* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AND THE MOUNTAINS ECHOED
  • Availability : Available
  • Translators : VAIJAYANTI PENDSE
  • ISBN : 9789387789562
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 376
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :KHALED HOSSEINI COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MESMERISE YOUR SENSES WITH THIS RIVETING STORYLINE! PRESENTING THE GREAT BESTSELLER BY KHALED HOSSEINI, ‘AND THE MOUNTAINS ECHOED’ IS A GREAT NOVEL WHICH IS A MUST HAVE FOR READING ENTHUSIASTS. THE NOVEL IS ABOUT A BOY ABDULLAH AND HIS SISTER PARI WHO LIVE WITH THEIR FATHER ALONG WITH THEIR STEPMOTHER. THE NOVEL IS SET IN THE LANDS OF SHADBAGH, AFGHANISTAN WHERE THEIR FATHER, SABOOR, IS IN A CONSTANT SEARCH FOR A PLACE TO WORK SO HE CAN FEED HIS FAMILY. THE STORY HIGHLIGHTS THEIR STRUGGLE THROUGH THE EVIL EYES OF POVERTY AND THE BRUTAL WINTERS.
"अफगाणिस्तान, १९५२. शादबाग नावाच्या लहानशा खेड्यात राहणारा अब्दुल्ला आणि त्याची लहान बहीण परी. तिच्या नावाप्रमाणेच सुंदर आणि ऋजू स्वभावाची परी अब्दुल्लाचे सर्वस्व होती. थोरल्या भावाहून अधिक तोच तिचा पालक होता. तिच्यासाठी काहीही करण्याची त्याची नेहमीच तयारी असे. अगदी तिच्या पिसांच्या खजिन्यात भर घालण्यासाठी स्वतःची एकुलती एक बुटांची जोडी देऊन टाकण्याचीसुद्धा! रोज रात्री एकमेकांच्या डोक्याला डोकी चिकटवून, ते आपल्या पलंगावर एकमेकांना बिलगून झोपत. एक दिवस ती भावंडं आपल्या वडिलांसोबत वाटेत पसरलेलं अफाट वाळवंट पार करून काबूलला पोहोचतात. पुढे काय वाढून ठेवलंय याची त्या दोघांना कल्पनाही नसते. पुढे घडणाऱ्या घटना परी आणि अब्दुल्ला यांच्या आजवर एकत्र विणलेल्या आयुष्याचा घट्ट गोफ उसवून टाकतात. म्हणतात ना, ‘कधी कधी हात वाचवण्यासाठी बोट तोडावं लागतं.’ अनेक पिढ्यांची आणि खंडांची अंतरं ओलांडत, काबूलहून पॅरिस, पॅरिसहून सॅन फ्रॅन्सिस्को, तिथून तिनोस या ग्रीक बेटावर अशी भ्रमंती करत खालेद हुसैनी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या आणि व्यक्ती म्हणून आपल्याला घडवणाऱ्या, आपली ओळख निर्माण करणाऱ्या बंधांविषयी लिहितो आणि आपण घेतलेले निर्णय, केलेली निवड यांचे परिणाम घटनांच्या इतिहासात कसे झंकारत राहतात तेही. "

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#KHALED HOSSEINI# VAIJAYANTI PENDSE# PARI# ABDULLAH# NABI# WAHDATI# SPRING 149# SHADBAGH# MARKOS# BAITULLAH# SAN KARLOS# IDRIS# AMRA#खालिद हुसैनी# वैजयंती पेंडसे# अब्दुल्ला# परी# नबी# पानगळ १९५२# वसंतऋतू १९४# राक्षस आणि दिव# सब्ज# कुवैसत#शादबाग ए नौ# वाहदाती#बैतुल्ला#मार्कोस वार्वारिस# इद्रिस# अमरा अदमोव्हिक# ममान# कोलेट आणि दिदिये# आदेल# सान कार्लोस दे अपोक्विन्डो# थालिया# जेम्स पार्किन्सन# जॉर्ज हंटिंगटन# रोबर्ट ग्रेव्ह्ज# जॉन डाउन आणि आता माझा लू गेऱ्हीग- रोगांची नावं#कापितोला #इक्बाल# अँड द माउंटन्स एकोड
Customer Reviews
  • Rating StarSunita Pathade

    बरेच दिवसांनी एक दिवसात एक पुस्तक संपलं.छान आहे

  • Rating Starलोकसत्ता 17 मार्च 2019

    विपरीततेची परीकथा... अफगाणिस्तान हा एक दुर्दैवी देश. धर्माधतेची परिणती कशात होते, हे अफगणिस्तानकडे बघून कळतं... आपण बहुतांश पौर्वात्य आपली घट्ट विणलेली कुटुंबसंस्था आणि शिस्तबद्ध पितृसत्ताक व्यवस्था याविषयी अभिमान बाळगतो. पण हे मजबूत वाटणारे धागे मळापासून गदागदा हलवले, उचकटून फेकून दिले तरीही उरतं माणसा-माणसांमधलं निखळ प्रेम, ममता आणि माणूसकी. हीच मूल्यं शेवटी महत्त्वाची असतात, हे ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ या कादंबरीत सांगितलंय. ‘द काईट रनर’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक खालिद हुसनी यांची ही तिसरी कादंबरी. अफगाणिस्तान हा एक दुर्दैवी देश. धर्माधतेची परिणती कशात होते, हे अफगणिस्तानकडे बघून कळतं. आपण अफगणिस्तानच्या भीषण अवस्थेकडे नीट पाहायला हवं. आपल्याला आपल्या सुस्थित घराची, अजूनही बऱ्यापकी घट्ट विण असलेल्या कुटुंबपद्धतीची कदर वाटत नाही. हे सगळं कायम असणार आहे असं गृहीत धरून आपण जगतो. मात्र, अचानक एके दिवशी कुटुंबातील आपलं सगळ्यात जवळचं असलेलं माणूस गमावणं ही कमालीची भयावह गोष्ट असते. अचानक एके दिवशी आपल्याला आपला देशच नसणं ही अत्यंत भीषण गोष्ट असते. ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ ही या अशा भयानकतेची कादंबरी आहे. देश, भाषा, रक्त यांच्या आयुष्यभराच्या शोधाची ही कादंबरी आहे. या कादंबरीत चितारलेला काळाचा पट मोठा आहे. प्रदेशविस्तार अफाट आहे. तीत अनेक पात्रं आहेत. मात्र, मूळ कथा आहे अब्दुल्ला व परी या भावा-बहिणीची. दहा-बारा वर्षांचा अब्दुल्ला हा तीन-चार वर्षांच्या परीचा भाऊ नसून जणू आईच आहे. त्यांची आई परीच्या जन्माच्या वेळेस वारली आहे. परवाना ही त्यांची सावत्र आई आहे. ती सावत्रपणा करत नसली तरी त्यांच्याशी तुटकपणे वागते. आपल्या अपत्यांमध्ये ती रमली आहे. अत्यंत गरिबीत हे कुटुंब कसंतरी जगतं आहे. अब्दुल्ला व परीच्या सावत्रमामाच्या कृपेनं परीचं आयुष्य बदलायची संधी चालून येते. नबी हा सावत्रमामा काबूलमधल्या अतिश्रीमंत सुलेमान वाहदाती परिवाराचा नोकर आहे. त्याची मालकीण- सुलेमानची तरुण बायको नीला वाहदाती अर्धी फ्रेंच आहे. ती अत्यंत सुंदर, बंडखोर आणि स्वैर स्त्री आहे. ती अपत्यहीन आहे. तिला काही वैद्यकीय कारणामुळे मूल होऊ शकत नाही. नीला उत्तम कवी आहे. नबी परीला नीलाला देऊन तिच्या आयुष्यातली पोकळी भरू पाहतो. सुलेमान, नबी आणि नीला हा एक विचित्र प्रेमाचा त्रिकोण आहे. त्या काळात अफगाणिस्तानात समलैंगिक असणं हे केवळ गुपितच असू शकतं. सुलेमानचं नबीवर अव्यक्त प्रेम आहे. नबी नीलावर अव्यक्त प्रेम करतो. नीला मात्र फक्त स्वतवर प्रेम करते. नशिबाचे फासे असे पडतात, की नीला परीला घेऊन पॅरिसला कायमची निघून जाते. सतानी तालिबानच्या उदयापूर्वी हे घडतं. परी आणि नीलाची कथा पॅरिसमध्ये पुढे सुरू राहते. नीला वाहदाती, जुलिन आणि परी यांचाही प्रेमत्रिकोण आहे. नीला वाहदाती हे पात्र लेखक हुसनी यांनी फार प्रेमाने लिहिलंय. नीला मनस्वी, आत्मघाती प्रवृत्तीची आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण करून स्वतची पोकळी भरता येत नाही, याची जाणीव नीलाला फार उशिरा होते. नबी आणि सुलेमानची कथा काबूलमध्ये सुरू राहते. पुढे अफगाणिस्तानात तालिबानी येतात. अपार विध्वंसानंतर पुन्हा जीवन सुरू होतं. सुलेमान आता वारला आहे. नबी वाहदातींच्या खिळखिळ्या हवेलीचा मालक बनला आहे. मार्कोस वर्वरीस हा ग्रीक प्लास्टिक सर्जन नबीकडे भाडेकरू म्हणून येतो. मार्कोसची एक वेगळीच कथा आहे. थालिया ही त्याची घट्ट बालमत्रीण. थालियाचा लहानपणीच कुत्र्याने जबडा फाडला आहे. ती भीषण कुरूप आहे. ओडेलिया ही मार्कोसची आई. ती शिक्षिका होती. ती खंबीर व कणखर विधवा बाई आहे. थालिया ही ओडेलियाच्या बालमत्रिणीची मुलगी आहे. या दुर्दैवी मुलीला तिची अभिनेत्री आई चक्क ओडेलियाकडे टाकून पळून जाते. स्वतच्या कुरुपतेशी झगडणारी, तीक्ष्ण वैज्ञानिक बुद्धीची थालिया, भटक्या वृत्तीचा छायाचित्रकार (आता प्लास्टिक सर्जन झालेला) मार्कोस आणि आयुष्यभर मार्कोस व थालियावर मूक प्रेम करणारी ओडेलिया हादेखील नातेसंबंधांचा एक विलक्षण त्रिकोण म्हणायला हवा. या एका कादंबरीत अनेक कादंबऱ्या वेगवेगळ्या काळांत सुरू आहेत. तीत कॅलिडोस्कोपप्रमाणे प्रत्येक नातेसंबंधांची नक्षी अलग आहे. त्यामुळे मुख्य पात्रांखेरीज अनेक पात्रं येतात. अमेरिकेत स्थलांतरित होऊन यशस्वी आयुष्य जगणारे तमूर बशिरी आणि डॉ. इद्रिस बशिरी हे दोघे चुलतभाऊ आहेत. घरगुती भांडणात संपूर्ण कुटुंब गमावलेली आणि मेंदूवर घाव झेलून उभी राहिलेली लहानगी रोशी आहे. इस्टेटीच्या कामासाठी इद्रिस आणि तमूर काबूलमध्ये येतात. योगायोगाने रोशीला भेटतात. इद्रिस रोशीवर माया करू लागतो. पण तिला मदतीची गरज असते तेव्हा मात्र काहीच करत नाही. स्वार्थी वाटणारा तमूर मात्र रोशीला अमेरिकेत येऊन उपचारांसाठी, जगण्यासाठी मदत करतो. अब्दुल्ला आणि परीची सावत्र आई परवाना, वडील सबूर आणि परवानाची जुळी, देखणी बहीण मासुमाची एक वेगळीच कथा आहे. परवाना क्रूर स्वभावची स्त्री आहे. हा प्रेमाचा त्रिकोण मासुमाला आयुष्यभराचं पांगळेपण देतो. एकेकाळी अब्दुल्ला आणि परीचं जिथं घर होतं, ती जागा बळकावून तिथे हवेली बांधून राहणारा शादबागमधला अफू माफिया बाबाजान व त्याचा निरागस मुलगा आदेल आहे. या सगळ्यांचे आपापसातले नातेसंबंध आणि कडय़ा जुळवताना वाचकाची पार दमछाक होते. अर्थात कादंबरी हा साहित्यातील बडा ख्याल असतो. सुरांच्या अनेक लडय़ा उलगडत जाव्यात तशी कादंबरी उलगडत जायला हवी. कधी कधी मात्र कादंबरी वाचकाच्या संयमाची परीक्षा बघते. या ३७० पृष्ठांच्या कादंबरीचा अनुवाद वैजयंती पेंडसे यांनी केला आहे. अनुवाद प्रवाही आहे. परीकथेपासून सुरू होणारी ही कथा वास्तव आयुष्यदेखील परीकथेपेक्षा कमी चमत्कारिक नसतं हे सांगते. लेखक खालिद हुसनी यांनी ११ वर्षांचे असताना अफगाणिस्तान सोडला. काही र्वष त्यांनी फ्रान्समध्ये काढली. नंतर ते अमेरिकेत गेले आणि तिथेच डॉक्टर होऊन स्थायिक झाले. २००१ नंतर स्वतच्याच देशात ते एखाद्या पर्यटकासारखे फिरले. तिथे त्यांना त्यांच्या कादंबऱ्या सापडल्या. अशावेळी परवीन कुमार अश्क यांचा एक शेर आठवतो : ‘तमाम धरती पे बारूद बिछ चुकी है खुदा, दुआ जमीन कही दे तो घर बनाऊ मैं’ ..आणि ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ ही संपूर्ण मानवजातीच्या निर्वासितपणाच्या दुखाची आणि ताटातुटीची कादंबरी होते. - जुई कुलकर्णी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 17-06-2018

    दोन भावंडांची हृदय हेलावणारी कथा... खालिद हुसैनी या अत्यंत लोकप्रिय कादंबरीकाराची ‘अँड द माउंटन्स एकोड’ ही कादंबरी म्हणजे अफगाणी खेड्यातल्या, आईच्या मायेला पारख्या झालेल्या दोन भावंडांमधल्या हृदय हेलावणाऱ्या घट्ट भावबंधाची कथा आहे. आशयघन आणि विस्तृतअवकाश असलेली, शहाणपण आणि माणुसकीच्या गहिवराने ओथंबलेली ही कादंबरी माणूस म्हणून आपली व्याख्या करणाऱ्या मानव्याच्या खऱ्या अर्थाची लेखकाला असलेली गहिरी जाण अधोरेखित करते. एका छोट्याशा अफगाणी खेड्यात ही कथा सुरू होते. तीन वर्षांच्या परीसाठी तिचा थोरला भाऊ अब्दुल्ला हा तिच्या भावापेक्षा तिची आईच अधिक आहे, तर दहा वर्षांच्या अब्दुल्लाचं लहानगी परी हे सर्वस्व आहे. त्यांच्या आयुष्यात जे जे घडतं त्याचे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या अनेकांच्या आयुष्यात जे पडसाद उमटतात, त्यातून मानवी आयुष्यातली नैतिक गुंतागुंत स्पष्ट होते. अनेक पिढ्यांमध्ये घडणारी ही कथा केवळ आईवडिलांच्या आणि मुलांच्या नात्याबद्दलची राहत नाही, तर भाऊ-बहीण, चुलत भावंडे, नोकर, मालक, विश्वस्त, पाल्य या साऱ्या नात्यांची होते. त्यांच्या एकमेकांवर प्रेम करण्याच्या, एकमेकांसाठी त्याग करण्याच्या नाना परी लेखक पडताळून पाहतो. ...Read more

  • Rating Starसकाळ २७.०५.१८

    अफगाणिस्तान मधल्या एका खेड्यातल्या दोन भावंडांमधले भावबंध उलगडणारी हि कादंबरी. आईच्या मायेला पारखी झालेली तीन वर्षांची परी आणि तिचा दहा वर्षांचा भाऊ अब्दुलहा यांची हि कहाणी. त्यांच्या आयुष्यात एकेक गोष्टी घडत जाताना किती तरी नातेसंबधांची ओळख होती. एकविशिष्ट बिंदूपासून सुरु झालेली हि कहाणी मोठा कालखंड आणि पट उलगडते आणि त्या निमित्ताने अफगाणिस्तान मधली संस्कृती , तिथलं वातावरण तिथली माणसं यांचीही माहिती वाचकांना होते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more