* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAHE KABIR MAIN PURA PAYA
  • Availability : Available
  • Translators : MEENA TAKALKAR
  • ISBN : 9788177666830
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`I FEEL CONTENTED WITH THE THOUGHT OF DEATH, OF WHICH ALL ARE SCARED.`_ KABIR. THOSE WHO ARE IGNORANT ARE SCARED OF DEATH. THOSE WHO UNDERSTAND DEATH, HAVE CONQUERED LIFE. DEATH IS THE SUPREME BEAUTY OF THIS WORLD. IF YOU WANT TO DESTROY YOUR SHADOW, YOU JUST HAVE TO STAND STILL AT A PLACE, THIS KILLS YOUR SHADOW. THE SAME THING APPLIES TO DEATH. THE MORE YOU TRY TO RUN AWAY FROM DEATH, THE MORE IT WILL FOLLOW YOU. BUT STAND STILL, GIVE IT A FEARLESS GLANCE AND YOU WILL FIND ELIXIR IN IT. STOP AND FACE THE DEATH. LEARN TO RECOGNIZE DEATH. YOU WILL COME ACROSS THE GOD. OSHO TRIES TO REVEAL NEW MEANING FROM KABIR`S `DOHA`. OSHO`S SIMPLE LANGUAGE MIGHT HELP YOU TO COME ACROSS THE TRUE MEANING OF LIFE.
``सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते.`` — कबीर जे अज्ञानी आहेत तेच मृत्यूला घाबरतात. ज्यांनी मृत्यू ओळखला आहे, त्यांनी जीवन जिंकले आहे. मृत्यूसारखी परम सुंदर गोष्टच नाही या जगात. जर तुमची सावली नष्ट करायची असेल तर तुम्ही एका जागी स्थिर होता, सावली आपोआप नाहीशी होते. जसे प्रत्येक समस्येकडे डोळे उघडून पहाता, समस्या आपोआप संपून जाते. मृत्यूचेही तसेच आहे. मृत्यूपासून पळायचा प्रयत्न केलात तर तो पाठलाग करेल. पण त्याकडे निर्भयपणे पहाल तर तो अमृतासमान भासेल. थांबा आणि मृत्यूला सामोरे जा. मृत्यू ओळखायला शिका. तुम्हाला परमेश्वर भेटेल. कबिरांच्या सुंदर दोह्यांमधून ओशो जीवनाचा नवा अर्थ शोधू पाहतात. ओशोंच्या रसाळ भाषेतले हे अर्थ वाचून कदाचित आपल्यालाही जीवन समजेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 24-09-2006

    आपल्या जीवनाविषयी, भोवतालच्या जगाविषयी अनेक प्रश्न ‘मृत्यू’ विषयीचे असतात. जन्माकडून मृत्यूकडे होणाऱ्या प्रवासात आपण सुखदु:खाच्या छायाप्रकाशात चाचपडत असतो. अशा वेळेस जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगणारी भगवान रजनीश उर्फ ओशो यांची पुस्तके निश्चितच मार्गदर्श ठरतात. त्यातलेच एक पुस्तक ‘मृत्यू अमृताचे द्वार’ ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या ‘कहे कबीर मैं पुरा पाया’ या हिंदी पुस्तकातील सात ते तेरा प्रकरणे मीना टाकळकर यांनी मराठीत अनुवाद केली आहेत. या सात प्रवचनांचे संकलन म्हणजेच ‘मृत्यू अमृताचे द्वार’ संत कबिराच्या सुंदर दोह्यांमधून ओशो यांनी जीवनाचा नवा अर्थ शोधला आहे. पहिले प्रवचन आहे, ‘जो जागा झाला त्यालाच ईश्वर भेटला! कबीर म्हणतात, ‘भैर चढै सो अधधर डूबै।’ या दोह्याचे विश्लेषण ओशोंनी केले आहे. कोणत्याही नावेमध्ये चढलात तरी प्रवाहाच्या मध्यभागी ती डुंबणारच. ‘निराधार भार पार’ ज्यांनी कोणत्याही आधार घेतला नाही, ते पैलतीरी सहज पोहोचतील. याबद्दल ओशो म्हणतात, जो नावेमध्ये चढला त्याच क्षणी त्याचे डुबणे सुरू झाले. कारण तो पोहू शकत नव्हता. म्हणून तर तो चढला. हा जीवनाचा प्रवास खरे तर एकट्याचा आहे. तो एकट्यानेच पोहून पार करावयाचा आहे. कुणावरही अवलंबून न राहाता स्वत:च्या सामर्थ्याने, श्रद्धा विश्वासाने पार पाडायचा असतो. कबिरांच्या वचनांचा अर्थ ओशोंनी वेगवेगळ्या दृष्टातांनी दाखले देऊन उलगडून सांगितला आहे. जो निराधार आहे तो त्याचा त्यालाच आधार आहे. जर परमेश्वराला आधार बनवले तर तुमच्या परमेश्वरांची काय किंमत राहिली? तुमचा परमेश्वर म्हणजे तुमची कल्पना आहे. जर तुम्ही परमेश्वराचा आधार न मानता स्वत:च स्वत:चा आधार झालात तर तिथेच परमेश्वर आपण होऊन आधार देतो, त्याआधी नाही. ‘एक परम समाधान’ या दुसऱ्या प्रवचनातही ‘अहंकारा’ विषयीचे कबिराचे वचन उलगडून सांगितले आहे. ते म्हणतात. अहंकार अडचण आहे, समर्पण उकल आहे. अहंकाराने रोग निर्माण केले तर समर्पणामुळे ते संपतील म्हणून तर सगळ्या शास्त्रांनी सगळ्या परंपरांनी समर्पणाचा महिमा गायला आहे. एक महत्त्वाचे सूत्र ओशोंनी सांगितले आहे की, आपला प्रश्न नीटपणे समजून घेतला आहे, त्यांचे समाधान होईल. दुसरे कुठेही नाही तर प्रश्नामध्येच उत्तर लपले आहे. ज्याला तुम्ही शोधताय ते कुठेही दुसरीकडे नसून ते तुमच्यातच दडले आहे. ‘अमृताचे दार मृत्यू आहे’ या तिसऱ्या प्रवचनात ‘मृत्यू’ संकल्पनेचा अर्थ उलगडून दाखवला आहे. एका बाजूने बघताना जीवन मृत्यू आहे. दुसऱ्या बाजूने बघताना जीवन संपूर्ण परमानंद वाटते. ते पूर्ण परमानंद आहे. ते उच्च परमजीवन आहे. बघण्याच्या दृष्टिकोनावर सारे अवलंबून आहे. चवथे प्रवचन ‘संन्यास परम सौभाग्य आहे.’ या शिर्षकाचे आहे. प्रत्येकच प्रवचनात सुरुवातीला कबिराच्या ओव्या दिल्या आहेत आणि पुढे प्रवचनात त्या ओवीचा अर्थ उदाहरणं, दाखले, देऊन ओशोंनी समजावून सांगितला आहे. पाचवे प्रवचन आहे ‘पंडितापासून सावधान’ या प्रवचनात कबिराविषयी आपल्याला काय वाटते ते ओशो सांगतात. ते म्हणतात. संतांमध्ये कबिराच्या तोडीचे कोणीच नाही. सगळे संत अद्भूत आहेत. त्याचे अद्वितीयपण हे आहे की त्यांचे उसने असे काहीच नाही. कबिराचा मार्ग मोठा सरळ-साधा आहे. खूप कमी लोकांचा रस्ता इतका सरळ साधा असतो. वाकड्या तिरक्या गोष्टीं कबिरांना पसंत नाहीत म्हणूनच त्यांच्या मार्गाचे नाव आहे ‘सहजयोगी’ण् सहावे प्रवचन आहे ‘शून्यामध्ये उडी’ या प्रवचनात चर्चा केली आहे ते मुद्दे म्हणजे - (१) मी शून्य होत आहे आता काय करू? (२) धर्मगुरुंसारखा कबिराचा व्यापक प्रभाव का पडला नाही? (३) दु:खापासून मुक्ती कशी मिळेल? (४) माझ्यावर गुरुकृपा कधी होईल? या चार मुद्यांवर कबिराच्या वचनांचा अर्थ सांगत उदाहरणे देऊन ओशोंनी चर्चा केली आहे. त्यात शेवटी म्हटले आहे की, माळी कोणतीही फुले स्वत:हून उमलवत नाही. पाणी देतो, खाद्या देतो परंतु कोणतेही फूल हाताने उमलवत नाही. रोपट्याला सुद्धा संधी देतो, की जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा पिकेल, जेव्हा वसंत येईल, जेव्हा फुलांच्या आत उमलण्याची क्षमता निर्माण होईल, तेव्हा फूल आपणहून उमलेल. आपणहून उमलणे हा सहजयोग आहे. सहजतेला समजलात तर कबिराला समजलात. शेवटच्या प्रवचनाने शीर्षक आहे ‘शब्दांची साधना करो’ जे शब्द शांतता आणि शीतलतेपासून येतात. असेच शब्द ऐका. क्रोध, शत्रुत्व, हिंसा आणि तिरस्काराचे शब्द ऐकायचे नाहीत. त्याचप्रमाणे युद्ध आणि विषाने भरलेला शब्द ऐकू नका. जेव्हा मनामध्ये तिरस्कार निर्माण होईल तेव्हा एकांतात बसा. परमेश्वराचे स्मरण करा. शीतल व्हा, शीतल बोला, शांतता ही जीवनशैली बनवा. तीच तुमची जीवनप्रणाली आहे. शांत होता होता, साधक होता होता एक दिवस तुम्ही साधू होऊन जाल. साधू होता एक दिवस तुम्ही कृतार्थ होऊन जाल. ‘मृत्यू अमृताचे द्वार’ हे पुस्तक म्हणजे कबिराच्या सुंदर दोह्यांमधून ‘ओशो’नी दिलेला जीवनाचा नवा अर्थ वाचकांना मार्ग दर्शविणारा आहे. ओशोंच्या रसाळ भाषेतल हे चिंतन जीवन-मृत्यूसंबंधी तत्वज्ञान सांगणारे आहे. -रजनी अपसिंगेकर ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 12-11-2006

    ओशोंच्या मुखातून कबीरवाणी!... ‘ओशो’ नाव घेतलं की भारतीय मनासमोर धर्माच्या विरोधात बंड करून उठलेली आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देणारी व्यक्ती डोळ्यासमोर येते. अशी सर्रास धारणा असलेल्या व्यक्तींनी एकतर ओशोंचं साहित्य वाचलेलं नसतं किंवा त्याबद्दल ते वालेल्यांकडून काही ऐकलेलंही नसतं. एक गॉसिप म्हणून ओशो बऱ्याचवेळा चघळले जातात. पण वस्तुस्थिती तर अशी आहे की, फ्रेडरिक नित्शे फ्रॉइड, रामकृष्ण, राजकारण, समाजकारण अशा सर्व विषयांवर अधिकारवाणीने मार्गदर्शन ओशोंनी केलंय. त्यांच्यावर धर्माच्या विपरित शिकवण केल्याचा आरोप केला जातो. तर त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ त्यामुळे अनेक संतांचे दाखले, त्यांचे विचार ओशो आपली धार्मिकता विषद करण्यासाठी मांडतात. दोह्यांमुळे आपल्याला माहिती असलेल्या कबीरांवर त्यांनी दिलेली व्याख्याने ‘मृत्यू अमृताचे द्वार’, ‘माझे माझ्यापाशी काही नाही’ आणि ‘भक्तीत भिजला कबीर’ या पुस्तकात संग्रहित करण्यात आली आहेत. ओशोंचा मुख्य विषय नेहमीप्रमाणेच परमेश्वर आणि मानव असा आहे. त्या ईश्वराला शोधण्यासाठी बाहेर नाही तर आत बघायला पाहिजे, हा उपदेश सर्वमान्य असला तरी सर्वसामान्यांच्या काही तो गळी उतरत नाही. पण कबिराच्या दोह्यांमध्ये नीट डोकावून बघितलं तर लक्षात येतं, परमेश्वर कसा आहे; तर तो जिथे हवा तिथे तसा आहे. आणि हे असं का आहे, हे ओशो मग अत्यंत रंजक अशा भाषेत पानापानात समजावत राहतात. या आशेने की, कधीतरी आपल्या मनातला अंधकार दूर होईल आणि या प्रचंड विश्वातल्या आपल्या आणि ईश्वराच्या बाबतीतल्या सत्य स्वरुपाचं आपल्याला ज्ञान होईल. साधारणपणे कुठलाही धार्मिक विषय हा रुक्ष असतो. एकदम कपाळावर भरपूर आठ्या घालून विश्वाचं ओझं आपल्याच डोक्यावर असल्यासारखी भावमुद्रा बुवांना आणि भक्तांना म्हणजे आपल्याला वागवावीच लागते. पण ओशोंच्या धार्मिकतेत मात्र निखळ विनोदाला स्थान आहे, समाजाच्या सबलीकरणाला स्थान आहे, शांततेला स्थान आहे, नृत्याला स्थान आहे. संगीताला स्थान आहे, थोडक्यात म्हणजे जीवनाला स्थान आहे. आणि जीवन आहे तर मृत्यूही आहे. या वास्तवाची जाणीव ज्यादिवशी खऱ्या अर्थी आपल्याला होते, त्यावेळी जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. मृत्यू आहे म्हणून जीवनाला काही अर्थ आहे. हे पटतं. मग कबीराचं ‘सारे जग ज्या मृत्यूला घाबरते त्याच मृत्यूने माझे मन आनंदित होते’ हे वचन आपल्याला आतल्या प्रवासाला जायला उद्युक्त करतं. लोकांनी आतल्या प्रवासाला सुरुवात करावी या उद्देशाने, धार्मिक बनावं या हेतूने असे हे कबीर आपल्याला ओशो या तीन पुस्तकांतून समजावून देतात. त्यामुळे अक्षरश: प्रत्येक व्यक्तीने ही पुस्तकं वाचणं ‘मस्ट’च आहे. -योगेश मेहेंदळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more