* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Notify Me
     
  • ISBN : 9788177667592
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : TRAVEL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`AMREKETIL PAPNAGARI` IS A STRANGE TRAVEL GUIDE. IT PORTRAITS THE DARK SIDE OF AMERICA. DR.ANANT LABHSETVAR HAS PENNED THE TRUTH BEHIND GLAMOROUS LIFE IN AMERICA.
डॉ. अनंत पां. लाभसेटवार यांनी ‘अमेरिकेतील पापनगरी एक वारी’ या पुस्तकातून ‘लास वेगास’ या रंगीत पर्यटनस्थळाचे वर्णन केले आहे. जगभरात या शहराला पापनगरी (SIN CITTY) म्हणून ओळखले जाते हे शहर जुगाराची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. इथे जुगार कायदेशीररित्या खेळला जातो. मनुष्याच्या वामप्रवृत्तींना योग्य वातावरण मिळालं की त्या अधिकच उफाळून येतात आणि त्यापासून अमाप पैसा मिळवता येतो. हे तत्त्व पटवून देणारं हे ठिकाण आहे. मनुष्याच्या मनोदौर्बल्याचा फायदा घेणारी अनेक ठिकाण इथे आहेत. लास वेगासला जाताना अगदी विमानात बसल्यापासून लेखकाला आलेले अनुभव त्याने सांगितले आहेत. माहितीपूर्ण आणि तरीही मनोरंजक असे हे प्रवासवर्णन आहे. लास वेगास मधील हॉटेल्स तेथे चालणारे ‘शोज’ त्यांची वैशिष्ट्ये, उत्कृष्ट स्थापत्यकला याबरोबरच मद्याचे वाहणारे पाट, अर्धनग्न मदिराक्षी, कधीही बंद न होणारी जुगारगृह, उघडपणे चालणारा शरिरविक्रय सर्व प्रकारच्या व्यसनांची उपलब्धता यांचेही इत्यंभूत वर्णन लेखकाने केले आहे. पायदळी तुडवली गेलेली नितिमत्ता, मूल्यांचा नाश, जुगारात पैसा गमावल्याने होणारी निराशा या बरोबरीने काही गुणसंपन्न गोष्टीही येथे अनुभवास येतात. जसे समुद्रकिनाऱ्यापासून आयफेल टॉवरपर्यंत सर्व काही येथे कृत्रिम असूनही या कृत्रिमतेत सत्याचा आभास निर्माण होतो आणि तणावग्रस्त चिंतीत मन काही काळ का होईना विरंगुळा पावते. या ठिकाणाचे अजून एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे माफक दरात उत्तम प्रतीचे अन्न मिळते. जगातील अनेक नामवंत शेफ्सनी आपली रेस्टॉरंट्स येथे उघडली आहेत. फ्लोरिडा या ठिकाणी असणारे डिस्नीलँड हा परिकथेतील स्वर्गच आहे दरवर्षी लक्षावधी लोक या ठिकाणाला भेट देतात. भारतातील तिरूपती मंदिर येथेही लक्षावधी भाविक दरवर्षी दर्शनासाठी जमतात. परंतु या दोनही ठिकाणांपेक्षा अधिक पटीने लोक लास वेगासला या ठिकाणी भेट देतात हे कळल्यावर आश्चर्य वाटते आणि मनुष्य मुळातच पापप्रवृत्त आहे याची खात्री पटते. प्रत्यक्ष पाप न करताच पापनगरीच्या संस्कृतीची सफर घडवणारे हे पुस्तक वाचकांचे नक्की मनोरंजन करेल.पापनगरीच्या भेटीला जाताना कुणी अंतर्मनाचा वेध घेत नाही.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #AMERICETILPAPANAGARIEKVARI #AMERICETILPAPANAGARIEK VARI #अमेरिकेतीलपापनगरीएकवारी #TRAVELMARATHI #LABSHETWARANANTP. "
Customer Reviews
  • Rating StarDainik Aikya

    लास वेगास हे अमेरिकेतील शहर जुगाराचे शहर म्हणून जगभर मशहूर आहे. नेवाडा या वालुकामय राज्यात पीक पाण्याची वानवा. तेथील लोकांना रोजगाराचे कुठलेच साधन नाही. त्यांना निर्वाहाचे काहीतरी साधन हवे. म्हणून नेवाडा राज्याने जुगाराला कायद्याने मान्यता दिली आणि कसिनो काढण्यास आपल्या नागरिकांना परवानगी दिली. त्या काळात अमेरिकेतील अन्य सर्व राज्यात कायद्याच्या दृष्टीने जुगार हा दंडनीस अपराध होता. जुगाराला राजरोस मुभा मिळाल्याने अमेरिकेच्या इतर राज्यांमधून लास वेगासला पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले. त्यांच्या निवासाची उत्तम सोय करण्यासाठी एकापेक्षा एक भव्य हॉटेल्समध्ये नाना प्रकारचे चविष्ट खाद्यपदार्थही माफक दरात मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर पर्यटकांच्या रंजनासाठी आकर्षक करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्याची कल्पनाही अंमलात आणली गेली. जगभरचे नामवंत कलावंत, नृत्यकार, नकलाकार, जादूगार, अभिनेते तेथील फ्लोअर शोज्, स्ट्रिपटीझ रेव्ह्यू वगैरे कार्यक्रमात भाग घेऊ लागले. एकाच वेळी शंभर (दोनशे) नर्तकांचा सहभाग असणारे भव्य नेत्रदीपक शो हे लास वेगासमधल्या प्रत्येक हॉटेलचे खास आकर्षण ठरले. त्यामध्ये नाना प्रकारचे ट्रिक सीन्स, बदलते रंगमंच, चमत्कृतीपूर्ण सजावटी वगैरेंचे प्रयोग होऊ लागले आणि या सर्व गोष्टींची माफक दरात लयलूट होत असताना आलेल्या पर्यटकांना अधिकच थ्रील वाटावे म्हणून एकेका हॉटेलात शेकडो स्लॉट मशीन्स बसवण्यात आली. एकाच प्रकारची तीन फळे एकाच रांगेत आली की जॅकपॉट म्हणून एक डॉलरचे पंचवीस-पन्नास डॉलर मिळू लागले. अशा जॅकपॉटमुळे पर्यटकांच्या खिशातून नोटावर नोटा निघू लागल्या आणि तासन्तास त्या मशीनच्या समोर बसण्यात पर्यटकांना धन्यता वाटू लागली. त्याचबरोबर पोकरसारखे पत्त्यांचे खेळ, केनो, रौलेट डझनवारी प्रकारचे खेळही सुरू झाले आणिलास वेगासच्या समृद्धीत भर घालू लागले. अमेरिकेतील इतर संस्थानात लग्न करणे आणि घटस्फोट घेणे यासाठी महिनाभर आधी नोटीस द्यावी लागते. लास वेगासच्या प्रशासनाने ही जाचक तरतूद रद्दबातल करून हव्या त्या क्षणी, हव्या त्या ठिकाणी लग्न करण्याची आणि घटस्फोट घेण्याची मुभा दिली. त्यामुळे अनेक चॅपेल्स व चर्चेस तेथे निघाली आणि तेथील चचंप्रमुखांनाही अमाप कमाईचे मार्ग राजरोस खुले झाले. या झटपट श्रीमंतीला पुढे अनेक फाटे पुâलत राहिले. या शहरात रात्रंदिवस विद्युतदीपांचा झगमगाट उजळत राहिली. रात्रीहा दिवसापेक्षा जास्त लखलखाट... या शहराला झोप नाही. कुठलाही कॅसिनो चोवीस तास चालू... तशात हूवर डॅममुळे येथील पाण्याचा प्रश्न सुटला. हे धरण हाही स्थापत्यशास्त्रातला चमत्काराच मानला जातो. अनावर बेधुंद कोलोराडो नदीला धरणाचा वेसन घालून पाण्याचा हा प्रश्न सोडवून लास वेगासला वाळवंटातील अद्भूत मायानगरीच बनवले गेले! जगण्यातले थ्रील... जुगारातले थ्रील... मुक्त स्त्रीपुरुष प्रणयाचे रंगढंग... अल्पावधीत लक्षावधी डॉलर्स कमविण्याचे आमिष... लास वेगासला एकीकडे काही लोक पृथ्वीवरचे नंदनवन बनवत होते, तर दुसरीकडे सिनसिटी/पापनगरी म्हणून काही प्युरिटन तिला नाके मुरडत होते... तरीही लास वेगासची लोकसंख्या वाढत होती... आज लास वेगासची वस्ती तीस-पस्तीस लाखांच्या घरात आहे. अमेरिकेतील इतर शहरांच्या तुलनेने बरीच जास्त... येथील दहापैकी आठ हॉटेल्स ही जगातील सर्वांत मोठ्या दहा हॉटेल्सच्या यादीत गणली जातात, एकेका हॉटेलमध्ये चार-सहा हजार खोल्या आहेत, आणि हजारो स्लॉट मशीन्स, पंधरावीस रेस्टॉरंटस्, नाट्यगृहे, दुकाने... न्यूयॉर्क , पॅरिस, इंग्लंड, इजिप्त, व्हेनिस (इटली) शहरांच्या वा देशांच्या प्रतीकात्मक प्रतिकृती येथे तयार करण्यात आल्या आहेत. या शहराला तुम्ही वाळवंटातले नंदनवन म्हणा, अद्भूत मायानगरी म्हणा की पापनगरी म्हणा, तिची भूल सर्वांना पडते. जन्माला यावे आणि काशीला जाऊन जन्माचे सार्थक करावे. त्याचप्रमाणे लास वेगासला जावे आणि त्या मायानगरीचे दर्शन घेऊन मनुष्य जन्माची संधी पुन्हा लाभावी असा संकल्प सोडावा, अशी या नगरीची जादू आहे. विलक्षण जादूनगरीवर मराठीत आजवर फुटकळ प्रवासवर्णनात्मक लेख अधूनमधून वाचायला मिळत होते. परंतु स्वतंत्र पुस्तक मात्र निघाले नव्हते. ती उणीव आता डॉ. अनंत लाभसेटवार यांनी ‘अमेरिकेतील पापनगरी : एक वारी’ हे पुस्तक लिहून भरून काढली आहे. डॉ. अनंत लाभसेटवार हे गेली तीस-पस्तीस वर्षे अमेरिकेत राहतात. पेशाने संशोधक पण पुढे एक बँकही त्यांनी अमेरिकेत खरेदी केली आणि शॉपिंग मॉल्सचेही सौदे त्यांनी केले. एक हजार एकरात शेती केली, आकाशवाणी केंद्र चालवले. त्याबद्दल त्यांनी मोकळेपणाने आपल्या ‘अमेरिकेतील धावपळ’ या आत्मकथनात बरेच काही सांगितले आहे. त्या कमाईतून एक कोटी रुपयांचा एक धर्मादाय ट्रस्ट नागपूरला काढून मराठी लेखकांना आणि लोकसंख्या नियंत्रण क्षेत्रातील कार्यकत्र्यांना लाखलाखचे पुरस्कार देण्याचा उपक्रम चालू केला आहे. अमृतमध्ये डझनावारी लेख लिहून अमेरिकेतील जीवनाचे वेगवेगळे रंगढंग आणि अंतर्विरोध टिपले आहेत. लाभसेटवारांचे एक बलस्थान म्हणजे त्यांचे चौफेर निरीक्षण आणि दुसरे बलस्थान म्हणजे त्यांची मिश्किल विनोदबुद्धी. स्वत:ला विनोदविषय बनवण्यात ते कधीच हात आखडून घेत नाहीत, त्यामुळे त्यांचे लेखन हे अघळपघळ गप्पांच्या मैफलीसारखे रंगते. इ.स. २००४ मध्ये चार दिवसांचा लास वेगासचा दौरा डॉ. लाभसेटवार यांनी पत्नीसह केला. सेंट मार्वâ चौक, इटालियन स्थापत्यशास्त्राचे नमुने... चार हजार खोल्या... १९९७ ते १९९९ या दोन वर्षांत संपूर्ण बांधकाम... सभा संमेलनांसाठी १९ लक्ष चौ. पूâट वातानुवूâलित दालने... २.३ एकर विस्ताराचे जुगारगृह... २०० जुगार यंत्रे... आरंभी ३ हजार खोल्या (आता आणखी ३००० लोकांची भर) जगातले सर्वांत मोठे हॉटेल २.३ अब्ज डॉलर्स खर्च... या हॉटेलचा मालक शेल्डन अ‍ॅडल्सन... व्हेनिसची प्रतिकृती करण्याची कल्पना... पहिल्याच वर्षांत शेअर्स भाव वाढून अ‍ॅडल्सनचे भांडवल १४ अब्ज डॉलर्स झाले. इ. वर्णन त्यांनी मनोरंजकपणे केले आहे. व्हिनिशियन हॉटेलमध्ये चौथ्या मजल्यावर छान तलाव... त्यात केलेला जलतरणाचा कार्यक्रम... अमेरिकन स्त्रियांचा धीटपणा... जास्तीत जास्त अंगप्रदर्शन करून आपलं शरीर सौष्ठत्व उधळण्यात त्यांना वाटणारा आनंद... आपल्याकडे तरुणाचं लक्ष वेधून घेणं हाच त्यांचा उद्देश... आपल्या शरीर प्रदर्शनाकडे कुणी त्रयस्थ माणूस बघत असेल तर त्यांना त्यात काही वावगं वाटत नाही. कोणी बघत असले तरी त्याचं भान अमेरिकन नारीला नसते... स्त्रीसुलभ लज्जा व सोज्वळता अमेरिकन नारीमध्ये सापडत नाही. लासवेगासमध्ये कितीतरी प्रकारची पापं घडतात हे माहीत असलं तरी त्या एकट्याने यायला तरुण मुली भीत नाहीत. उलट ते आव्हानसारखं मानतात. त्या नगरीची अनेकविध वैशिष्ट्ये त्यामुळे लक्षात येतात. लास वेगासला भेट देण्याची ओढ लागावी अशी लाभसेटवार यांच्या लेखणीची एकूणच किमया आहे. ...Read more

  • Rating StarNEWS PAPER REVIEW

    अमेरिकेच्या नेवाडा प्रांतात ‘लास वेगास’ नावाची, आता जगप्रसिद्ध झालेली एक मायावी नगरी आहे. तिला sin-city (पापनगरी) नावानेही ओळखलं जातं. इथं सर्व काही ‘बिनधास्त’ चालतं. इथला जुगार कायदामान्य आहे. तो अहोरात्र खेळता येतो. सोबत मदिरा, मदिराक्षीची ‘सोय’ आे. अमेरिकेत बहुतेक सर्व जागी धूम्रपानाला मनाई असली तरी इथं ती नाही. वेगवेगळी हॉटेल्स मिळून एक लाखाहून अधिक ‘रुम्स’ इथं आहेत. मनोरंजनार्थ evening shows आहेत. इथला झगमगाट एवढा भव्य, तीव्र व दिखाऊ, तो अंतराळातूनही दिसतो... तपशिलात जाऊन हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर डॉ. अनंत लाभसेटवर यांचं ‘अमेरिकेतील पापनगरी एक वारी’ हे छोटंसं पुस्तक अवश्य हाती घ्यावं... मनोरंजक आहे, प्रबोधन करणारंही आहे. भाषा तर अशी की, लेखक वाचकाशी बोलत आहे असचं वाटेल... प्रस्तुत लेखन म्हणजे मराठी माणसाच्या नजरेतून ‘लास वेगास’ असंही पानापानातून वाचकाला स्पष्ट होतं. एकच उदाहरण पुरेसं! लेखकाला जुगार नगरी पाहताना महाभारतातला युधिष्ठिर आठवतो. ‘आशा अमर आहे’ हे सूचित करतो. अगदी शेवटी निघताना त्याला खिशात दोन नाणी सापडतात. विमानतळावरही जुगार यंत्र असतातच! आणि... यस! एक नाणं यंत्रात टाकून त्याला, नशिबाने चाळीस नाण्यांची कमाई होते. त्यावर मजेदार भाष्य करूनच या पुस्तकाचं (अखेरचं) भरतवाक्य तो लिहितो... पुस्तकातले फोटो अगदी प्रेक्षणीय आहेत. मायानगरीची ओळख व्हायला मदत करतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more