE POLITICAL CORRIDORS OF EUROPE, EXCITED THE WORLD`S FINANCIAL MARKETS AND TRANSFORMED THE STEEL INDUSTRY. COLD STEEL IS THE GRIPPING STORY OF THE BIGGEST AND MOST HARD-FOUGHT INDUSTRY TAKEOVER OF RECENT YEARS. AT THE HEART OF THE STORY ARE TWO COMPANIES AND TWO MEN DUBBED THE "STALLIONS OF STEEL`. LAKSHMI MITTAL IS A SELF-MADE INDIAN INDUSTRIALIST WHO GREW UP WALKING ON THE BARE FLOORS OF A HOUSE BUILT BY HIS GRANDFATHER AND SLEEPING ON ROPE BEDS. TODAY HE IS THE RICHEST MAN IN GREAT BRITAIN, AND THE FIFTH RICHEST MAN IN THE WORLD; HIS LONDON HOME COST £57 MILLION. HE COULD HARDLY HAVE BEEN MORE DIFFERENT FROM THE BRILLIANT AND MERCURIAL FRENCHMAN GUY DOLLE, CEO OF LUXEMBOURG-BASED ARCELOR, THE WORLD`S LARGEST STEEL PRODUCER BY TURNOVER (SOME 30 BILLION EUROS IN 2004). BUT ONE AMBITION UNITED THE MEN: THAT HIS COMPANY SHOULD BE PRE-EMINENT. SO WHEN MITTAL CALLED DOLLE TO ANNOUNCE THAT HE WAS ABOUT TO LAUNCH A BID FOR ARCELOR, A DRAMATIC TAKEOVER STRUGGLE INEVITABLY ENSUED, INVOLVING BILLIONS OF DOLLARS OF FINANCE, SECRETIVE GOVERNMENT AND SHAREHOLDER MANOEUVRINGS AND ACCUSATIONS OF DOUBLE-DEALING - ALL WITH GLOBAL CONSEQUENCES. FAST-PACED AND COMPELLING, COLD STEEL BRINGS TO LIFE THE CUT AND THRUST OF BIG BUSINESSES AT WAR WITH EACH OTHER - MITTAL AND DOLLE LED ARMIES MADE UP OF HUNDREDS OF THE WORLD`S LEADING INVESTMENT BANKERS, TAKEOVER LAWYERS, HEDGE FUNDS, LOBBYISTS AND FIVE MAVERICK BILLIONAIRES. THE AUTHORS HAVE ENJOYED UNPRECEDENTED ACCESS TO ALL OF THE MAJOR PLAYERS, MAKING THIS A TRUE INSIDER ACCOUNT OF THE TAKEOVER THAT DEFINED AN ERA.
‘‘गी, मी लक्ष्मी मित्तल बोलतो आहे. मी केवळ औपचारिकपणे तुझ्या कानावर घालण्यासाठी हा फोन केला आहे, की उद्या मित्तल स्टील तुझ्या भागधारकांच्यासमोर आर्सेलरच्या शेअर्ससाठी थेट प्रस्ताव मांडणार आहे.’’ –लक्ष्मी मित्तल ‘‘भारतीय वंशाचा एक उद्योजक, जगातील पहिल्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक झाला आहे, याचा मला अभिमान आणि आनंद वाटत आहे...’’ –अर्थमंत्री पी.सी. चिदंबरम ``एक वर्षापूर्वी फ्रान्समध्ये तू आगंतुक होतास; पण आता परिस्थिती बदललेली आहे,`` असं म्हणत जॅक शिराकने हसून मित्तलशी हस्तांदोलन केलं आणि म्हणाला, ``आता फ्रान्समध्ये सर्वत्र तुझं स्वागतच केलं जात आहे.`` –फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक `‘ही तर एक प्रकारची लढाईच आहे,`` जॉन कास्टेगन्रोने जाहीर केलं. ``आपण आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढलं पाहिजे.`` मित्तलचा प्रस्ताव आर्सेलरच्या संचालक मंडळाने एकमुखाने फेटाळून लावला.

No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #COLDSTEEL #SUBHASHJOSHI #BYRONOUSEY #TIMBOUQUET
Customer Reviews
  • Rating Star PUNYANAGARI 4-4-2010

    भारतीय वंशाच्या ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्तीने म्हणजेच लक्ष्मी मित्तल यांनी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या उद्योगसमूहातील औद्योगिक वर्चस्वासाठी लढाई केली. ही लढाई त्यांनी जिंकलीही. या लढाईचे धगधगते चित्रण ‘कोल्ड स्टील’ या पुस्तकात आपणास वाचावास मिळते. २००६ मध्ये सर्वात जास्त पोलादाचे उत्पादन करणारे उद्योजक बाजारपेठेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी एकमेकाला भिडले. त्यातून महासंग्राम सुरू झाला आणि या दोन नेत्यांभोवती यातील कथानक फिरत राहिले. ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत आणि जागतिक पातळीवर पहिल्या पाचात असणारे लक्ष्मी मित्तल स्वकर्तृत्वाने उद्योगक्षेत्रात दादा माणूस झाले. राजस्थानमध्ये आजोबांनी बांधलेल्या घरात चपलेशिवाय चालणारा आणि साध्या बाजेवर झोपणारा लक्ष्मी मित्तल आज पोलादाच्या साम्राज्यात आपला अमिट ठसा उमटवणारा मोठा उद्योजक झाला. यशस्वितेच्या क्षितिजांना स्पर्श करत असताना मित्तल विरुद्ध आर्सेलर या संघर्षाने जगातील सर्व उद्योजकांचे लक्ष वेधले. आपली कंपनी सर्वश्रेष्ठ असली पाहिजे. ही महत्त्वाकांक्षा मित्तल यांची होती. या महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी आर्सेलरवर दावा सांगणाऱ्या गी डोलला फोन करून आर्सेलरची बोली आपण बोलणार असल्याचे सांगितले. यातून सुरू झालेला संघर्ष वाचत असताना जगातील महान व्यक्तीचे जीवन संघर्षातून कसे तावून-सुलाखून निघते हे पदोपदी जाणवत राहते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.