* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983791
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 1990
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : TRAVEL
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AUSTRALIA, A COUNTRY OF SHEEP AND MEADOWS. WHAT WE KNEW ABOUT AUSTRALIA IS WHAT WE HAVE HEARD VERY OFTEN. A COUNTRY GROWING ALL SORT OF GRAINS, A COUNTRY WHERE PEOPLE ARE FREE TO START ANY BUSINESS THAT THEY WISH TO. GO DEEP DOWN THE SEA AND BRING HANDS FULL OF PEARLS BACK. REAR CATTLE AND EARN THOUSANDS BY EXPORTING THE MEAT. REAR SHEEP AND EARN FROM THE WOOL. START YOUR OWN `EVERYTHING UNDER ONE ROOF` SHOP DEVOID OF SIZE. OR JUST BE A FARMER AND PRODUCE PINEAPPLES, WHEAT, SUGAR OVER HUNDREDS OF ACRE. HAVE YOUR OWN MINE PRODUCING THE OPEL, THE SEMIPRECIOUS STONE. THIS COUNTRY PROVIDES OPPORTUNITY FOR LITERALLY ANYTHING.
ऑस्ट्रेलिया! कसा असेल हा देश? ऐकून माहीत होतं की, जगातली सगळी पिकं ऑस्ट्रेलियात होतात. या देशात माणूस हवा तो उद्योग करू शकतो.... समुद्रात बुड्या मारून मोती काढा, हजारो गुरं पाळून त्यांचं मांस परदेशी पाठवा, हजारो मेंढ्या पाळून लोकरीचं उत्पादन करा, जगातलं लहान, मोठं `सबकुछ मिलेगा` दुकान चालवा. शेतकरी होऊन शेकडो एकर अननस, गहू, ऊस पिकवा किंवा भांडवल घालून ‘ओपेल’खड्यांची खाण चालवा. काहीही करायला या देशात संधी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarGovind Patil

    व्यंकटेश माडगूळकर माझा आवडता लेखक... वाचायला पुन्हा पुन्हा आवडणारे जे फार कमी आहेत त्यापैकी एक... नुकताच त्यांच्याबरोबर मेलबोर्न,सिडणी, केन्स ,लाॅंगरीच असा आस्ट्रेलियाचा काही भाग फिरून आलो.... एक छान प्रवासवर्णन पुन्हा वाचून झालं....

  • Rating StarDAINIK LOKSATTA 27-03-2016

    माडगुळकरांची मर्दानगी... फिजिऑलॉजीचं लेक्चर नुकतंच संपलं होतं आणि आम्ही पायऱ्यांवर बसून नुकत्याच शिकवलेल्या ‘टेस्टेस्टेरॉन’ या पुरुषी संप्रेरकावर बोलत होतो. तेवढ्यात कुणी मुलगी म्हणाली तुम्ही म्हणूनच तुम्ही सारी मुलं एवढी भांडखोर असता! आणि पटलं ते आ्हालाही. आम्ही पुरुष आणि आमच्या आतलं सळसळणारं ते टेस्टेस्टेरॉन हार्मोन - आमचं न रडणं, आमचे बायसेप्स एकमेकांना दाखवणं, आमचं लॉजिकल असणं, आमचं शक्तिशाली असणं, झुंजार असणं, टगं आणं, रांगडं असणं, रंगेलही असणं - हे त्या हार्मोनशी सारं निगडित होतं. ते जास्त मात्रेत निर्माण झाल्यास केस गळतात, हा भाग सोडून या हार्मोनमध्ये न आवडण्यासारखं असं काही आम्हाला वाटत नव्हतं! पुढे जगताना ‘पुरुष’ असण्याची व्याख्या इतकी मर्यादित नसते, हे आमच्यापैकी अनेकांना कळतही गेलं! पण ते ‘तरुण’ रसायन व्यंकटेश माडगूळकरांच्या तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या एका प्रवासवर्णन ऑस्ट्रेलियामधल्या त्यांच्या मुक्कामाची नोंद मांडतं, हे झालंच; पण त्यामधलं पाना-पानांआड उमटणारं आणि प्रवाहीपणे बदलत जाणारं पौरुष हे औरच आहे! वाटतं, खुद्द टेस्टेस्टेरॉननंच चूष म्हणून मस्तीत, तोऱ्यात शब्दांचं रूप घेऊन पाहिलं असावं! पुस्तकाच्या पहिल्या परिच्छेदामध्येच ती सारी पुरुषी लक्षणे ठासून भरली आहेत. माडगूळकर सुट्टीला गावी गेलेले असतात आणि त्यांचे ‘रजेचे तीन आठवडे ससा, चित्तुरांची, माळढोक, घोरपडींची शिकार करण्यात भराभर निघून जातात. चेहऱ्यावरचा पुणेरी तुकतुकीतपणा जातो आणि तो ‘चांगला’ रापलेला दिसू लागतो. निघताना ते गोंदा रामोशाला विचारतात, ‘‘गोंदा गड्या, तू दोन बायका कशा वागवतोस तेवढा कोर्स मला दे!’’ त्या शिकारीमध्ये पुरुषी आक्रमकता सूचित होते. रापलेला चेहरा ‘चांगला’ वाटण्यामागे पुरुषी रांगडेपण अनुस्यूत असतं आणि दोन बाया नोदवण्याचा विचारपुशीमध्ये पुरुषी भ्रमरवृत्ती जशी अभिमानाने मांडली जाते तसाच पुरुषा-पुरुषांमधला सामाजिक, आर्थिक तफावत ओलांडून पुरुष असण्याच्या बळावर रंगणारा संवादही दिसतो. (अनेक उद्योगपती आपल्या गाडीच्या चालकाशी उत्तम गप्पा मारतात ते याच धाग्यावर) बाकी त्या गोंदाचं उत्तरही भारीच आहे. ‘दोन बायका नांदवायच्या म्हंजे हातात सारकं टिकारनं ठिवावं लागतं.’’ आणि उत्तरातून पुरुष असण्याचा हिंसेकडे झुकण्याचा जो संबंध आहे त्यावरही प्रकाश पडतो! अन् मग सुरू होतो खरा प्रवास! ऑस्ट्रेलियामधला कस्टम ऑफिसर बायकोने दिलेले लाडू बघून विचारणा करतो... पण सभ्यपणे! माडगूळकर त्याला चेष्टेने ‘शामळू’ हे विशेषण लावतात. या दौऱ्यात ते एकटेच असतात. रेडिओ ब्रॉडकास्टर मंडळीचं तिथे प्रशिक्षण असतं. अशा एखाद्या प्रवासात सोबत पत्नी, मुलं, आई, उर्वरित कुणी मित्रही सोबत नसणं हे महत्त्वाचं ठरतं. पुरुषाचे अनुभव घेण्याचे पोत बदलतात... आणि मांडण्याचेही! गाडगीळ आणि पुलंनी सहकुटुंब प्रवास केले आणि जे एकेकटे प्रवास केले त्यातलं पौरुष हे त्यांनी हात राखूनच मांडलेलं दिसतं. पण व्यंकटेश माडगूळकरांनी ते सारे खास टेस्टेस्टेरॉनयुक्त अनुभव अभिजात लेखनाच्या कसोटीला पार पाडत बेधक मांडले आहेत! आणि या पुस्तकाचं ते फार मोठं वैशिष्ट्य आहे. मग हंगेरियन माय-लेकी चालवीत असलेल्या हॉटेलमध्ये अपरिचित जर्मन खलाशी माडगूळकरांशी तिथली मुलगी ‘मिस’ आहे की ‘मिसेस’, यावर खल करतो आणि मेलबर्नच्या शेतीप्रदर्शनामध्ये वुडचॉपिंग करणारे चार भक्कम पुरुष लेखकाच्या लेखणीचा ठाव घेतात. किती सुंदर तऱ्हेनं ते पौरुष माडगूळकरांनी व्यक्त केलं आहे!’’ लगोलग चारही जवान आपल्या धारदार कुऱ्हाडी दणदण ओंडक्यावर चालवू लागले एक सरळ घाव, एक खालून वरती घाव. त्या कडेच्या बहाद्दराने ओंडक्याचे दोन तुकडे केले. टाळ्यांचा गजर झाला. पहिला आलेला लाकूडतोड्या अठावन्न वयाचा होता! वा रे नर!’’ या वर्णनामधला तो ‘वा रे नर!’ हा भाग ते कडक पौरुष थेट वाचकांपुढे मांडतो. सिडनीच्या एका पबमध्ये लेखक ‘टिम’ सोबत बियर प्यायला जातो. तो पबमधल्या अनुभव माडगूळकरांनी सविस्तरपणे लिहिला आहे. ते खास पुरुषी जग त्यांनी फार सहजतेनं लिखाणात मूळ प्रवासवर्णनाल बाधा न आणता उतरवलं आहे. टिम आणि लेखक बियर पिताना एका वेगळ्या दिसणाऱ्या मुलीला बघतात. टिम सांगतो, ‘‘ती मुलगी असून मुलासारखी वागते. फार चांगली आहे. सर्वांच्यात ‘दांडगी!’’ हा संवाद जेंडर क्रिटिसिझम् च्या नजरेततून अगदी रोचक आहे! टिम हा ‘जेंडर’ पलीकडे जाऊन ती व्यक्ती ‘फार चांगली’ आहे असं म्हणू शकतो. भारतीय पुरुषी साच्यातला लेखक व्यक्तीच्या ‘जेंडर’- ओळखीवर त्या व्यक्तीच्या माणूसपणाची प्रत ठरवण्याची चूक करतो आणि तिची ओळख करून घ्यायलाही नका देतो! पुढे तर माडगूळकर ज्यो आणि ओंग या सहाध्यायांसोबत नाइट क्लबला जातात. तिथे ‘स्ट्रीप्ट्टीज् बघतात. ते वर्णन त्यांनी पुष्कळ चवीनं केलं आहे. पण शेवटला त्या लेखकाचा खास पौर्वात्य पुरुषीपिंड जागा होतो. तो अनुभव आवडलेला असतानाही तो निवेदक दोन-दोनदा म्हणतो, ‘‘माय गॉड... हॉरिबल! आय वूड नॉट डू इट अगेन!’’ पण माडगूळकरांचं पुरुष-सूक्त हे सुदैवाने इतकंच आणि एवढंच नाहीये या पुस्तकात! शेवटी व्यंकटेश माडगूळकर आहेत ते! आणि कदाचित त्यांच्याही नकळत त्या पुस्तकामधील पौरुषाची व्याख्या विस्तारत गेलेली आहे. प्रवासात कॅनबेरामध्ये असताना त्यांना आकाशवाणीमधील त्यांची मैत्रीण सई परांजपे यांची आठवण होते. रँगलर परांजपे ऑस्ट्रेलियात हायकमिशनर असताना सई परांजपे तिथे राहत होत्या. तिथल्या त्यांच्या घराचे फोटो माडगूळकर आठवणीने काढतात. या साऱ्या वर्णनात एकतर त्यांनी ‘सई’ असं एकेरीत संबोधलं आहे. तत्कालीन लेखनात कुणा पुरुष लेखकानं आपल्या मैत्रिणीचा असा जिव्हाळ्यानं, आत्मीयतेनं उल्लेख केलेला दिसत नाही! ते नातं खूप सहजभाव राखणाऱ्या मैत्रीचं आहे. सई ही लेखकासाठी एखाद्या मित्रासारखी आहे असं मी म्हणणार नाही. मैत्रीणच आहे ती. ठरीव स्त्री-पुरुष प्रेमाच्या आकर्षणापेक्षा निराळ्या प्रतलात नांदणारी जिव्हाळा-मैत्री आहे ती! माडगूळकर प्रवास करताना, पुढे तो शब्दात उतरवताना पौरुषाच्या सीमाही जोखत होते का? असावं! प्रवासातले अनुभव माणसाला पठडीबाहेर नेऊ पाहतात. फ्रॅंकलिन आणि आबू आपाल्या देशांचा उत्तम स्वयंपाक रांधतात. लेखकाची वेळ आल्यावर लेखक बावचळतो. आपलं हे ज्ञान भात-पिठल्याच्या पुढे नाही हे त्याला जाणवत, त्यांनी खंतावत म्हटलंय, ‘‘साफ उतरलेल्या चेहऱ्यानं सर्व पदार्थांची उजळणी केली. एकाचीही कृती नजरेसमोर येईना. ‘सुग्रास भोजन’ सारखं एखादं पुस्तक आणायची बुद्धी मला सुचली नाही!’’ पण हे पुरुष-आख्यान पुस्तकाच्या शेवटाला माडगूळकरांनी इतकं विलक्षण उंचीवर नेलं आहे की बस् रे बस्! लेखक तिथल्या आदिवासी पाड्यात जातो. विली नावाच्या आदिवासी माणसाशी बोलतो. तोवर आत झोपडीत त्याला मुलगा झाल्याची बातमी येते. त्याचं नाव काय ठेवायचं, या दुग्धात असताना लेखक म्हणतो की, ‘‘भीम हे नाव ठेव.’’ ‘‘हू वॉज दॅट ब्लोक? नेव्हर हॅड ऑफ हिम! तो योद्धा होता का? शिकारी होता का?’’ विली विचारतो. लेखक महाभारताच्या भीमाचे पराक्रम ऐकवतो. ‘भीम’ असं नाव झाडाच्या बुंध्यावर कोरून बारसं होतं. अगदी शेवटी माडगूळकर म्हणतात की, ‘‘तुम्ही कधी तिथे गेलात तर विलीला भेटा. आता तो म्हातारा झाला असेल. भीमू चांगला मोठा झाला असेल. त्याला माझी आठवण द्या. म्हणावं, त्यावेळेला सांगायचं राहून गेलं, पण आणखीन एक भीमू नावाचं प्रचंड मोठा माणूस आमच्याकडं होऊन गेला... मग झाडाखाली बसून त्याला ती सगळी कहाणी सांगा!’’ खरंच सांगतो- हे लिहितानाही मी थरथरतो आहे. हाच का तो लेखक- ज्याचं पुरुषभान आत्ता काही पानांपूर्वी पुरतं सांकेतिक होतं! पौरुषाचा अर्थ डॉ. भीमराव आंबेडकरांना जसा प्रतीत झाला, तसा त्या पिचलेल्या ऑस्ट्रेलियन आदिवासी ‘भीमू’ला व्हावा, हे लेखकाचं स्वप्नच केवढं मर्दानगी बाळगणारं आहे! पौरुष हे नेहमी सत्ता गाजवणारं, जुलमी नसतं. ती आक्रमकता सर्जनशील आणि सहृदयही असू शकते. ते पौरुष आपली रग न सोडताही शहाणं, विचारी आणि क्षमाशीलही असू शकतं. केवढी मोठी गोष्ट आहे- की माडगूळकरांनी पौरुषाची अनेक रूपं एका छोट्या प्रवासवर्णनात सामावली! टेस्टेस्टेरॉन आम्हा साऱ्या पुरुषांमध्ये शिगोशिग असतंच; पण ती रग कुठे वळवायची हे पुरुषा-पुरुषांवर अवलंबून असतं माडगूळकरांसारख्या एखाद्या प्रज्ञावान पुरुषाच्या टेस्टेस्टेरॉनला मग सहज कळून येतं, की शिकारीपेक्षा लेखन हे अधिक मर्दानगीचं काम आहे. ती मर्दानगी मग जिवंतही असते- आणि बाईपणाइतकी सर्जनशीलही! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more