* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983791
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 1990
  • Weight : 170.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : TRAVEL
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AUSTRALIA, A COUNTRY OF SHEEP AND MEADOWS. WHAT WE KNEW ABOUT AUSTRALIA IS WHAT WE HAVE HEARD VERY OFTEN. A COUNTRY GROWING ALL SORT OF GRAINS, A COUNTRY WHERE PEOPLE ARE FREE TO START ANY BUSINESS THAT THEY WISH TO. GO DEEP DOWN THE SEA AND BRING HANDS FULL OF PEARLS BACK. REAR CATTLE AND EARN THOUSANDS BY EXPORTING THE MEAT. REAR SHEEP AND EARN FROM THE WOOL. START YOUR OWN `EVERYTHING UNDER ONE ROOF` SHOP DEVOID OF SIZE. OR JUST BE A FARMER AND PRODUCE PINEAPPLES, WHEAT, SUGAR OVER HUNDREDS OF ACRE. HAVE YOUR OWN MINE PRODUCING THE OPEL, THE SEMIPRECIOUS STONE. THIS COUNTRY PROVIDES OPPORTUNITY FOR LITERALLY ANYTHING.
ऑस्ट्रेलिया! कसा असेल हा देश? ऐकून माहीत होतं की, जगातली सगळी पिकं ऑस्ट्रेलियात होतात. या देशात माणूस हवा तो उद्योग करू शकतो.... समुद्रात बुड्या मारून मोती काढा, हजारो गुरं पाळून त्यांचं मांस परदेशी पाठवा, हजारो मेंढ्या पाळून लोकरीचं उत्पादन करा, जगातलं लहान, मोठं `सबकुछ मिलेगा` दुकान चालवा. शेतकरी होऊन शेकडो एकर अननस, गहू, ऊस पिकवा किंवा भांडवल घालून ‘ओपेल’खड्यांची खाण चालवा. काहीही करायला या देशात संधी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarGovind Patil

    व्यंकटेश माडगूळकर माझा आवडता लेखक... वाचायला पुन्हा पुन्हा आवडणारे जे फार कमी आहेत त्यापैकी एक... नुकताच त्यांच्याबरोबर मेलबोर्न,सिडणी, केन्स ,लाॅंगरीच असा आस्ट्रेलियाचा काही भाग फिरून आलो.... एक छान प्रवासवर्णन पुन्हा वाचून झालं....

  • Rating StarDAINIK LOKSATTA 27-03-2016

    माडगुळकरांची मर्दानगी... फिजिऑलॉजीचं लेक्चर नुकतंच संपलं होतं आणि आम्ही पायऱ्यांवर बसून नुकत्याच शिकवलेल्या ‘टेस्टेस्टेरॉन’ या पुरुषी संप्रेरकावर बोलत होतो. तेवढ्यात कुणी मुलगी म्हणाली तुम्ही म्हणूनच तुम्ही सारी मुलं एवढी भांडखोर असता! आणि पटलं ते आ्हालाही. आम्ही पुरुष आणि आमच्या आतलं सळसळणारं ते टेस्टेस्टेरॉन हार्मोन - आमचं न रडणं, आमचे बायसेप्स एकमेकांना दाखवणं, आमचं लॉजिकल असणं, आमचं शक्तिशाली असणं, झुंजार असणं, टगं आणं, रांगडं असणं, रंगेलही असणं - हे त्या हार्मोनशी सारं निगडित होतं. ते जास्त मात्रेत निर्माण झाल्यास केस गळतात, हा भाग सोडून या हार्मोनमध्ये न आवडण्यासारखं असं काही आम्हाला वाटत नव्हतं! पुढे जगताना ‘पुरुष’ असण्याची व्याख्या इतकी मर्यादित नसते, हे आमच्यापैकी अनेकांना कळतही गेलं! पण ते ‘तरुण’ रसायन व्यंकटेश माडगूळकरांच्या तुलनेने दुर्लक्षित राहिलेल्या एका प्रवासवर्णन ऑस्ट्रेलियामधल्या त्यांच्या मुक्कामाची नोंद मांडतं, हे झालंच; पण त्यामधलं पाना-पानांआड उमटणारं आणि प्रवाहीपणे बदलत जाणारं पौरुष हे औरच आहे! वाटतं, खुद्द टेस्टेस्टेरॉननंच चूष म्हणून मस्तीत, तोऱ्यात शब्दांचं रूप घेऊन पाहिलं असावं! पुस्तकाच्या पहिल्या परिच्छेदामध्येच ती सारी पुरुषी लक्षणे ठासून भरली आहेत. माडगूळकर सुट्टीला गावी गेलेले असतात आणि त्यांचे ‘रजेचे तीन आठवडे ससा, चित्तुरांची, माळढोक, घोरपडींची शिकार करण्यात भराभर निघून जातात. चेहऱ्यावरचा पुणेरी तुकतुकीतपणा जातो आणि तो ‘चांगला’ रापलेला दिसू लागतो. निघताना ते गोंदा रामोशाला विचारतात, ‘‘गोंदा गड्या, तू दोन बायका कशा वागवतोस तेवढा कोर्स मला दे!’’ त्या शिकारीमध्ये पुरुषी आक्रमकता सूचित होते. रापलेला चेहरा ‘चांगला’ वाटण्यामागे पुरुषी रांगडेपण अनुस्यूत असतं आणि दोन बाया नोदवण्याचा विचारपुशीमध्ये पुरुषी भ्रमरवृत्ती जशी अभिमानाने मांडली जाते तसाच पुरुषा-पुरुषांमधला सामाजिक, आर्थिक तफावत ओलांडून पुरुष असण्याच्या बळावर रंगणारा संवादही दिसतो. (अनेक उद्योगपती आपल्या गाडीच्या चालकाशी उत्तम गप्पा मारतात ते याच धाग्यावर) बाकी त्या गोंदाचं उत्तरही भारीच आहे. ‘दोन बायका नांदवायच्या म्हंजे हातात सारकं टिकारनं ठिवावं लागतं.’’ आणि उत्तरातून पुरुष असण्याचा हिंसेकडे झुकण्याचा जो संबंध आहे त्यावरही प्रकाश पडतो! अन् मग सुरू होतो खरा प्रवास! ऑस्ट्रेलियामधला कस्टम ऑफिसर बायकोने दिलेले लाडू बघून विचारणा करतो... पण सभ्यपणे! माडगूळकर त्याला चेष्टेने ‘शामळू’ हे विशेषण लावतात. या दौऱ्यात ते एकटेच असतात. रेडिओ ब्रॉडकास्टर मंडळीचं तिथे प्रशिक्षण असतं. अशा एखाद्या प्रवासात सोबत पत्नी, मुलं, आई, उर्वरित कुणी मित्रही सोबत नसणं हे महत्त्वाचं ठरतं. पुरुषाचे अनुभव घेण्याचे पोत बदलतात... आणि मांडण्याचेही! गाडगीळ आणि पुलंनी सहकुटुंब प्रवास केले आणि जे एकेकटे प्रवास केले त्यातलं पौरुष हे त्यांनी हात राखूनच मांडलेलं दिसतं. पण व्यंकटेश माडगूळकरांनी ते सारे खास टेस्टेस्टेरॉनयुक्त अनुभव अभिजात लेखनाच्या कसोटीला पार पाडत बेधक मांडले आहेत! आणि या पुस्तकाचं ते फार मोठं वैशिष्ट्य आहे. मग हंगेरियन माय-लेकी चालवीत असलेल्या हॉटेलमध्ये अपरिचित जर्मन खलाशी माडगूळकरांशी तिथली मुलगी ‘मिस’ आहे की ‘मिसेस’, यावर खल करतो आणि मेलबर्नच्या शेतीप्रदर्शनामध्ये वुडचॉपिंग करणारे चार भक्कम पुरुष लेखकाच्या लेखणीचा ठाव घेतात. किती सुंदर तऱ्हेनं ते पौरुष माडगूळकरांनी व्यक्त केलं आहे!’’ लगोलग चारही जवान आपल्या धारदार कुऱ्हाडी दणदण ओंडक्यावर चालवू लागले एक सरळ घाव, एक खालून वरती घाव. त्या कडेच्या बहाद्दराने ओंडक्याचे दोन तुकडे केले. टाळ्यांचा गजर झाला. पहिला आलेला लाकूडतोड्या अठावन्न वयाचा होता! वा रे नर!’’ या वर्णनामधला तो ‘वा रे नर!’ हा भाग ते कडक पौरुष थेट वाचकांपुढे मांडतो. सिडनीच्या एका पबमध्ये लेखक ‘टिम’ सोबत बियर प्यायला जातो. तो पबमधल्या अनुभव माडगूळकरांनी सविस्तरपणे लिहिला आहे. ते खास पुरुषी जग त्यांनी फार सहजतेनं लिखाणात मूळ प्रवासवर्णनाल बाधा न आणता उतरवलं आहे. टिम आणि लेखक बियर पिताना एका वेगळ्या दिसणाऱ्या मुलीला बघतात. टिम सांगतो, ‘‘ती मुलगी असून मुलासारखी वागते. फार चांगली आहे. सर्वांच्यात ‘दांडगी!’’ हा संवाद जेंडर क्रिटिसिझम् च्या नजरेततून अगदी रोचक आहे! टिम हा ‘जेंडर’ पलीकडे जाऊन ती व्यक्ती ‘फार चांगली’ आहे असं म्हणू शकतो. भारतीय पुरुषी साच्यातला लेखक व्यक्तीच्या ‘जेंडर’- ओळखीवर त्या व्यक्तीच्या माणूसपणाची प्रत ठरवण्याची चूक करतो आणि तिची ओळख करून घ्यायलाही नका देतो! पुढे तर माडगूळकर ज्यो आणि ओंग या सहाध्यायांसोबत नाइट क्लबला जातात. तिथे ‘स्ट्रीप्ट्टीज् बघतात. ते वर्णन त्यांनी पुष्कळ चवीनं केलं आहे. पण शेवटला त्या लेखकाचा खास पौर्वात्य पुरुषीपिंड जागा होतो. तो अनुभव आवडलेला असतानाही तो निवेदक दोन-दोनदा म्हणतो, ‘‘माय गॉड... हॉरिबल! आय वूड नॉट डू इट अगेन!’’ पण माडगूळकरांचं पुरुष-सूक्त हे सुदैवाने इतकंच आणि एवढंच नाहीये या पुस्तकात! शेवटी व्यंकटेश माडगूळकर आहेत ते! आणि कदाचित त्यांच्याही नकळत त्या पुस्तकामधील पौरुषाची व्याख्या विस्तारत गेलेली आहे. प्रवासात कॅनबेरामध्ये असताना त्यांना आकाशवाणीमधील त्यांची मैत्रीण सई परांजपे यांची आठवण होते. रँगलर परांजपे ऑस्ट्रेलियात हायकमिशनर असताना सई परांजपे तिथे राहत होत्या. तिथल्या त्यांच्या घराचे फोटो माडगूळकर आठवणीने काढतात. या साऱ्या वर्णनात एकतर त्यांनी ‘सई’ असं एकेरीत संबोधलं आहे. तत्कालीन लेखनात कुणा पुरुष लेखकानं आपल्या मैत्रिणीचा असा जिव्हाळ्यानं, आत्मीयतेनं उल्लेख केलेला दिसत नाही! ते नातं खूप सहजभाव राखणाऱ्या मैत्रीचं आहे. सई ही लेखकासाठी एखाद्या मित्रासारखी आहे असं मी म्हणणार नाही. मैत्रीणच आहे ती. ठरीव स्त्री-पुरुष प्रेमाच्या आकर्षणापेक्षा निराळ्या प्रतलात नांदणारी जिव्हाळा-मैत्री आहे ती! माडगूळकर प्रवास करताना, पुढे तो शब्दात उतरवताना पौरुषाच्या सीमाही जोखत होते का? असावं! प्रवासातले अनुभव माणसाला पठडीबाहेर नेऊ पाहतात. फ्रॅंकलिन आणि आबू आपाल्या देशांचा उत्तम स्वयंपाक रांधतात. लेखकाची वेळ आल्यावर लेखक बावचळतो. आपलं हे ज्ञान भात-पिठल्याच्या पुढे नाही हे त्याला जाणवत, त्यांनी खंतावत म्हटलंय, ‘‘साफ उतरलेल्या चेहऱ्यानं सर्व पदार्थांची उजळणी केली. एकाचीही कृती नजरेसमोर येईना. ‘सुग्रास भोजन’ सारखं एखादं पुस्तक आणायची बुद्धी मला सुचली नाही!’’ पण हे पुरुष-आख्यान पुस्तकाच्या शेवटाला माडगूळकरांनी इतकं विलक्षण उंचीवर नेलं आहे की बस् रे बस्! लेखक तिथल्या आदिवासी पाड्यात जातो. विली नावाच्या आदिवासी माणसाशी बोलतो. तोवर आत झोपडीत त्याला मुलगा झाल्याची बातमी येते. त्याचं नाव काय ठेवायचं, या दुग्धात असताना लेखक म्हणतो की, ‘‘भीम हे नाव ठेव.’’ ‘‘हू वॉज दॅट ब्लोक? नेव्हर हॅड ऑफ हिम! तो योद्धा होता का? शिकारी होता का?’’ विली विचारतो. लेखक महाभारताच्या भीमाचे पराक्रम ऐकवतो. ‘भीम’ असं नाव झाडाच्या बुंध्यावर कोरून बारसं होतं. अगदी शेवटी माडगूळकर म्हणतात की, ‘‘तुम्ही कधी तिथे गेलात तर विलीला भेटा. आता तो म्हातारा झाला असेल. भीमू चांगला मोठा झाला असेल. त्याला माझी आठवण द्या. म्हणावं, त्यावेळेला सांगायचं राहून गेलं, पण आणखीन एक भीमू नावाचं प्रचंड मोठा माणूस आमच्याकडं होऊन गेला... मग झाडाखाली बसून त्याला ती सगळी कहाणी सांगा!’’ खरंच सांगतो- हे लिहितानाही मी थरथरतो आहे. हाच का तो लेखक- ज्याचं पुरुषभान आत्ता काही पानांपूर्वी पुरतं सांकेतिक होतं! पौरुषाचा अर्थ डॉ. भीमराव आंबेडकरांना जसा प्रतीत झाला, तसा त्या पिचलेल्या ऑस्ट्रेलियन आदिवासी ‘भीमू’ला व्हावा, हे लेखकाचं स्वप्नच केवढं मर्दानगी बाळगणारं आहे! पौरुष हे नेहमी सत्ता गाजवणारं, जुलमी नसतं. ती आक्रमकता सर्जनशील आणि सहृदयही असू शकते. ते पौरुष आपली रग न सोडताही शहाणं, विचारी आणि क्षमाशीलही असू शकतं. केवढी मोठी गोष्ट आहे- की माडगूळकरांनी पौरुषाची अनेक रूपं एका छोट्या प्रवासवर्णनात सामावली! टेस्टेस्टेरॉन आम्हा साऱ्या पुरुषांमध्ये शिगोशिग असतंच; पण ती रग कुठे वळवायची हे पुरुषा-पुरुषांवर अवलंबून असतं माडगूळकरांसारख्या एखाद्या प्रज्ञावान पुरुषाच्या टेस्टेस्टेरॉनला मग सहज कळून येतं, की शिकारीपेक्षा लेखन हे अधिक मर्दानगीचं काम आहे. ती मर्दानगी मग जिवंतही असते- आणि बाईपणाइतकी सर्जनशीलही! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more