* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ISLAND OF THE BLUE DOLPHINS
  • Availability : Available
  • Translators : MAITREYEE JOSHI
  • ISBN : 9789386342157
  • Edition : 1
  • Publishing Year : JANUARY 2017
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : TRAVEL
Quantity
Buying Options:
  • Print Books:
TWELVE-YEAR-OLD KARANA ESCAPES DEATH AT THE HANDS OF TREACHEROUS HUNTERS, ONLY TO FIND HERSELF TOTALLY ALONE ON A HARSH DESOLATE ISLAND. HOW SHE SURVIVES IN THE FACE OF ALL SORTS OF DANGERS MAKES GRIPPING AND INSPIRING READING. BASED ON A TRUE STORY.
आयलंड आफ द ब्लू डॅल्फिन ही 1960ची बालसाहित्यातली प्रथितयश कादंबरी. जॅना मारिया या अठरा वर्षिय मुलीच्या अचाट धाडसाची ही सत्यकथा. कादंबरीत ती कराना या नावाने आपल्याला भेटते. कादंबरीची नायिका कराना. तिचा भाऊ रॅमो. रॅमोची चिकित्सक वृत्ती कायम नव्या आव्हानांना तोंड देत असते. कराना आणि तिचं कुटुंब या बेटावर सुखासिन रहात असतं. पण एक दिवस एक रशियन व्यापारी जहाज बेटाला भेट देत. या जहाजासोबत झालेल्या संघर्षात करानाचं कुटुंब उध्वस्त होतं. निरनिराळ्या आपत्तींमुळं कराना बेटावर एकटी पडते. तिथून तिचा जीवनसंघर्ष सुरु होतो. या जीवसंघर्षाची थरारक जाणीव या पुस्तकातून अनुभवाला येते. बेटावर एकटी रहात असतानाही कराना धैर्य सोडत नाही. उलट आत्मविश्वास आणि धैर्याच्या जोरावर ती एकटी उभी रहाते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अखंड प्रयत्न करत रहाते. कादंबरीत करानाचा हा संघर्ष सकारात्मकतेचा संदेश भरुन टाकतो. बेटावर आयुष्याचे नवे अर्थ शोधताना कराना निसर्गाच्या नजीक जाते. तिचं जगणं निसर्गातल्या मुलभूत गोष्टींवर अवलंबून होतं. करानाचं हे निरामय निसर्गजीवन आधुनिकतावादापुढेही प्रश्नचिन्ह निर्माण करतं.

No Records Found
No Records Found
Keywords
ALEUT SHIP# ALEUTS# RAMO# KARANA# ISLAND# OTTERS# SEA# WEAPONS# SURVIVAL# ENEMIES# RONTU# CORAL COVE# HARBOR# ULAPE# SPEAR# DOGS# BEACH# BLUE DOLPHINS# SCOTT O DELL# EARTHQUAKE# FISH# STORMS# SEA-ELEPHANT# DEVILFISH# ABALONES
Customer Reviews
  • Rating StarRavindra Chavan

    गोष्ट एका करानाची... स्कॉट ओ`डेल अनुवाद :मैत्रेयी जोशी.. अद्भुत, सारच विलक्षण!! नेहमी प्रमाणेच आपल्या ग्रुपवर कोणी सारांश न लिहिलेल्या पुस्तकाचा सारांश...! ` आयलँड ऑफ द ब्ल्यू डॉल्फिन्स` प्रशांत महासागरातील एक बेट.... आकार एखाद्या सूर्यस्नन घेत पहुडलेल्या महाकाय माशासारखा... या बेटावर निळी डॉल्फिन्स पोहतात, ऑटर जलक्रीडा करतात, समुद्रपक्षी सूर मारून मासे पकडतात. एकेकाळी या बेटावर इंडियन्संची वस्ती होती, एका जहाजात बसून ते पूर्वेकडे निघून गेले आणि एक बारा तेरा वर्षाची मुलगी तिथेच मागे राहिली, कराना नावाची इंडियन मुलगी 18 वर्षे या निर्जन बेटावर वाट पाहत एकटीच राहिली, तिथे बेटावर ती एकटी धावत्या जहाजातून भर समुद्रात कोणासाठी उडी मारून परत बेटावरती का गेली होती? तर आपला छोटा भाऊ एकटाच बेटावर चुकून मागे राहिला होता म्हणून....त्या भावाचे नंतर काय झाले? अठराव्या शतकातील ही कहाणी आहे या कहाणीतली मुलगी १८३५ ते १८५३ अशी अठरा वर्ष या बेटावर एकटी राहिली होती.बरोबर होतं एक कुत्रं, दुसरं जहाज येईल आणि मला घेऊन जाईल या आशेवर ती जगत होती या एकाकीपणातही ती मनाने खचली नाही, तिने स्वतःसाठी घर बांधलं, स्वसंरक्षणार्थ शस्त्र बनवली, नाव बनवली, त्या नावेत बसून जलपर्यटन केलं! सारंच अद्भुत! अशरण जीवनेच्छा, दुर्दम्य आशावाद आणि पार्श्वभूमीला या बेटावरील रमणीय आणि निसर्ग सौंदर्याच चित्रण असलेली ही सत्य-कथा. अनुवाद वाहता आणि इतका ओघवता झाला आहे त्यामुळे आपण नकळत त्या निसर्गरम्य बेटावरती आणि त्या एकाकी मुलीबरोबर एकदम समरस होऊन जातो. आपलाच Rc😊. २०/०२/ २०२१ ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 27-05-2018

    निकोलस सेटवरची धाडसी स्त्री... या पुस्तकातलं बेट, ज्याचा ‘आयलंड ऑफ द ब्ल्यू डॉल्फिन्स’ या नावानं उल्लेख झाला आहे, त्या बेटावर खिस्तपूर्व २०००च्या आसपास इंडियन्स आले आणि तेथेच त्यांनी वसाहत केली. ते या बेटावरचे पहिले रहिवासी! पण गौरवर्णीयांना या बेटचा शोध लागला, तो इ.स. १६०२ मध्ये. त्यावर्षी स्पॅनिश संशोधक सेबॅस्शियन विसकायनो मेक्सिकोहून निघाला. तो अशा एका बंदराच्या शोधात होता, जिथे फिलिपिन्सहून खजिना गोळा केलेली मोठ्या शिडांची व्यापारी जहाजे विपत्तीच्या काळात आश्रय घेऊ शकतील. कॅलिफोर्निया किनाऱ्याच्या उत्तरेला काठाकाठाने प्रवास करत असताना हे बेट त्याच्या दृष्टीस पडले. त्याने किनाऱ्यावर एक लहानशी नाव पाठवली. खलाशी, प्रवासी आणि व्यापारी या सर्वांच्या संरक्षक देवतेच्या स्मरणार्थ त्याने त्या बेटाचे, ‘ला इला डा सॅन निकोलस’ असे नामकरण केले. शतकं लोटली, कॅलिफोर्नियावरचे स्पॅनिश राज्य जाऊन आता मेक्सिकन सत्ता आली. अमेरिकन्स आले, पण इकडे या बेटावर क्वचित कुणी शिकारी यायचे. त्यामुळे तिथले इंडियन्स मुख्य समाजापासून अलगच राहिले. या कहाणीतील मुलगी रॉबिन्सन क्रुसोची बहीण शोभावी अशीच आहे. ती इ.स. १८३५-१८५३ अशी १८ वर्षं या बेटावर एकटी राहिली होती. इतिहासात ती ‘सॅन निकोलसची हरवलेली स्त्री’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिची जीवनकहाणी मी इथे माझ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. कॅप्टन हबर्ड याचं पुढे-मागे शीड असेलं जहाज गालाज अ‍ॅटच्या इंडियन्सना घेऊन गेलं आणि त्याच्या सांगण्यानुसार इतकंच कळलं की, या मुलीने खरोखरच समुद्रात उडी मारली. तिला थोपवण्याचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. कॅप्टन निडेव्हरच्या नोंदीनुसार त्याला कराना १८ वर्षांनंतर या बेटावर सापडली. भूशिरावर बांधलेल्या एका ओबडधोबड घरामध्ये ती एकटीच एका कुत्र्याबरोबर राहत होती. तिने कॉमेंरंट पक्ष्याच्या पिसांचा स्कर्ट घातला होता. सांता बार्बरा मिशनचे फादर गोन्सालीस यांनी तिची सुटका झाल्यानंतर तिच्याशी मैत्री केली. तिच्याकडून त्यांना कळलं की, तिच्या भावाला रानटी कुत्र्यांनी फाडून खाल्लं होतं. त्यांना जास्त माहिती मिळाली नाही, कारण ती फक्त खुणांच्या साहाय्याने त्याच्याशी संवाद साधत होती. फादर किंवा मिशनमधले इतर इंडियन्स : कुणीच तिची विचित्र भाषा समजू शकले नाहीत. गालाजअ‍ॅटवरील इंडियन्स नामशेष होऊन प्रदीर्घकाळ लोटला होता. सॅन निकोलसची ही बेपत्ता स्त्री आज एका टेकडीवर चिरनिद्रा घेत आहे. सांता बार्बरा मिशनजवळ असलेल्या या टेकडीवर तिचे दफन करण्यात आले आणि तिचा हिरवा कॉमोंरंट पिसांचा स्कर्ट रोमला पाठवण्यात आला. आठ चॅनल आयलंड्सपैकी सर्वांत बाहेरच्या बाजूला असलेले हे बेट सॅन निकोलस लॉस एंजेलिसच्या नैऋत्येला सुमारे ७५ मैलांवर आहे. कित्येक वर्षं इतिहास संशोधकांना वाटत होतं, की हे बेट सहाशे वर्षांपूर्वी वसलं असावं. पण नुकत्याच केलेल्या उत्खननाच्या आधारे (कार्बन-चौदा चाचण्या) असं दिसतं की, उत्तरेकडून हे इंडियन्स खिश्चन युगाचा आरंभ होण्यापूर्वी कितीतरी अगोदर आले. अलास्काच्या किनाऱ्यावर सापडलेल्या चित्रांशी साधर्म्य दाखवणारी त्यांची वनचरांची, जलचरांची आणि पक्ष्यांची चित्र लॉस एंजेलिसच्या साऊथ - वेस्ट म्युझियममध्ये पाहायला मिळतील. ही चित्रं कोरणाऱ्या कलावंतांच्या बोटात जादू होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सॅन निकोलसचं भविष्य धूसर आहे. आता तिथे युएस नेव्हीचा गुप्ततळ आहे. पण वैज्ञानिकांना भीती वाटते की, लाटांचा होणारा सततचा मारा आणि प्रक्षुब्ध वारे यामुळे एक दिवस हे बेट पुन्हा समुद्रात गडप होईल. ...Read more

  • Rating StarDainik Loksatta , Lokrang 21-5-17

    सत्य हे कधी कधी कल्पनेहून रोचक असते. ‘गोष्ट एका करानाची’ ही अशीच एक सत्यकथा आहे. ही कथा एखाद्या चित्रपटासारखी आपल्या डोळ्यांसमोर उलगडत जाते. अमेरिकेत कॅलिफोíनयाजवळचे सॅन निकोलस हे बेट ‘निळ्या डॉल्फिनचे बेट’ म्हणून ओळखले जाते. इथे राहणाऱ्या कराना नावा्या बारा वर्षांच्या रेड इंडियन मुलीची ही कथा आहे. अ‍ॅल्युट या दुसऱ्या जमातीशी झालेल्या लढाईत कराना आपले वडील गमावते. तिचे वडील तिच्या खेडय़ाचे प्रमुख असतात. या लढाईत खेडय़ातले सगळेच दणकट पुरुष कामी येतात. या संकटानंतर काही दिवसांनी नवीन गावप्रमुख ठरवतात- की हे बेट आपण सोडून जायचं. ठरवल्याप्रमाणे गोऱ्या लोकांच्या जहाजातून संपूर्ण गाव ते बेट सोडून जातं. करानाची मोठी बहीण त्या जहाजातून निघून जाते. करानाचा छोटा भाऊ मात्र चुकून बेटावरच राहतो. त्यामुळे कराना चालत्या जहाजातून उडी मारून बेटावर येते. तिला वाटतं की आपली बहीण आणि गोऱ्या लोकांचं जहाज त्यांना न्यायला परत येईल. परंतु तसं होत नाही. कारण या जहाजाला पुढे जलसमाधी मिळालेली असते. ज्या भावासाठी कराना एवढा मोठा धोका पत्करते तो भाऊ दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी जंगली कुत्र्यांची शिकार होतो. त्यानंतर न खचता तब्बल अठरा वष्रे- म्हणजे १८३५-१८५३ हा काळ ही मुलगी या बेटावर एकटी राहते. नंतर त्याच कुत्र्यांच्या टोळीचा प्रमुख कुत्रा रोंटू करानाचा त्या निर्मनुष्य जगात सोबती होतो. करानाला खरं तर त्याला ठार मारून भावाच्या मृत्यूचा सूड घ्यायचा असतो. पण स्वतच जखमी केलेल्या या कुत्र्याला ती शुश्रूषा करून माणसाळवते. त्याच्याच सोबतीने ती दीर्घकाळ त्या बेटावर जगते. नंतर ती पक्षी पाळते. घराचं जणू गोकुळ करते. कराना जरी रेड इंडियन असली तरी ती सुसंस्कृत आहे. तिला लहानपणी शिकवलेले नियम नीट लक्षात आहेत. कुठल्याही स्त्रीसारखीच तिलाही कपडे, दागिन्यांची स्वाभाविक आवड आहे. बेटावर एकटी राहत असली तरी स्वतसाठी पिसांचे, गवताचे, कातडीचे उत्तम पोशाख बनवणं, दगड व िशपल्यांचे दागिने बनवणं, हे सगळं ती आवर्जून करते. एक दिवस करानाला अ‍ॅल्यूट लोकांचा दागिन्यांचा पेटारा सापडतो. कराना काही तास ते दागिने घालून मिरवते. पण याच माणसांच्या लढाईत आपले वडील वारले, खेडं नष्ट झालं, म्हणून नंतर तो दागिन्यांचा पेटारा ती दागिन्यांसह समुद्रात बुडवते. अठरा वर्षांनी शेवटी सुटकेसाठी गोरे लोक येतात, तेव्हा कराना स्वतचे सर्वोत्तम कपडे घालून शालिनपणे त्यांना भेटते. माणसाच्या अफाट सहनशीलतेची कमाल आहे. कुठल्याही परिस्थितीत टिकून राहण्याची देणगी त्याला मिळाली आहे. अर्थात हे शक्य होते ते केवळ मानवी बुद्धीमुळे. कारण मानवी शरीर हे प्राण्यांच्या तुलनेत अतिशय कमकुवत आहे. स्त्री असूनही कणखरपणात कराना कुठेच कमी पडत नाही. या जमातीत स्त्रीने शस्त्रे हाती घ्यायची नाहीत असा कट्टर नियम असतो. पण बेटावर एकटीनेच तगून राहायचं तर हा नियम करानाला मोडावा लागतो. ‘स्त्रीला शस्त्र ऐनवेळी साथ देत नाही,’ हे वडिलांचे उद्गार करानाला आठवतात. परंतु तिरकमठा, भाला, दगडी सुरी असे प्रत्येक शस्त्र चालविण्यात ती पटाईत होते. अफाट कष्ट करून कराना स्वतसाठी दोन निवास तयार करते. नाव बांधते. एकाकीपणा अस होऊन कराना समुद्रातून पळून जायचाही अयशस्वी प्रयत्न करते. एकटं असलं की मन रमत नाही आणि दुसरा आला की भय वाटतं, ही माणसाची मानसिकता आहे. तारुण्याच्या ऐन बहराच्या काळात कराना या निर्जन स्थळी एकाकी पडते. या काळात त्यांची पारंपरिक शत्रूजमात अ‍ॅल्यूट एकदाच तिथे येते. परंतु मृत्युभयाने ती त्या लोकांना भेटत नाही. गंमत म्हणजे त्या जमातीतील एका मुलीशी मात्र करानाची मत्री होते. ही मत्रीण आपल्या लोकांपासून लपूनछपून करानाला भेटते. एकमेकांची भाषाही न येता त्या दोघी खाणाखुणा वापरून संभाषण करतात. एकमेकींना दागिने भेट देतात. कराना या मत्रिणीच्या विरहानंतर अधिक तडफडते. केवळ माणसाचा आवाज ऐकायला ती तरसते. शेवटी माणसाला माणूस लागतो, हेच खरं. कुत्रा वा पक्षी पिंजऱ्यात पाळून कितीही मन रमवलं तरी करानाला ते पुरत नाही. अनेक वष्रे अनेक संकटांत एकाकी संघर्ष करूनही करानात कडवटपणा मात्र येत नाही. विनाकारण गंमत म्हणून ती शिकार करत नाही. ती स्वतमध्ये आणि सभोवतालच्या निसर्गात एक प्रकारे साहचर्य निर्माण करते. ‘सॅन निकोलसची स्त्री’ म्हणून कराना पुढे प्रसिद्ध झाली. एका पाद्रय़ाला तिने खाणाखुणा करून आपली गोष्ट सांगितली. त्यावर आधारित हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सहज- सोप्या भाषेत केला गेला आहे. आवश्यक तिथे शब्दांचे अर्थ खाली दिले आहेत. त्यामुळे वाचकाला हे बेटावरचे अपरिचित जग समजून घेणे सोयीचे होते. मनोरंजन हेदेखील साहित्यिक मूल्य आहे. अशी सत्य-साहसकथांची रोचक पुस्तके याचा प्रत्यय देतात. - जुई कुलकर्णी ...Read more

  • Rating StarVaibhav Mahajan

    एक अद्भुत, विलक्षण, सत्यकथा....

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more