ARAVIND ADIGA

About Author

Birth Date : 23/10/1974


ARINVAD ADIGA WAS BORN ON 23 OCTOBER 1974 IN MADRAS. AFTER THAT HE STAYED IN INDIA FOR SOME TIME AND FROM THERE HE LIVED IN PLACES LIKE AUSTRALIA, AMERICA AND ENGLAND. CURRENTLY HE IS IN MUMBAI. THE WHITE TIGER IS HIS FIRST NOVEL. HE STARTED HIS CAREER AS A JOURNALIST IN THE FINANCIAL TIMES. HE WORKED AS A SOUTH ASIA CORRESPONDENT FOR TIME MAGAZINE FOR THREE YEARS BEFORE TURNING TO FREELANCE JOURNALISM.

अरिंवद अडिगा यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९७४ साली मद्रास येथे झाला. त्यानंतर काही काळ ते भारतातच राहिले व तेथून पुढे ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इंग्लड अशा ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले. सध्या ते मुंबईत असतात. द व्हाईट टायगर ही त्यांची पहिलीच कादंबरी आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात फायनान्शिअल टाइम्स मध्ये पत्रकार म्हणून झाली. फ्री-लान्स पत्रकारिता सुरू करण्याआधी तीन वर्षे ते टाइम मासिकासाठी दक्षिण आशियाचे बातमीदार म्हणून काम करत होते. आपल्या काहीशा बेफिकीर आणि धक्कादायक शैलीतून रेखाटलेल्या या कादंबरीतून धनिक वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांचं वास्तवातील जीवन, त्यांची लालसा, त्यांची वैषयिक वृत्ती, त्यांचा अहंकार यांचं कमालीचं वास्तववादी आणि अत्यंत यथार्थ चित्रण अडिगा यांच्या संवेदनक्षम लेखणीने केलं आहे. त्याचबरोबर समाजातील दुर्बल घटकाच्या पोटी जन्माला आलेल्यांना दैनंदिन जीवन जगताना पावलोपावली करावा लागणारा संघर्षसुद्धा त्यांनी येथे तितक्याच ताकदीने उभा केला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 2 of 2 total
AMNESTY Rating Star
Add To Cart INR 350
THE WHITE TIGER Rating Star
Add To Cart INR 295

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
तेजस यादव

वाचला तो कर्ण ! आवडला तो कर्ण ! भावला तो कर्ण ...! दोन वर्षापुर्वी मृत्युंजय कादंबरी वाचून झालती . त्या कादंबरीने कित्येक जणांच आयुष्य कायापालट केल , हे मराठी साहित्य विश्व जाणून आहे . आता नुकतीच राधेय वाचून पुर्ण झाली . लेखक रणजित देसाई सुरवातीच ्हणतात .... " राधेय हे कर्णचरित्र नव्हे . प्रत्येकाच्या मनात दडलेला कर्ण असतो . माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी . भावकहाणी . याची सत्यता शोधायची झाली , तर त्यासाठी महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही , कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत , तर त्यात हा कर्ण दिसेल ." मला कादंबरीत एक विशेष गोष्ट आवडली , ती म्हणजे कर्ण कुठेच वरचढ , रंगवून दाखवला नाही. त्याचे गुण दाखवले तसे त्याचे दोष ही दाखवले . नदीच्या प्रवाहावर वाहत जाणार त्याचं आयुष्य , त्याच दातृत्व , त्याच मित्रप्रेम , त्याचा मनाचा गाभारा , त्याचा आयुष्यी आलेली अहवेला वाचकांसं खुप काही शिकवून जाते . देसाईंची लेखणी इतकी प्रभावशाली आहे की ते कुरुक्षेत्राची युध्दभुमीही जिवंत झालेला भास होतो . मी जेवढा कर्ण वाचला तो मला सर्व आठवला ! मग तो ` शिवाजी सावंतांचा ` असो अथवा नटसम्राट मधील ` वि.वा.शिरवाडकर ( कुसुमाग्रजांचा ) . कादंबरी वाचून झाल्यावर कुसुमाग्रजांची ती ओळ आठवली कृष्ण - " अरे वेड्या तुझ्यासारखे कर्मयात्री ह्या धरेवरच्या माणसांचे दिपस्तंभ.! तुमचे जीवन हे केवळ जळण्यासाठी , ह्या प्रकाशात आम्हाला आमच्या वाटा सापडतात . खुप सुंदर वाचनीय , आणि भरभरुन शिकवनारी कादंबरी .... ...Read more

MAHASAMRAT ZANZAVAT
MAHASAMRAT ZANZAVAT by VISHWAS PATIL Rating Star
Abhiram Bhadkamkar

महा-सम्राट "इतिहास वाचून माणूस बेभान होतो, भानावर येतोच असं नाही" हे (बहुधा) वि ग कानेटकर यांचे विधान मला कायमच महत्वाचे वाटते। प्रकाशनास काही महिने लोटले असले तरी निवांत ऐसपैस वेळ काढून वाचायची म्हणून बाजूला ठेवलेली ज्येष्ठ कादंबरीकार विश्वा पाटील ह्यांची महासम्राट ही कादंबरी हातात घेतली आणि तिने झपाटून गेलो। ही कादंबरी बेभानही करते आणि एक भानही देते हे तिचे वैशिष्ट्य आहे. विश्वासरावांची शैली आणि त्यांची शब्दसंपत्ती ह्यावर नवे काय बोलणार? पण ही कादंबरी उभ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील घटनांचे केवळ चमकदार कथन यापुरती मर्यादित न राहता तत्कालीन सामाजिक व राजकीय परिसराचे भान देणारी ठरते। तेव्हाचा काळ बारीकसारीक तपशिलांसह उभा करते. ती छत्रपतींच्या तेजस्वी कर्तृत्वाला मुजरा तर करतेच पण त्यासोबत त्यांच्या जन्मापूर्वीची राजकीय परिस्थिती, त्यातून आईसाहेबांच्या मनात उगवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अत्यंत अवघड, जवळजवळ अशक्यप्राय स्वप्नाच्या पाठलागाची वेगवान घडामोड चितारते. मुघलांचे डावपेच, खेळया नेस्तनाबूत करण्यामागची `अत्यंत योजनाबद्ध आखणी` मांडत जाते। ही कादंबरी माझे त्याकाळाबद्दलचे आकलन वाढवते. मऱ्हाटी मुलाखातला तत्कालीन निसर्ग यात येतो, तत्कालीन नातेसंबंध, समाजधारणा आणि परचक्राच्या दडपणाखालची उलघाल यातून त्या काळाचा पट मांडला जातो आणि इथेच कादंबरी केवळ एका युगपुरुषांचे चरित्रकथन न रहाता एका शतकाचा लेखाजोखा होऊन जाते। वेगळेपण आहे ते हेच की ही कहाणी महाराक्षसी लाटांविरुद्ध पोहून जात महासागरालाच बांधून घालणाऱ्या चिवट आशावादाची आणि या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या बुद्धीचातुर्याची होत जाते। म्हणूनच ती एकाच वेळी बेभानही करते आणि भानही देते। कादंबरी संपते एक स्वल्पविराम देत... आता पुढचे भाग... त्याची अधीरता आणि उत्सुकता... डोळे दिपून जावेत अशा थोर व्यक्तिमत्वाचे चित्रण हे शिवधनुष्य होते, जे लिलया पेलले आहे... यात रेखाटलेली चित्रे अप्रतिम आहेत... घराघरात भक्तिभावाने ठेवावा आणि `अभ्यासावा` असा हा `झंझावात` आहे... ...Read more