* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KANCHANGANGA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661330
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FOR LAST SEVEN DECADES, THE SOUL RESIDED IN THIS PARTICULAR BODY WHICH WAS NOW EXTREMELY TIRED. HOW LONG IT COULD BE USED SUCH? HOW LONG CAN ONE STAY IN PARENTAL HOUSE? THIS BODY WAS BESTOWED WITH THE PRIME FUNCTION OF RELEASING THE SOUL. THERE WAS NO LUST TOWARDS THE BODY, RATHER A FEELING OF TOTAL RETIREMENT COMBINED WITH EAGERNESS TO GET DISSOLVED WITH ‘THE ULTIMATE’. THE MELODIOUS TANPURA WAS ACCOMPANYING BEGUM. SHE WAS SINGING: ‘NAIHAR CHHUTO JAI’… AS I LEAVE MY PARENTAL HOME. APART FROM THE BRIGHT WHITE LIGHT THE EYES COULD NOT SENSE ANYTHING ELSE. OH, THERE IS A BLUE LAKE AS WELL. AND WHAT IS IT AT ITS FAR END? A SNOW-COVERED MOUNTAIN PEAK. THE VERY TALL PEAK…KANCHANGANGA. FOR THE FIRST TIME IN HER LIFE, MAI COULD SEE VALUKESHWAR DEEP IN MEDITATION. OH, SO THIS DISPASSION HAD A MEANING AFTER ALL? IT ENABLED HER TO VIEW HIM THUS. ANJANI’S LIFE REACHED THE FLOW OF THE GANGA. HER PATH WAS LINED WITH KACHNAR FLOWERS. ANJANI HAD BECOME AS HOLY AS THE GANGA NOW. NOW THERE WAS NOTHING BUT ‘NADBRAHMA’ THE SOUND OF GOD…
गेली सात तपं...हा आत्मा या शरीरात वस्ती करुन होता. हे शरीर...आता थकलं होतं. ते किती वर्षं वापरायचं? नैहर झालं, म्हणून काय झालं?ज्या आत्म्याच्या उध्दारासाठी म्हणून हे शरीर लाभलं होतं, त्या शरीराची आता आसक्ती नव्हती, तर निवृत्ती होती. त्या भव्य सुरात आपला सूर मिळवण्याची आतुरता! तंबोरा झंकारत होता. बेगमचा आवाज कानांवर पडत होता. नैहर छुटो जाय... आता...मिटलेल्या डोळ्यांसमोर फक्त पांढराशुभ्र प्रकाश दिसत होता. एक निळं सरोवर...आणि त्या पलीकडलं हिमालयाचं बर्फाच्छादित शिखरही... एक उत्तुंग शिखर...कांचनगंगा! त्या शिखरावर ध्यानस्थ झालेला वालुकेश्वर माईला आज प्रथमच स्पष्ट दिसला. तो नजरेसा दिसावा, म्हणूनच तर होतं हे वैराग्य! कांचनाच्या पायघड्यांवरुन चालणारं, अंजनीचं जीवन पार गंगेच्या प्रवाहापाशी पोचलं होतं. गंगेइकंच् पवित्र, विशाल. अंजनी स्वतच बनली होती कांचनगंगा! जिथं..फक्त. नादब्रम्ह झंकारत होतं!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarSmita Kawale

    Interesting read!

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 20-05

    एक वाचनीय चरित्रात्मक कादंबरी... माधवी देसाई यांची ‘कांचनगंगा’ ही चरित्रात्मक कादंबरी! गोमंतकन्या अंजनीबाई मालपेकर, हिरबाई पेडणेकर आणि सुरंगा मुळगावकर अशा तीन तेजस्वी स्त्रियांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी जितकी मनोरंजक तितकीच माहितीपूर्णही आहे. यातीन तेजस्विनींचे अप्रकाशित जीवन या कादंबरीने प्रकाशात आणले, हा या कादंबरीचा उल्लेखनीय विशेष! मराठी नाट्यवाङ्मयात स्त्री नाटककरांची आजही वानवाच आहे. अशा क्षेत्रात हिराबाई पेडणेकर या ‘महाराष्ट्रातील पहिली नाटक लेखिका’ म्हणून ओळखल्या जाणे अपूर्वाईचे आहे. त्यांच्या घरी होणाऱ्या साहित्यचर्चा, मोठमोठे नाटककार, लेखक यांचे येणे-जाणे याबद्दल अंजनीबाई आणि सुरंगा या आपल्या मैत्रिणीजवळ हिराबाई बोलत असतानाच, त्यामागे असलेली पुरुषीदृष्टी हिराबार्इंना अस्वस्थ करून सोडणारी आहे. ते आपल्या घरी कशासाठी येतात हे हिराबार्इंना चांगलं ठावूक असतं. या संबंधी त्या आपल्या मैत्रिणींजवळ म्हणतात- ‘त्या सर्वांना हवा असतो माझा सहवास. त्यांना माझ्या सौंदर्याचं वेड आहे म्हणून माझ्या घरी नट येतात, लेखक येतात. त्यांच्या पदांना मी चाली लावते. पण ते खरं नाही. मला त्यांचे हेतू समजतात.’ (पाठ नं. १२१) हिराबाई पेडणेकरांच्या या उद्गारातून तत्कालीन विदुषीकडे पुरुष कोणत्या दृष्टीने बघत यावर विदारक प्रकाश पडतो. कलावंत स्त्रीकडे येणार पुरुष केवळ कलेच्या वेडानं येतात असं नाही. त्यांनी केलेली स्तुती, त्यांचं गोड वागणं हे बरेचदा खोटं खोटं असतं. हिराबार्इंसारख्या विदुषीला हे खोटेपण कळत नाही असं नाही. तरीही आपल्याला हे सारं आवडतं कारण याचीही एक नशा असते. ‘कुणा एकावर आपण मनापासून प्रेम करावं, त्यानं आपल्याला फसवावं अशावेळी आधार देण्यासाठी तिसराच कुणी यावा, आपल्या भावूक अवस्थेचा त्यानंही फायदा घ्यावा आणि मग त्याचीच नशा चढत जाते...’ हे यावर हिराबार्इंचं उत्तर. स्त्रीचं चारित्र्य हे काचेच्या भांड्यासारखं. त्याला तडा जाता कामा नये. हिराबार्इंच्या दोन्ही मैत्रिणी फार समंजस. त्या हिराबार्इंना समजवतात. आपलं चारित्र्य जपायला सांगतात. ‘हिरा, बाईचं खरं सौंदर्य कशात असेल तर ते तिच्या चारित्र्यात. ते चारित्र्य भंगलं की सारं संपलं. आपण कलावंत घरच्या मुली! आपण वयात येण्यापूर्वीच साऱ्याचं लक्ष आपल्यावर असतं.’ हिराबार्इंची मैत्रीण अंजनी मालपेकर हिच्या या उद्गारातून साऱ्या स्त्रीजातीच्या वाट्याला आलेल्या भागावर किती विदारक प्रकाश पडला आहे. अंजनीबाई मालपेकर ही एक श्रेष्ठ गायिका! भेंडीबाजार घराण्याचे अतिथी नजीरखां यांची अंजनी ही पट्टशिष्या. अंजनी अठरा वर्षांची असतानाच गाण्याची बैठक करू लागली होती. लावणी ठुमरी, गझल, दादारा हे सारं तयारीनं गाणारी अंजनी शास्त्रीय संगीतातही तरबेज होती. शास्त्रीय संगीताचा दळदार आवाज तिने तयार केला होता. उर्दू, हिंदी, संस्कृत, गुजराती, मराठी साऱ्या भाषा ती शिकली होती. मिशनरी शाळेत तिने शिक्षण घेतलं होतं. गोहरजान, चुन्ना, वैष्णवसंप्रदाय या सर्वांच्या गायकीचा तिने अभ्यास केलाय. उच्चार, भाव, शब्दफेक, ताल, लय यात ती तरबेज आहे. कलावंताला आसनाचा मान असायला हवा हा तिचा हट्ट! आजवर कुण्याही स्त्री कलावंतानं हा हट्ट केला नाही. रात्रभर अदा करून, उभ्याने ठुमरी, दादरा कव्वाली पेश करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या बैठकी अन् लोडाला टेकून त्यांना वाहवा देणारे श्रीमंत श्रोते या परंपरेविरुद्ध आवाज उठवणारी अंजनी ही पहिली कलावंत! अन् राष्ट्रपतींच्या हातून पहिली नाट्य आणि संगीताची फेलोशिप प्रदापन केली गेली, अशी श्रेष्ठ गायिका! ‘बॉम्बे म्युझिकल सोसायटी’ या एका नव्या संस्थेचा मुंबईत शुभारंभ करणारी अशी श्रेष्ठ गायिका आणि सरतेशेवटी अगदी तृप्त मनाने तिने घेतलेला गानसंन्यास! अंजनी मालपेकरांची या कादंबरीतली व्यक्तिरेखा अशी चारित्र्यसंपन्न आणि बुद्धिमान साकारली आहे. या कादंबरीतील तिसरी तेजस्विनी आहे सुरंगा मुळगावकर. राजा रविवर्मा या महान भारतीय चित्रकाराची प्ररेणा! हिरा, सुरंगा अन् अंजनी या तिघींमध्ये सर्वांत सुंदर होती सुरंगा! राजा, रविवर्मा या महान भारतीय चित्रकाराची प्रेरणा! हिर, सुरंगा अन् अंजनी या तिघींमध्ये सर्वांत सुंदर होती सुरंगा! राजा, रविवर्माच्या चित्रामधील सीता, शकुंतला, उर्वशी, दमयंती, पार्वती या सर्वामध्ये हुबेहूब उतरली ती सुरंगाच! राजाजींची पत्नी माहेरी राहते. कारण त्यांच्या प्रदेशात लग्न झालं की पुरुषानं पत्नीच्या घरी राहायला जायचं ही पद्धत. पण राजाजींना ती मान्य नाही. ते आपल्याच घरी राहतात. चित्रकलेच्या निमित्तानं अनेक स्त्रियांशी त्यांचा संबंध आलेला. त्यातही राजा रविवर्मा अन् सुरंगा यांच्यातले संबंध म्हणजे रेशीमबंधच! सुरंगामुळे राजाजींच्या कुंचल्यात एक वेगळीच जादू आलेली. अन् राजाजींच्या प्रेमानं सुरंगाचं झालेलं कृतकृत्य जीवन. सुरंगा राजाजींच्या प्रेमाबद्दल म्हणते, ‘त्यांनी मला कोणतीही जहागिरी दिलेली नाही. पण माझं प्रेम अजरामर केलं. या सुरंगाला त्यांनी केव्हढ्या उंचीवर नेऊन ठेवलं? यापेक्षा आणखीन काही सुंदर असेल?’ सुरंगाच्या या उद्गारात राजाजींच्या प्रेमाबद्दल किती कृतज्ञता भरून राहिली आहे. हिराबाई पेडणेकर, अंजनीबाई मालपेकर आणि सुरंगा मुळगावकर या तीन बाल मैत्रिणींच्या जीवनावरची ही कादंबरी! नवीवाडीमधील गोयंकारांचं जीवन, त्यांचे जगण्याचे संकेत या तीन मैत्रिणींचा असीम त्याग, त्यांचा संघर्ष या साऱ्यांचं मनोहारी चित्रण या कादंबरीतून आले आहे. या तिघींनाही एकमेकींच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान आहे. हिरा पेडणेकर अंजनीच्या गाण्याबद्दल म्हणते, ‘आज तू मोठी गायिका म्हणून नावलौकिक मिळवलास.’ सुरंगाबद्दल म्हणते, ‘आमचं’ हे नाजूक सुरंगीचं फूल राजाजींसारख्या कलावंताच्या हाती सुखरूप आहे. अंजनी हिराबद्दल म्हणते, ‘आपणा तिघीत खरी विदुषी तूच आहेस. आजवर कुणी बाईमाणसानं नाटक लिहिलंय्?’ कविता केल्या आहेत तुझ्यासारख्या? की गाण्याला चाली दिल्या आहेत?’ या तिघीही अशा एकमेकींच्या सुखदु:खात समरस झाल्या आहेत. ह्या कादंबरीचे कथाबीज लेखिकेच्या मनात कसे पडले? लेखिकेला या तिघींच्या जीवनावर कादंबरी का लिहावीशी वाटली? तर रणजित देसाई यांची ‘राजा रविवर्मा’ ही कादंबरी लेखिकेच्या वाचनात आल्यावर या कादंबरीची नायिका सुरंगा हिने लेखिकेच्या मनात घर केले. पुढे केव्हा तरी म्हापसा गोवा इथे अंजनीबाई मालपेकर संगीत सम्मेलन आविष्कार या संस्थेतर्फे अंजनीबार्इंवर बोलण्याचं निमंत्रण माधवी देसार्इंना आलेले. त्या निमित्ताने अंजनी मालपेकरांच्या जीवनाचा त्यांनी घेतलेला शोध. अन् मग अंजनी, हिरा आणि सुरंगा या तिघीही बालमैत्रिणी असल्याचा लेखिकेला लागलेला शोध. नवीवाडी, गिरगाव इथं वाढलेल्या, गोमंतकात जन्मलेल्या या तीन बालमैत्रिणी, त्यांचं मूकजीवन शब्दबद्ध करून वाचकांसमोर ठेवण्याची लेखिकेच्या मनात निर्माण झालेली आकांक्षा अन् या आकांक्षेतून मूर्त रूपात साकारलेली ‘कांचनगंगा’ ही माधवी देसार्इंची कादंबरी! सुरंगाचं विषप्राशन, हिराबार्इंचा विजनवास आणि अंजनीचा गानसंन्यास या तीन घटनांची साखळी म्हणजे कांचनगंगा! या तीन बालमैत्रिणींच्या जीवनकहाणीत लेखिकेने काल्पनिकतेचे रंग भरताना अलंकारिक भाषेचा केलेला वापर, बरेच ठिकाणी पाल्हाळीकपणे केलेली वर्णनं यामुळे ही कादंबरी काहीशी पसरट आणि कृत्रिम व्याज झालेली असली तरी या तीन विदुषींचे अपरिचित जीवन या कादंबरीने वाचकांसमोर आणले हे विशेष! -डॉ. सुनंदा देशपांडे ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 03-06-2001

    गानतपस्विनीच्या जीवनावरील लोभस कादंबरी... माधवी देसाई यांचं ‘कांचनगंगा’ हे तेरावं पुस्तक आहे. अंजनीबाई मालपेकर या सुप्रसिद्ध गायिकेच्या जीवनावर ही कादंबरी आधारलेली आहे. महाराष्ट्रातील पहिली नाट्यलेखिका हिराबाई पेडणेकर आणि ‘राजा रविवर्मा’ या महान अशाहिंदुस्थानी चित्रकाराची प्रेरणा असलेल्या सुरंगा मुळगावकर या अंजनीबार्इंच्या मैत्रिणींची आयुष्यंही लेखिकेने जोडून घेतली आहेत. अंजनीबाईसारख्या गोमंतक कन्येविषयी, तिच्या गानतपस्येविषयी, आणि तत्कालीन समाजाविषयी, परंपरेविरुद्ध केलेल्या संघर्षाविषयी आणि जपलेल्या मूल्यांविषयी लेखिकेने मोठ्या आस्थेनं लिहिलं आहे असं लक्षात येतं. गोमंतकात जन्म घेतलेल्या, छत्तीस वर्षे संगीत साधना केलेल्या आणि थोर गायक-कलावंत असलेल्या अशा अंजनीबाईच्या लावण्याविषयी कादंबरीत अनेकदा उल्लेख आलेले आहेत. “मोत्यासारखे स्वच्छ सूर, त्या सुरांना असणारी एक मुलायम किनार, प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार, अर्थाप्रमाणे चेहऱ्यावर उमटणारे भाव, अत्यंत शालीन वर्तन आणि डाळिंबी रंगाच्या इंदोरी साडीमधून उठून दिसणारं त्या गायिकेचं लावण्य पाहून सारेजण भारावून गेले होते.” असे लेखिका सहज लिहून जाते. अशा स्वर्गीय सौंदर्याची धनीण असलेल्या अंजनीबार्इंनी आपल्या गुरू नाजिरखाँकडे जाहीर बैठकीपूर्वी एक अट स्पष्टपणे घातली होती : “मी उभं राहून गाणार नाही. कलावंत एक स्त्री म्हणून तिनं उभ्यानं गायचं ही कुठली परंपरा? मला हा फरक मान्य नाही.” आश्चर्य म्हणजे, त्रिभुवन शेटजींकडे होणाऱ्या पाहिल्या बैठकीच्या कार्यक्रमाच्या वेळी चिंतामण शास्त्रींनीसुद्धा स्पष्टपणे सांगितले, “मित्रहो, या आसनावर आजची गायिका बसणार आहे. हा मान आपण सर्वजण तिला देणार आहो. आजवर आपण हे कधी केलं नाही. आपण टेकून बसत होता आणि कलावती स्त्री रात्रभर उभी राहून गाताना ऐकत होता. हा एक फार मोठा उपमर्द आपल्या हातून होत होता. कलाकार कलेचा उपासक असतो. त्याने खडतर तपश्चर्या केलेली असते. सभागृहात येणाऱ्या अतिथी कलाकाराला आपण प्रथम आसन देणं उचित नव्हे का?” खाँ साहेब, पं. भातखंडे, त्रिभुवनशेठ आनंदले व अंजनीबार्इंना आसनाचा मान लाभला. परंपरेविरुद्ध बंड केल्याचा हा परिणाम होता. अंजनीबार्इंना धनाढ्य माणसांकडून, राजेरजवाड्यांकडून आमंत्रणे येऊ लागली तेव्हा आईनं जबाबदारीची जाणीव देऊन म्हटलं होतं, “बाय, आजवर तू या घरात सुखरूप होतीस. पिलाला पंख फुटले की, ते आभाळात प्रथम झेप घेतं, तो एकच क्षण काळजीचा असतो. नंतर मात्र त्याला आपोआपच समजायला लागतं की, आभाळाभर भरारी मारूनही घरट्यांत सुखरूप कसं परतावं आणि त्याच्या पंखांत आपोआपच उडण्याची शक्तीही येते.” अंजनीबार्इंच्या दोन्ही मैत्रिणी तेवढ्या कणखर निघाल्या नाहीत. हिरा पेडणेकरच्या कविता कुठे कुठे छापून येत होत्या. तिच्या सौंदर्यानं लोभावून नट, लेखक, नाटककार येत पण त्यांच्या मनातले हेतू स्वच्छ नव्हते हे तिला उशिरा कळले. एका विद्ध हरिणीसारखी ती जगली. दुसरी मैत्रीण सुरंगा रविवर्म्याच्या चित्रांतून साकारली गेली तरी लोकांच्या टीकेला ती बळी पडली. विष प्राशन करून तिनं पुढं मृत्यूलाच कवटाळलं. हे दोन्ही प्रसंग आणि त्यातून कलावंत मनाची होणारी तगमग लेखिकेनं यथार्थपणे मांडली आहे. अंजनीबाईला वसनजी वेद या धनिकाचा आश्रय लाभतो. त्याच्याशी विवाह होऊन ती एका मुलाची आई बनते आणि गाण्याच्या बैठकीतून तिला अमाप असं यश पदरी पडते. तरीही प्रापंचिक आसक्तीतून ती विरक्त होत जाते. तिच्यावर केडगावच्या नारायण महाराजांच्या विचारांचा पगडा बसू लागतो. काही काळ ती नवऱ्यापासूनही दुरावते. नवरा कर्जबाजारी झाल्यावर त्याला धंद्यात उभं करण्यासाठी भांडवल गोळा करते, परंतु काही दिवसांतच नवऱ्याच्या मृत्यूनं ती पार कोसळते. उरलंसुरलं अवसानही गळून पडतं. हे कथानक अतिशय ओघवत्या शैलीतून मांडण्यात आलं आहे. अंजनीबार्इंचं व्यक्तिमत्त्व केवळ गायिका म्हणूनच नव्हे तर वाचनानं, अनुभवानं, चिंतनानं परिपक्व झालेलं असं दर्शविलं आहे. नेपाळ ते कन्याकुमारीपर्यंतचा सारा भारत त्यांनी आपल्या स्वर्गीय गायकीनं जिंकला. चारित्र्यसंपन्न आणि बुद्धिमान अशा गोमंतक कन्येच्या रूपात माधवी देसाई यांनी अंजनीबार्इंचं कादंबरीतून रेखाटलेलं चित्र मोठं विलोभनीय झालं आहे. एका गान-तपिस्विनीवर लिहिलेली ही कादंबरी मोठी वाचनीय आणि लोभस झाली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 03-06-2001

    श्रेष्ठ कलावतीची हृदयस्पर्शी जीवनगाथा-कांचनगंगा… कांचनगंगा ही माधवी देसाईची कादंबरी भेंडीबाझार घराण्याचे गायक नजिरखाँ यांची परमशिष्या गोमंतक कन्या अंजनीबाई मालपेकर यांच्या जीवनावर आधारित आहे. अंजनीबाईनी आपल्या स्वर्गीय गायकीने सारा भारत जिंकला. त्याच्या जाण्यामुळे कला आणि सांस्कृतिक प्रांगणात फार मोठी पोकळी निर्माण झाली. अंजनीबाईच्या दोन मैत्रीणी - हिराबाई पेडणेकर महाराष्ट्रातील पहिली नाट्यलेखिका आणि संगीततज्ज्ञ कवयित्री आणि दुसरी सुरंगा मूळगावकर ही राजा रविवर्मा या श्रेष्ठ चित्रकाराची प्रेरणाशक्ती या तिघी गायन, लेखन, चित्र या कलाक्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या स्त्रिया. त्यांच्या जीवनप्रवासाची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यासाठीच लेखिकेने हे शब्दशिल्प निर्माण केले आहे. अंजनीला सौंदर्य आणि मधुर आवाज या दैवी देणग्या लाभल्या होत्या. तसेच तिचे नशीबही बलवत्तर होते. म्हणूनच नजिरखॉसारख्या संगीत शिक्षक मिळाला. त्याने बिदागीची अपेक्षा न ठेवता आपल्या संगीतज्ञानाचे पूर्ण भांडार या शिष्येच्या स्वाधीन केले. शिष्येने निष्ठेने ज्ञान आत्मसात केले. कमीत कमी स्वरात जास्तीत जास्त आशयपूर्ण फुलोरा असणारे स्वरशिल्प निर्माण करण्यात आपले कसब दाखवले. वाचनाची आवड असलेली आणि गाण्याचे वेड असलेली अंजनी, वसनजी या देखण्या, दिलदार, संगीत रसिकाची पत्नी झाली. वसनजी गिरण्यांचा मालक, उत्तम व्यापारी आणि शेअर दलाला होता. आर्थिक सुबत्ता असूनही त्याने अंजनीला गाण्याच्या बैठका घेण्यास अनुमती दिली. कारण गाणे हा तिचा श्वास आहे हे जो जाणून होता. त्याचे अंजनी आणि तिचे गाणे या दोन्हीवर अकृत्रिम प्रेम होते. अंजनी स्वतंत्र बंगलीत छानदार मोठ्या प्रशस्त जागेत आई-आजीसह राहूल लागली. श्रेष्ठ गायिकेचे मानमरातब तिला मिळत गेले. कीर्ती वाढली. प्रतिष्ठ उंचावली तरीही ती आपल्या जुन्या मैत्रिणींना आणि गुरूंना मुळीच विसरली नाही. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत राहिली. अनुभवातून अधिक परिपक्व होत गेली. तिची वर्गमैत्रिण सुधा जातीने ब्राह्मण केवळ आठव्या वर्षी विधवा झाली. त्यावेळी शाळेच्या फादरने आणि सेवाभावी शिक्षिका मेरीने दु:ख व्यक्त करताना जे विचार मांडले ते अंजनीच्या काळजात घर करून राहिले. तेव्हाच परंपरा हा शब्द असा काही तिच्या हृदयात रुतला की भावी आयुष्यात परंपरा तोडण्यात ती सतत पुढाकार घेत गेली. परंपरेच्या संदर्भात स्वतंत्रपणे विचार करून कृती करू लागली. मैत्रिणींनादेखील तिने घातक परंपरा न मानण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांना भावनिक आधार दिला. तिघींनी व्यक्तिगत जीवनात परिस्थितीचे चटके सोसले. कलेची पूजा करताना परंपरा मोडण्याचे धाडस केले. त्यामुळे समाजाकडून विरोधाचे घाव बसले. ह्या सोसले, चारित्र्य आणि निष्ठा ही जीवनाची मूल्य बघून कलेच्या क्षेत्रात उंच भरारी घेतली. अशी ही तीन तेजस्वीनींच्या जीवनावरची सुंदर कादंबरी आहे. कादंबरीचे निवेदन ओघवत्या शैलीतील भावपूर्ण आहे. अंजनीची आजी कुटुंबियांची गोमंतकीय बोली तर नजिरेखा इ. ची उर्दू मुस्लीम मिश्रीत मराठी यांचा मार्मिक वापर लेखिकेने केला आहे. शास्त्रीय गायकीतले बारकावे, संदर्भ परिश्रमपूर्वक मिळवून योग्य प्रकारे वापरल्याचे जाणवते. वाचकाचे शीर्षकाला संगीताचे ज्ञान नक्कीच वाढते. मुखपृष्ठ विषयाला व शीर्षकाला साजेलसे आहे. -डॉ. विभा शहा ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

BHARTIYA GANIKA
BHARTIYA GANIKA by DR.S.R. DESHPANDE Rating Star
डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

मंडळी, कालच्या ऱ्हासचक्रानंतर मी विचार करत होते की आज काय? पुस्तकं तर काही वाचून ठेवली होती (म्हणजे वाचली आणि ठेवून दिली बाजूला... अक्षरशः). आत्ताची समोर आहेत ती. कदाचित त्यातलं एखादं उद्या घेईन. मध्ये अचानक या पुस्तकाची जाहिरात वाचली, अगदी गेल्या ठवड्यातली गोष्ट. उत्सुकता चाळवली. समूहात काहीतरी आगळं वेगळं पुस्तक घ्यावं हा विचार सतत मनात असतोच. तसं पुस्तक घरी येताच (जय amazon) चाळायला म्हणून बसले, आणि काय सांगू, हातात मार्कर कधी आलं, मी खुणा कधी केल्या, पुस्तक कधी संपलं... कळलंच नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगते... प्रेयर पुस्तकाला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद दिलात, अनेकांनी ते विकत घेण्याचा विचार केला तेव्हाच सांगायचं होतं, पण राहिलं. ओळख करून दिलेलं पुस्तक पूर्णपणे वाचनीय असतं असं नाही. त्याचा बरचसं भाग बोजड असतो. पण ते नाही का, डेटिंगच्या काळात मुलगा मुलगी स्वतःमधलं केवळ उत्तम ते दाखवतात, तसं मला प्रेयर बद्दल वाटलं. आय मीन प्रेयर पुस्तकाबद्दल वाटलं आणि गणिका या पुस्तकाबद्दल मला नेमकं तेच वाटत आहे. ========== ‘भारतीय कामशिल्प’ या पुस्तकाचं लेखन करत असताना प्राचीन भारताच्या समाजजीवनाची माहिती देणारे अनेक संदर्भग्रंथ वाचण्यात येऊन लेखकांची उत्सुकता चाळवली गेली आणि जेव्हा या विषयावर मराठीत एकही परिपूर्ण संदर्भग्रंथ नाही हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी स्वतःच या पुस्तकाचं लेखन मनावर घेतलं. केवळ सनसनाटी विषय सवंगपणे हाताळला आहे असं कुठेही वाटत नाही. अतिशय अभ्यासपूर्वक लेखन आहे. सोबत जोडलेली संदर्भग्रंथांची यादी (एकूण संख्या ६४) पुरेशी आहे. गणिका आणि उर्वरित श्रेणी या शरीरविक्रय करतात, हा वैश्विक व्यवसाय आहे. कैक काळापासून या व्यवसायाला मान्यता मिळाली आहे आणि त्याची आवश्यकता वाटली आहे. प्राचीन काळात भारतीय गणिका यांना एक संस्कृती आणि दर्जा होता. नीतीनियम होते, ते पाळावे लागत होते. पुस्तकाची प्रकरणं – प्रास्ताविक, विदेशी गणिका, भारतीय साहित्यातील गणिका, गणिकेची प्रशिक्षण व वर्णन, गानिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने, विट, गणिकामाता, प्रियकराचा राग-रंग, कथांविषयी थोडेसे आणि कथा (या शेवटच्या प्रकरणात एकूण १३ कथा आहेत – अगदी सुरस आणि चमत्कारिक वाटाव्यात अशा, त्यांचा परिचय मी देणार....... नाही.) प्रास्ताविक – (नऊ पानांचं प्रकरण) कुटुंब किंवा विवाहसंस्था कधी आकाराला आले हे नक्की सांगता येत नसलं तरी स्त्री-पुरुष शरीरसंबंध हे आदिम असून ते पशु – पक्ष्यांप्रमाणेच जनन हेतुस्तव नैसर्गिक होते आणि राहतील. फलन हे स्त्रीदेहामध्ये होतं या जाणीवेतून तिला आदरस्थान प्राप्त झालं. सर्जनाची गूढ शक्ती धारण करणारी ती आदिमाया/माता/ अद्याशक्ती होय. जवळपास प्रत्येक धर्मात प्रजा, पशु आणि धान्य समृद्धीसाठी सुफलता विधी आहेत. भारतीय हिंदू धर्म शास्त्रीय ग्रंथांतून स्त्री पवित्र्याच्या कथा वाचायला मिळतात. पतीला परमेश्वर मानलं जाई. त्याही काळात गणिका हा व्यवसाय होता आणि त्याकडे सहिष्णू वृत्तीने पाहिलं जाई.राजे महाराजे त्यांचे पोशिंदे असतं. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया तिरस्काराला पात्र असत, पण गणिका नाही. त्यांना नगर भूषण, नगर अलंकार, नाग्त रत्न मानलं जाई. प्रसंगी, राजे त्यांचा सल्ला घेत. त्या बहुश्रुत असतं चौसष्ट कलांत पारंगत असतं. संभाषणचतुर, हुशार, समंजस, उदार, योग्य आदर राखणाऱ्या, विनयशील आणि अनुपम सौंदर्यवती असत. एखाद्या गणिकेमुळे त्या राज्याची कीर्ती वाढत असे. धार्मिक समारंभ, सामाजिक कार्यक्रम (विविध झुंजी, शर्यती), करमणुकीचे कार्यक्रम (जलक्रीडा, वनविहार), रंगमंचावर अभिनय, अशा नानाविध ठिकाणी त्यांची ठळक उपस्थिती असे. रथारूढ अथवा सिंहासनाधिष्ठ राजाला वारा घालणे, चवरी ढाळणे, छत्र धरणे अशी कामं त्या करत. त्यांच्याशी संबंध ठेवणं समाजमान्य होतं. प्रतिष्ठितांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक, अगत्यशील आणि स्नेहिल होता. मात्र, त्यांना कडक आणि कठोर नियम पालन करावे लागे.विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर ते पेशवाई संपेपर्यंतच्या काळात, मोगल राजवट येऊन गेली, ब्रिटीश वसवतवादाचा प्रसार सुरू झाला, समाज व्यवस्था बदलली, गणिका संस्कृतीला ओहोटी लागली. ब्रिटीशांचा अंमल सुरू झाल्यावर गणिका संस्था नष्ट होऊन वेश्या व्यवसाय वाढीला लागला. यामागे औद्योगिक क्रांती हे एक कारण आहे. वेश्यागमन निंद्य कृत्य मानलं जाऊ लागलं. तरुण अधिकाधिक सुशिक्षित होऊ लागला तसा शरीरसंबंधांपायी स्वास्थ्य गमवावं लागलं तर काय, हा विचार थोडाफार मूळ धरू लागला. आणि या शौकाची आसक्ती कमी झाली. चरितार्थाकरता पैसे मिळवण्यासाठी वेश्याव्यवसाय हादेखील विश्वसनीय आर्थिक व्यवसाय मानण्यात यावा असा निकाल १९११मध्ये युरोपियन न्यायालयाने दिला. विदेशी गणिका – (२७) बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतीत गणिकांचे पुरावे मिळतात. इजिप्त, बबिलोन, सिरीया, फिनिशिया, ही काही उदाहरणं. ग्रीस, इटली, भारत इथे त्यांना विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. त्यांचेही प्रकार होते, सामान्य वेश्या अलेत्रय्डी, आणि सर्वोच्च म्हणजे हेटीअरा (या शब्दाचा अर्थ सोबती). काही हेटीअरा वादविवादपटू होत्या. क्लेप्सीड्रा हिच्या वक्तशीरपणामुळे तिला ते नाव मिळालं होतं त्याचा अर्थ जलघटिकापात्र असा होतो. थीओफ्रत्स याने इ.पू. ३७२ – २८७ या काळात ‘ऑन मरेज’ हा ग्रंथ लिहिला, याचा सविस्तर अभ्यास करून लिओंटीयम या हेटीअराने त्यावर प्रगल्भ टीका लिहिली. रोमन समाजात कोर्टीझन अस्तित्वात होत्या. पॉम्पेई इथे व्हिकोली बाल्कोन पन्सिली नावाच्या इमारतीत शेकडो रमणी वास करत. या संदर्भातली रतिक्रिडेची मूळ चित्रं पॉम्पेईन wall paintings म्हणून प्रसिद्ध असून ती इटलीच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आहेत. रोमन साम्राज्यात हेटीअरा ऐवजी कोर्टीझन शब्द रूढ झाला. युरोपात पंधरा-अठरा शतकांत कोर्टीझन आणि कलावंतीण यांना समाजात विशिष्ट स्थान आणि आदर मिळत होता. फ्रान्समध्ये सतराव्या शतकात रमणींची सत्कारगृहं (सलो) प्रसिद्ध होती. जपानमध्ये गै (कलात्मक क्षमता) आणि शा (व्यक्ती) यावरून गैशा ही संज्ञा रूढ झाली. त्यांच्यात अलंकारिक सुरावट, सौजन्य, निष्कपट, सुसंस्कृतपण असे. बाराव्या शतकापासून कार्यरत असलेली ही प्रथा इडो काळात (इ.स.१६००-१८६८) अधिक वाढीला लागली. ओकिया ही त्यांची निवासस्थानं होत. विसाव्या शतकात त्यांचं वर्चस्व राजकीय क्षेत्रात वाढीला लागलं. १९२०-३० मध्ये त्यांची संख्या साधारण ८० हजार होती, ती १९७०-८० दम्यान १७ हजार इतकीच उरली आहे. चीनमध्ये पूर्वी पीकिंग (बीजिंग) इथे सिंगसॉंग हाउस हा भाग राखीव होता. शांघाय इथे अत्यंत विलासी वारांगना गृहं आहेत. सिंगापूरमध्येगिटार गर्ल्स (पीपाचाई) या नावाने त्या ओळखल्या जातात. पाकिस्तानात त्या तवायफ, कान्जारी आणि गश्ती नावाने ओळखल्या जातात. आज मात्र सर्वत्र आमुलाग्र बदल झाला आहे. भारतीय साहित्यातील गणिका – (३२) संस्कृत, प्राकृत, पाळी भाषांत, हिंदू, बौद्ध, जैन वान्ग्मयात, त्यांचा उल्लेख आढळतो. त्या वैदिक काळात भारतात होत्या हे काही ऋचांवरून समजतं. (ऋचा १.१६७.४ – अनेक पुरुषांशी सांग करणारी ती साधारणी). पंचचुडा अप्सरेपासून त्यांची उत्पत्ती झाली असं मानतात. महाभारत काळात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. (राज, नागरी, गुप्त, देव आणि ब्रह्म असे पाच प्रकार होते). रामायणात फार स्थान नव्हतं. अमरकोश, महाभाष्य, वार्त्तिके, दशरूपक, कौटिलीय अर्थशास्त्र जातक कथा, पंचतंत्र, वेताळकथा, शुकबहात्तरी, गाथासप्तशती, अशा विविध ग्रंथांत त्यांचा उल्लेख आहे. कामसूत्र या ग्रंथात वात्सायनाने ‘वैशिक’ या प्रकरणात त्यांची माहिती दिली आहे. कथासरीत्सागर, राजतरंगिणी, शृंगारतिलक, सरस्वतीकंठभरणा, कलाविलास, मेघदूत, मृच्छकटिक, रत्नावली, नागानंदा, अशा नाटकांतून त्यांचा उल्लेख येतो. भारतात इ.पू. पहिल्या सहस्रकात ती प्रथा अस्तित्वात येऊन ब्रिटीशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकात लोप पावली असावी असं समजलं जातं. गणिकेची प्रशिक्षण व वर्णन – (१६) गणिकेला बालपण जवळपास नव्हतच. वयाच्या सहा-सात वर्षापासून तिला घडवायला सुरुवात होत असे. त्यांच्या प्रशिक्षणात आचार, विचार, शिष्टाचार, विविध कला, खेळ, भाषा, वर्तन, सौंदर्यवर्धन, गायन, वादन, नृत्य, अलंकरण, शरीर सौष्ठव, बुद्धिवर्धन अशा प्रत्येक अंगाचा व्यापक विचार होता. काही हस्तकला शिकाव्या लागत. पाककला, सुगंधी द्रव्य निर्मिती, कामशास्त्र, प्रणायाराधन, हिकाव्म लागे. स्वसंरक्षण शिकावं लागे. गणिकांची वेशभूषा, सौंदर्यप्रसाधने – (५) आधीच्या प्रशिक्षणात हाही एक महत्त्वाचा भाग होता. विट – (७) हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा इथे दिलेला अर्थ – शृंगाररस नायकानुचराप्रमाणे संपत्तीचा भोग न घेणारा किंवा जो आपल्या पैशाचा वापर कधी करत नाही, असं नाटकातलं लबाड, धूर्त पात्र. गणिका संस्थेत त्याच्या जोडीने वयस्य, अनुचर, धूर्त आणि डिंडिक ही पुरुष पात्र वावरतात. प्रतिवेशिनी ही गणिकेची शेजारीण. ती विश्वासातली. ती गणिकेसाठी विट आणि प्रियकर यांच्याशी संवाद साधते. गणिकामाता – (७) हे पात्र फार महत्त्वाच. तिला संरक्षित स्त्री, कुट्टनी किंवा कुट्टीनी म्हटलं जाई. तिचं काम शिस्त राखणे, थोडक्यात रेक्टर. कामकुजानांना आळा घालणं, गणिकांना खऱ्या प्रेमापासून वंचित ठेवणं. कामुकांचं मानसशास्त्र तिला मुखोद्गत. पुरुषांच्या गुणदोषाच्या’ आधारे अचूक आडाखे बांधत ती गणिकेला सल्ला देता. तिचा दबदबा असतो. ते नसती तर गणिका ही संस्था कधीच नामशेष झाली असती. कारण स्त्रिया या स्त्रिया असल्याने स्त्रीसुलभ भावनेनुसार गणिकागिरीत न रमता त्या केव्हाच संसाराला लागल्या असत्या. प्रियकराचा राग-रंग – (९) रग हे बारा छटांमधली काम आसक्ती असं म्हणता येईल. पुरुषाची मनोवृत्ती, प्रवृत्ती, स्वभाव, गुणविशेष आणि खास करून राग-लोभ जाणून घेत गणिकेला त्याच्याशी वर्तन करावे लागते. कथांविषयी थोडेसे आणि कथा (४८) – ‘शृंगारमंजरीकथा’ हा राजा भोज रचित संस्कृत ग्रंथ असून त्यात स्त्री-पुरुष मनोवृत्ती दर्शन घडवणाऱ्या तेरा कथा आहेत. त्यापैकी काही जीर्ण, काही अपूर्ण आहेत. पैकी एक कथा वाचून दाखवते. संदर्भग्रंथ (४) सोबत फोटो दिले आहेत त्या पानांचे. या पुस्तकात आढळलेले सुंदर शब्द – गरती, लीलासहचारी, पृथुल (अर्थ कळला नाही अजून), रूपाजीवा, सूरसुंदरी परिचय फार लांबला. या विषयावरच्या इतक्या अभ्यासानंतर एखादा पेपर सहज देता येईल. परत अभिमानाने म्हणता येईल, ‘मा, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया!’ मनापासून धन्यवाद. माझी परिचय पाळी नसती तर मी हे पुस्तक वाचलंच नसतं. मजा आली मला वाचताना. तशी तुम्हालाही आली असेल अशी खात्री आहे. थांबते. ...Read more

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more