* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CONTAGION
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788177662047
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 328
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THIS IS A NOVEL BASED ON THE MEDICAL BACKGROUND. A VERY INTELLIGENT TEAM OF CRIMINALS WHO ARE ALSO THE CLASS ONE IN THE FIELD OF SCIENCE, THEIR UNCOMMON WAYS OF CRIMES, A FIGHT BY AN EQUALLY INTELLIGENT BUT VIRTUOUS MAN WHO IS WELL AWARE THAT HE IS PLAYING WITH HIS LIFE, AND THE BEAUTIFULLY WOVEN FACTS PRESENTING YET ANOTHER NOVEL FULL OF SUSPENSE, MAINTAINING THE STATUS OF THE WELL KNOWN AUTHOR ROBIN COOK. IN THE WELL KNOWN MANHATTAN GENERAL HOSPITAL AT NEW YORK, PATIENTS START DYING SUDDENLY WITH SOME UNKNOWN, UNDETECTABLE INFECTIOUS DISEASE. THE CHIEF MEDICAL OFFICER AND THE MAIN DOCTOR IN THE AUTOPSY DEPARTMENT DR. JACK STAPLETON IS BAFFLED WITH THE FINDINGS AFTER POSTMORTEM. WHAT IS THIS INFECTIOUS DISEASE? INFLUENZA? PLAGUE? TULAREMIA? ROCKY MOUNTAIN SPOTTED FEVER? WHAT IS THIS DISEASE? HOW COME THE LONG ERADICATED VIRUSES HAVE FOUND THEIR WAY AGAIN? AND THAT TOO IN THE POSH AND MODERN HOSPITAL OF NEW YORK? HAVE THESE VIRUSES OCCURRED NATURALLY OR IS SOMEONE DOING THIS INTENTIONALLY? JACK SETS HIMSELF UP ON THE TASK OF FINDING THE CULPRIT BEHIND THESE MISHAPS. NATIONAL BIOLOGICAL… FRAZER LAB, THE FROZEN ESKIMOS IN ALASKA, WHAT IS AT THE BASE OF ALL THESE? A NOVEL FULL OF DRAMATIC SITUATIONS, IT WILL MAKE YOU HELD YOUR BREATH. THIS NOVEL MAKES YOU REALIZE THAT THESE MEDICAL MISHAPS CAN TAKE PLACE ANYWHERE ALL OVER THE WORLD.
‘कन्टेजन’ ही डॉ. रॉबिन कुक यांची वैद्यकीय पाश्र्वभूमीवरील एक यशस्वी रहस्यमय कादंबरी. विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘इंटेलिजंट’ गुन्हेगारांची टोळी, त्यांची असाधारण गुन्हेगारी व एका बुद्धिमान, निष्ठावंत व्यक्तीनं ती हाणून पाडण्यासाठी जिवाच्या करारानं घेतलेला त्याचा शोध, या पद्धतीनं गुंफलेलं हे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक मांडणीमुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेतं. न्यू यॉर्कच्या मॅनहटन जनरल हॉस्पिटलमध्ये कोणत्यातरी अज्ञात संसर्गजन्य रोगानं एकापाठोपाठ एक माणसं मरू लागतात. मुख्य वैद्यकीय तपासनीस ऑफिसातील गुन्हाअन्वेषण विभागातील निष्णात डॉक्टर जॅक स्टेपलटन शवविच्छेदन केल्यावर चक्रावून जातो...! हा घातक संसर्गजन्य रोग कोणता? इन्फ्ल्युएंझा?... प्लेग?... टुलरेमिया?... रॉकी माउंटन स्पॉटेड फिव्हर?... ७०-७५ वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या या रोगांचे विषाणू पुन्हा या काळात आणि तेही न्यू यॉर्कमधल्या इतक्या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये? हे विषाणू नैसर्गिकपणे उद्भवले, की कोणा माथेफिरू दहशतवाद्याचं हे कृत्य? जॅक हात धुऊन या प्रकरणाच्या मागे लागतो. नॅशनल बायॉलॉजिकल्स... फ्रेझर लॅब... अलास्कातील गोठलेले एस्किमो... शेवटी काय असतं याच्या मुळाशी? अत्यंत नाट्यपूर्ण घडामोडींनी श्वास रोधायला लावणारी ही कादंबरी. या वैज्ञानिक शक्यता कोणत्याही देशात, कोणत्याही काळात प्रत्यक्षात येऊ शकतील, या जाणिवेनं मनाचा थरकाप होतो, हेच डॉ. रॉबिन कुक यांचं यश आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #प्रमोदजोगळेकर #रोबिनकुक #COMA #TOXIN #SONS OF FORTUNE #FALSE IMPRESSION #CONTAGION #SEIZURE #CRISIS #CRITICAL #NOT A PENNY MORE, NOT A PENNY LESS #MARKER #कोमा #टॉक्सिन #कन्टेजन #सीजर #क्रायसिस #क्रिटिकल #मार्कर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTARANG) 26-05-2002

    वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील खळबळजनक कादंबरी... ‘कन्टेजन’ म्हणजे स्पर्शजन्य रोग. स्पर्शजन्य रोग सहजासहजी नैसर्गिकरीत्या होणं निराळं आणि स्वार्थापोटी तो मुद्दाम पसरवणं निराळं. त्यात स्वार्थापोटी काही औषधी कंपन्याही सामील असतात. हेतू असा की, त्यांच्या षधांना उठाव मिळावा. स्पर्शजन्य रोग वाऱ्यासारखा पसरतो. उग्र स्वरूप धारण करतो. परिणामी औषधांचा खप वाढतो. संबंधितांचं उखळ पांढरं होतं. आपल्याकडे काही दिवसांपूर्वी ‘हिपेटायटीस बी’ या रोगावरील प्रतिबंधक लसीसंदर्भात अशीच जोरदार जाहिरातबाजी चालली होती. अगदी मोहीमच उघडण्यात आली होती. त्यामागे अंतस्थ हेतू हाच होता. जगातील सर्वच देशात हा धुमाकूळ चालतो की नाही माहीत नाही. पण अमेरिकेत तो चालत असावा. अमेरिका सर्वच बाबतीत पुढारलेला देश आहे. तेव्हा याही क्षेत्रात तो आघाडीवर असणारच. त्या अमेरिकेमधील ही कहाणी आहे. ती थोडक्यात अशी– जॉन टेंपलटन (पुढे तो जॅक टेंपलटन म्हणून वावरतो) हा अमेरिकेतील ‘शांपान’ गावातील एक नेत्रविशारद. त्याचं तसं छान चाललेलं असतं. पत्नी आणि दोन मुलींसमवेत तो आनंदात राहत असतो. पण त्याच्या दुर्दैवाने औषधनिर्मिती क्षेत्रातील ‘अमेरिकेअर’ ही महाकाय कंपनी त्या भागात आपलं जाळं पसरते आणि बघता बघता तेथील खासगी डॉक्टरांचे व्यवसाय मोडीत काढते. सगळ्या वैद्यकीय सुविधा ती कंपनी आपल्या प्रचंड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देते. त्यामुळे खासगी डॉक्टर बेकारीच्या खाईत लोटले जातात. त्यांना आपले दवाखाने बंद करावे लागतात. जॉन टेंपलटन त्याला अपवाद कसा असणार? मग तो आपलं कार्यक्षेत्रच बदलतो. पॅथॉलॉजीमध्ये तो पाच वर्षें शिकागोमध्ये शिक्षण घेतो. त्याच्या व्यतिरिक्त शवविच्छेदनातही तो कौशल्य संपादन करतो. त्यामुळे मृत्यू नेमका कोणत्या रोगामुळे झाला याचे तो अचूक निदान करू शकतो. शिकागोला शिक्षण घेण्यासाठी तो जातो तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या समवेत राहावं असं त्याला वाटतं. पण त्याच्या पत्नीच्या नोकरीमुळे ते शक्य नसतं. ती मुलींसमवेत परत आपल्या गावी विमानाने परत जायला निघते. पण दुर्दैवाने त्या विमानाला अपघात होतो आणि जॉनची बायको आणि दोन मुली त्या अपघातात मरतात. जॉन आता कौटुंबिक पाशातून मुक्त झालेला असतो. तो आपलं संपूर्ण आयुष्य वैद्यकीय संशोधनात विशेषत: हे सांसर्गीय रोगजंतू कुठून निर्माण होतात, त्याचा प्रसार कसा होतो यावरच तो आपलं लक्ष केंद्रित करतो. Associate Medical Examiner म्हणून तो काम करू लागतो. या कादंबरीतील दुसरी महत्त्वाची रेखा म्हणजे टेरेस हेगन. जाहिरात क्षेत्रातील ती एक बडी असामी असते. ‘विलो अँड हिथ’ या न्यू यॉर्कमधील एका बड्या जाहिरात कंपनीत ती मोठ्या हुद्द्यावर काम करीत असते. ‘नॅशनल हेल्थ’ ही दुसरी एक औषधी कंपनी असते. त्या कंपनीची जाहिरात टेरेसची कंपनी करीत असते. त्या जाहिरातीची जबाबदारी टेरेसवर असते. वैवाहिक जीवनात टेरेस दु:खीच असते. तिचं अ‍ॅबॉर्शन तर होतंच. पण त्याचबरोबर अ‍ॅबॉर्शन करताना नाइलाजास्तव तिचं गर्भाशयही काढून टाकावं लागतं. आता ती कधी आई होऊ शकणार नसते. तिच्या पतीचा तिच्यामधला रस संपतो. तो तिला सोडून जातो. हा तिला जबरदस्त मानसिक आघात करतो. त्यातून वर येण्यासाठी ती स्वत:ला आकंठ कामात बुडवून घेते. योगायोगाने तिची आणि जॉन टेंपलटनची ओळख होते. त्याच्या संशोधनातील बित्तंबातम्या ती जॉनकडून काढून घेत असते. या दोन महत्त्वाच्या पात्रांभोवती कादंबरी गुंफलेली आहे. इतरही पात्रे आहेत. पण जॉन आणि टेरेस ही पात्रे महत्त्वाची. अमेरिकेअर कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये काही लोकांचा स्पर्शजन्य रोगाने मृत्यू होतो. तोही अगदी झटपट. लागण की लगेच मृत्यू. हॉस्पिटलचे लोक हवालदिल होतात. पुन्हा ही बातमी बाहेर फुटता कामा नये. हॉस्पिटलची बदनामी होईल ही भीती. हॉस्पिटलच्या औषध पुरवठा विभागातील लोकांना त्याची लागण होऊन ते मरतात. कोणत्या जंतूंमुळे हा रोग होतो हे शोधून काढण्यात जॉन व्यग्र होतो. त्याला तो ध्यासच लागतो. शवचिकित्सेचं काम तो करू लागतो. खरं तर हॉस्पिटलमधील वरिष्ठांना त्याचं अस्तित्व त्रासदायक होऊ लागतं. कारण त्यांचे हितसंबंध त्यात गुंतलेले असतात. पण तो त्यांना दाद देत नाही. त्यांच्या विरोधाला न जुमानता तो आपलं काम चालूच ठेवतो. हे काम करीत असताना एकेक रहस्याचा उलगडा होऊ लागतो. त्यात त्याच्या असं लक्षात येतं की, जंतू मुद्दाम पसरविले जात आहेत. त्यात अनेकांचा मृत्यू होतोय. एन्फ्लुएंझा, प्लेग, ग्रॅनुलोमा, टुलरोमिया, क्षय, नोसोकॉमियल इत्यादी रोग झपाट्यानं पसरविण्यात ही एकमेकांची सख्खी भावंडेच. जॉन चक्रावून जातो. मग हे जंतू कोण पसरवीत असावं याचा तो शोध घेऊ लागतो. या शोध कामात अनेक अडथळे येतात. त्याच्यावर मारेकरी घातले जातात. पण सगळ्या अग्निदिव्यातून तो पार पडतो. शेवटी गुन्हेगार शोधून काढण्यात तो यशस्वी होतो आणि ते सापडल्यावर तो चाट पडतो. ते असतात टेरेस आणि तिचा भाऊ रिचर्ड. ते आपल्या घरातच रोगजंतू वाढवीत असतात आणि ते पार्सलने निरनिराळ्या हॉस्पिटलमध्ये कंपन्यांच्या बनावट नावाने पाठवीत असतात. त्या उद्योगात ही बहीण-भावंडं स्वत:च त्या रोगजंतूंना बळी पडतात. जॉन मात्र सहीसलामत सुटतो. इथे कादबंरी संपते. -वसंत जहागिरदार ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 31-03-2002

    प्राणघातक रोगजंतूंच्या फ़ैलावाची रहस्यमय कथा... न्यू यॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उत्तुंग जुळ्या इमारतीवर ११ सप्टेंबर २००१ रोजी हल्ला होऊन दोन्ही इमारती जमीनदोस्त झाल्या. त्या पाठोपाठच अमेरिकेत जागोजागी अ‍ॅथ्रॅक्स या अत्यंत घातक सांसर्गिक रोगकारकजंतूचा टपालामार्फत प्रसार होण्याचे प्रकार सुरू झाले. सारेजण विलक्षण धास्तावले. प्रत्यक्षात २००१ मध्ये घडलेल्या या घटनेच्या आधीच काही वर्षे कुणा माथेफिरूने असे प्राणघातक विषाणू आणि रोगजंतू पसरवण्याचा घाट घातला तर काय भयानक परिस्थिती उदभवू शकेल याचे प्रत्ययकारी रोमांचक चित्रण डॉ. रॉबिन कुक यांनी त्यांच्या ‘कन्टेजन’ या कादंबरीत केले कन्टेजन या शब्दाचा अर्थ प्राणघातक संसर्गजन्य रोगास कारणीभूत होणारा घटक-रोगजंतू किंवा विषाणू असा आहे. स्वार्थाने आणि सूडबुद्धीने प्रेरित होऊन न्यू यॉर्कच्या मॅनहटन जनरल हॉस्पिटलात प्लेग, टुलारेमिया, रॉकी माउंटन स्पॉटेड फिव्हर, १९१८ सालचा तडकाफडकी बळी घेणारा घातक इन्फ्लुएंझा अशा रोगांचे जंतू आणि विषाणूंचा प्रसार करण्याचा माथेफिरू गुन्हेगारी कट त्यातून सुरू झालेले एकापाठोपाठ एक अनेक निष्पाप माणसांचे तडकाफडकी रहस्यमय मृत्यू. या मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करताना चक्रावून जाणारा बुद्धिमान, निष्ठवंत डॉ. जॅक स्टेपलटन आणि त्याने हे कटकारस्थान शोधून काढून ते हाणून पाडण्यासाठी जिवाच्या कराराने केलेले प्रयत्न याची ही चित्तथरारक, उत्कंठावर्धक कहाणी आहे. डॉ. रॉबिन कुक यांनी कादंबरीची मांडणी एखाद्या रहस्यमय गुन्हेगारी चित्रपटाच्या पटकथेसारखी केली आहे. कथेच्या सुरुवातीला १२ जून १९९१ या एकाच दिवशी अमेरिकेतील तीन अगदी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या वरवर पाहता परस्परांशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या तीन घटनांचे वर्णन केले आहे. पुढच्या कादंबरीचे सारे मध्यवर्ती सूत्र या तीन घटनांच्या परिणामावरच गुंफले गेले आहे. पहिली घटना म्हणजे अलास्कातील गोठलेल्या हिमभूमीत गाडल्या गेलेल्या एस्किमोच्या झोपडीतील मृत शवांच्या फुप्फुसातून डिक नावाचा सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञ सूक्ष्मजंतूंचे नमुने काढून घेतो. ही मृत शरीरे १९१८ मध्ये उद्भवलेल्या इन्फ्लुइंझाच्या रोगाने गेलेल्या एस्किमोची असून बर्फात गाडली गेल्याने टिकून राहिलेली असतात. दुसरी घटना म्हणजे शंपान या छोट्या गावी नेत्रवैद्याचा व्यवसाय करणारा डॉ. जॅक स्टेपलटन याचा व्यवसाय आरोग्यविषयक महाप्रचंड अशा अमेरिकेअर कंपनीच्या मक्तेदारीमुळे साफ बसल्याने वेगळ्याच क्षेत्रातील वैद्यकीय शिक्षणासाठी तो शिकागोला येतो. शिकागोहून त्याचा निरोप घेऊन त्याची पत्नी व दोन छोट्या मुली शंपानला परत येत असताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू होतो. तिसरी घटना म्हणजे न्यू यॉर्कच्या मॅनहटन जनरल हॉस्पिटलात दाखल झालेल्या टेरेस हेगेन या महिलेच्या गर्भवाहक नलिकेमध्ये वाढू लागलेल्या गर्भाचे ऑपरेशन करताना तिचे गर्भाशय काढून टाकावे लागते. त्यामुळे तिला पन्हा अपत्यप्राप्ती होण्याचा मार्ग खुंटतो. १९९१ मध्ये एकाच दिवशी घडलेल्या या तीन घटनांनंतर पाच वर्षे उलटून गेल्यावर १९९६ च्या मार्च महिन्यात कादंबरीतील मुख्य घटनांना सुरुवात होते. या पाच वर्षांच्या काळात जॅक स्टेपलटन याने पॅथॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो आता निष्णात कुशल पॅथॉलॉजिस्ट झालेला असतो. वैद्यकीय गुन्हा अन्वेषण विभागात संशयास्पद मृत्यू झालेल्या शवांचे विच्छेदन करून मृत्यूचे नेमके कारण व परिस्थिती शोधून काढण्याचे काम तो करीत आहे. तो काहीसा मनस्वी, सडेतोड, परखड, स्पष्ट बोलणारा, जगावेगळा वागणारा, निग्रोच्या वस्तीत राहणारा, स्वच्छंदी वागणूक असणारा, पण हाती घेतलेले काम निष्ठेने अथक श्रमाने पूर्ण करणारा माणूस आहे. कथेच्या सुरुवातीला मॅनहटन हॉस्पिटलमधून कोणत्यातरी अज्ञात घातक संसर्गजन्य रोगाने एकापाठोपाठ मरू लागलेल्या माणसांची मृत शरीरे शवविच्छेदनासाठी येऊ लागतात. त्यांच्या वैद्यकीय तपासणीतून मिळणाऱ्या निष्कर्षाने जॅक चक्रावून जातो. न्यू यॉर्कच्या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये हे रोगजंतू उद्भवले की कुणा माथेफिरूने हे कृत्य केले आहे, अशी शंका जॅकला येते, तो त्याचा शोध घेतो. त्यानंतर अनेक नाट्यमय घटना घडतात. जॅकवर गुंडांचे हल्ले, निग्रो गुंडांच्या दोन टोळ्यांतील समझोता, जॅकच्या मित्रांनी त्याचे प्राण वाचवणे. याची चित्तथरारक वर्णने कादंबरीत आहेत. शेवटी या साऱ्या विषाणूंचा प्रसार करणारी बहीण भावांची जोडी स्वत:च या विषाणूंना बळी पडते. जॅक वाचतो आणि शेवट सुखद होतो. एका वेगळ्या विषयावरची वेगळ्याच क्षेत्रातील गुन्हेगारीचे चित्रण करणारी ही उत्कंठावर्धक कादंबरी मांडणीमुळे वाचकांच्या मनाची पकड घेते. मेहता पब्लिशिंग हाऊसने इंग्रजीतील नामवंत व जगप्रसिद्ध लेखकांच्या उत्तम कलाकृतींचे अनुवाद ‘टी क्लब’ योजनेतून मराठी वाचकांना सादर करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. त्यातीलच ही एक वाचनीय कादंबरी आहे. -प्रभाकर सोवनी ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (NASIK) 06-01-2002

    ही डॉ. रॉबिन कुक यांची वैद्यकीय पार्श्वभूमीवरील एक यशस्वी रहस्यमय कादंबरी. विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठिा ‘इंटेलिजंट’ गुन्हेगारांची टोळी, त्यांची असाधारण गुन्हेगारी व एका बुद्धिमान, निष्ठवंत व्यक्तीनं ती हाणून पाडण्यासाठी, जीवाच्या करारानं घेतलेा त्याचा शोध, या पद्धतीने गुंफलेलं हे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक मांडणीमुळे वाचकांच्या मनाचा ठाव घेते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more