* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: AND THE MOUNTAINS ECHOED
  • Availability : Available
  • Translators : VAIJAYANTI PENDSE
  • ISBN : 9789387789562
  • Edition : 1
  • Publishing Year : MAY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 376
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :KHALED HOSSEINI COMBO SET - 3 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
MESMERISE YOUR SENSES WITH THIS RIVETING STORYLINE! PRESENTING THE GREAT BESTSELLER BY KHALED HOSSEINI, ‘AND THE MOUNTAINS ECHOED’ IS A GREAT NOVEL WHICH IS A MUST HAVE FOR READING ENTHUSIASTS. THE NOVEL IS ABOUT A BOY ABDULLAH AND HIS SISTER PARI WHO LIVE WITH THEIR FATHER ALONG WITH THEIR STEPMOTHER. THE NOVEL IS SET IN THE LANDS OF SHADBAGH, AFGHANISTAN WHERE THEIR FATHER, SABOOR, IS IN A CONSTANT SEARCH FOR A PLACE TO WORK SO HE CAN FEED HIS FAMILY. THE STORY HIGHLIGHTS THEIR STRUGGLE THROUGH THE EVIL EYES OF POVERTY AND THE BRUTAL WINTERS.
"अफगाणिस्तान, १९५२. शादबाग नावाच्या लहानशा खेड्यात राहणारा अब्दुल्ला आणि त्याची लहान बहीण परी. तिच्या नावाप्रमाणेच सुंदर आणि ऋजू स्वभावाची परी अब्दुल्लाचे सर्वस्व होती. थोरल्या भावाहून अधिक तोच तिचा पालक होता. तिच्यासाठी काहीही करण्याची त्याची नेहमीच तयारी असे. अगदी तिच्या पिसांच्या खजिन्यात भर घालण्यासाठी स्वतःची एकुलती एक बुटांची जोडी देऊन टाकण्याचीसुद्धा! रोज रात्री एकमेकांच्या डोक्याला डोकी चिकटवून, ते आपल्या पलंगावर एकमेकांना बिलगून झोपत. एक दिवस ती भावंडं आपल्या वडिलांसोबत वाटेत पसरलेलं अफाट वाळवंट पार करून काबूलला पोहोचतात. पुढे काय वाढून ठेवलंय याची त्या दोघांना कल्पनाही नसते. पुढे घडणाऱ्या घटना परी आणि अब्दुल्ला यांच्या आजवर एकत्र विणलेल्या आयुष्याचा घट्ट गोफ उसवून टाकतात. म्हणतात ना, ‘कधी कधी हात वाचवण्यासाठी बोट तोडावं लागतं.’ अनेक पिढ्यांची आणि खंडांची अंतरं ओलांडत, काबूलहून पॅरिस, पॅरिसहून सॅन फ्रॅन्सिस्को, तिथून तिनोस या ग्रीक बेटावर अशी भ्रमंती करत खालेद हुसैनी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या आणि व्यक्ती म्हणून आपल्याला घडवणाऱ्या, आपली ओळख निर्माण करणाऱ्या बंधांविषयी लिहितो आणि आपण घेतलेले निर्णय, केलेली निवड यांचे परिणाम घटनांच्या इतिहासात कसे झंकारत राहतात तेही. "

No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#KHALED HOSSEINI# VAIJAYANTI PENDSE# PARI# ABDULLAH# NABI# WAHDATI# SPRING 149# SHADBAGH# MARKOS# BAITULLAH# SAN KARLOS# IDRIS# AMRA#खालिद हुसैनी# वैजयंती पेंडसे# अब्दुल्ला# परी# नबी# पानगळ १९५२# वसंतऋतू १९४# राक्षस आणि दिव# सब्ज# कुवैसत#शादबाग ए नौ# वाहदाती#बैतुल्ला#मार्कोस वार्वारिस# इद्रिस# अमरा अदमोव्हिक# ममान# कोलेट आणि दिदिये# आदेल# सान कार्लोस दे अपोक्विन्डो# थालिया# जेम्स पार्किन्सन# जॉर्ज हंटिंगटन# रोबर्ट ग्रेव्ह्ज# जॉन डाउन आणि आता माझा लू गेऱ्हीग- रोगांची नावं#कापितोला #इक्बाल# अँड द माउंटन्स एकोड
Customer Reviews
  • Rating StarSunita Pathade

    बरेच दिवसांनी एक दिवसात एक पुस्तक संपलं.छान आहे

  • Rating Starलोकसत्ता 17 मार्च 2019

    विपरीततेची परीकथा... अफगाणिस्तान हा एक दुर्दैवी देश. धर्माधतेची परिणती कशात होते, हे अफगणिस्तानकडे बघून कळतं... आपण बहुतांश पौर्वात्य आपली घट्ट विणलेली कुटुंबसंस्था आणि शिस्तबद्ध पितृसत्ताक व्यवस्था याविषयी अभिमान बाळगतो. पण हे मजबूत वाटणारे धागे मळापासून गदागदा हलवले, उचकटून फेकून दिले तरीही उरतं माणसा-माणसांमधलं निखळ प्रेम, ममता आणि माणूसकी. हीच मूल्यं शेवटी महत्त्वाची असतात, हे ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ या कादंबरीत सांगितलंय. ‘द काईट रनर’ या गाजलेल्या कादंबरीचे लेखक खालिद हुसनी यांची ही तिसरी कादंबरी. अफगाणिस्तान हा एक दुर्दैवी देश. धर्माधतेची परिणती कशात होते, हे अफगणिस्तानकडे बघून कळतं. आपण अफगणिस्तानच्या भीषण अवस्थेकडे नीट पाहायला हवं. आपल्याला आपल्या सुस्थित घराची, अजूनही बऱ्यापकी घट्ट विण असलेल्या कुटुंबपद्धतीची कदर वाटत नाही. हे सगळं कायम असणार आहे असं गृहीत धरून आपण जगतो. मात्र, अचानक एके दिवशी कुटुंबातील आपलं सगळ्यात जवळचं असलेलं माणूस गमावणं ही कमालीची भयावह गोष्ट असते. अचानक एके दिवशी आपल्याला आपला देशच नसणं ही अत्यंत भीषण गोष्ट असते. ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ ही या अशा भयानकतेची कादंबरी आहे. देश, भाषा, रक्त यांच्या आयुष्यभराच्या शोधाची ही कादंबरी आहे. या कादंबरीत चितारलेला काळाचा पट मोठा आहे. प्रदेशविस्तार अफाट आहे. तीत अनेक पात्रं आहेत. मात्र, मूळ कथा आहे अब्दुल्ला व परी या भावा-बहिणीची. दहा-बारा वर्षांचा अब्दुल्ला हा तीन-चार वर्षांच्या परीचा भाऊ नसून जणू आईच आहे. त्यांची आई परीच्या जन्माच्या वेळेस वारली आहे. परवाना ही त्यांची सावत्र आई आहे. ती सावत्रपणा करत नसली तरी त्यांच्याशी तुटकपणे वागते. आपल्या अपत्यांमध्ये ती रमली आहे. अत्यंत गरिबीत हे कुटुंब कसंतरी जगतं आहे. अब्दुल्ला व परीच्या सावत्रमामाच्या कृपेनं परीचं आयुष्य बदलायची संधी चालून येते. नबी हा सावत्रमामा काबूलमधल्या अतिश्रीमंत सुलेमान वाहदाती परिवाराचा नोकर आहे. त्याची मालकीण- सुलेमानची तरुण बायको नीला वाहदाती अर्धी फ्रेंच आहे. ती अत्यंत सुंदर, बंडखोर आणि स्वैर स्त्री आहे. ती अपत्यहीन आहे. तिला काही वैद्यकीय कारणामुळे मूल होऊ शकत नाही. नीला उत्तम कवी आहे. नबी परीला नीलाला देऊन तिच्या आयुष्यातली पोकळी भरू पाहतो. सुलेमान, नबी आणि नीला हा एक विचित्र प्रेमाचा त्रिकोण आहे. त्या काळात अफगाणिस्तानात समलैंगिक असणं हे केवळ गुपितच असू शकतं. सुलेमानचं नबीवर अव्यक्त प्रेम आहे. नबी नीलावर अव्यक्त प्रेम करतो. नीला मात्र फक्त स्वतवर प्रेम करते. नशिबाचे फासे असे पडतात, की नीला परीला घेऊन पॅरिसला कायमची निघून जाते. सतानी तालिबानच्या उदयापूर्वी हे घडतं. परी आणि नीलाची कथा पॅरिसमध्ये पुढे सुरू राहते. नीला वाहदाती, जुलिन आणि परी यांचाही प्रेमत्रिकोण आहे. नीला वाहदाती हे पात्र लेखक हुसनी यांनी फार प्रेमाने लिहिलंय. नीला मनस्वी, आत्मघाती प्रवृत्तीची आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण करून स्वतची पोकळी भरता येत नाही, याची जाणीव नीलाला फार उशिरा होते. नबी आणि सुलेमानची कथा काबूलमध्ये सुरू राहते. पुढे अफगाणिस्तानात तालिबानी येतात. अपार विध्वंसानंतर पुन्हा जीवन सुरू होतं. सुलेमान आता वारला आहे. नबी वाहदातींच्या खिळखिळ्या हवेलीचा मालक बनला आहे. मार्कोस वर्वरीस हा ग्रीक प्लास्टिक सर्जन नबीकडे भाडेकरू म्हणून येतो. मार्कोसची एक वेगळीच कथा आहे. थालिया ही त्याची घट्ट बालमत्रीण. थालियाचा लहानपणीच कुत्र्याने जबडा फाडला आहे. ती भीषण कुरूप आहे. ओडेलिया ही मार्कोसची आई. ती शिक्षिका होती. ती खंबीर व कणखर विधवा बाई आहे. थालिया ही ओडेलियाच्या बालमत्रिणीची मुलगी आहे. या दुर्दैवी मुलीला तिची अभिनेत्री आई चक्क ओडेलियाकडे टाकून पळून जाते. स्वतच्या कुरुपतेशी झगडणारी, तीक्ष्ण वैज्ञानिक बुद्धीची थालिया, भटक्या वृत्तीचा छायाचित्रकार (आता प्लास्टिक सर्जन झालेला) मार्कोस आणि आयुष्यभर मार्कोस व थालियावर मूक प्रेम करणारी ओडेलिया हादेखील नातेसंबंधांचा एक विलक्षण त्रिकोण म्हणायला हवा. या एका कादंबरीत अनेक कादंबऱ्या वेगवेगळ्या काळांत सुरू आहेत. तीत कॅलिडोस्कोपप्रमाणे प्रत्येक नातेसंबंधांची नक्षी अलग आहे. त्यामुळे मुख्य पात्रांखेरीज अनेक पात्रं येतात. अमेरिकेत स्थलांतरित होऊन यशस्वी आयुष्य जगणारे तमूर बशिरी आणि डॉ. इद्रिस बशिरी हे दोघे चुलतभाऊ आहेत. घरगुती भांडणात संपूर्ण कुटुंब गमावलेली आणि मेंदूवर घाव झेलून उभी राहिलेली लहानगी रोशी आहे. इस्टेटीच्या कामासाठी इद्रिस आणि तमूर काबूलमध्ये येतात. योगायोगाने रोशीला भेटतात. इद्रिस रोशीवर माया करू लागतो. पण तिला मदतीची गरज असते तेव्हा मात्र काहीच करत नाही. स्वार्थी वाटणारा तमूर मात्र रोशीला अमेरिकेत येऊन उपचारांसाठी, जगण्यासाठी मदत करतो. अब्दुल्ला आणि परीची सावत्र आई परवाना, वडील सबूर आणि परवानाची जुळी, देखणी बहीण मासुमाची एक वेगळीच कथा आहे. परवाना क्रूर स्वभावची स्त्री आहे. हा प्रेमाचा त्रिकोण मासुमाला आयुष्यभराचं पांगळेपण देतो. एकेकाळी अब्दुल्ला आणि परीचं जिथं घर होतं, ती जागा बळकावून तिथे हवेली बांधून राहणारा शादबागमधला अफू माफिया बाबाजान व त्याचा निरागस मुलगा आदेल आहे. या सगळ्यांचे आपापसातले नातेसंबंध आणि कडय़ा जुळवताना वाचकाची पार दमछाक होते. अर्थात कादंबरी हा साहित्यातील बडा ख्याल असतो. सुरांच्या अनेक लडय़ा उलगडत जाव्यात तशी कादंबरी उलगडत जायला हवी. कधी कधी मात्र कादंबरी वाचकाच्या संयमाची परीक्षा बघते. या ३७० पृष्ठांच्या कादंबरीचा अनुवाद वैजयंती पेंडसे यांनी केला आहे. अनुवाद प्रवाही आहे. परीकथेपासून सुरू होणारी ही कथा वास्तव आयुष्यदेखील परीकथेपेक्षा कमी चमत्कारिक नसतं हे सांगते. लेखक खालिद हुसनी यांनी ११ वर्षांचे असताना अफगाणिस्तान सोडला. काही र्वष त्यांनी फ्रान्समध्ये काढली. नंतर ते अमेरिकेत गेले आणि तिथेच डॉक्टर होऊन स्थायिक झाले. २००१ नंतर स्वतच्याच देशात ते एखाद्या पर्यटकासारखे फिरले. तिथे त्यांना त्यांच्या कादंबऱ्या सापडल्या. अशावेळी परवीन कुमार अश्क यांचा एक शेर आठवतो : ‘तमाम धरती पे बारूद बिछ चुकी है खुदा, दुआ जमीन कही दे तो घर बनाऊ मैं’ ..आणि ‘अ‍ॅण्ड द माऊंटन्स एकोड’ ही संपूर्ण मानवजातीच्या निर्वासितपणाच्या दुखाची आणि ताटातुटीची कादंबरी होते. - जुई कुलकर्णी ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 17-06-2018

    दोन भावंडांची हृदय हेलावणारी कथा... खालिद हुसैनी या अत्यंत लोकप्रिय कादंबरीकाराची ‘अँड द माउंटन्स एकोड’ ही कादंबरी म्हणजे अफगाणी खेड्यातल्या, आईच्या मायेला पारख्या झालेल्या दोन भावंडांमधल्या हृदय हेलावणाऱ्या घट्ट भावबंधाची कथा आहे. आशयघन आणि विस्तृतअवकाश असलेली, शहाणपण आणि माणुसकीच्या गहिवराने ओथंबलेली ही कादंबरी माणूस म्हणून आपली व्याख्या करणाऱ्या मानव्याच्या खऱ्या अर्थाची लेखकाला असलेली गहिरी जाण अधोरेखित करते. एका छोट्याशा अफगाणी खेड्यात ही कथा सुरू होते. तीन वर्षांच्या परीसाठी तिचा थोरला भाऊ अब्दुल्ला हा तिच्या भावापेक्षा तिची आईच अधिक आहे, तर दहा वर्षांच्या अब्दुल्लाचं लहानगी परी हे सर्वस्व आहे. त्यांच्या आयुष्यात जे जे घडतं त्याचे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या अनेकांच्या आयुष्यात जे पडसाद उमटतात, त्यातून मानवी आयुष्यातली नैतिक गुंतागुंत स्पष्ट होते. अनेक पिढ्यांमध्ये घडणारी ही कथा केवळ आईवडिलांच्या आणि मुलांच्या नात्याबद्दलची राहत नाही, तर भाऊ-बहीण, चुलत भावंडे, नोकर, मालक, विश्वस्त, पाल्य या साऱ्या नात्यांची होते. त्यांच्या एकमेकांवर प्रेम करण्याच्या, एकमेकांसाठी त्याग करण्याच्या नाना परी लेखक पडताळून पाहतो. ...Read more

  • Rating Starसकाळ २७.०५.१८

    अफगाणिस्तान मधल्या एका खेड्यातल्या दोन भावंडांमधले भावबंध उलगडणारी हि कादंबरी. आईच्या मायेला पारखी झालेली तीन वर्षांची परी आणि तिचा दहा वर्षांचा भाऊ अब्दुलहा यांची हि कहाणी. त्यांच्या आयुष्यात एकेक गोष्टी घडत जाताना किती तरी नातेसंबधांची ओळख होती. एकविशिष्ट बिंदूपासून सुरु झालेली हि कहाणी मोठा कालखंड आणि पट उलगडते आणि त्या निमित्ताने अफगाणिस्तान मधली संस्कृती , तिथलं वातावरण तिथली माणसं यांचीही माहिती वाचकांना होते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more